मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Missing Tile Syndrome…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Missing Tile Syndrome…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“काही लोक ‘ Missing Tile Syndrome’ या आजाराने ग्रस्त असतात. “

काल आम्ही सर्व मैत्रिणी नेहाकडे गेलो होतो. तिने नवीन घर बांधलेम्हणजे अगदी छान टुमदार बंगलाच बांधला. काल बाप्पाचे दर्शन, हळदीकुंकू व तिचे नवीन घर बघणे असा कार्यक्रम झाला.

सर्व मैत्रिणींनी छान गुलाबी रंगाच्या साड्या नेसायचे ठरविले होते व नेहा करिता छान gift पण घेतले होते.

नेहा कडे तिचे मिस्टर, जे इतक्यातच रिटायर्ड झाले आहेत. व तिचा मुलगा निशांत.

जो सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. म्हणजे एकुण मध्यम वर्गीय एक चांगला परिवार म्हणता येईल.

आम्ही वेळेवर पोचलो. नेहाने उत्साहाने आपला थ्री बेडरुम बंगला दाखवायला सुरुवात केली. किचन, ड्राय बाल्कनीहॉल मागची पूढची जागाछोटासा बगीचा वगैरे वगैरे. सर्वजण उत्साहाने बघत होतो. जो तो आपापल्या परीने कौतुक ही करत होते. घरातील wood workकिचन मधील डिझाईन colour combinations, भिंती चे रंग. प्रत्त्येक सहा महिन्यांत फॅशन बदलते. त्यामुळे हे नवीन घर बघायला सर्वांना मजा येत होती. नवीन घरात एक वेगळाच सुगंध दरवळत असतो.

सर्वच सारखे असतातअसं नाही ना. आमची पण एक मैत्रिण थोडी वेगळीच आहे. मी विचारच करत होतेअजून मॅडमने काही शेरा कसा मारला नाही?? expert comments कसे दिले नाहीत.???

तेवढ्यात सुरू झालेच. “अग! शहरापासून किती दूर आहे.  बंगला म्हंटला तर security चा प्रश्न येतोच.  या वयात फ्लॅटच बरा.  एवढ मोठं घर बांधले तर आहे. पण तुझी सतत तक्रार असतेच. कंबर दुखते ना. मग maintain कसं काय करणार?? “

” आमच बघ कस सुटसुटीत. एक समोर चा दरवाजा बंद केला, की काळजी नाही.  अगदी शहरात. खाली उतरलं की सर्व मिळत. रंग थोडे डार्क च वापरले आहेस तू. अंधार पडत असणार. दिवसा पण लाईट लावावे लागत असतील. “

विषय बदलावा म्हणून मी म्हंटल अग निशांत काय म्हणतो? शिक्षण पूर्ण होण्यातच असेल नाही का?? नेहा उत्तर देणार, तेंव्हाच “अग, आजकाल H1 B visa चा खूप. Problem चालू आहे.  नोकऱ्यांचा तर प्रश्न आहेच आहे. आमच्या अजय ची काळजी नाही आम्हाला. ‘citizenship’ मिळाली आहे ना त्याला. “बोलल्याच मॅडम. “

नेहा चे मिस्टर तर आधीच सटकले होते. नेहा हुं हां करत ऐकत होती. बाकी सर्व बैचेन झाल्या होत्या.

अग!! नेहा चल हळदीकुंकू दे. निघायला हवं आम्हाला. मी म्हंटल.

नेहाने हळदीकुंकू दिले. वाण दिले. व मस्त गरम गरम बटाटे वडे व गाजर हलवा ही होता. खरं तर सर्व व्यवस्थित झाले होते. एवढा पाहुणचार भरपूर होता. पण काय करणार?? बटाटे वड्यात आलं लसूण थोडे कमीच झाले होते ना. ‘वडे’ अजून थोडे तळायला हवे होते. असा मॅडमचा ‘expert comment’ आलाच.  बटाटे वडा करताना बेसन मधे थोडी तांदूळाची पीठी घातली की वरचा पापुद्रा कसा छान क्रिस्पी होतो. एक सूचना पण मिळाली.

आम्ही परत यायला निघालोनेहाने मला जवळ येऊन विचारले काय ग! घर कसे वाटले? बरे आहे ना.

मी म्हंटलेअग!! अगदी मस्त. फारच सुंदर. बटाटे वडे पण छान. , मस्तच.

नेहाचा चेहरा खुलला.

घरी येताना मी हाच विचार करत होतेकी मॅडमने जेवढ्या comments केल्या. त्यातील‌ एका तरी comment ची गरज होती का? ती वेळ बरोबर होती का? तुम्ही किती पण expert असाल. पण प्रत्त्येकाची आवड असतेइच्छा असतेपैशाचा ही विचार करायचा असतो. मुख्य म्हणजे तो त्यांचा विचार आहे. आपल्याला तेथे रहायचे ही नाही. व तुम्हाला कोणी विचारले ही नाही. आता नेहाने आपल्या तीस वर्षांच्या संसारात आधीही बटाटे वडे केलेच असतील ना.  पाहुण्यांनी पाहुण्यांसारखे रहावे. हा साधा सरळ सोपा नियम आहे.

आणि जर चूका काढायचे ठरविले तर स्वतः पासून सुरुवात करावी.  

खूप लोकांना दुसर्यांच्या आनंद साजरा करता येत नाही. कौतुक करणे तर सोडाच.

” जिभेचं वजन खूप कमी असते, म्हणून तिचा तोल सांभाळणं कठीण काम असते. ” प्रत्येकाला जमतेच असं नाही. .

असे लोक वेळ बघत नाही, मौका बघत नाही, बोलतात. आपली तुतारी सतत प्रत्येक क्षेत्रात वाजवत राहतात. IMeMyself याच्या बाहेर ते निघतच नाही. विषयवेळ, काळ कोणताही असो ‘I am the best ‘ I know everything. हेच दाखवायचा प्रयत्न असतो. व लक्ष नेहमी दुसऱ्यांच्या रिकाम्या अर्ध्या ग्लास वरच असतं. कमजोर मनाचा व्यक्ती जर यांच्या बरोबर सतत राहिला तर तो तर डिप्रेशन मध्ये जाईल.

अरे!! देवा तू मला काहीच गुण दिले नाहीअशी तक्रार तो देवाजवळ करेल.

स्वतःचा ‘ EGO ‘ सांभाळतानाते किती लोकांना दुखवतातहे त्यांना कळत नाही. समोरचा माणूस उत्तर देत नाही. याचा अर्थ तो बोलू शकत नाही. असा होत नाही. प्रत्येकाला डोळेकानतोंड असतंच की. बुद्धी पण देवाने दिलीच आहे. तो वादविवाद टाळतो. वातावरण खराब होऊ नये. याचा प्रयत्न करतो म्हणून बोलत नाही. परंतु कधी कधी ठोकावच. त्याशिवाय ते सुधारणार नाही. हे पण नक्की. अस माझं मत आहे.

उद्या मॅडम कडे मुलांचे लग्न होणारसून येणार तेंव्हा काय होईल? आज हळद जास्त झाली. उद्या मीठच कमी झाल. गॅस किती मोठा ठेवलाय? वगैरे वगैरे. हे असच मॅडम करणार का??

काही जण “missing tile syndrome” या आजाराने ग्रस्त असतात. चूका (त्यांच्या दृष्टीने) शोधणे व‌ दाखविणे आपला जन्मसिद्ध अधिकार समजतात. स्वतः बद्दलही विचार करावा थोडासा. नेहा पण सहज उत्तर देऊ शकली असती.

मी म्हणेन तेच बरोबर. तेच झालं पाहिजे. ते दुसऱ्यांना गृहित धरतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट आपण कुठे बुधवारी जाऊ म्हंटल तर त्या म्हणतील नाहीआपण शुक्रवारी जाऊ या.

गृप मधे सर्व सारखेच ना. असं ‘self style commander ‘ बनायची गरज नसते. मैत्रित ‘सर्वानुमते’ हा शब्द खूप महत्त्वाचा असतो.

एकदा असा स्वभाव कळला तर हळूहळू लोक दूर जातात. किंवा नाइलाजाने ऐकतात.

असा स्वभाव घरचे सहन करतील. बाहेरच नाही. घरचे ही हळूहळू विरोध करतातच.

आता मात्र मी ठरवलंय मॅडम बरोबर बाहेर जायचे नाही. समोरचा बदलत नाही, तर आपणच बदलावे.

काही गोष्टी वयामानाप्रमाणे शिकायच्या असतात. काही सवयी ठरवून बदलायच्या असतात. काही नाही आवडलं तरी सहन करायचं असत. आपल्या बॉडी लॅंगवेजवर expressions वर लक्ष द्यायचं असत. माझ्या दोन गोष्टी तुम्हाला आवडतं नाही, ठीक आहे. अगदी मान्य आहे. माझ्यात दोन नाही, दहा गोष्टी तुम्हाला न आवडणाऱ्या असतील. तसंच तुमच्या ही चार गोष्टी मला आवडत नाहीत. हे पण तेवढंच खरं आहे. हेही लक्षात असू दयाव. तुमचाही अर्धा ग्लास रिकामा आहेच.

अशा प्रसंगांना कसे handle करायचे हे प्रत्येकाला ठरवायचे असते. दुर्लक्ष करायचे, मनाला लावून घ्यायचेकी सडेतोड उत्तर द्यायचे. न बोलता आपली नाराजी दर्शविली तरी चालेल.

खरंतर इतरांच्या नजरेत आपण कोण आहोत? याने काही ही फरक पडता कामा नये.

*I must learn to value myself. * 

लोकांच्या बोलण्यामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा आपली मानसिक शांती जास्त महत्वाची हेही खरंय.

“मी अशीच आहे “. म्हणून चालत नाही. वय कोणतेही असो ‌गृपचे manners व attiquets वेगळेच असतात. टीम चा मेंबर रहायचे असैल तर ते पाळणे गरजेचे असते.

अस नाही की हे असे लोक पॉझिटिव्ह कमेंट / कौतुक करतच नाहीत. करतात पणफक्त काही लोकांचेजेथे फायदा असेल तेथे कौतुक करतात आणि तेथे चमचेगिरी करायला पण लाजत नाहीत..

म्हणतात ना,

“Be generous while giving compliments.

Your words can change their world. “

“Comments do wonders. “

*कौतुक शब्द जरी छोटा असला तरी ते करायला मन मात्र मोठं लागत. * 

 

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कानाला खडा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “कानाला खडा…” ☆ श्री सुधीर करंदीकर

 “कानाला खडा

 – – “ माझा व्हॅलेंटाईन डे “

सगळेच जण आपापल्या आवडींप्रमाणे व्हॅलेंटाईन डे हा दिवस साजरा करत असतात. माझा या वर्षी हा दिवस असा होता…

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात जवळची मैत्रिण, म्हणजे बायको, तिला ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ केले. मी रोजच सकाळी कारण शोधून बायकोला शुभेच्छा देत असतो. अगदीच काही कारण नसेल, तर, हॅपी सोमवार वगैरे, असे पण विश करतो. बायको खुश असेल तर दिवस छान जातो, हा माझा आजवरचा अनुभव!

सकाळचे खाणे आटोपले आणि घराच्या बाहेरच्या बागेत झाडांना पाणी घालायला बायको बाहेर गेली. मी काहीतरी किरकोळ काम करत होतो. तेवढ्यात बायकोचा बाहेरुन आवाज़ आला –

अहो, ग्लासभर गरम पाणी प्यायला देता का?

चला, बायकोला खुश करायला अजुन एक चान्स मिळाला, असा विचार करून मी लगेच गॅसवर दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले. तेवढ्यात हॉलमधून मोबाईलची रिंग वाजली. धावत हॉल मधे गेलो. कॉलेज मैत्रीण छायाचा फोन होता.

मी : छायाजी नमस्ते, आज एकदम सकाळी सकाळी फोन!

छाया : अरे आज १४ फेब्रुवारी. हॅपी वैलेंटाईन डे.

मी : ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’. शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. भरपूर जुन्या-नव्या गप्पा झाल्या. आता पुढचा फोन मी करायचा असे ठरले. बाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे करून फोन संपला. किती वेळ गेला हे समजलेच नाही. फोन टेबलवर ठेवला आणि गॅसवर पाणी आहे, ही डोक्यात टयुब पेटली. धावत आत गेलो. गॅसवरचे दोन ग्लास पाणी आटून पाव कप पाणी झाले होते. तेवढ्यात बायकोचा बाहेरून आवाज आला,

‘अहो, आज गरम पाणी मिळणार आहे कां?

मी : सॉरी, पाणी गॅसवर लगेच ठेवलं होतं, पण माझ्या गोंधळात, गॅस ऑन करायलाच विसरलो होतो. आता लगेच देतो. असे म्हणून, मायक्रोवेव्ह मधे 30 सेकंदात पाणी गरम केले आणि खिडकीतून बाहेर बायकोला ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ म्हणत पाणी दिले. बायको पुन: खुष.

११ च्या सुमाराला माझी फर्माईष म्हणून बायकोकडून मला गरमा-गरम चहा मिळाला. बायकोला म्हटलं, चला, आज वॉशिंग मशीन मी लावतो. आमच्या घरात वाशिंग मशीन वरच्या मजल्यावर आहे. कपड्यांची बादली घेऊन वर गेलो. तेवढयात मित्राचा फोन आला. फोनवर बोलत-बोलत वर गच्चीत गेलो. ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ ची देवाण -घेवाण झाली. ३-४ मिनिटात फोन संपला. मशीनकडे गेलो. साबण पावडर टाकली. अ‍ॅक्टीव्ह सोक – वॉश – रिंझ – स्पिन अशी सायकल सिलेक्ट केली. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. रिंग वाजली की आपण हातातले काम सोडून का पळतो, हे अजुनहि मला समजत नाही. मशीनचे झाकण घाई-घाईत लावले आणि गच्ची मध्ये रेंज छान असते म्हणून फोन घ्यायला गच्चीत गेलो. व्हेरी व्हेरी ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ अशी तिकडून सुरूवात झाली. अननोन नंबर – लेडीज आवाज – कोण आहे, हे ओळखण्याकरता तिकडून अनेक क्लू -जसे नावातली / आडनावातली अक्षरे वगैरे, असे सुरू झाले. माझी टयुब पेटत नव्हती. मी म्हटलं, तुमचं लग्नाच्या आधीचं नाव आणि आडनाव यातली काही अक्षरं सांगा, लगेच ओळखतो. तिकडून २ – ३ अक्षरं आली आणि मी एकदम ओरडलो, अरे, ‘X X X’ तू —-!

काय पत्ता आहे? कुठे होतीस???? अशा अनेक प्रश्नांची मी सरबत्तीच सुरू केली. अहो -जाहो वरून अरे – तुरे वर केव्हा आलो आणि दोघेहि भूतकाळात कधी गेलो हे समजलेच नाही. आता कुठे भेटायचे / कसे भेटायचे हे ठरले, आता पुढचा फोन मी करायचा असे पण ठरले. बाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे करून फोन संपला. गच्चीचं दार लावलं आणि आत आलो. तेवढयात बायकोचा खालून आवाज आला –

‘अहो, मशीन झालेलं दिसतयं, ‘बीप – बीप’ आवाज येतोय’.

मशीनची सायकल नुकतीच संपली होती आणि ‘बीप – बीप’ आवाज येत होता. मेनस्वीच बंद केला, झाकण उघडलं आणि गोंधळ लक्षात आला. सगळे कपडे बाहेर बादलीतच होते. मशीन मोकळीच होती. म्हणजे मशीनमधे पाणी घेणे, साबणाचा फेस होणे, पाणी फेकणे, पुन: पाणी घेणे, असे सगळे सोपस्कार बिन कपडयांचेच झाले होते. तेवढयात बायकोचा खालून आवाज आला —

बायको : कपडयांची बादली जिन्यात आणून ठेवा, मी वाळत घालीन.

मी : अग, जरा गोंधळ झाला. मशीन झाली आहे, पण मी मशीनमधे साबण टाकायला विसरलो होतो. आता साबण टाकून पुन: मशीन लावली आहे.

बायकोचा विश्वास बसला की नाही, हे कळायला मार्ग नव्हता.

खाली आलो आणि बागेत गेलो. एक खडा घेऊन कानाला खडा लावला – की, पुढच्या व्हॅलेंटाईन-डे ला – 

बायकोनी गरम पाणी प्यायला मागितले तर पाणी गॅस वर गरम न करता, मायक्रो वेव्ह मधे गरम करायचे.

वॉशिंग मशीन लावायचे असेल तर, मशीनमधे आधी कपडे टाकायचे, मग पुढचे सोपस्कार करायचे… ,

कारण व्हॅलेंटाईन डे म्हणजे मैत्रिणींचे फोन हे येणारच…

सगळ्यांना पुढच्या व्हॅलेंटाईन डे करता शुभेच्छा…

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ६१, ६२, ६३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६१, ६२, ६३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

नारद भक्ति सूत्रे : ६१

लोकहानौ चिन्ता न कार्या निवेदितात्मलोकवेदत्वात् ||६१||

अर्थ : भक्ताने आपला स्व आणि लौकिक व वैदिक कर्मे भगवंताला अर्पण केलेली असतात. म्हणून लोक व्यवहारात हानी झाली तरी त्याने चिंता करू नये.

विवेचन : *श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही, तसे भक्ति करायला शिकवावे लागू नये…! (नारद मुनींची इतकी सूत्रे अभ्यासल्यावर तर अजिबातच नाही…)* तर मनुष्याला श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही…! भक्तिमार्गात जाणे किंवा भक्तीमार्ग लाभणे हे कदाचित दैवाधिन असू शकेल. मागे आपण एक विचार केला की अनुदिनी अनुतापें… अशी स्थिती आल्यावर जर मनुष्य भक्तिमार्गाकडे अग्रेसर झाला तर त्याने तो मार्ग स्वतःहून सोडू नये…

*भक्तीमार्ग अनुसरणे हा एक प्रवास आहे. प्रवासात स्थिर असलेली झाडं आपल्याला पळताना दिसतात… , अर्थात याचे बालपणी जितके नवल अथवा आकर्षण असते, तितके आकर्षण मोठेपणी राहता नाही, कारण आपले वाहन पुढे जात असते, याचे पूर्ण ज्ञान मनुष्याला झालेले असते… *

मनुष्याच्या आयुष्यात येणारी सुखदुःख ही त्या पळणाऱ्या झाडांप्रमाणे खोटी असतात, किंवा आपल्या मनाने तयार केलेली असतात, हे मान्य करण्याचे सामर्थ्य आपल्याला भक्तीच देत असते. परमेश्वर आपल्याला जीवनाचा सारथी आहे. तोच आपला जीवनरथ हाकत आहे आणि आपण त्याच्यावर भार टाकून निर्धास्त झाले पाहिजे ही जाणीव आता साधकाला होऊ लागते. मग तो अधिकाधिक निश्चिंत होऊ लागतो…

भक्तिमार्गात वाटचाल करताना साधक असो व सिद्ध असो सुखदुःख त्याच्या वाट्याला येतातच येतात. कारण त्यामागे त्याचे प्रारब्ध असते. त्याचे त्याला ते भोगून संपवावे लागते. इथे भक्त आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताची इच्छा आहे असे मानून त्यातून अलिप्त होत जातो आणि कर्मबंधांतून मुक्त होत जातो.

एका साधूकडे एक मनुष्य गेला. साधूला म्हणाला की माझ्यामागे भूत लागले आहे. ते मला सोडत नाही. साधूने आपल्या सामर्थ्याने भुताला बोलावले आणि त्याला सांगितले की या मनुष्याला सोडून दे. त्यावर ते भूत म्हणाले की मी आता सोडायला तयार आहे. पण हा मनुष्यच मला सोडत नाही…! सामान्य मनुष्य आपल्या मनाने अशी भीतीची अनेक भुते निर्माण करतो आणि स्वतःच त्यांना धरून ठेवतो, त्यांना चिकटून बसतो आणि आयुष्यभर दुःखी राहतो… 

साधकाने कसे वागावे किंवा साधनेच्या विशिष्ठ टप्प्यावर साधकांची मनोवृती कशी असते किंवा असावी याचे वर्णन माउली पुढील ओवीत करतात…

करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥

(ज्ञानेश्वरी १२. ११८)

जय जय रघुवीर समर्थ

 – – – – 

नारद भक्ति सूत्रे ६२

न तदसिद्धौर लोकव्यवहारो हेयः किन्तु फलत्यागस्तत् साधनं च कार्यमेव ॥ ६२ ॥

अर्थ : जोपर्यंत चिंता न करणे साधले नाही तोपर्यंत साधकाने लौकिक कर्माचा त्याग करू नयेज त्यांना सोडू नये. कर्मफळाचा त्याग मात्र प्रयत्नपूर्वक निष्ठेने करीत रहावे.

विवेचन : काळाच्या पुढे धावती ती काळजी. मनुष्य सर्व काही सोडतो पण तो काळजी सोडत नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की मनुष्याने मनुष्याने नामस्मरणभक्तीच्या सहाय्यानं

काळाच्या छाताडावर नाचावे. पण प्रत्यक्षात मात्र याच्या उलट होताना दिसते…

संताच्या दारी जाऊन आले की मनुष्याला आपण चिंतामुक्त झाल्यासारखे वाटते. पण त्याची काळजी, चिंता घरी पोचण्याआधीच त्याच्या छाताडावर नाचू लागतात.

साधनेत प्रगती होऊ लागली की साधक खऱ्या निश्चिंत होऊ लागतो, पण ती स्थिती कायम राहते असे म्हणणे धाडसाचे ठरते. ज्याप्रमाणे सायकल चालवायला शिकणारा मुलगा सायकल शिकत असतो, तेव्हा तो थोडा थोडा तोल सांभाळू लागतो. त्याला वाटतं आपण सायकल पूर्णपणे चालवायला शिकलो. पण प्रत्यक्षात मात्र तसं होतंच असं नाही… , मनुष्य अनेक वेळा पडतो आणि सायकल चालवायला शिकतो… पण जोपर्यंत त्याच्यात निपुणता येत नाही, तोपर्यंत त्याचे सायकल चालवताना पडणे अगदीच स्वाभाविक असते आणि जोपर्यंत तो निपुण होत नाही, तोपर्यंत त्याने सायकल चालवण्याचा सराव करणे सोडून चालत नाही…

साधकाने असेच करावे असे नारद मुनी आपल्याला सांगत असावेत. साधनेचे विविध टप्पे असतात…! जोपर्यंत नदी सागराला जाऊन मिळत नाही, तोपर्यंत तिची कधी खळखळ, तर कधी शांत प्रवाह असे चालूच राहते. फक्त नदीने वाहणे थांबवून चालत नाही…!

साधकाचे असेच होते असे सर्व संत सांगतात. साधनेच्या काळात देखील थोडीफार भरती ओहोटी असतेच..! घालमेल चालू असतेच…! थोडक्यात साधकाने आपली विहित कर्मे टाकून चालत नाही. जोपर्यंत साधनेत पूर्णत्व येत नाही, तोपर्यंत त्याने आपली विहित कर्म टाकू नयेत. फक्त त्याचे फळ मात्र भगवंताला अर्पण करावे. संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग या सूत्रांचे विवेचन करणारा आहे असे म्हणता येईल.

“नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥२॥ नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥३॥ तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥४॥”

(अभंग क्रमांक 870, सार्थ तुकाराम गाथा. धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ

– – – 

नारद भक्ति सूत्रे ६३

“स्त्रीधन नास्तिकवैरीचरित्रं न श्रवणीयम्‌ ||६३||”

अर्थ : स्त्रिया, धन, संपत्ती, ऐश्वर्य, नास्तिक लोक आणि शत्रू यांचे वर्णन ऐकू नये.

विवेचन : आपल्याकडे सहा विकार प्रमुख सांगितले आहेत. आता विकारांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही…!

दूरदर्शन, दूरचित्रवाणी, चोवीस तास चालणाऱ्या बातम्या, सामाजिक माध्यमे, त्यात भर म्हणून झटपट पैसा देणार अनेक खेळ सध्या मोबाईल वर उपलब्ध आहेत, तसेच आधुनिक जीवनशैली मनुष्याला निसर्गापासून दूर नेत आहे आणि नवनवीन मानसिक, शारीरिक, भावनिक आजारांना आमंत्रण देत आहे. इतक्या व्यवधानातून लक्ष काढून ते *आत*मध्ये वळवणे किती अवघड…!

नारद मुनींच्या काळात फक्त सहा विकार होते. त्यात सुद्धा काम आणि क्रोध हे जास्त महत्वाचे आहेत. या सूत्राच्या सुरवातीला स्त्रीचा उल्लेख झाला आहे. जवळजवळ सर्व साहित्यात पुरुषांना स्त्रीपासून सावधान राहायला सांगितले आहे. थोडा सखोल विचार केला तर मनुष्य स्खलनशील प्राणी आहे. यात स्त्रीपुरूष असा विषय असण्याचे कारण नाही. पण सर्व संतांना हा विश्वास होता की स्त्रिया वाईट मार्गाला जाऊ शकणार नाहीत, पण पुरुषांबद्दल तितका विश्वास त्यांना वाटतं नसावा. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की आजपर्यंत धर्म टिकला तो स्त्रियांमुळेच..!

असो, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रीच्या मोहात पडून अनेक लोक पथभ्रष्ट झाल्याचे आपल्याला आढळेल. गीतेत भगवंत म्हणतात,

“अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया|

स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर||”

(गीताई ०१. ४१)

इथे स्त्री वाईट नाहीच आहे, पण पुरुषांना परस्त्रीबद्दल आसक्ती वाटते ती वाईट आहे आणि यातून त्यांचे पतन होत जाते. आपल्याकडे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यात पहिला आहे धर्म. दुसरा आहे काम, तिसरा आहे अर्थ आणि चौथा आहे मोक्ष.

धर्मावर आधारित आचार, विचार आणि व्यवहार. धर्मावर आधारित काम इथे अपेक्षित आहे. धर्मावर आधारित आचरण, त्यावर आधारित काम आणि त्यावर आधारित अर्थाची प्राप्ती झाली तर मोक्ष नक्कीच दूर नाही.

संत तुकाराम महाराज आपल्या साधनेच्या प्रारंभिक टप्प्यात त्यांचे जे अनुभव आहेत ते अभगांच्या द्वारे लिहिले आहेत. ते म्हणतात,

स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।

काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥

*

नाठवे हा देव न घडे भजन ।

लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु. ॥

*

दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें ।

लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥

*

तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु ।

परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥

*
(अभंग क्रमांक 239 सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

साधकाच्या मनातून स्त्री आणि पुरुष हा भेद जाईपर्यंत काळजी घ्यावीच लागते. एकदा का साधक पक्का झाला की मग त्याच्यावर या कामक्रोधाचा प्रभाव पडत नाही. मला इथे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक घटना आठवते. परदेशात असताना त्यांना एक तरुणी भेटायला आली. तिने त्यांच्याकडे मागणी केली की मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. सामान्य

साधक असता तर त्याने काय केले असते हे सांगणे अवघड आहे, पण स्वामी विवेकानंद तिला म्हणाले की माझ्या सारखा मुलगा कशाला हवा आहे, मातोश्री मलाच आपला मुलगा माना, मी आपल्याला माझी आई मानतो.

गीतेत भगवंत म्हणतात,

“काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण|”

“तीन हीं नरक द्वारें टाळावीं चि म्हणूनियां||”

(गीताई १६. २१)

– – धन मिळवणे हा आपल्याकडं पुरुषार्थ मानला गेला गेला आहे. विहीत मार्गाने धन मिळवणे हा पुरुषार्थ आहे. चोरी करून धन मिळवणे यात कसला आलाय पुरुषार्थ?

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात धनाबद्दल आपले मत सांगतात.

“जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।

उदास विचारें वेंच करी।।”

(अभंग क्र. 2864, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

साधना करणे म्हणजे स्वतःला अधिकाधिक नव्हें, तर पूर्ण शुद्ध करणे. त्यासाठी निर्विकार होणे. विकार भगवंताने निर्माण केलें आहेत तर वाईट नसणारच, पण ज्याप्रमाणे औषधाची ठराविक मात्रा असते, तसे विकार त्या मात्रेत घेतले तर ते पूरक ठरू शकतात, अन्यथा विकारांची मालिका चक्रवाढ पद्धतीने वाढू शकते.

भक्तिमार्गात अग्रेसर होत असताना साधकाची दृष्टि आणि मनोवृत्ती अशी होते की त्याला सगळीकडे भगवतांचे अस्तित्व जाणवू लागते. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मला प्रत्येक गोष्टीत राम दिसतो.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– नारद भक्तीसूत्रे : ६१, ६२, ६३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नसानसात फौज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नसानसात फौज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

Once a solider…. always a soldier! असं म्हणतात त्याचा प्रत्यय प्रत्येक सेवानिवृत्त सैनिकांच्या जीवनात येतोच येतो! दुस-या कोणत्याही पेशापेक्षा सैनिकी पेशा अर्थात सैनिकी जीवन माणसाला विविधांगी अनुभवांनी समृद्ध करत असते.

भारतीय सैनिक तर याबाबतीत खूपच सुदैवी म्हणायला पाहिजेत. त्यांना त्यांच्या सेवाकाळात देशाच्या विविध सीमांवर, राज्यांत कर्तव्यावर जावे लागते. प्रचंड उष्ण वाळवंट ते अतिथंड सियाचीन असा सैनिकांचा प्रवास होतो. वर्षातील सुमारे नऊ महिने सैनिक त्यांच्या तुकडीत (युनिट)मध्ये वास्तव्य करीत असल्याने ती तुकडी हेच त्यांचे कुटुंब बनून जाते. त्यांच्या रेजिमेंटची सन्मानचिन्हे, बोधचिन्हे, बोधवाक्ये, ब्रीदवाक्ये आणि युद्धघोषणा या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात… जणू शरीराचा एखादा अवयवच. याच सोबत सैनिकी जीवनातील शिस्तीलाही, भाषेलाही सैनिक सरावलेले असतात. त्यामुळे सेवानिवृत्त होऊन नागरी जीवनात (सिविलीयन) वावरताना त्यांना मोठे समायोजन करावे लागते!

बारीक केस राखणे, गुळगुळीत दाढी करणे, वेळ पाळणे, व्यायाम करणे, कपडे, बूट इत्यादी टापटीप ठेवणे इत्यादी ठळक वैशिष्ट्ये असतात सेवानिवृत्त सैनिकांची. सेवानिवृत्त सैनिक ही सुद्धा देशाचे एक बलस्थान असते. असो.

मागील दोन लेखांत मी भारतीय सैन्यातील 21, Special Forces चे सन्मानचिन्हाबद्द्ल अर्थात ‘वाघनख’ बाबत लिहिले होते. आणि त्यानंतर मेजर दीपेंद्रसिंह सेंगर (सेवानिवृत्त) साहेबांच्या एका मोहिमेबाबत लिहिले होते. त्यात आपल्या महाराष्ट्राचे शूर सैनिक आणि अहिल्यानगरचे रहिवासी सुभेदार मेजर श्री. बाळासाहेब मोहारे (सेवानिवृत्त) साहेब यांचा उल्लेख होता. मोहारे साहेबांशी झालेल्या मोबाईल संभाषणात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण घराबाबत समजले.

मोहारे साहेबांनी त्यांच्या दुमजली घराला नाव दिले आहे… ’वाघनख’! कारण मोहारे साहेब 21, Special Forces मध्ये Commando म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या बंगल्याला नाव दिले आहे… Commando House!

जेंव्हा त्यांनी व्यावसायिक इमारत उभारली तेंव्हा त्या इमारतीवर राष्ट्ध्वज फडकत राहील, अशी व्यवस्था तर केलीच परंतू त्यांच्या 21, Special Forces दलाचे जे चिन्ह आहे, त्या चिन्हाचे नाव या इमारतीवर ठळक अक्षरांत लिहिले… वाघनख! या नावाबाबत बरेच लोक अनभिज्ञ असतील. काही लोकांनी मोहारे साहेबांना विचारलेही… तुमचे आडनाव तर मोहारे आहे… ते बदलून तुम्ही ‘वाघनख’ केले आहे का?

भारतीय सैन्य, सैन्याच्या परंपरा, त्यांची बोधचिन्हे, सन्मानचिन्ह यांबाबत हल्ली हल्ली जागरूकता वाढलेली दिसते. परंतू अजूनही सविस्तर अशी माहिती खूप कमी लोकांपर्यंत पोहोचते.

 वर्ष १९८५. भारतीय सैन्यात मराठा लाईट इन्फंट्रीची २१वी बटालियन उभारण्यात आली… भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्सचा विचार करता ही बटालियन तशी ‘तरुण’ किंवा नवी कोरी म्हणावी अशी होती. सीमापारचे शत्रू तर आहेतच, परंतू देशांतर्गत शत्रू सुद्धा काही कमी नाहीत. उत्तर-पूर्वेकडे देशाला विशिष्ट असा शेजार लाभलेला आहे. विघटनवादी शक्ती या देशांच्या सीमावर्ती भागांत तसेच त्यांच्या सीमांत लपून भारताविरोधात सशस्त्र कारवाया करीत असतात. या भागातील विशिष्ट भौगोलिक रचना लक्षात घेऊन अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यास सक्षम ठरेल असे PARA SPECIAL FORCES ची एक स्वतंत्र तुकडी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि २१, मराठा लाईट इन्फंट्री चे रुपांतर PARA SPECIAL FORCE मध्ये केले गेले. २१ मराठाचे स्पेशल फोर्सेस दलात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी रत्नागिरीतल्या मोरावणे गावात जन्मलेल्या कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांच्या समर्थ खांद्यांवर देण्यात आली. शिंदे साहेबांनीच या दलाचे नाव, हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी क्रूरकर्मा अफजल खान याच्या वधासाठी वापलेले ‘वाघनख’ हे शस्त्र असावे, यासाठी खूप आणि यशस्वी प्रयत्न केले!

मोहारे साहेबांनी इमारतीला ‘वाघनख’ नाव देण्यासोबतच घराचे दरवाजे सुद्धा विशेष बनवून घेतलेले आहेत. त्यावर ‘INDIAN ARMY’, ‘SPECIAL FORCES’ ‘वाघनख’ ही अक्षरे अंकित केलेली असून बलिदान BADGE कोरलेला आहे. आणि 21 आकड्यातील 1 च्या जागी वाघनखाचे चित्र अंकित करण्याची कल्पकताही दाखवली आहे. ही दृश्य प्रतिके लोकांना माहिती तर देतातच परंतू प्रेरणाही देतात!

सैनिक कल्याण कार्यात हिरीरीने सहभागी असलेले सुभेदार मेजर बाळासाहेब ऊर्फ बाळू मोहारे (सेवानिवृत्त) यांनी आपल्या कृतीतून देशभक्तीचे उदाहरण घालून दिलेले आहे. इंग्लंडमधून ‘वाघनख’ महाराष्ट्रात दर्शनार्थ आणले होते. त्या वाघनखाच्या प्रदर्शनाच्या उपक्रमातही मोहारे साहेबांनी हातभार लावला होता. त्यांच्या नसा-नसांत भिनलेली देशभक्ती, भारतीय सैन्याबद्दलचा अभिमान कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असाच आहे. धन्यवाद, मोहारे साहेब! जयहिंद!

(पंजाबातले लोक त्यांच्या घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांना विविध आकार देतात… विमान, रणगाडा, पक्षी, प्राणी वगैरे..)

– – – या लेखासाठी मोहारे साहेबांनी छायाचित्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. सैनिकांसाठी कार्य करणा-या ज्योतीताई गोखले-पेंडसे यांच्या सहका-यामुळे मोहारे साहेबांचा संपर्क क्रमांक उपलब्ध होऊ शकला. धन्यवाद!)

 

लेखक : संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

मंदिराच्या पायऱ्या चढताना हातातील फुलांच्या हारापेक्षाही मनातील मागण्यांचे ओझे जास्त जड असते..

प्रत्येक पाऊल एका अपेक्षेने पडत असते आणि प्रत्येक नमस्कारात काहीतरी पदरात पाडून घेण्याची धडपड असते..

आपण देवाकडे जातो ते बहुधा स्वतःला अपूर्ण समजूनच..

कुणाला धन हवे असते, कुणाला यश, तर कुणाला केवळ मनाची शांती..

पण या मागणारे आणि देणारे यांच्या गर्दीत एक निराळाच प्रवाह वाहत असतो.

तो म्हणजे त्या जिवांचा, ज्यांनी मागणे सोडून दिले आहे..

ज्यांच्या डोळ्यांत आता आसवांची जागा एका संथ शांततेने घेतली आहे..

​माणूस जेव्हा स्वतःच्याच अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावतो, तेव्हा त्याला उमजते की खरी श्रीमंती बाहेरून काही मिळवण्यात नसून आत जे आहे त्यात तृप्त राहण्यात आहे.

हे जगणे सोपे नसते..

या तृप्तीला एक सूक्ष्म दुःखाची किनार असते. हे दुःख एखाद्या जुन्या जखमेसारखे नसते, तर ते एका अशा जाणीवेचे असते की आता आपल्याला जगाकडून काहीही नको आहे..

ज्याला काही नको असते, तोच खऱ्या अर्थाने ‘सुखी आत्मा’ असतो..

पण या वैराग्यात एक प्रकारची एकाकीपणाची सावली असते..

जग जेव्हा धावत असते, ओरडत असते, तेव्हा हा माणूस आपल्याच हृदयाच्या कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो..

ही तृप्ती आनंदापेक्षाही जास्त गंभीर आणि मौनापेक्षाही जास्त सखोल असते..

अशा वेळी बाहेरच्या मूर्तीसमोर हात जोडण्याचं भानही उरत नाही, कारण साऱ्या जगाला व्यापणारा तो विधाता स्वतःच्याच निवांत एकांतात सामावलेला असतो..

हे एक नितांत सुंदर सत्य आहे..

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # १६० ☆ लघुकथा – आस ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है सामाजिक विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा ‘आस। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # १६० ☆

☆ लघुकथा – आस ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

“सर! अनाथालय से एक बच्ची का प्रार्थना पत्र आया है।”

“अच्छा, क्या लिखा है उसने ?”

“पत्र में लिखा है कि वह पढ़ना चाहती है, उसे स्कूल आना है.”

“क्या नाम है उसका?”

“रेणु।”

“रेणु ? पर अभी तक तो वह पढ़ने के लिए तैयार ही नहीं थी – वह अचंभित थे । कितना समझाया था हम लोगों ने उसे लेकिन वह स्कूल आई ही नहीं।”

स्कूल की शिक्षिका ने एक पत्र उनके हाथ में देते हुए कहा – “सर! आप रेणु का यह प्रार्थनापत्र पढ़िए — ”

“टीचर जी! मुझे बताया गया है कि विदेश से कोई मुझे गोद लेना चाहते हैं| वो मेरे मम्मी- पापा होंगे न! अंग्रेजी नहीं आएगी तो मैं अपने मम्मी -पापा से बात कैसे करूंगी ? मुझे उनसे बहुत सारी बातें करनी है। मुझे नहीं मालूम था कि मम्मी-पापा से बात करने के लिए स्कूल जाना जरूरी होता है, मुझे पढ़ना है टीचर! — रेणु “

 

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – richasharma1168@gmail.com  मोबाईल – 09370288414.

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # २८४ ☆ हनुमान जयंती विशेष – भक्ति, शक्ति और हरियाली… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना भक्ति, शक्ति और हरियाली। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख # २८४ ☆

☆ हनुमान जयंती विशेष – भक्ति, शक्ति और हरियाली… ☆  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

भक्ति, शक्ति और हरियाली: हनुमान जी का वो संदेश जिसे आज का युवा भूल रहा है… और फिर से पा सकता है।

हनुमान जयंती केवल शक्ति और पराक्रम का उत्सव नहीं, बल्कि अटूट भक्ति और प्रकृति से जुड़ाव का भी पावन अवसर है। हनुमान जी की सबसे बड़ी पहचान उनकी शक्ति नहीं, उनकी निष्कलंक भक्ति है—एक ऐसी भक्ति जिसमें अहंकार नहीं, केवल समर्पण है।

आज की युवा पीढ़ी सफलता, नाम और पहचान की दौड़ में कहीं न कहीं भीतर की शांति और जुड़ाव खोती जा रही है। ऐसे समय में हनुमान जी का जीवन हमें याद दिलाता है कि सच्ची शक्ति भक्ति से ही जन्म लेती है। जब मन ईश्वर से जुड़ता है, तब वही ऊर्जा प्रकृति के प्रति प्रेम में भी बदल जाती है।

हनुमान जी “पवनपुत्र” हैं—वायु के पुत्र। उनकी भक्ति केवल प्रभु तक सीमित नहीं थी, बल्कि हर उस तत्व तक फैली थी जो जीवन को सम्भव बनाता है। यही कारण है कि उनकी भक्ति हमें सिखाती है कि पेड़-पौधे, जल, वायु—ये सब भी पूजनीय हैं। जब हम एक पौधा लगाते हैं, उसकी सेवा करते हैं, तो वह भी एक प्रकार की भक्ति ही है—प्रकृति के प्रति समर्पण की भक्ति।

युवा अगर इस भाव को समझ ले, तो उसकी ऊर्जा केवल स्वयं तक सीमित नहीं रहेगी, बल्कि समाज और पर्यावरण को भी संवारने लगेगी। आज की “ग्रीन मोटिवेशन” दरअसल वही भक्ति है, जो हनुमान जी ने अपने जीवन से सिखाई—सेवा, संरक्षण और संतुलन।

इस हनुमान जयंती पर, आइए हम केवल मंदिरों में दीप न जलाएँ, बल्कि अपने भीतर भी भक्ति का दीप प्रज्वलित करें। एक पेड़ लगाएँ, उसे प्रेम से सींचें, और हरियाली को अपना साथी बनाएँ। यही भक्ति का आधुनिक रूप है—जहाँ ईश्वर और प्रकृति दोनों का सम्मान हो।

“हनुमान जी की भक्ति जब जीवन में उतरती है, तो हाथ सेवा में लगते हैं और दिल प्रकृति से जुड़ जाता है।”

आपका यह भाव ही भक्ति को जीवित रखेगा और धरती को भी हरा-भरा बनाएगा।

**

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मैली चाँदनी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – मैली चाँदनी ? ?

गैर घरों में

झाड़ू-पोछा करती

अपने बच्चों की फीस भरती,

परायी किचन में

चपाती सेकती

अपनी रसोई चलाती,

जुआरी पति की

भद्दी गालियाँ सुनती

शराबी मर्द के

लात-घूँसे खाती,

हर रात बलत्कृत होती

फिर भी

करवा चौथ का व्रत करती!

काश! चाँद औरत होता!

इन बदनसीब कालिमाओं

के जीवन में

थोड़ी चाँदनी होती!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 2 अप्रैल से  एक माह की हनुमान साधना वैशाख पूर्णिमा तदनुसार 1 मई 2026 को संपन्न होगी। 🕉️

💥 इसमें हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमानाष्टक के पाठ किए जाएँगे। हनुमान चालीसा के 21 या अधिक पाठ करने वाले विशेष साधक तथा 51 या अधिक पाठ करने वाले महा साधक कहलाएँगे। 101 या अधिक पाठ करने वाले परम साधक कहलाएँगे। आत्म परिष्कार और मौन साधना साथ चलेंगे।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Criterion… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present Capt. Pravin Raghuvanshi ji’s amazing poem “~ Criterion ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) and his artwork.) 

? ~ Criterion… ??

☆ 

On a white canvas        

colours arrive uninvited—

they spill, collide, breathe

and the silence of white

begins to shape a meaning

They call it art…and

a crowd gathers to celebrate

 

On a white sari falls

one stray drop—

and the same white

turns into judgment

The pallu trembles

not with wind,

but with probing eyes

Another crowd gathers—

to correct, to contain…

 

How paradoxical

these lines  are

—where colour is freedom

and where it becomes stigma

 

The canvas may bear

a thousand reckless strokes

and be called alive

but a woman must

remain unblemished white

 

The painter pauses—

what if the frame wore the sari

and the woman the canvas

would color still be a crime

or be seen as truth…!

(Inspired by Shri Sanjay Bhardwaj Ji’s poem मानदंड

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मानदंड ☆ श्री संजय भारद्वाज ☆

~Pravin Raghuvanshi

 © Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # ४०८ ☆ मानवीय सभ्यता और युद्ध ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # ४०८ ☆

?  आलेख – मानवीय सभ्यता और युद्ध ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

मानवीय सभ्यता की कहानी वास्तव में मनुष्य की जिजीविषा और उसके संघर्षों की एक लंबी दास्तान है।

सभ्यता सामाजिक नियमों का परिपालन चाहती है, इन मान्य प्रचलित नियमों की अवहेलना युद्ध की जन्मदात्री बनती है।

संपत्ति, संसाधन , स्त्री , या जमीन के लिए युगों से युद्ध होते रहे हैं।  हम पीछे मुड़कर देखते हैं तो पाते हैं कि विकास और विनाश  सिक्के के दो पहलू रहे हैं। सभ्यता का अर्थ अगर सुसंस्कृत होना है तो युद्ध उसी संस्कृति का एक काला अध्याय है।

आदिम युग में जब मनुष्य वनों में रहता था तब उसकी लड़ाई केवल अस्तित्व को बचाने की थी। वह भोजन के लिए लड़ता था और जंगली जानवरों से स्वयं की रक्षा करता था। धीरे धीरे उसने समूह में रहना सीखा और यहीं से समाज की नींव पड़ी। समाज बनने के साथ ही अधिकारों की भावना जागी और इसी भावना ने युद्ध को जन्म दिया।

प्रारंभिक बस्तियों ने जब नगरों का रूप लिया तो संसाधनों पर कब्जे की होड़ शुरू हो गई। नदियों के किनारों पर फली फूली सभ्यताएं पानी और उपजाऊ भूमि के लिए आपस में टकराने लगीं। विकास की दौड़ में मनुष्य ने पहिए का आविष्कार किया और इसी पहिए ने युद्ध के रथों को गति दी। धातु की खोज हुई तो कुल्हाड़ी के साथ साथ तलवारें भी बनाई जाने लगीं। यह एक विडंबना ही है कि मनुष्य ने अपनी बुद्धि का उपयोग जीवन को सुगम बनाने के साथ साथ दूसरों के जीवन को संकट में डालने के लिए भी किया। जैसे जैसे साम्राज्य बढ़े वैसे वैसे सीमाओं का विस्तार हुआ और उन सीमाओं की रक्षा के लिए रक्तपात अनिवार्य मान लिया गया।

इतिहास के पन्ने पलटें तो महान सभ्यताओं के उदय और पतन में युद्धों की बड़ी भूमिका रही है। मेसोपोटामिया से लेकर सिंधु घाटी तक और रोम के वैभव से लेकर चीन की महान दीवार तक हर जगह विजय और पराजय की गाथाएं अंकित हैं। महान सम्राटों ने शांति की स्थापना के नाम पर विशाल सेनाएं खड़ी कीं। उन्होंने विशाल किलों का निर्माण किया जो आज भी हमारी वास्तुशिल्प की उन्नति के गवाह हैं। लेकिन इन किलों की दीवारों के पीछे अनगिनत चीखें और रक्त की बूंदें दफन हैं। विकास ने हमें विज्ञान दिया और विज्ञान ने हमें बारूद थमा दिया। तलवारों की जगह तोपें आ गईं और आमने सामने की लड़ाई दूर से वार करने वाले हथियारों में बदल गई।

मध्यकाल तक आते आते युद्ध केवल जमीन का टुकड़ा जीतने का माध्यम नहीं रह गए। अब विचारधाराओं और धर्मों के नाम पर तलवारें खिंचने लगीं। मनुष्य ने कला और संस्कृति के क्षेत्र में अभूतपूर्व प्रगति की लेकिन उसके भीतर का शिकारी कभी शांत नहीं हुआ। वह महलों में रहने लगा और रेशमी वस्त्र पहनने लगा पर उसकी आंखें अब भी पड़ोसी के वैभव पर टिकी रहती थीं। व्यापार के मार्ग खुले तो उन पर अधिकार जमाने के लिए नौसेनाएं तैयार की गईं। समुद्रों की लहरें भी मानवीय रक्त से लाल होने लगीं। खोज और आविष्कार की इस यात्रा ने मानवता को सात महाद्वीपों तक पहुँचाया लेकिन साथ ही गुलामी और शोषण की नई व्यवस्थाएं भी दीं।

औद्योगिक क्रांति ने दुनिया का चेहरा पूरी तरह बदल दिया। कारखानों से उत्पादन बढ़ा और देशों की भूख भी बढ़ गई। कच्चे माल की तलाश और तैयार माल को बेचने की होड़ ने विश्व को दो भयानक युद्धों की आग में झोंक दिया। बीसवीं सदी का विकास अभूतपूर्व था लेकिन इसी सदी ने हिरोशिमा और नागासाकी का वह मंजर भी देखा जिसने मानवीय चेतना को झकझोर दिया। परमाणु शक्ति जो ऊर्जा का स्रोत बन सकती थी वह सर्वनाश का प्रतीक बन गई। विज्ञान की सबसे बड़ी उपलब्धि ने ही मनुष्य को सबसे अधिक डरा दिया। आज हम अंतरिक्ष में बस्तियां बसाने की सोच रहे हैं लेकिन धरती पर शांति स्थापित करने में अब भी संघर्ष कर रहे हैं।

युद्ध ने तकनीकी विकास को गति तो दी है पर मानवीय मूल्यों को पीछे धकेल दिया है। हवाई जहाज से लेकर रडार और इंटरनेट तक कई महान आविष्कार युद्ध की जरूरतों के कारण ही अस्तित्व में आए। सेनाओं को बेहतर संचार चाहिए था इसलिए हमने सूचना क्रांति का सूत्रपात किया। सैनिकों की जान बचाने के लिए चिकित्सा विज्ञान ने नई ऊंचाइयां छुईं। लेकिन क्या इस भौतिक उन्नति की कीमत उन करोड़ों मासूमों की जान से ज्यादा है जो इन युद्धों में स्वाहा हो गए। सभ्यता का विकास तभी सार्थक है जब वह संवेदनशील समाज का निर्माण करे। आज की दुनिया हथियारों के ढेर पर बैठी है और एक छोटी सी चूक सदियों की मेहनत को राख कर सकती है।

आधुनिक युग में युद्ध का स्वरूप बदल गया है। अब केवल सीमाओं पर गोलियां नहीं चलतीं बल्कि आर्थिक और साइबर युद्ध के माध्यम से भी देशों को घुटनों पर लाया जाता है। हमने विकास के नाम पर प्रकृति को भी युद्ध का मैदान बना दिया है। जंगलों का कटना और प्रदूषण का बढ़ना भी एक तरह का युद्ध ही है जो हम अपनी आने वाली पीढ़ियों के खिलाफ लड़ रहे हैं। सच्चा विकास वह है जो समन्वय और सहअस्तित्व की भावना पर आधारित हो। मानवीय सभ्यता का भविष्य इस बात पर निर्भर नहीं करता कि हमारे पास कितने उन्नत हथियार हैं बल्कि इस पर निर्भर करता है कि हम आपसी मतभेदों को कितनी समझदारी से सुलझाते हैं।

सभ्यता की लंबी यात्रा में हमने बहुत कुछ सीखा है। हमने लोकतंत्र को अपनाया और मानवाधिकारों की बात की। अंतरराष्ट्रीय संस्थाएं बनाई गईं ताकि संवाद के माध्यम से विवाद सुलझाए जा सकें। यह इस बात का संकेत है कि मनुष्य अब युद्ध की विभीषिका से ऊब चुका है। वह शांति और प्रेम की भाषा समझना चाहता है। बुद्ध और गांधी जैसे महापुरुषों ने हमें अहिंसा का मार्ग दिखाया जो आज भी सबसे अधिक प्रासंगिक है। विकास की परिभाषा केवल ऊंचे भवन और तेज रफ्तार गाड़ियां नहीं होनी चाहिए। एक ऐसा समाज जहां हर व्यक्ति सुरक्षित महसूस करे वही वास्तव में विकसित समाज कहलाने का अधिकारी है।

अंत में हमें यह समझना होगा कि युद्ध कभी किसी समस्या का स्थायी समाधान नहीं होता। हर युद्ध अपने पीछे विनाश और प्रतिशोध की नई कहानियां छोड़ जाता है। मानवीय सभ्यता का वास्तविक उत्कर्ष तभी संभव है जब हमारी बुद्धि और हृदय के बीच संतुलन हो। हम विज्ञान की शक्ति का उपयोग दुखों को दूर करने के लिए करें न कि नए जख्म देने के लिए। भविष्य की राहें तभी प्रशस्त होंगी जब हम हथियारों को त्याग कर ज्ञान और करुणा के दीप जलाएंगे। सभ्यता की मशाल को जलते रहने के लिए शांति की हवा की जरूरत है न कि नफरत के तूफान की। मनुष्य को मनुष्य से जोड़ना ही विकास की अंतिम मंजिल होनी चाहिए।

 

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

लंदन प्रवास पर

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares