मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – २ – रेडियो -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – २ – रेडिओ – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी

“नमस्कार श्रोतेहो… हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. सकाळचे पाच वाजून सत्तावन्न मिनिटे आणि बारा सेकंद झाले आहेत. आपल्या आजच्या सभेला सुरुवात करु या मंगलध्वनीने…

आणि मग तो मंगलध्वनी सुरु व्हायचा. अगदी लहानपणी पासून दिवसाची सुरूवात अशीच होते. आणि दर पाच मिनिटांनी बदलणारे कार्यक्रम वेळ सांगतात. सकाळच्या घाईत घड्याळ बघावे लागत नाही. ते काम रेडिओ ऐकला की आपोआप होते. शिवाय ते कार्यक्रम ज्ञानात भर घालतात हा खूप मोठा आणि महत्वाचा फायदा! आजही मला लहानपणी निवेदन करणारे निवेदक व त्यांचे निवेदन आठवते. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या द्यायला आल्या की शाळा कॉलेजला निघायची योग्य वेळ झाली हे लक्षात यायचे. आणि त्या बातम्या संपल्या की उशीर झाला असे समजायचे.

सकाळी सकाळी रेडिओ लावायची जुनी सवय बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या करते. आज गाणे ऐकले शब्द शब्द जपून ठेव एकीकडे काम चालू होते. आणि इतके अर्थपूर्ण गाणे ऐकत असताना माझ्या मनात कसे विचार येतात याचे हसू आले. आणि जपून ठेवलेल्या वस्तू आठवायला लागल्या. आणि कुठे कुठे जीव अडकतो याची गंमत वाटली.

परवा सहज कपाट आवरताना जरा पिवळसर पडलेली कॅरीबॅग सापडली. उघडून बघितले तर रेडिओचे लायसन सापडले. आता असे वाटेल हा काय प्रकार आहे? पण पूर्वी (मी लहान असताना) रेडिओ साठी परवाना आवश्यक होता. एका वर्षा साठी १/२ रुपये पोस्टात भरून त्या पुस्तकावर तिकीट लावून आणावे लागायचे. आणि घरात टेबल सारखे मोठे रेडिओ असायचे तो नीट ऐकण्यासाठी ३/४ फूट लांबीची व २/३ इंचाची तांब्याची जाळी असलेली पट्टी घरात लावावी लागायची. आणि छोटा रेडिओ (ट्रांझिस्टर) सायकलच्या हॅण्डलला लावून लोक ऐटीत फिरायचे. आणि ज्याच्याकडे लायसन नसेल तो लपवून ट्रांझिस्टर नेत असे.

हे सर्वच रेडिओ मात्र नवनवीन कपडे घालायचे.

त्यात गृहिणीची कलाकुसर व दृष्टी याची जणू परीक्षा व्हायची. काही जणी तर त्यावर स्वहस्ते भरतकाम करायच्या आणि कौतुक मिळवायच्या.

आमच्या कडे मोठ्ठा रेडिओ होता. लांबून बघितले तर पुस्तकांचे कपाट वाटावे असा होता. मी कायम त्याच्या बटणावर पाय ठेवून वर चढून दूध प्यायला बसायची. मग जेवायला बसायची. ही बाल सवय त्याचा उपयोग कळायला लागल्यावर सुटली.

विशेष म्हणजे या रेडिओचे सर्वत्र दर्शन होते. शेतात, मळ्यात, चौकात, पारावर, बागेत कुठेही सूर ऐकू येतात. मधल्या काही काळात असे भय वाटत होते की सगळ्या आधुनिक साधनांच्या गदारोळात आपला रेडिओ लुप्त होईल का? पण रेडिओने आपले स्थान कायम ठेवले आहे. स्वरूप बदलले आहे. सुटसुटीत झाले आहे. पूर्वीच्या अडचणी (रेडिओ वापरातील) आता नाहीत. त्याने प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये स्थान मिळवले आहे. आणि पेन सारखे छोटे स्वरूपही धारण केले आहे. आणि आता ऐकू येणारी स्टेशन्स सुद्धा वाढली आहेत.

काही वर्षांपूर्वी प्रसारित होणारे कार्यक्रम आधुनिक स्वरूप धारण करून पुन्हा प्रसारित होऊ लागले आहेत.

या रेडिओच्या अनंत आठवणी बऱ्याच जणांच्या मनात जागृत असतील.

रेडिओवर एक जाहिरात लागते. एक सखी दुसरीला विचारते, “कुटं ग शिकलिस एवढं ग्यान? ” लगेच दुसरी उत्तरते, “आपल्या रेडिओनं श्यानं केलंय की, तू बी ऐकत जा. ” हे ऐकून अगदी पटले. खरेच जे नियमित रेडिओ ऐकतात त्यांचे मन विविध माहिती, ज्ञान, आरोग्य, गृहिणींना मार्गदर्शन, मनोरंजन, यांनी भरून जाते. आणि या साठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. शिवाय डोळेही बिघडत नाहीत.

या रेडिओची सुरुवात भारतात १९२३ साली झाली. पण ती खाजगी कंपनी होती. आणि ती दिवाळखोरीत निघाली. नंतर १९३६ मध्ये ही कंपनी सरकारने ताब्यात घेतली आणि ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण केले.

प्रासंगिक कार्यक्रम सादर करणे. हे तर रेडिओचे खास वैशिष्ट्य आहे.

रेडिओवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर लिहायचे म्हंटले तर एक वेगळाच लेख होईल.

आज जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने भारतातील रेडिओ विषयी काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा विषय खूप मोठा आहे. जे माझ्या सारखे रेडिओ प्रेमी आहेत त्यांना नक्कीच असे वाटते, हा रेडिओ अजरामर होवो. या मनापासून शुभेच्छा!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगभलं… – भाग – २ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 जीवनरंग 🌸

☆ चांगभलं… – भाग – २ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

(त्यांनी सर्व सोसलं. त्यांना मारन्याच्या नादात वासरालाबी मारलं. वासरू गेलं. त्या आजारी हुत्या, काय बी लक्ष दिलं नाही. पन गंमत म्हनजे नवरा घरातून निघून लांब जायला बगायचा. गेला की त्योच आजारी पडायचा. असं तीन चारदा झालं.) 

इथून पुढे – –

बिचारीनं नवऱ्याची लई शेवा केली. द्येवाची भक्ती केली. नवऱ्याला नंतर चूक कळली आन् त्यानं माफी मागितली, पुना दोघांनी लई झ्याक संसार केला. हेच ते महाराज सांगत हुते. लई मोटी कथा हाय. नीट वाचू कदीतरी. ”असं बोलून त्यानं इषय थांबवला. लिहिन्याचं काम आटवडाभर चाललं. पोथी परत करून ते बहुल्याला परत आले. आता छापील प्रती तयार करायचं काम. ते पोलिस पाटलानं उचाललं. शंभर प्रती लगोलग कराडास्न छापून आनल्या. पोथीची गावातून मिरवनूक निघाली. सर्वांनी भक्तिभावाने आईला आनि पोथीला हात जोडलं. ”आई, होऊ दे गं बाई तुजं मंदिर. ”आई पत्र्याच्या शेडमधे असते हे कुनालाच पहावत नव्हतं. बाया बापड्याही श्रद्धेनं सर्व शेवा करत हुत्या.

 पारायनाचा आटवडा निश्चित करण्यात आला. तयारी पूर्न झाली. पारायन सुरू झालं. समदी मंडळी वाचाया बसली. चार दिस झालं. पाचवा दिस उजाडला. सकाळची लगबग, तयारी सुरू होती.

तवर गन्या धावतपळत आला आन् म्हनला, “आवं बापू, तात्या, गुरजी कळलं का तुमास्नी पाटलाच्या सर्जाला बैलांनं मारलं म्हनं” 

हे ऐकताच जो तो आ वासून पाहू लागला. पळापळ झाली. समदी मंडळी निघाली वाड्यावर. खरंच, पाटलाचा तरणाबांड लेक सर्जा पडला हुता जमिनीवर. पाटील डोकं धरून बसला हुता. पाटलीन रडत हुती. त्याचं असं झालं हुतं, बैलाला नेहमी परमानं वैरन टाकायला सर्जा गेला हुता. त्याचवेळी नवीन गडी शान मागं सारत हुता. निशाण बैलाला तो काय वळखला नाय. तो जोरात हिकडं तिकडं करायला लागला. सर्जा त्याला हो हो म्हनून हाकारत हुता. पण चवताळलेल्या निशाणानं एकदम मान हलवली आन् नेमकं टोकदार शिंग लागलं सर्जाच्या खांद्याला. सर्जा कळवळून खाली पडला. बरं तर बरं निशाण्याला बांधलं हुतं.

 सर्जाला वेदनेनं मूर्च्छा आली. पाटलाला काय करावं कळंना. काही जाणकारांनी तालुक्याच्या गावची ॲम्ब्युलन्स बोलावली. सर्जाला घेऊन दोन चार जन तालुक्याच्या मोठ्या डॉक्टरकडं गेले.

 गावात वातावरन गंभीर झालं. आई निनाईचा कोप झाला का काय असं वाटून जो तो मंदिरात गेला. सर्जासाठी प्रार्थना कराया लागला. सर्जा होताच तसा. सर्वांच्या गरजंला धावनारा. मदत करनारा. येता जाता विचारपूस करनारा. भावी पाटील तोच हुता. थोडावेळ पारायन थांबलं.

 पाटील, गावातील पंच मंडळी जमली. गाव जमलं. पाटील चिंतेत हुता. तरीबी फुडं काय करायचं ते कळत नव्हतं. तेवढ्यात भुलाबाई उटली. फुडं आली. म्हनली, “आवं, म्या म्हनलं हुतं नीट शेवा करा. नगा त्या फंदात पडू. कोप झालाय देवीचा आता. भाकणूक करू, माफी मागू आनि म्हनू पुन्हा वाटंला जानार नाय मंदिर बांदायच्या. ”

 समदी इचार करायला लागली. खरं हाय तिचं. येवडं देवाचं करती. अंगात बी येतिया देवी. समद्यांना उत्तरं देती. मंग देविनंच सांगितलं असनार तिला असं वाटायला लागलं.

 पंच काहीतरी बोलनार तेवड्यात “ रामकृष्ण हरी” म्हनत एकनाथ बाबा उठले आणि फुडं आले. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

 “लोकहो, आपल्या कित्येक पिढ्यांची देवीवर श्रद्धा हाय. त्यांनी आखून दिलेली परंपरा आपन आजपर्यंत जपून ठिवली हाय. देव कदी कोपत नसतो. आई कधी लेकावर रूसती व्हय? देवच जर लोकास्नी माराया लागला तर ईस्वास कुनावर ठिवनार.? म्या बी भाकणूक घालून देविचा कौल घेतला हुता. आरं येड्यानों, चांगल्या कामाला देव का न्हाय म्हनंल? माजी दोन तपाची पुन्याई म्यां देविच्या मंदिरासाठी कौल लावला तवा लावली हाय. आरं बाबानों, देवी नाय खोटं ठरविनार. आई निनाई, म्यां पारायन सुरू केलं हाय. ते निम्म्यात थांबलं तर कसं हुनार? तूच आता तार नाही तर मला मार पन त्या सर्जाला वाचिव. ”येवडं बोलून बाबा खाली बसलं. पंच, पाटील काय सांगतात तिकडं सर्वांचं कान लागलं. पाटलाचं डोळं डबडबलं हुतं. एक ध्यान तालुक्याला गेलेली मंडळी कदी येतील इकडं तर दुसरं ध्यान पारायनाचं काय करायचं इकडं.

शेवटी धीर धरून पाटील म्हनालं,

 “लोकहो, माजं बी मन लागंना पन् कायतरी ईचार केला पायजे. आपन फकस्त मंदिर बांदायचा संकल्प केलाय. देवाचं पारायन तरी बंद कसं करायचं? आपन देवीला पाया पडू आन् सुरू ठिऊ पारायन. काय देवी सुचविल तसं करू. ”एवडं बोलून पाटलांनी देवीला हात जोडले. त्यांच्या बरोबर आख्ख्या गावानं आई निनाईला प्रार्थना केली. “आई निनाई, पारायन तरी आमी पूर्न करतो. नंतर तू सांगशील तसं करतो. तूच हायेस आमाला. आमचं काय चुकलं असंल तर माफी कर”

 एवडं बोलून पारायनाच्या मंडपात समदे आले. पारायन सुरू झालं. तास दोन तास गेले. पाटील पाटलीनबाई डोळं मिटून शांत बसले होते. पोराचा जीव वाचू दे म्हनून प्रार्थना करत होते. तेवड्यात तालुक्याच्या गावी दवाखान्यात गेलेला गन्या तराट आला आणि हाकारायला लागला,

 “पाटील पाटील”

 त्यांनी डोळं उघडून पाहिलं. म्हनले, ”आरं, बोल की लवकर. ”

गन्या म्हनला, “पाटील, काय बी काळजी करू नगासा. सर्जेरावाला सुद आलीय. काय बी धोका नाय. डागदरांनी जखम धुवून पट्टी केलीय. सलाईन चालू हाय. औषधं चालू हायेत. ठीक हाय समदं. ” पाटलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आलं. पाटलीन रडाया लागली. आयाबायांना म्हनली,

 “बयांनो, देवी पावली गं आपनास्नी. पारायन संपलं की लुगडं चोळी करते गं देविला आनि निवद बी दावते पुरणपोळीचा. ”

बायांना पन हायसं झालं. काहीजनी घरला गेल्या. प्रसाद करायला. दोघी पाच सात कप चा

आनि कप घिऊन आल्या. उपाशी मंडळींना चा दिला. पारायन चा पिऊन फुडं सुरू झालं.

संध्याकाळ झाली. पारायन संपलं. आरती झाली दिस मावळला. समदे घरला गेले. सर्जाला दोन दिस दवाखान्यात ठिवनार असं कळलं पन आता धोका टळला हुता. समदी निवांत हुती.

पारायनाचे पुढील दोन दिस शांततेत गेले. नित्यनेमाने वाचन, आरती, निवद, प्रसाद समदं सुरू हुतं. आता बाबांना पण हायसं वाटत हुतं. चांगल्या कामाचा संकल्प केला हाय तर पूर्न होयाला हवं असं त्यास्नी वाटतं हुतं.

भुलाबाई मात्र आतून संतापली हुती. कढ जिरवत हुती.

 “म्यां येवडं सांगून बी कशाला ईचार करतायत पाटील. हे बरं नव्हं. त्या पोराच्या जिवावर आलं तरी बी कुनी ऐकना. ” म्हनून भुलाबाई चरफडत हुती. कुनाकुनाला कानाला लागत हुती. मंदिर बांदायचा फेरईचार करावा म्हनून हट्ट करत हुती. आई निनाईचा कोप नको म्हनत हुती. काहीजनी तिला गप बशवित हुत्या. तिची नकारघंटा नको वाटत हुती पन करनार काय. देवी अंगात यिती. तिला मान दिलाच पायजे. नायतर ती रागावली तर आपल्या घरावर संकट यिल म्हनून गपगुमान तिचं ऐकत हुत्या.

दोन दिसांनी सर्जा घरला आला. दुसऱ्या दिशी पारायनाची सांगता हुती. महाप्रसाद हुता. सर्जा उठला. आंघोळ करून, बॅंडेज बांधून, आवरून देविच्या दर्शनाला गेला. तिथून पारायनाच्या मंडपात गेला. तिथं बाबांच्या पाया पडला आणि म्हनला, “बाबा पारायन पूर्न केलं ते बरं झालं. आबास्नी सर्वांनी आधार दिला. सर्वांचे आभार मानतो. आपन असंच पारायन दरवर्षी करू. आई निनाईनं मला वाचिवलं. मला लागलं म्हनून आई कोपली म्हनू नगासा. यांतून मार्ग निगंल. मंदिराचं बांदकाम हुईल आसं माझं मन म्हनतंय”

– क्रमशः भाग दुसरा 

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुद्ध भाषा आणि भाषाशुद्धी… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ शुद्ध भाषा आणि भाषाशुद्धी… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

*मराठी मातृभाषादिनाच्या सर्वांना शुभेच्छा. *

फेसबुक, व्टहाटस् अपच्या विविध समूहावर मराठी, काही हिंदी तर काही इंग्रजी भाषेतील टपाले पाठविली जातात. ती स्वलिखित असतात किंवा अग्रेषित असतात. वाचनात येणाऱ्या अशा लेखनात अनेक दोष आढळतात.

स्वलिखित वा अग्रेषित कोणचीही लेखने असोत, त्यातली बरीच अशुद्ध असतात असे सामान्य निरीक्षण आहे.

*आतपुढ* (आले तसे पुढे ढकलले) ही व्टहाटस् अप संस्कृती असल्यामुळे असे सदोष लेख या समूहावरून त्या समूहावर आणि जगभर फिरत असतात.

आपण पाठविलेले लिखाण शुद्ध असावे असे ते टपालणाऱ्याला वाटत नाही का? येवढेच काय, आपण अशुद्ध लिहितो हे ही काहींना कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणायचे.

आपली भाषा अशुद्ध, अपरिपक्व आहे याची जाण व खंतही कोणाला वाटत असल्याचे दिसत नाही. माझ्याप्रमाणे ज्या कोणाला हे जाणवत असेल त्यांना या विषयी बोलण्याचा संकोच वाटतो म्हणून कोणीच बोलत नसावे.

त्याने होतेय काय, दोष तसेच राहतायत. सदोष लेखन तसेच चालू रहाते, फिरत रहाते. ‘उगाच वाईटपणा नको’ म्हणून जे व जसे येते ते तसेच स्वीकारलेही जाते. पुढे पुढे ‘आहे तेच योग्य आहे’ असे समजण्यापर्यंत मजल जाते!

याला काय करायचे! आपण अशुद्ध भाषा स्वीकारायची की आपली भाषा, मग हिंदी असो इंग्रजी असो वा मराठी, ती शुद्ध लिहायची ते आपणच ठरवा.

लेखकाने मांडलेला विचार चांगला असूनही त्याची अशुद्ध भाषा खटकते. सुवासिक केशरी भातात अचानक दाताखाली खडा लागून भोजनाचा रसभंग व्हावा तसेच काहीसे वाटते!

समूहातील सर्वच सभासद लेखकांनी या विषयाकडे जरा गंभीरपणे ध्यान द्यावे असे सुचवावेसे वाटते. साहित्य अग्रेषित असले तरी ‘कापी-कट-पेस्ट’ सुविधा वापरून ते अचूक, निर्दोष करून मग पुढे पाठवावे.

लेख लिहिताना, ‘ घाईघाईत टंकित करताना एखादी चुकीची कळ दाबली जाते, एखादे अक्षर राहून जाते ‘ इ. कारणे सांगून वेळ मारून नेणे, ‘ वाचकांनी समजून घ्यावे, सांभाळून घ्यावे ‘ असे म्हणणे, आपले आहे तेच पुढे दामटणे हे अयोग्य आहे. मला सांगा, वाचकांनी नेहमीच का अशुद्ध वाचावे? का तुम्हाला सांभाळून घ्यावे? आपण लेख पाठवण्यापूर्वी तो काळजी काट्याने तपासायला नको का? त्याला कितीसा वेळ लागतो? त्यासाठी थोडे कष्ट पडतील, पण ते घ्यावेत. भाषा निर्दोष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

‘कळतंय ना मला काय म्हणायचंय ते, मग झालं तर ‘ ‘ उसमे क्या है’, ‘ उससे क्या फरक पडता है, ‘ ‘चलता है याsर’, ‘ टेक इट ईझी ‘ ही वृत्ती घातक आहे. हा दुर्गुण आहे. या वृत्तीमुळेच जागतिक स्तरावरही इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण भारतीय अनेक क्षेत्रात खूप मागे राहिलो आहोत. गुणवत्तेचा, परिपूर्णतेचा, अचुकतेचा, निर्दोषतेचा, नेमकेपणाचा ध्यास असावा. ‘फर्स्ट शाॕट ओके’, ‘झीरो मिस्टेक’ हे आपले उद्दिष्ट असायला हवे, हा आपला ध्यास असावा. ते कठीण असले, सहजसाध्य नसले तरी अशक्य नाहीये, निश्चित प्रयत्नसाध्य आहे.

अर्थात त्यासाठी मुळात स्वतःला पुरेसे भाषाज्ञान असले पाहिजे. आणि केवळ भाषेविषयीच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या मूल्यांचा आग्रह असायला हवा. ‘क्वालिटी लाईफ’साठी त्याची नितांत अवश्यकता आहे.

मराठी तर आपली मातृभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा (?). त्यांच्या उपयोजनेतही किती परकीय शब्द, किती ऊर्दू, किती इंग्रजी शब्द!

इंग्रजीचे म्हणाल तर ती परकी भाषा. पण व्यवहारासाठी आवश्यक. आम्हाला तीही धड येत नाही. तिथेही गोंधळ. सदोष वाक्यरचना, सदोष शब्दप्रयोग आणि शब्दांची चुकीची स्पेलिंगे. संगणकीय व्यवहारात अनेक शब्दांची रूपे बदलली गेली आहेत. तिथे ते क्षम्य आहे. पण ती रूपे लेखनात का आणायची? उदा. And ऐवजी नुसताच ‘n’, please ऐवजी ‘plz’ वगैरे. आपल्याला एक तरी भाषा शुद्ध यावी असे का वाटू नये? भाषेकडे येवढे दुर्लक्ष का व्हावे? भाषांविषयी येवढी अनास्था का असावी?

आपली दैनंदिन विचार विनिमयाची भाषा लालित्यपूर्ण नसली तरी निदान शुद्ध असावी व नेमकी असावी येवढी तरी अपेक्षा ठेवायला काय प्रत्यवाय आहे?

एका हिंदी लेखातील अवतरण…

‘हम प्रतिदिन अगणित उर्दू, अंग्रेजी शब्द प्रयोग में लेते हैं। भाषा बचाइये, संस्कृति बचाइये। जांच करें कि आप कितने उर्दू या अंग्रेजी के शब्द बोलते है। हर हिंदी प्रेमी इस लेख को पढ़ने के बाद अपने मित्रों के साथ साझा अवश्य करे।’

(अवतरण समाप्त)

आपण मराठीतही अनेक ऊर्दू व इंग्रजी शब्द उपयोगात आणतो. या इंग्रजी, उर्दू, फारसी शब्दांना आपल्या मराठी, हिंदीत काही पर्यायी शब्द नाहीत का? नसलेच तर आपण ते निर्माण करू शकत नाही का? आपल्या भारतीय भाषा विशेषतः आपली मराठी मातृभाषा इतकी दरिद्री आहे का की त्यात पर्यायी शब्दनिर्मिती अशक्य वाटावी? तेव्हा मराठी भाषिकांनीही अवश्य विचार करावा ह्या सूचनेचा.

अखेर आपली भाषा शुद्ध, सुसंस्कृत, प्रगल्भ असावी, असे ती बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच वाटायला हवे. त्याला मातृभाषेविषयी प्रेम, आस्था, आभिमान वाटायला हवा. अर्थात हे मी एकट्याने म्हणून काय उपयोग!

समूहावर येणाऱ्या लेखांच्या भाषेविषयीची ही माझी अतिसामान्य निरीक्षणे व विचार मी चिंतनासाठी वाचकांसमोर ठेऊन आता इथेच थांबणे उचित समजतो.

व्याकरणाविषयी म्हणजे -हस्व-दीर्घ, ‘न’ आणि ‘ण’ मधील भेद किंवा घोळ, ‘स’, ‘श’, आणि ‘ष’ यातील भेद, काळ, लिंग, विभक्ति, वचने, शब्दप्रयोग, म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसंग्रह इ. विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलू. तेही ते समजून घेण्याची, वाचण्याची, आपली भाषा शुद्ध असावी अशी कुणाची इच्छा असली, कुणाला त्याची आवश्यकता वाटली तर! तो पर्यंत नमस्कार!!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मराठी भाषा दिन…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “मराठी भाषा दिन…” ☆ सुश्री शीला पतकी 

फक्त वेलांटी जर बदलली… दिन या शब्दाची तर आजची अवस्था वर्णन करायला पुरेसे आहे… पण वेलांटी बदलून परिस्थितीचे वर्णन करणारे शब्द मराठी भाषेतच आहेत. असो आज आपण आजच्या लेखात मराठी भाषेने दिलेले काव्य आणि गाणे याचा विचार करूयात आणि आपण किती समृद्ध आहोत हे लक्षात येईल आपल्या घरची समृद्धी लक्षात न घेता लोकांच्या प्लास्टिकच्या डब्याचं वर्णन करायच अशी आज आपली गत झाली आहे असो..!

संपूर्ण मराठी भाषेचा विचार केला तर पुस्तक तयार होईल.. फक्त मराठी भाषेत असलेल्या काव्य आणि गाण्यांचा आपण येथे विचार करणार आहोत

अगदी साडेसातशे वर्षांपूर्वी पासून चा विचार केला तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेला हरिपाठ अनेक वारकऱ्यांच्या मुखातून रोज सकाळी प्रसवतो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.. किंवा पैलं तो गे काऊ कोकता हे… मोगरा फुलला… आणि विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेले पसायदान म्हणजे भारतीय माणूस देवाकडे काय मागतो आणि विश्व कल्याणाची चिंता करतो याचे उत्तम उदाहरण आहे. तुकोबांच्या गाथांचा मोह तर इंद्रायणीलाही झाला आणि त्या त्यामधे बुडालेल्या असतानाही वर तरुन आल्या. चोखामेळ्याचे अभंग जनाबाईचे अभंग तुकारामाचे अभंग आपली अभंग ठेव आहे. मन अस्वस्थ झालं की शांततेचा तो एकमेव मार्ग आहे नुसता हरिपाठ म्हणला तरी मन शांत होईल

पुढील काळात अनेकांनी त्यात भर घातली अनेक काव्य मुखामुखी झाली जात्यावरच्या ओव्यांनी बायकांचा दुःख बोलून दाखवलं माहेर सासरची महती गाईली त्यानंतरच्या येणाऱ्या काळात मोरोपंतांच्या आर्या आल्या खाडीलकरांची नाट्यपद आहेत संगीत नाटकांचा जमाना आला आणि त्यांनी लोकांना वेड लावला. आजही ती नाट्य गीते ओठावर आहेत संगीत मानापमान संगीत सौभद्र अशा अनेक नाटकाने त्या काळातली दुनिया संगीतमय करून टाकली आणि तो काळ मराठी भाषेच्या नाट्यकलेचा वैभवशाली काळ समाजाला गेला त्यानंतर येणाऱ्या मर्ढेकर आणि त्यांचे समकालीन कवी यांनी आशय संपन्न कविता दिल्या पुढे त्या काही कविताना चाल लावून त्याची गाणी झाली गाण्याच्या बाबतीत असं म्हणतात की गाण्यांना जन्म आहे मृत्यू नाही.. ती अमर आहेत. मराठी भाषेतील अवीट गोडीची ही गाणी हे काव्य खरोखर अजरामर आहेत…

जन पळभर म्हणतील हाय हाय… हे भा रा तांब्यांचे काव्य अजरामर आहे.. परी जयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती… या कवितेतला विनम्र भाव आणि कृतज्ञता किती सुंदर आहे! अजूनी रुसून आहे खुलता कळी खुलेना… या काव्यामागची कथा वेगळी आहे.. काव्यमागे अनेक कथा असणारी गाणी तत्कालीन कवीनी दिली… पुढे चित्रपटांचा काळ जसा सुरू झाला तशी सुंदर चालीची अनेक गीते आणि भावगीते तयार झाली. प्रत्येक गीताला एक कथा सांगावी इतका ऐवज आहे प्रत्येक गाण्याला कथा आहे कवीची संगीतकाराची पण ते लिहिण्याचा एक स्वतंत्र विषय करावा लागेल.

कौसल्येचा राम बाई… हे काव्य लिहून झाल्यावर पु ल देशपांडे यांनी त्याची चाल बांधली होती माणिक बाईने ते गाणं गायलं आणि या गाण्याला अमरत्व लाभलं ग दि मा ने दिलेली कित्येक गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत…

प्रेमा भाग्य दिले तू मला… त्या बदल्यात नायिका विचारते आहे की मी तुला काय देऊ? .. प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का? का जळवंती च्या जलाची निळी ओढ ती तुला हवी का? अशा अनेक सुंदर ओळी या काव्यात आहेत आणि तितकीच सुंदर चाल… तितके सुंदर संगीत..! ही सगळी अमरत्व लाभलेली गाणी…

खळ्यांचे श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा… भर मे महिन्यात ट्रेनमध्ये बसून दुपारच्या वेळेला लिहिलेले हे गाणं म्हणजे कवीच्या कल्पनाविलासाचे उत्तम उदाहरण आहे. लताबाईने ते तितक्याच ताकतीने गायलेला आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलावे?

घन घन माला नभी दाटती या गाण्यातील..

कोणी विरहिणी राधा गवळण

तिला अडवते कवाड अंगण

अंगणी अवघ्या तळे साचले

विरले जलधारा…! काय सुंदर काव्यरचना आणि प्रसंग. अत्यंत कलात्मक…! हा एवढा खजिना सोडून इंग्रजी माध्यमाकडे का वळता रे बाबांनो…?

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.. अ अ आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका… दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी अवघ्या दत्त विराजे… बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला… वाट पाहणाऱ्या दोन प्रेमी युगोलांसाठी अजरामर झालेले गीते… जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते.. जे वेड मजला लागले तुजला ही ते लागेल का माझ्या मनाची ही व्यथा कोणी तुला सांगेल का? … उडत्या चालीची, तरुण मनाची,… तुझी चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु किंवा लपवलास जरी हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का… मालती पांडे यांनी गायलेले सुंदर गीत… नाच नाच नाचुनी अति मी दमले… बाई मी विकत घेतला शाम… जग हे बंदी शाळा… जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे… रामायणातील राम जन्मला ग सखे राम जन्मला त्या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन करणारे अप्रतिम गीत, जोवर राम आहेत कृष्ण आहेत तोवर या गीतांना मरण नाही ती अमर आहेत. हा माझा मार्ग एकला हे शांत चालीचं गाणं.. जीवनाचा सत्य सांगून जातं. “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया” हे गाणं डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही… जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा प्रत्येक मुलीच्या लग्नात वाजणार हे गीत अख्या मांडवाला रडवून जायचं… अमर भूपाळी मधली घनःशाम सुंदरा ही भूपाळी… सांगा मुकुंद कुणी हा पाहिला हे गाणं… गगन सदन ही प्रार्थना.. सुवासिनी मधले येणार नाथ आता.. बिज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत… जीवनात ही घडी अशीच राहू दे.. आम्ही जातो आमच्या गावा मधलं… देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा… आराम हराम आहे या चित्रपटातलं आकाशी झेप घे रे पाखरा… तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले… एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात… अष्टविनायका तुझा महिमा कसा… किती असंख्य गाणी..! विरह गीत, प्रेम गीत, भक्तीगीत, भावगीत, मराठी कवींनी लिहिली संगीतकाराने चाली लावल्या संगीत दिलं आणि ती गाणी अजरामर झाली केवढा मोठा खजिना आहे. हे मी इथे लिहिते ते अगदी वरवरचे आहे याची जाणीव मला आहे या खजिन्याचा आनंद घ्यावा… तोच आनंद पदरात भरून माघारी फिरावं.. खजिन्याचा आनंद लुटावा खजिना नव्हे.. कारण तो अमाप आहे.

… हे इतक सुंदर मराठीत असताना हे सगळं सौंदर्य हा आस्वाद हा संस्कार आमची पुढची पिढी मात्र घेणार नाही कारण ते रेन रेन कम अगेन, मेरी हॅड अ लिटिल लॅम्प.. डॅफो डीलस्.. अशा कविता पाठ करते ज्या त्यांच्या मातृभाषेत नसल्यामुळे त्यांना त्याचा अर्थही समजत नाही आजच्या दिवशी या सगळ्या कवी लेखकांचे स्मरण करा त्यानी आपल्याला काय दिले हे दहा मिनिटे बसून मनोमन आजमवा. आमची पिढी भाग्यवान मातृभाषेत शिकली आणि फर्ड इंग्रजी येत नाही म्हणून कुठेही अडलं नाही मराठी साहित्यातला हा आनंद आम्ही आज उपभोगतोय. नुसती गाणी नाहीत हा संस्कार आहे, इतिहास आहे, पुराण आहे.. त्याच्या कथा आहेत, त्या भावभावनांचे वर्णन आहे.. आम्ही हे मनसोक्त उपभोगले… श्यामची आईचे चिंधीच्या गाण्याने घराघरात प्रेमाचा संस्कार रुजला होता आणि द्रोपदीशी बंधू शोभे नारायण.. हे भावा बहिणीचे प्रेम सांगितलं होतं …

हे सगळं लुप्त होता कामा नये. हा निखळ आनंद सर्व मराठी कुटुंबाला मिळालाच पाहिजे. किमान अशी प्रार्थना आपण देवाजवळ आजच्या दिवशी करू…

या लेखात मी फक्त काव्याचा परामर्च घेतला आहे.. तोही अगदी वरवर. पण थोडा आनंद तो नक्कीच मिळवून देईल. आजच्या दिवशी ज्ञानेश्वर तुकाराम जनाबाई सर्व संत सज्जन त्यानंतरचे कवी कुसुमाग्रज माडगूळकर खळे काका भारा तांबे मर्ढेकर अत्रे देशपांडे अशा असंख्य लेखकाना, कवीना मनापासून वंदन ज्यानी ही भाषा समृद्ध केली, त्या माय मराठीला सौंदर्य प्राप्त करून दिले, त्या सर्वांना आजच्या दिवशी मनापासून वंदन.

… लक्षात ठेवा नाणी संपतात पण गाणी संपत नाहीत. ती अमर आहेत.. अगदी अजरामर…!

आपल्या लाडक्या लेकाला लेकीला मराठी माध्यमाच्या शाळेत तरी शिकवा रे.. एवढी आग्रहाची विनंती आहे, नाहीतर ते या खजिन्याला मुकतील आणि त्यांची यंत्र होतील.

– – बघा जमलं तर…

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके

कॅप्टन राकेश वालिया 

साडेनऊ वगैरे वय असताना या पोराचे आई-वडील रस्ते अपघातात जातात. हे पोर मग नातेवाईकाच्या आश्रयाला जातं. आई-बाप नावाची सावली सरल्यावर डोईवर ऊन-पावसाचा खेळ नित्याचा होतो. परिस्थिती याला बाल-कामगार बनवते. पोरगं कारखान्यात तुटपुंज्या रोजंदारीवर राबत राबत मोठं होत राहतं. इतरांच्या सायकली दुरुस्ती करत करत आपल्या आयुष्याचा मार्ग आक्रमत राहतं. कृश शरीरयष्टी त्यात अन्नाची आबाळ. खाली धरती आणि उशाशी आभाळ.

डिसेंबर, १९७१. भारतीय सैन्य पाकिस्तानशी लढायला निघालं आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर सीमेवर निघालेली ट्रेन भरगच्च भरून तयार आहे. सैनिकांना जेवण पुरवण्यासाठी नेमलेला ठेकेदार त्याच्याकडच्या पोरांना घेऊन स्टेशनवर पोहोचला आहे. पोरं पटापटा प्रत्येक डब्यात आलू-पुरीचे डबे सैनिकांच्या हाती सोपवत आहेत. या पोरांची सुद्धा ही जगण्याची लढाईच की. हा लहानगा गडी सुद्धा त्याच लगबगीत आहे. गाडी हलली… हळूहळू पुढे जाऊ लागली. डब्याच्या खिडकीतून पाण्याची एक खास लष्करी बाटली डोकावली… पानी… पानी चाहिदा! कुण्या सैनिकाला पाणी भरून पाहिजे होतं. या पोराने ती हाक ऐकली… खिडकीपाशी धाव घेतली… फलाटावर ठेवलेल्या पाण्याच्या पिंपातलं पाणी बाटलीत शिगोशीग भरलं… आणि वेग घेत असलेल्या गाडीपेक्षा जास्त वेग धारण करीत त्या सैनिकाच्या हाती ती बाटली दिली!

“बेटे, फौज में भर्ती हो जाना… ” पोराच्या खांद्यावर थोपटत तो सैनिक म्हणाला… आणि गाडी पुढे निघून गेली… या पोराच्या डोक्यात एक विचार रुजवून.

त्या सैनिकाच्या डोईवर त्याने परिधान केलेल्या मोठ्या तिरकस, रुबाबदार टोपीने त्याच्या मनात घर केले. असा गणवेश पाहिजे आयुष्यात! नंतर समजले… पाणी मागणारी व्यक्ती सामान्य जवान नव्हते… अधिकारी होते त्यांच्यातले. काय लागतं सैनिक अधिकारी व्हायला? किमान माध्यमिक शिक्षण तर पाहिजेच. तोवर आठवीपर्यंत मजल गेली होती… शाळेत जाता कधी न जाताही. दहावीची परीक्षा दिली… उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरले होते… Passed शेरा प्रमाणपत्रावर उमटलेला पाहून मन भारावून गेलं. सेनेत जाण्याचा मार्ग माहीत नव्हता तोवर. ग्वालियर येथे कारपेट कारखान्यात काम मिळाले. त्याच शहरात सेनेची भरती निघाली.

तोवर पोरानं धावण्याचा सराव, व्यायाम करून ठेवला होताच. प्राथमिक शारीरिक परीक्षेत निवड झाली… आता लष्करी वर्दी दूर नव्हती. पण समजलं की या भरतीमध्ये ती तिरकी टोपी नाही मिळणार घालायला… मन खट्टू झालं. डोक्यावर गोरखा बटालियनची, पूर्ण डोकं झाकणारी, हनुवटीवर घट्ट दोरी बांधलेली टोपी घालून एक भरती अधिकारी झाडाच्या सावलीत खुर्चीवर बसलेले दिसले. “त्यांच्यासारखी टोपी पाहिजे! ” हा तरुण म्हणाला. उत्तर मिळालं… ”त्यासाठी वेगळी परीक्षा असते.. आधी पदवीधर व्हावे लागते! ” पोराने मनाशी काही विचार केला… आणि त्या रांगेतून काढता पाय घेतला!

पडत-धडपडत बी. ए. ची पदवी पदरात पडली… पण नशिबाने पुढे मुंबईला पोहोचवलं… तारुण्यसुलभ मनाला सिनेमा नावाची जादूसुद्धा भावली होतीच तोवर. मायानगरीत एका फुटकळ प्रवासी एजन्सीत काम लागलं. कामानिमित्त कुलाब्याच्या नेव्ही नगरमध्ये मित्रासोबत जाणं व्हायचं… तिथे पांढ-या शुभ्र, रुबाबदार गणवेशात येणारे-जाणारे अधिकारी दिसायचे. त्यांपैकी एका साहेबांच्या दृष्टीस प्रवेशद्वाराजवळ नेहमी दिसणारा हा तरुण पडला. त्यांनी याची चौकशी केली आणि “माझ्यासारखे अधिकारी व्हायचं असेल तर स्पर्धा आहे… परीक्षा द्यावी लागेल” हे सांगून मार्ग सांगितला. त्या मार्गावर चालत हे महाशय ती परीक्षा देते झाले. एक-दोनदा आपटी खाल्ल्यानंतर एकदा उत्तीर्ण झाले. इतर कुणाचेही मार्गदर्शन नसल्याने ब-याच गोष्टी ठाऊकच नव्हत्या. वाटलं आता मिळेल युनिफॉर्म. मग समजलं आता एस. एस. बी. मुलाखत द्यावी लागेल… त्यातून सुटला की मग मिळेल वर्दी! मुलाखतीत अपयश आलं आणि या माणसाने रेल्वे रूळाकडे धाव घेतली. जीवन संपवून टाकलेले बरं. रेल्वे गाडी काही फुटांवर आल्यावर मनातला लढवय्या जागा झाला… कुणीतरी आपली परीक्षा घेतं आहे… ज्या अर्थी संकटे मोठी त्या अर्थी इनामही मोठेच असणार! गडी चपळाईने बाजूला झाला… मोठा आवाज करीत, धुरळा उधळीत ट्रेन निघून गेली… इथेही आणखी एक प्रयत्न करावा लागला. पण अलाहाबादमध्ये हेही दिव्य पार झालं. पण पुढे वैद्यकीय चाचणी असते… त्यात नापास म्हणजे थेट घरी परत जाणे. आयुष्यात तोवर कधी डॉक्टरांकडे जाण्याचा प्रसंग अनुभवला नव्हता. त्यावेळी पैसेच नसायचे. कामाच्या धावपळीत किरकोळ आजार दुर्लक्षित रहायचे. पायांत चप्पल नसायची बहुतेकवेळा. कधी काही जखम झाली की औषधी मलम म्हणून चक्क टूथपेस्ट लावायची जखमेवर… आग व्हायची… पण हेच औषध… जखम यथावकाश बरी व्हायची.

 वैद्यकीय तपासणीत सारं काही आलबेल… पण दृष्टी थोडी दोषपूर्ण. पण ते चालून गेलं त्यावेळी नशिबानं. अजूनही वर्दी मिळायला अवकाश होता. दिल्लीतून निजामुद्दीन स्टेशनवरून त्यावेळच्या मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईकडे स्वारी निघाली. तमिल, मद्रासी भाषा येत नाही… स्टेशनचं नाव समजत नाही पटकन… चोवीस तास सलग प्रवास करून प्रशिक्षण संस्था गाठली. तिथं दैनंदिन वापरासाठीच्या वस्तूंचे कीट विकत घ्यावं लागतं हे ठाऊक नव्हतं. किंमत होती चौदाशे. खिशात सातशे. दोनदा रांगेतून बाहेर पडले साहेब. तिथल्या एका अनुभवी माणसाने हे ओळखले… सातशे रुपये उसने दिले.

प्रशिक्षण जड जाऊ लागले… घरी जावे आता… विचार आला. कारण प्रकृती धडधाकट नव्हती. खाण्याची आबाळ झालेली आयुष्यात. पण अशाच एका माणसाने धीर दिला… ही संधी पुन्हा मिळणार नाही! मनातला सैनिक आता पुन्हा उठून उभा ठाकला… प्रशिक्षण संपले! गुरखा पलटण हट्टाने मागून घेतली… आणि नशिबाने तीच मिळालीही… तीच तिरकी टोपी… हनुवटीवर बंद् घट्ट बांधलेली!

साडेनऊ वर्षे सेवा झाली… उत्तम सेवा झाली. ३५० ब्रिगेड मध्ये सारं काही उत्तम सुरु होतं. लग्न झालं. मुलगा झाला. आणि पत्नीला असाध्य व्याधीने घेरलं. कुटुंब फार मोठं नव्हतं. गरजेच्या वेळी पाठ फिरवलेल्या नातेवाईकांशी पुन्हा धागे जोडलेले नव्हतेच. कौटुंबिक परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाऊ लागल्यावर स्वेच्छानिवृत्ती मागावी लागली. वैद्यकीय कारण म्हणून अनुग्रहाच्या तत्वावर सेवेतून निवृत्ती मिळाली. फारशी रक्कम हाताशी नव्हती. स्वत:चे घरही झालेले नव्हते. मुलगा अजून हाताशी यायचा होता. एक मारुती गाडी चालवायला घेतली. पुढे प्रवासी व्यवसायात उडी घेतली. पुढे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळवली… आणि यश मिळायला आरंभ झाला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शिवदासी लता…” – लेखक : श्री. गो. नी. दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “शिवदासी लता” – लेखक : श्री. गो. नी. दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

असे तीव्रतेने वाटत असे, की या दीदीला कुठेतरी एखादे दृढ आलंबन सापडले असले पाहिजे. एरवी प्रसिद्धीचे अन् लोकप्रियतेचे हे लोटच्या लोट अंगावरून जात असता एखादा माणूस केवळ खुळावून गेला असता.

एके दिवशी अचानकपणे पत्ता लागला. हे लोकप्रियतेचे चपेटे ज्या महापुरुषाच्या आश्रयाने दीदी सोसत्ये आहे, त्याचे नाव कळले.

बाळाकडून (हृदयनाथ मंगेशकर) समर्थभक्त देवांचे समर्थावतार घेऊन आलो – अभ्यासासाठी. पुस्तकाची पहिली पृष्ठे उलटायचे कारण पडले नाही. मधले संदर्भ हवे असत, तेवढ्यापुरता तो भाग उघडला, की माझे काम भागत असे. पण एकदा पुस्तकावर नाव कुणाचे आहे, हे पाहण्याचा फुकाचा चाळा करू गेलो. बाळाचे थोडे तिरके, अतिशय देखणे हस्ताक्षर नुसते पाहत बसणे, हेही एक सुखच आहे.

मुखपृष्ठ उलटले, तो आत अक्षरे दिसली :

“श्रीजगदंबेच्या कृपेने – ज्ञानेश्वरांच्या लेखणीने – समर्थांच्या वैराग्याने – शिवाजीमहाराजांच्या तरवारीने पवित्र झालेल्या या मंगल महाराष्ट्राचा तुला कधी ओढही विसर न पडो, हा आशीर्वाद. “

आणि खाली सही होती –

‘शिवदासी’

१९-१०-५५

चि. हृदय,

१९ व्या वाढदिवसानिमित्त’

 शिवदासी!

 शिवदास्याबद्दल मनी केवढा गौरव! छंदच जडायचा असेल, तर तो हा असा जडावा. तो श्रीमंत योगी अशा अलौकिक योग्यतेचा पुरुषोत्तम होता, की भल्याभल्यांनी त्याचे दास म्हणून मिरवण्यांत धन्यता मानावी! ते एक भावनिक समाधान असते. बऱ्या-वाइटाच्या लाटा भवताली आंदोळत असता मनाला आधार वाटत राहतो, की चिंतेचे कारण काय? ज्याचे दास म्हणून म्हणवितो, त्याने तर याहून अधिक विराटरूप अंगावर झेलून त्याचा भार सहज वाहिला होता!

दीदीचे हे शिवदास्य केवळ कौतुकापुरते नव्हे, याचा प्रत्यय येण्याजोगी एकदोन बरी निमित्ये घडली. शिवराय मंडळाने दादरच्या हेटकरी महाजन वाडीमध्ये शिवछत्रपतिविषयक प्रदर्शन भरवले होते. काही दुर्गांच्या प्रतिमा, छायाचित्रे, शिवजीवनातले चित्ररूप केलेले काही प्रसंग, शिवकालीन शस्त्रे, अशा नाना परी यत्नपूर्वक मिळवून मांडल्या होत्या. अनेक जवानांनी रात्रंदिवस कष्ट केले होते. मात्र त्यांच्या त्या श्रमांचा परिहार करता येईल, असे मंडळाजवळ काही नव्हते। पाचसातशे रुपये खर्चावेत, तेव्हा शिवछत्रपतींच्या नावाला साजेसे कवतिक करता आले असते.

एकदम विचार आला, की दीदीजवळ हात पसरावा. शब्द टाकताक्षणी दीदी मूठभर नोटा घेऊन बाहेर आली; आणि कार्यकर्त्यांच्या मुद्रा उजळून निघाल्या. पावती नेऊन देऊ जाता ती म्हणाली,

“करायची काय पावती? घरच्या कामासाठी कुणी पावत्या का फाडीत बसते? “

दुसरा प्रसंग –

सिंधुदुर्गावरून शिवछत्रपतींच्या पदमुद्रेचा ठसा घेऊन मुंबईस आलो. मनी गौरव दाटला होता, की या क्षणीं आपल्याजवळ एक अलौकिक वस्तु आहे. ज्याला तिचे मोल कळते, तो पाहतांक्षणी मोहरून उठेल. स्वतः शिवछत्रपतींच्या पावलाचा ठसा!

दीदीकडे जाऊन तो कसा मिळवला, इत्यादि सर्व फुशारक्या मारल्या. शेवटी म्हणालो,

“आणि या क्षणी तो ठसा माझ्याजवळ आहे! ”

अतिशय उतावीळ होऊन दीदी म्हणाली,

“खरे? कुठाय्? दाखवा ना! “

ठशावरची आवरणे सोडेतोवरही तिला धीर निघेना. ठसा अनावृत्त होताच तिने अत्यंत श्रद्धापूर्वक करस्पर्श करून हात भाळी टेकला, अन् एखाद्या लहान मुलीप्रमाणे धावत ठसा घेऊन आपल्या शयनगृहात गेली. तिथे तो उशाशी ठेवून दिला. किती वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग भराभरा ज्याला त्याला फोन करून सांगू लागली,

‘हाँ, जी, सुनिये, महाराज शिवछत्रपति का चरणचिन्ह – हाँ, उन्हींका – अभी मेरे पास है, वही तो बता रही हूँ -‘

मात्र आता सूक्ष्मपणे पाहता वाटू लागले आहे, ही स्वरदेवता अलिकडे अधिक गंभीरपणे जीवनाचा विचार करू लागली आहे.

ज्या वेडाने जनी-मीरा झपाटल्या होत्या, त्या दिशेने हे पाखरू भरारू लागले आहे! तिथवर झेप घ्यावी, जिथवर त्या दोघी पोचल्या होत्या. त्याही तर प्रापंचिक कर्दमातून वर उठल्या होत्या. तर मग आपल्यालाही ऐहिक व्यापांची खंत मानायचे कारण नाही. तुकारामाने भरवंसा देऊन ठेवला आहे –

मागे झाले नका पाहो । पुढे जमान आम्ही आहो ।।

जामिनकी त्या महावैष्णवाने स्वीकारली आहे, तेव्हा आता द्यावे स्वतःला झोकून त्या महासमुद्रामध्ये!

 

लेखक:गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जिनॉमिक्स” – लेखक : डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे  – परिचय : डॉ. सुहास नेने  ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जिनॉमिक्स” – लेखक : डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे  – परिचय : डॉ. सुहास नेने  ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  जिनॉमिक्स – मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा

 – – – अद्भुत विज्ञान शाखेची सर्वांगीण ओळख

लेखक : डॉ. संजय गुप्ते, डॉ. अविनाश भोंडवे,

पाने : २८१

मूल्य: ४७५₹ 

जिनॉमिक्स मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नामवंत स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते आणि आजवर आरोग्यविषयक पंचवीस पुस्तकांचे लेखक, फैमिली डॉक्टर, तसेच आरोग्य विश्लेषक म्हणून सुविख्यात डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेले पुस्तक ‘ रोहन प्रकाशन’तर्फे नुकतेच प्रकाशित झाले.

जिनॉमिक्स किंवा जनुकशास्त्र या जीवशास्त्राच्या उपशाखेत, एखाद्या जीवाच्या सर्व जनुकांचा (जीन्सचा) आणि त्यातील डीएनएच्या संपूर्ण रचनेचा, कार्याचा, विकासाचा आणि रोगांशी असलेल्या संबंधाचा अभ्यास केला जातो. जिनेटिक्स किंवा अनुवंश शास्त्र, हे एखाद्या विशिष्ट जनुकाचा वैयक्तिकरीत्या अभ्यास करते. जेम्स वॉट्सन आणि फ्रान्सिस क्रीक यांनी लावलेल्या डीएनएच्या दुहेरी हेलिक्सचा शोध हा या क्रांतीचा पाया होता. जिनॉम मॅपिंग, क्रिस्पआर सिस्टीम, क्रिस्पआर-एसकेपी प्रक्रिया हे या पायावर बांधलेले वरचे मजले आहेत. कृत्रिम मानवी जिनॉम तयार करण्याचे तंत्र, म्हणजे सिंथेटिक जिनॉम प्रोजेक्ट, हा त्याचा कळस आहे. कुणी सांगावे, आयव्हीएफमुळे, कस्टमाईज्ड, डिझायनर बाळसुद्धा अगदी मनाला हवे तसे, प्रयोगशाळेत तयार करता येऊ शकेल आणि तेदेखील मातेच्या आयुष्यातल्या कोणत्याही वयात. या सर्व प्रगतीचा आढावा सोप्या भाषेत या पुस्तकात घेतला आहे.

जनुकीयशास्त्राची सारी मदार जिनॉमवर असते. जिनॉम या सहा अब्ज (तीन अब्ज जोड्या) अक्षरांनी सजलेला, अगणित पानांचा ग्रंथ आहे. ४६ गुणसूत्रे ही त्यातील प्रकरणे आहेत. जीन्स किंवा जनुके ही त्यामधील वाक्ये आहेत आणि बेसेस, न्यूक्लिओटाईड किंवा कोडॉन हे त्यामधील शब्द आहेत. जिनेटिक्सची मूळाक्षरे गिरवताना या पुस्तकात जीनेटिक्स आणि जिनॉमिक्स यांची प्राथमिक ओळख, डीएनएचे कार्य, अनुवंशिकता, उत्परिवर्तन, आनुवंशिक आजार, जनुकीय चाचण्या, त्यांची आवश्यकता, डाएट अशा विविध विषयांवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. जिनॉमिक्सचा केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर शेती, शिक्षण, आहार, क्रीडा आणि गुन्हे अन्वेषणशास्त्र या क्षेत्रात कशा रीतीने कायापालट होतो आहे, याबद्दल या पुस्तकात सविस्तर भाष्य केलेले आहे.

सर्व जगाला भेडसावणाऱ्या कर्करोगाबाबत, कर्करोगाचे जीवशास्त्र उलगडून सांगत आणि या विषयाशी संबंधित मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.

जनुकीय चाचण्या जनुकीय विकारांसाठी आवश्यक आहेत, असे सांगितल्यानंतर त्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध चाचण्या, त्यातही पारंपरिक व खास प्रगत तंत्रज्ञानातील अशी विभागणी करून प्रत्येकातील फायदे तोटे विशद केले आहेत.

जनुकशास्त्राच्या इतिहासात दीपस्तंभासारख्या असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांची नावे घेऊन त्यांना मानवंदना द्यायला लेखक विसरलेले नाहीत. सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीने, स्तनाच्या कर्करोगाबाबत, जनजागृती आणि लोकहिताच्या दृष्टीने केलेल्या कृतीचे कौतुकही ते करतात. ‘जन्माला येणाऱ्या बाळाचे लिंग, पुरुषाच्या गुणसूत्रावरच ठरत असते’, हे स्पष्ट करताना मुलीला जन्म देणाऱ्या मातांना त्रास देणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीला फटकारायला लेखक मागेपुढे बघत नाहीत.

कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीलाही जिनॉमिक्सच्या विश्वात भरारी घ्यावीशी वाटावी, अशा पद्धतीने पुस्तकाची मांडणी केल्यामुळे पुस्तकाचा आवाका वाढतो. सर्वांना समजेल, रुचेल अशा रोजच्या व्यवहारातील उदाहरणांनी, उदा. मांजा फिरकीभोवती गुंडाळलेला असणे, स्वतंत्र कार्यालय, विभागीय कार्यालय, सैनिकांचे हुद्याप्रमाणे रांगेत उभे राहणे, लाकडी पट्टीत ठोकलेले खिळे, समजावून सांगितले असल्यामुळे ते मनात ठसते.

मूळ इंग्रजी शब्दांचे ओढूनताणून मराठीत भाषांतर करण्याचा सोस टाळल्यामुळे मजकुरातील क्लिष्टता कमी झाली आहे. ठिकठिकाणी दिलेल्या आकृत्यांमुळे आणि तालिकांमुळे स्पष्टीकरणास पुष्टी मिळते. अवघड शब्दांची शब्दसूची दिल्यामुळे त्याबद्दल विशेष माहिती मिळविणे सोपे जाते.

मुखपृष्ठावरील रंगसंगती, उचित शब्दरचना आणि नागमोडी शिडीसारख्या डीएनएच्या चित्राने पुस्तकाबद्दलची उत्सुकता शिगोशिग वाढली आहे आणि जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा नक्की उलगडावा, असे वाटल्यावाचून राहत नाही.

समजण्यास अवघड असा हा विषय सरळ, सोप्या, सहज समजेल अशा भाषेत मांडून, या अ‌द्भुत विज्ञान शाखेचा अनोखा खजिना लोकांसाठी उपलब्ध करून दिला, याबद्दल डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे ही लेखकद्वयी अभिनंदनास पात्र आहे. यामुळे सर्वसामान्यांमधील जनुकीय शास्त्राबद्दलची भीती, अज्ञान आणि गैरसमजुतीची दरी मिटवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल याची खात्री वाटते.

पुस्तक परिचय: डॉ. सुहास नेने

 प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # ३२५ ☆ व्यंग्य – विदेश का गड़बड़झाला ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम एवं विचारणीय व्यंग्य – ‘विदेश का गड़बड़झाला‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # ३२५ ☆

☆ व्यंग्य ☆ विदेश का गड़बड़झाला   

ऑस्ट्रेलिया से एक भारतीय लड़की ने वीडियो डाला। लड़की ने वहां के सिस्टम के बारे में जो बताया उसे सुनकर बहुत परेशान हूं। बताया कि  वहां भुगतान मेहनत के हिसाब से मिलता है, शैक्षणिक योग्यता या अनुभव के आधार पर नहीं। एक घंटे के श्रम के 25 डॉलर मिल जाते हैं और आदमी दिन में कम से कम 50 डॉलर कमा ही लेता है।

लड़की ने यह भी बताया कि वहां सबसे ज़्यादा भुगतान शारीरिक श्रम करने वालों— जैसे प्लंबर, इलेक्ट्रीशियन, खदान श्रमिकों, निर्माण श्रमिकों— को मिलता है। इन्हें ‘प्रोफेशनल्स’ का नाम दिया जाता है, और समाज में सबको बराबर सम्मान मिलता है, कोई ऊंचा नीचा का भेद नहीं।

लड़की की बात सुनकर दिमाग ख़राब हो गया। यह कैसा देश है, भाई, जहां पांचों उंगलियों को बराबर माना जाता है। हमारे देश में ऐसा हो जाए तो हाहाकार मच जाए। फिर जाति- प्रथा का मतलब ही क्या रह जाएगा? ऑस्ट्रेलिया में जिन्हें ‘प्रोफेशनल्स’ कह कर अच्छा वेतन देते हैं उन्हें यहां दिन में चार-पांच सौ कमाने में देवता याद आ जाते हैं। समाज में इज़्ज़त पाने की बात करें तो  देश में इन ‘प्रोफेशनल्स’ को कोई बैठने के लिए स्टूल नहीं देता, कुर्सी की बात छोड़ दीजिए। ज़्यादातर को शस्य श्यामला भूमि पर ही आसन मिलता है। ‘डिगनिटी ऑफ लेबर’ यानी श्रम की प्रतिष्ठा का यह हाल है कि बड़ा आदमी वही माना जाता है जो अपने हाथ से लेकर पानी भी न पिये।

ऑस्ट्रेलिया जैसा किस्सा न्यूज़ीलैंड का भी सुनने को मिला था जहां मेरे एक परिचित प्रोफेसर किसी अध्ययन के लिए गये थे। वहां उनके दफ्तर में सफाई कर्मी आता था जिसे ‘जेनिटर’ कहते थे। जब प्रोफेसर साहब के भारत लौटने का वक्त आया तो जेनिटर ने उन्हें अपने घर पर भोजन के लिए आमंत्रित किया और शाम को उन्हें अपनी कार से घर ले गया। वहां उनके लिए विशेष तौर से शाकाहारी भोजन तैयार कराया गया था। मैंने सोचा कि यदि भारत में कोई सफाई कर्मचारी हमें भोजन के लिए आमंत्रित करे तो हम उस आमंत्रण से बचने की कोशिश करेंगे। सोचेंगे कि इस बंदे के पास खुद के खाने को है या नहीं, या हमें ऐसे ही न्योत रहा है। लगेगा कि उसका दिमाग़ चल गया है।

हमारे यहां सबसे अधिक पैसा उन्हें मिलता है जो कम से कम श्रम करते हैं। कुर्सी पर बैठकर काम करने वालों का भुगतान लाखों में होता है, लेकिन काम का आकलन कोई नहीं। इसीलिए मोटापे और उच्च रक्तचाप का रोना आम है। शारीरिक श्रम करने वाले का जीवन एक-एक दिन के हिसाब से चलता है। कल का कोई भरोसा नहीं। कभी एक अधिकारी के बारे में सुना था जिन्होंने अपना एक कोट कुर्सी पर स्थायी रूप से टांग दिया था। वे खुद दफ्तर से ग़ायब रहते थे, लेकिन किसी के पूछने पर कोट की तरफ इशारा कर दिया जाता था कि ‘यहीं कहीं गये हैं।’ ऐसे ही नौकरी करते-करते वे वैतरणी पार कर गये।

कुर्सी की शोभा बढ़ाने वालों को तनख्वाह के अलावा एक और भत्ता मिलता है जिसे रिश्वत-कम-कमीशन भत्ता कहते हैं। जितना बड़ा और ताकतवर पद, उतना ही ज़्यादा रिश्वत-भत्ता। कई अफसर हर सरकार के प्रियपात्र बने रहते हैं तो कई हर सरकार की आंख में चुभते हैं। हरियाणा में आई. ए. एस. खेमका जी हर छः महीने में ट्रांसफर झेलते अंततः रिटायर हो गये। उनके रिटायर होने पर बहुतों ने राहत की सांस ली होगी।

दूसरी तरफ, असंगठित क्षेत्र के श्रमिक को पूरी मज़दूरी मिल जाए, वही बहुत है। उसमें भी ठेकेदार का कमीशन कटता है। बिना सुरक्षा- उपकरण के कहीं बिजली के खंभे पर सुधार के लिए चढ़ा दिया जाता है तो कहीं बिना सुरक्षा- उपकरण के गैस से भरे सीवर में उतार दिया जाता है। ‘चढ़ जा बेटा सूली पर, भली करेंगे राम।’

ऐसे में हमें लगता है कि हमें अपने देश से परसाई के इंस्पेक्टर मातादीन की तरह कुछ अधिकारियों को ऑस्ट्रेलिया और न्यूज़ीलैंड जैसे देशों में भेजना चाहिए जो वहां के सिस्टम में ज़रूरी सुधार करवा सकें। अभी तो लड़की की बातें सुनकर मेरे दिमाग़ ने काम करना बन्द कर दिया है।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ गद्य क्षणिका# ९६ – वंदन… – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे।

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय गद्य क्षणिका “– वंदन…” ।

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी  ☆ गद्य क्षणिका # ९६ — वंदन — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

मैंने देखा मेरी टूटी हुई वीणा ने स्वयं अपनी मरम्मत कर ली है। पर मैं तो वीणा के मामले में छलिया हूँ। मेरे पास वीणा हो सकती है, लेकिन मैं उसके तारों को झंकृत नहीं कर सकता। पर मेरी वीणा की बात कुछ और है। विशेष कर आज मेरी वीणा आकंठ जागृत थी। मैं चुप था। मेरी वीणा ने स्वयं गाया, “मॉरिशस पहुँचे उन प्रथम भारतीय मजदूरों को वंदन जिनकी कुदाल से इस देश की धरती पहली बार स्पंदित हुई थी।”

 © श्री रामदेव धुरंधर

24 – 02 – 26

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : rdhoorundhur@gmail.com

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # ३२६ – शुष्क गले की ओर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है। साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

।। माँ सरस्वत्यै नमः।।

☆  संजय उवाच # ३२६ शुष्क गले की ओर… ?

कुछ दिन पहले राजस्थान के ग्रामीण अंचल में परिवार के एक विवाह समारोह में जाना हुआ। यह मेरा पैतृक प्रदेश है। परदेसी हो जाने पर भी यहाँ का सांस्कृतिक वैभव, माटी की सोंध, खान-पान का स्वाद और उसका सुवास भीतर गहरे तक बसे हैं। बचपन में देखे धूल उड़ाते टीबे या बालू के टीले अब दिखाई नहीं देते पर स्मृतियों पर धूल अभी नहीं जमी नहीं है। 

स्मृतियों की इस मधुर शृंखला को तब एकाएक झटका लगा, जब पैर से आकर कुछ टकराया। दृष्टि झुकी तो हतप्रभ रह गया। पैरों में मिनरल वाटर की एक सीलबंद बोतल पड़ी थी।

हुआ यूँ कि समारोह में विविध प्रकार के व्यंजनों के काउंटर लगे थे। एक काउंटर पर हजारों की संख्या में मिनरल वाटर की 200 मिलीलीटर वाली बोतलें थीं।

देखता हूँ कि कुछ बच्चे काउंटर से पानी की सीलबंद बोतल लेकर उन्हें खोले बिना, उनसे फुटबॉल खेल रहे हैं। मैं जड़वत हो गया। पानी को सिर नवाने वाला समाज, पानी को पैरों से ठोकर लग रहा है।

स्मृतिचक्र फिर बचपन में ले गया। पिताजी सेना में थे। उनका, भारत के विभिन्न राज्यों में स्थानांतरण होता रहता। हमारी वार्षिक छुट्टियों में माँ, हमें हमारे ननिहाल लेकर जाती। सामान्यतः यह विवाह का भी मौसम हुआ करता। इस अवधि में अनेक विवाह समारोहों में जाने का अवसर मिलता।

आज से लगभग पाँच दशक पूर्व के इन समारोहों में रामझरे से पानी से पिलाया जाता। रामझरा पानी संग्रह करने का लोटेनुमा पर आकार में बड़ा पात्र होता है, जिसमें जल पिलाने के लिए एक नली भी लगी होती है। उन दिनों काँसे से बने रामझरे उपयोग में लाए जाते थे। हमें पानी हथेलियों को आपस में जोड़कर चुल्लू से पीना होता था। राजस्थान में इसे ओक से पीना कहते हैं। हथेलियों को ठीक से बंद नहीं कर पाते तो बुज़ुर्गों से डाँट पड़ती कि पानी बर्बाद नहीं किया जा सकता।

नीति कहती है, ‘अति सर्वत्र वर्ज्येत।’ अति अंततः संकट का कारण बनती है।  मरुधरा में पानी को ठोकर लगाई जा रही है। पंचतत्वों में से एक है पानी। मनुष्य पंचतत्वों से बना है। मनुष्य पंचतत्वों को नष्ट करने पर तुला है। भावार्थ है कि मनुष्य भस्मासुर हो चला है।

बच्चों को मीठी झिड़की दी। पानी की  बोतलें एक स्थान पर जमा करने के लिए कहा। बच्चे खेल बंद करके भाग गए।

प्रश्नों से दूर भागने से प्रश्न समाप्त नहीं होते। विकास हो, वस्तुएँ उपलब्ध हों, सुविधा बढ़ें, यह सहज मानवीय भाव है पर विपुलता, जीवनावश्यक तत्वों का अपव्यय करे तो यह आशंका को जन्म दे सकता है। स्मरण रखा जाना चाहिए कि इसी अपव्यय के चलते जोहानिसबर्ग, विश्व में पहला बिना पानी का शहर होने के मुहाने पर है।

सिगरेट और अन्य तंबाकूयुक्त पदार्थों पर वैधानिक चेतावनी छपी होती है कि उनका सेवन स्वास्थ्य के लिए खतरनाक है। सोचता हूँ, समय आ गया है कि  मिनरल वॉटर की बोतलों पर छपा हो कि पानी की एक भी बूँद का अपव्यय, शुष्क गले की ओर एक क़दम है।

शेष चिंतन और आचरण अपना-अपना।

© संजय भारद्वाज 

प्रातः 3:29 बजे 28 फरवरी 2026

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आशुतोष साधना संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र ही दी जावेगी। 🕉️ 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares