मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा! ☆ श्री संभाजी बबन गायके 

एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा!

 – – रावणाच्या लंकेत पराक्रम गाजवणारे ‘राम’स्वामी परमेश्वरन!

२५ नोव्हेंबर, १९८७. साडे पाच वाजले होते… पहाटेचा अंधार संपत आला होता. रात्री दीड वाजल्यापासून या ठिकाणी अंधारात सापळा रचून, डोळ्यांत तेल घालून बसलो होतो… सर्वांची बोटं ट्रिगरवरच होती. काल संध्याकाळी पक्की खबर आली होती… याच गावात असलेल्या एका घरात अतिरेक्यांनी हत्यारांची मोठी खेप उतरवून घेतलेली आहे. त्यानुसार मी कॅप्टन डी. आर. शर्मांना PATROLING PARTY घेऊन जाऊन खात्री करून घ्यायला पाठवले होते. कॅप्टन शर्मा आणि त्यांचे वीस जवान त्या घराच्या जवळ पोहोचताच, त्यांच्यावर त्या घराजवळ असलेल्या एका मंदिराच्या गच्चीवरून तुफान आणि अचूक गोळीबार झाला! त्यात काही जवान जखमी झाले. कॅप्टन शर्मा तिथून काहीसे मागे आले आणि त्यांनी बटालियन हेडक्वार्टरला संदेश दिला की, ते गाव LTTE अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलमच्या ताब्यात असून त्यांचे संख्याबळ अधिक असून त्यांची हत्यारे आधुनिक आणि प्रभावी आहेत!

मी कॅप्टन शर्मांना तिथेच सुरक्षित जागी थांबून राहण्याचे आदेश दिले आणि निवडक सैनिकांची एक मोठी तुकडी घेऊन घटनास्थळाकडे त्वरीत कूच केले. तिथे पोहोचायला मला रात्रीचा दीड वाजला. कारण अंतर बरेच होते, रस्त्यात जंगल होते, त्यामुळे सावधानतेने जाणे गरजेचे होते.

आम्ही तिथे पोहोचलो तर त्या भागात एकदम स्मशान शांतता होती. त्या घराच्या जवळ एक ट्रक उभा होता. आम्ही त्या घराला वेढा घातला आणि सकाळी उजाडताच कारवाई करण्याची योजना आखली. पण सकाळी साडेपाच पर्यंत काहीही झाले नाही. त्या घरातून काहीही हालचाल झाली नाही. त्या घरात कुणीही नव्हते, हत्यारेही नव्हती. त्यामुळे आम्ही तिथून परतण्याचा निर्णय घेतला… काही अंतर चालतो न चालतो तोच… आमच्यावर तिथून अगदी जवळच असलेल्या जंगलातून जोरदार गोळीबार सुरु झाला. HMG अर्थात हेवी मशीन गन, एके-४७, हातगोळे इत्यादी शस्त्रांनी आमच्या तुकडीवर प्राणघातक हल्ला झाला! पहिल्याच फेरीत आमचे सुमारे दहा बारा जवान धारातीर्थी पडले!

मी कॅप्टन शर्मांना तिथूनच गोळीबाराला उत्तर देण्याचे आदेश देत ज्या जंगलातून हल्ला सुरु होत्या त्याच्या मागच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला… कारण अजून तसे उजाडले नव्हते… आहे त्या अंधाराचा फायदा घेत, थोड्या लांबच्या रस्त्याने जाऊन शत्रूवर मागून प्रहार करण्याची माझी योजना होती. त्यानुसार मी माझ्या वीस सैनिकांना घेऊन निघालो. गोळीबाराचा आवाज येत होता, त्या दिशेने गेलो… एवढ्यात अंधारातून माझ्या छातीवर रायफल टेकवली गेली… मोठा आवाज झाला आणि त्या रायफलमधून सुटलेली एक गोळी माझ्या बरगड्या फोडत छातीत घुसली… तो धातूचा लालबुंद तापलेला गोलाकार गोळा… खोलवर घुसला… मांस जाळत, चिरत! रक्ताची चिळकांडी उसळली… डोळ्यांपुढे अंधारी आली… आई, बाबा, पत्नी डोळ्यांसमोर दिसू लागली… आता त्यांची कधीही भेट होणार नाही! लष्करात आलो तेंव्हाच समजलं होतं… कुठल्या तरी गोळीवर आपले नाव निश्चित लिहून ठेवले गेले असेल तर त्या गोळीला रोखू शकणार नाही कुणीच. आणि तशी गोळी बनली नसेलच तर मात्र मला काहीही होणार नव्हतं. मरण तर काय कुठेही, कसेही येतेच. देशसेवेत आले मरण तर सोन्याहून पिवळे! माझ्या हातातली रायफल गळून पडली त्या प्रहाराने… पण त्याच उजव्या हाताने मी ती माझ्यावर डागली गेलेली रायफल, तिची नळी पकडली आणि जोर लावून माझ्याकडे खेचली… ती रायफल धरणारा दचकून मागे सरला… त्याला कल्पनाच नव्हती की ज्याला आपण छातीत गोळी घातली आहे… तो असं काही करेल! मी वायूवेगाने रायफल पेलली… ट्रिगर दाबला आणि समोरच्याच्या छाताडात एक नव्हे, दोन नव्हे… सलग पाच-सहा गोळ्या मारल्या… त्याच्या तोंडून मोठी किंकाळी आणि शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या… धूर निघाला! आणि तो धाडकन कोसळून पडला!

आता अतिरेक्यांनी हल्ल्याचा वेग वाढवला तसा मी ही आहे त्या जागेवरून माझ्या तुकडीला जोरजोरात सूचना देत राहिलो.. माझ्या महार रेजिमेंटची युद्ध घोषणा दिली… बोल… हिंदुस्तान की जय! श्रीलंकेत माझ्या भारताचे, हिंदुस्तानचे नाव त्या जंगलात गुंजत राहिले… माझे जवान लढत राहिले… काही वेळाने आपल्या मदतीसाठी आणखी सैनिक तिथे पोहोचले… मी रक्तबंबाळ… घायाळ… घरच्या, घरातल्यांच्या… माझ्या मायभूमीच्या आठवणीत डोळे मिटले… ते कायमचेच! १३ सप्टेंबर २०२६ रोजी ८० वर्षांचा झालो असतो!

आमचे मूळ गाव केरळमधल्या कोट्टयमजवळचे रामपूरम. आमचे कुळ किलीमंगलम नावाचे. वडील शंकरनारायनन आणि आई जानकी पोटासाठी मुंबईत येऊन राहिले आणि इथेच १३ सप्टेंबर, १९४६ रोजी माझा जन्म झाला. माझे शालेय शिक्षण आणि विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण सायन येथील SIES अर्थात साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा-महाविद्यालयात झाले. घरची लष्करी पार्श्वभूमी नसतानाही मी देशाच्या सेवेसाठी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. आणि The Officers’ Training School, Chennai (जी आता Officers’ Training Academy म्हणून ओळखली जाते) मधून १९७२ या वर्षी लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षित झालो. मला १५, महार रेजिमेंटमध्ये नेमण्यात आले. पुढील आठ वर्षे मी या रेजिमेंटमध्ये राहिलो. आम्हांला भारताच्या ईशान्येकडील राज्यांत देशविरोधी शक्तींचा मुकाबला करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ती मी यथाशक्ती पार पाडली. ‘बोलो, हिंदुस्तान की जय! ’ ही आमची युद्ध घोषणा आणि ‘यश सिद्धी’ हे आदर्श वाक्य आहे. मला माझी मातृभाषा मल्याळम तर येत होतीच, पण माझी जन्मभूमी असलेल्या मुंबईची मराठीही अवगत होती आणि… तमिळ सुद्धा! माझे सैनिक मला ‘पारी साहेब’ म्हणत… परमेश्वरन आडनावामुळे असेल बहुदा! लष्करी अधिका-यांनी नेहमी पुढे राहून नेतृत्व करावे, अशा विचारांचा मी होतो… त्यामुळे ईशान्येत अनेक अतिरेकीविरोधी मोहिमांत मी नेहमी आघाडीवरच राहिलो! ‘१५, महार’ मधून मला पुढे ‘५, महार’ मध्ये पाठवले गेले.

श्रीलंका आपला शेजारी देश… केवळ १८. ६ समुद्री मैल किंवा किलोमीटर्सच्या भाषेत ३४. ५ किलोमीटर्स एवढेच अंतर. या देशाशी आपला संबंध अगदी पुराण काळापासूनचा आहे. पुढे तमिळनाडूमधून मोठ्या संख्येने शेतमजूर श्रीलंकेत स्थायिक व्हायला गेले. श्रीलंकेतील बहुसंख्य ‘सिंहली’ समुदाय आणि मूळच्या भारतीय पण आता श्रीलंकेत कित्येक पिढ्यांपासून स्थायिक झालेल्या समुदायामध्ये संघर्ष पेटला. तमिळ लोकांपैकी काहींनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम अर्थात L. T. T. E. ही सशस्त्र संघटना स्थापन केली आणि श्रीलंका सेनेशी गृहयुद्ध सुरु केले. काही राजकीय उद्दिष्ट लक्षात घेऊन भारताने श्रीलंका आणि तमिळ बंडखोर यांच्यात परस्पर शांतता राखण्यासाठी श्रीलंकेत ‘शांतिसेना’ अर्थात IPKF इंडियन पीस कीपिंग फोर्स’ पाठवायचे ठरवले. ५४ व्या पायदळ डिविजनमध्ये ८, महार रेजिमेंटही या शांतिसेनेचा एक भाग बनली… आणि मला या रेजिमेंटमध्ये जबाबदारी देण्यात आली… मला तमिळ भाषा येत होती ही बाबही लक्षात घेतली गेली असावी… श्रीलंकेत तमिळ भाषिक आहेत.. त्यांच्याशी संवाद साधायला माझ्या भाषा ज्ञानाचा उपयोग झाला!

भारतीय लष्कर जो आदेश देईल तो प्राणपणाने पाळण्याची आपल्या सैनिकांची परंपरा आहे… मी ही याला अपवाद नव्हतो! जो देशाविरोधात, देशाच्या लष्कराच्या विरोधात शस्त्र हाती घेईल… तो आमचा शत्रू हे सैनिकांचे धोरण आणि प्रशिक्षण असते… बाकी राजकीय, धार्मिक, सामाजिक बाबी आम्ही शिपाईगडी ध्यानात घेत नसतो!

आरंभी श्रीलंकेतील तमिळ जनतेने शांतिसेनेचे स्वागत केले. परंतु पुढे दुर्दैवाने त्यांनीच भारतीय लष्करावर हल्ले करायला सुरुवात केली. शेजारी राष्ट्रांपैकी काही राष्ट्रं श्रीलंका लष्कराला तर काही राष्ट्रं तमिळ बंडखोरांना शस्त्रपुरवठा करू लागली. शांतिसेनेचे काम असल्याने सुरुवातीला भारतीय लष्कर युद्धाच्या तयारीनिशी श्रीलंकेत गेलेच नव्हते. त्यामुळे आधुनिक, मोठी शस्त्रे सोबत नेण्याचा प्रश्नच नव्हता… आणि इथेच खरी समस्या उभी राहिली!

परंतु उत्तम प्रशिक्षण, शौर्याच्या जोरावर भारतीय सैनिकांनी तमिळ बंडखोरांवर बाजी उलटवली… परंतु त्यासाठी ११७१ सैनिकांना प्राणार्पण करावे लागले आणि ३५०० पेक्षा अधिक सैनिक जायबंदी झाले!

मला माझ्या शौर्याबद्दल भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार ‘परमवीर चक्र’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला. परकीय भूमीवर भारतीय सैन्यातून कामगिरी करीत असताना एखाद्या सैनिकास दिले गेलेले हे तसे पहिलेच ‘परमवीर चक्र’! १९६१ मध्ये कांगो देशातील कटंगा येथे संयुक्त राष्ट संघाच्या आंतरराष्ट्रीय सैनिकांचा समावेश असलेल्या शांतिसेनेत अतुलनीय पराक्रम गाजवल्याबद्दल कॅप्टन गुरुबचनसिंग सलारिया साहेबांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले होते. आपला देश युद्धात सहभागी नसताना परदेशातल्या युद्धभूमीवर पराक्रम गाजवल्याबद्द्ल ‘परमवीर चक्र’ मिळवणारा केवळ दुसराच सैनिक ठरलो होतो. तसेच ‘परमवीर चक्र’ मिळवलेला OTAचा माजी विद्यार्थी म्हणून मी आजवर एकमेव आहे!

परंतु… पण… त्याचं काय झालं… माझ्या शौर्याची देशात फार काय सुरुवातीला तर अजिबातच चर्चा झाली नाही. कुसुमाग्रजांनी नेमकं म्हणून ठेवलं आहे… स्तंभ तिथे ना कुणी बांधला… पेटली न वात!

त्यावेळचं भारतातील राजकीय, सामाजिक वातावरण, आंतरराष्ट्रीय संबंध या व अशा अनेक कारणांमुळे अगदी २०२५ पर्यंत माझ्या किंवा श्रीलंकेत भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन पवन’ (१९८७-१९९०) मध्ये दिलेल्या ११७१ बलिदानांचा अधिकृत स्मृतिदिन कुठे पाळला जात नव्हता! श्रीलंकेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे, काही अधिका-यांचे मृतदेह भारतात आणले जाऊ शकले नाहीत!

‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझ्या कुटुंबास विशेष आर्थिक लाभही दिला गेला नाही… किंबहुना ‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझे नावही काही फारसे प्रसिद्ध नव्हते! श्रीलंका सरकारने मात्र २००८ मध्ये कोलंबो येथे IPKF Memorial निर्माण केले!

२०१८ मध्ये OTA मधले ३७ सेवानिवृत्त लष्करी अधिकारी-मित्र एकत्र आले. त्यांनी सात लाख रुपयांचा निधी गोळा केला आणि महार रेजिमेंटच्या सैनिक-अधिका-यांनी त्यात एक लाखाची भर घातली आणि माझा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारला… रायफल हाती आहे माझ्या! OTA मधल्या Drill Square ला माझे नाव देण्यात आले आहे. मी याच ठिकाणी इतरांची सरावाची वेळ संपली तरी March-Pastचा सराव करीत असे. त्यावेळी नेमके भारत-पाक युद्ध सुरु झाले होते, काही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सोडून निघूनही गेले… पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहिलो! देशासाठी मरण पत्करणे ही एक भावना आहे. मात्र सैनिक युद्धात शत्रूला मारायलाच जात असतात… मरायला नव्हे! परंतु या प्रयत्नांत मरण आलेच तर ते हसत हसत स्वीकारण्याचीही तयारी असते सैनिकांची! अशा सैनिकांच्या बळावरच तर देश टिकून राहतात… देशाच्या सीमा सुरक्षित राहतात! सैनिक होण्यासाठी काही किंमत चुकवावीच लागते… आणि त्याबद्दल सैनिकांची काहीही तक्रार नसते!

२३ जानेवारी, २०२३ रोजी अंदमान-निकोबार मधील एका बेटाचे माझ्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रामस्वामी बेट’ असे नामकरण करण्यात आले! मागील वर्षी २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी साहेबांनी भारतीय लष्कराच्या वतीने माझ्या आणि ऑपरेशन पवन मध्ये धारातीर्थी पडलेल्या सर्व सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्पचक्र वाहिले! माझी पत्नी लेखिका, कवयित्री श्रीमती उमा परमेश्वरन उपस्थित होती. ही परंपरा आता सुरु राहील! सैनिकांचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो, ते केवळ पगार मिळतो म्हणून नोकरी करीत नाहीत.. किंबहुना सैन्यातील सेवा ही नोकरी नव्हेच… तो एक करार असतो आत्म्याने देशाशी केलेला… आणि हा करार प्राण देऊनही पाळला जातोच!

(ऑपरेशन पवन मध्ये महाराष्ट्राचे, मराठा लाईट इन्फंट्री, महार रेजिमेंट यांच्या विविध तुकड्यांमधील तसेच अन्य काही विभागातील सुमारे ८५ पेक्षा अधिक सैनिक हुतात्मा झाले. यांपैकी शिपाई प्रभाकर बयाजी पत्रे आणि हवालदार पांडुरंग काकफळे, सुबेदार सीताराम पाटील (गढवाल रायफल्स) यांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्काराने तर लान्स नायक मिलिंद कांबळे, यांना मरणोत्तर सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. या यादीत नाईक श्रीधर विठ्ठल कुरणकर(गढवाल रायफल्स) हेही मराठी नाव आढळते ज्यांना मरणोत्तर वीर चक्र आणि सेना मेडल मिळाल्याचा उल्लेख आहे. इंटरनेटवर शहीद उपवन मध्ये ही सर्व नांवे आहेत. असो.

जय हिंद… जय हिंद की सेना.

(हा लेख संपूर्णपणे अराजकीय आहे)

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अग्नी किंवा तेज ऊर्जा ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जल ऊर्जा (Water Energy) ☆ विभावरी कुलकर्णी ☆

मिळवण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील जलतत्त्व संतुलित करण्यासाठी व मनाला शांत करण्यासाठी प्रभावी पद्धत आहे. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. जल ऊर्जा हे निसर्गाशी जोडलेली शांतता आणि भावनांवर नियंत्रण मिळवून देणारी असते.

जल ऊर्जेचे फायदे:

मानसिक शांती:

पाण्या सारखा प्रवाहीपणा आपल्या विचारात येतो. त्या मुळे मनातील गोंधळ कमी होतो. व एकाग्रता वाढण्यास मदत होते.

पाण्यासारखी स्थिरता आणि शांतता मिळण्यास मदत होते.

तणावमुक्ती: मज्जासंस्था शांत होते. आणि मानसिक ताण कमी होतो. ही ऊर्जा स्नायुंमधील ताण कमी करुन शरीराला शिथिल (Relax) करते. त्यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते.

सर्जनशीलता:

मन स्पष्ट आणि शांत झाल्यामुळे कल्पकतेत वाढ होते. मनाला नवीन दृष्टी मिळते.

भावनिक समतोल: भावनांचे नियमन करण्यास आणि नकारात्मकता कमी करण्यास मदत होते. जलतत्व हे भावनांशी संबंधित असते. या मुळे राग, भीती, तणाव या सारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. आणि मन स्थिर होते.

लवचिकता

पाणी जसे पात्रा प्रमाणे आकार धारण करते त्या प्रमाणे ही ऊर्जा जीवनातील बदल स्वीकारण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता वाढवते.

अंतर्मनाची शुद्धी

पाणी जसे अशुद्धी धुवून टाकते, त्या प्रमाणे ही जलऊर्जा मनातील जुन्या नकोशा आठवणी, दुःख, नकारात्मक विचारांचे ओझे स्वच्छ करुन मन हलके करते.

अंतर्ज्ञान

ही ऊर्जा अंतर्ज्ञानाशी (Intuition) जोडलेली असते.

सकारात्मक ऊर्जा वाढणे

या ऊर्जे मुळे शरीरातील ऊर्जा केंद्रे (चक्र) संतुलित होतात.

टीप: हे ध्यान रात्रीच्या वेळी किंवा शांत वातावरणात करणे अधिक फलदायी मानले जाते, जेणेकरून मन अधिक एकाग्र होऊ शकते.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ अकाऊंट क्लोज्ड…  – लेखक : श्री संजय मानके ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष ☆

वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अकाऊंट क्लोज्ड…  – लेखक : श्री संजय मानके ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष 

संध्याकाळचे सहा वाजले होते. बाल्कनीत बसून हातातला चहाचा कप पेलताना जनार्दनरावांचे डोळे उगाचच शून्यात दाटले होते. नेहमीप्रमाणे मनात विचारांचे वादळ सुरू होते—गेल्या महिन्यात मुलगा-सुनेने स्वतंत्र राहण्याचा घेतलेला निर्णय, काल रस्त्यात भेटूनही न बोलता निघून गेलेला जुना मित्र, आणि दोन वर्षांपूर्वी ज्या नातेवाइकाला अडीअडचणीत मोठी आर्थिक मदत केली त्यानेच नंतर फिरवलेली पाठ!

 मी आयुष्यभर लोकांसााठी काय काय नाही केलं? पण बदल्यात मला काय मिळालं? फक्त उपेक्षा आणि अपमान… जनार्दनराव स्वतःशीच पुटपुटले. त्यांच्या छातीत एक ओळखीची जाळणारी व्यथा जागी झाली.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात जनार्दनरावांचे जुने स्नेही आणि अभ्यासू लेखक ‘वपु’ उभे होते.

“काय जनार्दन, कसला विचार चालू आहे? चेहरा एवढा पडलेला का? ” वपुंनी आत येत विचारले.

जनार्दनरावांनी उसासा टाकला, “काय सांगू वपु, लोकांच्या वागण्या-बोलण्याचा फार त्रास होतो आजकाल. ज्यांच्यासाठी आयुष्य घासले, तीच माणसे अशी विचित्र वागतात. अपमान करतात, दुर्लक्ष करतात. उपकारांचे विस्मरण झाले आहे सगळ्यांना. “

वपु थोडे हसले. त्यांनी खिशातून एक छोटी वही काढली आणि समोरच्या टेबलावर ठेवत म्हणाले, “जनार्दन, एक सांगू? आपण या जन्मात येतो ते कोणाच्या अपेक्षा पूर्ण करायला नाही, तर आधीच्या कुठल्यातरी जन्माची परतफेड करायला! आपण प्रत्येकाचे मनात एक ‘खाते’ उघडून बसलोय. आणि समोरच्याने आपल्या इच्छेनुसार वागावे, अशी अपेक्षा ठेवतो. “

“पण वपु, त्रास तर होतोच ना? ” जनार्दनराव काकुळतीला येऊन म्हणाले.

“त्रास तेव्हाच होतो, जेव्हा आपण ते खाते अजून चालू आहे असे मानतो, ” वपु शांतपणे समजावून सांगू लागले, “तुम्ही दृष्टिकोन बदला. मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत? समजा, एखादी जुनी परतफेड होती, ती या जन्मात पूर्ण झाली. तुमच्या उपकारांची कोणाला आठवण राहिली नाही? समजा, ते खाते आता पूर्ण झाले. बँकेत शिल्लक संपली की पासबुकावर कसा ‘अकाऊंट क्लोज्ड’चा शिक्का मारतात? बस, तसेच मनातल्या या माणसांच्या नावावर ‘अकाऊंट क्लोज्ड’चा शिक्का मारा आणि त्यांच्या नावाचे पासबुक जाळून टाका! “

जनार्दनराव थबकले. वपुंचे शब्द थेट त्यांच्या मनाचा ठाव घेत होते.

वपु पुढे म्हणाले, “आपले मन जेवढे बलदंड असते ना जनार्दन, तेवढेच ते लवचीकही असते. आजवर तुम्ही मनाच्या हुकुमात राहिलात, त्याच्या भावनांची गुलामी केलीत. आता त्या मनाला सांगा—’बाबा रे, आजपासून मी तुला मुक्त करत आहे. ‘ परतफेडीचा हिशेब या जन्मात संपवल्याशिवाय सुटका नाही. मग कशाला विचारता परमेश्वराला की मला का जगवलंस? जे घडतंय, ती केवळ परतफेड आहे, हे स्वीकारा. “

जनार्दनरावांनी डोळे मिटले. मनातल्या गच्च साचलेल्या आठवणींकडे ते एका वेगळ्या नजरेने पाहू लागले. मुलगा दूर गेला—’अकाऊंट क्लोज्ड! ‘ मित्राने दुर्लक्ष केले—’अकाऊंट क्लोज्ड! ‘ नातेवाइकाने फसवले—’अकाऊंट क्लोज्ड! ‘

आश्चर्य म्हणजे, एकेक खाते बंद झाल्याची भावना मनात येताच, छातीत वर्षानुवर्षे साचलेला तो जाळणारा भार हळूहळू हलका होऊ लागला.

वपु उठले, त्यांनी जनार्दनरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि मिश्किलपणे म्हणाले, “हा प्रयोग करून बघा जनार्दन, आणि किती खाती फटाफट बंद होतात याची प्रचिती घ्या. अगदी उद्या मीसुद्धा तुम्हाला रस्त्यात भेटलो आणि ओळख दाखवली नाही, तर तुमच्या पासबुकात माझी एकच एन्ट्री होती, असं समजा आणि माझी फाइलही बंद करा! “

वपु निघून गेले. जनार्दनराव पुन्हा बाल्कनीत येऊन उभे राहिले. आता संध्याकाळचा वारा त्यांना शांतवत होता. मनात दुःखाची किंवा रागाची कोणतीही भावना शिल्लक नव्हती.

 अनेक वर्षांनंतर आज जनार्दनरावांनी एक दीर्घ, मोकळा श्वास घेतला. कारण, त्यांच्या मनातील नकारात्मकतेची सर्व पासबुके आज खरोखरच जळून खाक झाली होती!

 

लेखक: श्री संजय मानके

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अंतिम इच्छा ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अंतिम इच्छा ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

रोज येऊनी दारवठ्याला

वाट तुझी बघत बसते,

आज उद्या नक्की येशील

समजूत मनाची घालते!

*

 भूल तुला कशी पडली

 दूरच्या स्वप्न-नगरीची,

 सोडून सारी शेती वाडी

 वाट धरलीस त्या देशीची!

*

थकली सारी गात्रं आता

आला दिवस ढकलते,

नाही सोडली वेडी आशा

भरवसा उद्यावर ठेवते!

*

 डोळे माझे मिटण्या आधी

 तुला एकदाच पाहायचंय,

 डोकं ठेवून तुझ्या मांडीवर

 शांतपणे मला जायचंय!

 शांतपणे मला जायचंय!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ व्योमकेशीणी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? व्योमकेशीणी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

वाढता वाढता

परिघ वाढला,

जाहला ब्रह्मांडाएवढा

तूझिया अस्तित्वाचा…

 

सारे मानव

झाले तूझीच

तूही झालीस

तयांचीच…

 

ज्ञानसूर्य होवोनी

पसरलीस किरणे बनूनी

सदगुरु ॐ आई 

विश्वाचिच झाली…

 

एकदेशी न उरली

व्यापिले व्योमकेश,

ग्रहनक्षत्रे, देवही

तव भवती रास करिती…

 

सकल आत्म्यांची

तू आत्मा झालीस,

प्रत्येकाच्या हृदयी तू

तूझिया हृदयी 

ब्रह्मांड वसे…

 

एकरुप झाली

स्व रुप नुरले

पूर्णत्वाची प्रतिमा तू

द्वैत अद्वैतात विरून गेले…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # २९८ ☆ रक्षाबंधन : रिश्तों की हरियाली का पर्व ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना रक्षाबंधन : रिश्तों की हरियाली का पर्व। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख # २९८ ☆

रक्षाबंधन : रिश्तों की हरियाली का पर्व ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

आम नीम बरगद संग, पीपल की छाँव ।

महुआ और जामुन से, महकेगा गाँव ।।

*

टेसू के लाल फूल, चंपा सुहाय ।

गुलमोहर सेमल मन, सबका लुभाय ।।

रक्षाबंधन केवल भाई-बहन के स्नेह और विश्वास का पर्व नहीं, बल्कि हमारी प्रकृति और जीवन-मूल्यों से जुड़ने का भी सुंदर अवसर है। जिस तरह राखी का धागा भाई-बहन के रिश्ते को प्रेम और जिम्मेदारी से बाँधता है, उसी तरह एक पौधा हमें धरती के साथ अपने रिश्ते की याद दिलाता है।

आज जब पेड़-पौधों की संख्या घट रही है और पर्यावरण अनेक चुनौतियों से गुजर रहा है, तब रक्षाबंधन को हरियाली से जोड़ना एक सार्थक पहल हो सकती है। इस वर्ष हम अपने भाई या बहन की कलाई पर राखी बाँधने के साथ एक पौधा भी लगा सकते हैं और उसे अपने रिश्ते की तरह सहेजने का संकल्प ले सकते हैं। नीम, पीपल, बरगद, तुलसी, आंवला या कोई फलदार पौधा—हर पौधा आने वाली पीढ़ियों के लिए हमारा प्रेम-पत्र बन सकता है।

कल्पना कीजिए, जिस दिन भाई-बहन साथ मिलकर एक पौधा लगाएँ और कहें—“जैसे यह पौधा बढ़ेगा, वैसे ही हमारा स्नेह भी बढ़ता रहे”—तो रक्षाबंधन का अर्थ कितना व्यापक हो जाएगा। राखी का धागा कुछ समय बाद उतर जाएगा, लेकिन लगाया हुआ पेड़ वर्षों तक उस प्रेम की स्मृति बनकर खड़ा रहेगा।

प्रकृति भी तो हमारी बहन जैसी है—वह हमें छाया देती है, हवा देती है, फल-फूल देती है और बिना किसी अपेक्षा के हमारा जीवन सँवारती है। उसकी रक्षा करना भी हमारी जिम्मेदारी है।

आइए, इस रक्षाबंधन एक नई परंपरा शुरू करें—एक राखी रिश्ते के नाम और एक पौधा प्रकृति के नाम। क्योंकि जब रिश्तों में प्रेम और धरती पर हरियाली होगी, तभी जीवन सचमुच सुंदर होगा।

भाव यही जन-जन के , मन में जगाएँ।

एक- एक पौधे को, घर में  लगाएँ ।।

**

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ देश में जम्हूरियत है…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी ☆

डॉ. रामेश्वरम तिवारी

संक्षिप्त परिचय

  • हिंदी-प्राध्यापक(सेवानिवृत्त) महारानी लक्ष्मीबाई शासकीय कन्या स्नातकोत्तर महाविद्यालय, भोपाल  (म.प्र).
  • नई दुनिया, दैनिक भास्कर, वीणा, हंस, धर्मयुग, कादम्बिनी आदि पत्र-पत्रिकाओं में कविता और लघुकथाएँ प्रकाशित। पुस्तकः कविता के ज़रिए,  मध्य प्रदेश साहित्य अकादमी के सौजन्य से प्रकाशित।

आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – देश में जम्हूरियत है…!

☆ ॥ कविता॥ देश में जम्हूरियत है…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी

 

आसमां  में शमशीरें तनी हैं,

सुर-असुरों दरमियाँ ठनी है।

*

विदूषक अपनी हरकतों से,

हवा  में फैलाए सनसनी हैं।

*

कोई लाख  जतन कर देखे,

नाग-नेवलों में कब बनी है।

*

देश पर संकट मंडरा रहा है,

फिर  लौट  आया गजनी है।

*

लोग आँख के होते हुए अँधे,

श्यामा  यामिनी हुई घनी है।

*

सभी एक आदम के जाए हैं,

औ’ धरती सबकी जननी है।

*

बेशक; देश में जम्हूरियत है,

मगर  बावजूद दीन-धनी हैं।

© डॉ. रामेश्वरम तिवारी

सम्पर्क – सागर रॉयल होम्स, होशंगाबाद रोड, भोपाल-462026

मोबाईल – 8085014478

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – जिजीविषा ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – जिजीविषा ? ?

संकट, कठिनाई,

अनिष्ट, पीड़ादायी,

आपदा, अवसाद,

विपदा, विषाद,

अरिष्ट, यातना,

पीड़ा, यंत्रणा,

टूटन, संताप,

घुटन, प्रलाप,

इन सबमें सामान्य क्या है?

क्या है जो हरेक में समाता है,

उत्कंठा ने प्रश्न किया..,

मुझे इन सबमें चुनौती

और जूझकर परास्त

करने का अवसर दिखता है,

जिजीविषा ने उत्तर दिया..!

 

?

© संजय भारद्वाज   

 दोपहर 3: 24 बजे सोमवार 9 मार्च 2020

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️  श्रावण साधना गुरुवार दि. 30 जुलाई से आरंभ होकर शनिवार 28 अगस्त (रक्षाबंधन) तक चलेगी 🕉️

  💥 

इस साधना में-

ॐ नमः शिवाय का मालाजप होगा।

गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ करेंगे।

इस बार हम आदि शंकराचार्य के निर्वाण षटकम् / वैराग्य षटकम् का भी प्रतिदिन कम से कम एक पाठ अवश्य करेंगे।

मालाजप, रुद्राष्टकम्, निर्वाण षटकम् के साथ आत्मपरिष्कार व ध्यानसाधना भी नियमित रूप से चलेंगे।

हमारा प्रयास है कि महत्वपूर्ण स्तोत्रों का अधिकाधिक प्रसार हो।

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Articles ☆ 🌼The Fragrance of Onam and a House Full of Memories ☆ Shri Jagat Singh Bisht ☆


Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

Authored six books on happiness: Cultivating Happiness, Nirvana – The Highest Happiness, Meditate Like the Buddha, Mission Happiness, A Flourishing Life, and The Little Book of HappinessHe served in a bank for thirty-five years and has been propagating happiness and well-being among people for the past twenty years. He is on a mission – Mission Happiness!

🌼The Fragrance of Onam and a House Full of Memories 🌌

Some friendships are not bound by distance; they live on in the warmth of memories. ❤️

Onam brings a strange, deep nostalgia to me.

There is the usual nostalgia that we summon on every festival—the “those were the days” kind. But this is something deeper. It spreads far beyond a few memories. It carries within it layers of feelings, emotions, friendships and moments that have quietly travelled with me through the years.

I see an old-fashioned house.

Wooden grills at the entrance. British-era roof tiles. A stone floor, with modest, hard stone tiles. Nothing grand, nothing ostentatious—but the house had something far more precious: warmth.

It was the home of my childhood friend, Mukundan.

We studied together from kindergarten right through to university. His little sister, Maa and Achchan made up the family. And somewhere along the way, I ceased to be merely a friend who came visiting. I became a familiar presence in that home—someone who belonged there. 🏡❤️

And then there was Onam.

Onam day transformed that simple house.

It was decorated almost like a temple. The family dressed in the traditional attire of Kerala. There was a sense of cheerful busyness everywhere, with a steady stream of guests arriving throughout the day.

And I was usually there too—quietly sitting on a chair in some corner, watching it all unfold.

A home witness, perhaps. 😊

I watched Onam come and go year after year—from our childhood to adolescence, from youth to adulthood, and even into our middle years.

And then came the Sadya. 🍃

Served on a banana leaf, it was a feast of colours, aromas and flavours. I loved every bit of it. But I had a particular weakness for the sweet dish—payasam.

Maa knew that.

So, with the affection that only a mother can bestow, she would serve me a second helping.

And then, quite often, a third.

This was not a one-off indulgence. It happened year after year, for countless Onams.

Looking back, I realise that what she was serving me was not merely payasam.

She was serving affection.

And some flavours, once infused with love, never leave you. ❤️

How swiftly good times fly!

The children we once were have grown into senior citizens, with greying hair and a lifetime of stories behind us.

So much has changed.

Yet, remarkably, our fondness for each other has not.

Mukundan has now moved back to his native Kerala—God’s Own Country—and this Onam he will be enjoying his Sadya with his family there.

And I shall be having mine here in Indore, at the good old Indian Coffee House, a place with its own Kerala connection. 🍃🥥

Geographically, we are far apart.

But I suspect that distance will count for very little today.

There, the banana leaf will carry the fragrance of Sadya.

Here, the same fragrance will arrive through memory.

There will be the bustle of family and friends.

Here, there will perhaps be a quiet smile as an old friendship comes alive in the mind.

And perhaps, at some point, when both of us taste that familiar sweetness, we will be transported to the same old house once again.

The house with wooden grills.

The British-era tiled roof.

The stone floor.

The little sister.

Maa and Achchan.

The stream of Onam visitors.

And somewhere in a corner, a young boy sitting quietly on a chair, waiting for Maa to give him just one more helping of payasam. 😊❤️

Years have passed. Lives have changed. Distances have grown.

But some friendships refuse to grow old.

They simply become more precious with time.

This Onam, Mukundan and I may be celebrating far apart, but perhaps our hearts will beat to the same old rhythm—and feel the same warmth we once felt when the fragrance of our childhood Sadya filled that beloved home.

🌼 Happy Onam, Mukundan.

Some festivals arrive on the calendar.

Some arrive straight in the heart. ❤️

  • Jagat 🥰

♥ ♥ ♥ ♥

© Jagat Singh Bisht

Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker

FounderLifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ शेष कुशल # ६६ ☆ व्यंग्य – “प्रदर्शनकारियों का मक्का : जंतर-मंतर…” ☆ श्री शांतिलाल जैन ☆

श्री शांतिलाल जैन

(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो  दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक  ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी के  स्थायी स्तम्भ – शेष कुशल  में आज प्रस्तुत है उनका एक अप्रतिम और विचारणीय व्यंग्य  प्रदर्शनकारियों का मक्का : जंतर-मंतर…” ।)

☆ शेष कुशल # ६६ ☆

☆ व्यंग्य – “प्रदर्शनकारियों का मक्का : जंतर-मंतर – शांतिलाल जैन 

आईए श्रीमान्, ये जो आप देख रहे हैं, आज़ाद भारत में इसे प्रदर्शन करने की सबसे मुफ़ीद जगह माना जाता हैं. प्रदर्शनकारियों का मक्का : दिल्ली का जंतर-मंतर. समझ लें कि ये चित्रकार के सपनों की ‘जहाँगीर आर्ट गैलेरी’ है जहाँ वह जीवन में कम से कम एकबार अवश्य नुमाइश लगाना चाहता है. किए होंगे आपने जिंदगीभर प्रदर्शन हर जगह, मगर जंतर-मंतर पर नहीं किया तो आपकी प्रोटेस्टर-लाइफ फ़िज़ूल है. जंतर-मंतर देश में पाँच जगह पर हैं, बट डेल्ही इज डिफरेंट. बाकी जगह जंतर-मंतर हैं मगर प्रोटेस्टर्स नहीं हैं. जहाँ प्रोटेस्टर्स हैं वहाँ जंतर-मंतर नहीं हैं. दिल्ली में जंतर-मंतर भी हैं, प्रोटेस्टर्स भी हैं, कवर करनेवाला मेनस्ट्रीम मीडिया भी है और दोगला निज़ाम भी. वह दिन के उजाले में प्रदर्शन की अनुमति देता है, रात के अँधेरे में तम्बू उखाड़ फैंकता है. दिन में लोकतंत्र मज़बूत होता है. लोकतंत्र मज़बूत करने का काम देश में अगले दिन भी बचा रहे इसलिए रात में इसे फिर से कमज़ोर कर देता है.

लोकतंत्र में प्रोटेस्ट्स का होना जितना जरूरी है उसे कुचला जाना उससे भी ज्यादा जरूरी है. प्रोटेस्ट करने से डेमोक्रेसी ऑक्सीजन पाती हैं, कुचल दिए जाने से मज़बूत होती है. इसलिए हर सरकार की पहली जिम्मेदारी होती है कि वो लोकतंत्र को पहले कुछ प्राणवायु पा लेने दे फिर उसे कीलें ठुकी हुई लाठियों से मज़बूत बनाने के लिए दौड़ पड़े. प्रहरी ड्रेस पहन पाए तो ठीक, नहीं पहन पाए तो सादी वर्दीवाले साथ में ले जाकर भी डेमोक्रेसी को ताकत दी सकती है. लोकतंत्र सभ्यता के चरम पर तब पहुँचता है जब कोई ‘ही’ पुलिसवाला किसी ‘शी’ प्रोटेस्टर के निजी अंगों में करंट छोड़नेवाली बेटन पुश करता है. पत्थर कभी पुलिसवालों को लगता है कभी प्रदर्शनकारियों को. और कोई घायल हो न हो लोकतंत्र लहूलुहान अवश्य होता है.

जंतर-मंतर निज़ाम के लिए भी मुफीद जगह है. जब वह लोकतांत्रिक दिखना चाहता है, तब प्रदर्शन की अनुमति देता है. जब अधिक लोकतांत्रिक  दिखना चाहता है तब उसी प्रदर्शन को कुचल देता है. प्रदर्शनकारियों को निज़ाम से डर नहीं लगता, उसके अधिक लोकतांत्रिक हो उठने से लगता है. जंतर-मंतर पर एक सूर्यघड़ी है जो परछाई के झुकाव से बता देती है कि किस प्रोटेस्टर को कब लाठी खिलाना है, कब जूस पिलाना है. इंटेलिजेंस के खगोलशास्त्री सूर्यघड़ी की परछाई देखकर सरकार को बता देते हैं – कौन कब खतरनाक हो सकता है उसे किस दिन, कितने बजकर कितने मिनट्स, कितने सेकंड्स पर जेल में डालने के योग बन रहे हैं.

एक जंतर-मंतर मेरे शहर उज्जैन में भी है. आलसी और सुस्त. मैंने वहाँ लोकतंत्र मज़बूत होते हुए शायद ही कभी देखा हो. इसीलिए हमारे शहर के पुलिसवाले जब जब दिल्ली के जंतर-मंतर पर लोकतंत्र मज़बूत होता हुआ देखते हैं तो मज़बूती के यज्ञ में आहुति देने को मचल मचल उठते हैं. हरबार उनकी मचलन निराशा में बदल जाती है. उनके पास लाठी है मगर चार्ज करने के पॉइंट्स नहीं हैं, पैलेट्स हैं, गन हैं, मगर सब्जेक्ट नहीं है. उनकी अपनी आँख का पानी भले सूख गया हो मगर दूसरों की आँखों से आँसू निकल आए, दागने को गैस के गोले हैं. वाटर केनन है मगर चलाने के मौके नहीं है. किस्मतवाली है दिल्ली की पुलिस, लोकतंत्र मज़बूत करने में योगदान दे पा रही है. उसके पास जंतर-मंतर भी है, प्रोटेस्टर्स भी, झूठ बोल जाने की बेशर्मी  भी है. और लाठी, गन, गोले तो हैं ही. इसी बरस रिटायर होने जा रहे एक पुलिस अंकल ने कहा – ‘लगता है आँसू गैस का गोला छोड़ पाने की हसरत मन में लिए लिए ही रिटायर होना पड़ेगा.’

मैंने कहा – “अन्याय तो शेष मुल्क में भी कम नहीं हैं पुलिस अंकल, मगर क्या है कि आमजन ने अन्याय के साथ जीना सीख लिया है. समझदार लोग विरोध, निजता और मानवाधिकार जैसी बातों पर लेक्चर सुनने ज़रूर जाते हैं, चच्च-चच्च करते हैं, फिर आत्मतुष्ट होकर बैठ जाते हैं. टीवी पर मंजर देखकर उबलते तो हैं लेकिन शहर के जंतर-मंतर पर पहुँचकर लोकतंत्र बचाने उपायों में शरीक नहीं हो पाते.”

बहरहाल, धैर्य रखे जयपुर, बनारस, उज्जैन की पुलिस और लाठी को तेल नियमित रूप से पिलाती रहे, कौन जाने कब उन्हें उनके जंतर-मंतर पर लोकतंत्र मज़बूत करने के असाइनमेंट में लगा दिया जाए.

-x-x-x-

(टीप: यह आवश्यक नहीं है कि संपादक मंडल व्यंग्य /आलेख में व्यक्त विचारों/राय से सहमत हो।)

© शांतिलाल जैन 

बी-8/12, महानंदा नगर, उज्जैन (म.प्र.) – 456010

9425019837 (M)

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares