मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्ष…  भाग – २ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मोक्ष…  भाग – २ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

(पण आम्ही अगदी निग्रहाने, मनावर दगड ठेवून त्या सगळ्या मोहाकडे दुर्लक्ष केले. गर्दी इतकी अलोट होती, की एकमेकींचा हात सुटण्याची भीती होती. म्हणून आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरून चालत होतो. मैत्रिणी एकमेकींना समजावत होत्या, “आधी दर्शन घेऊया. मग येताना निवांत खरेदी करू!” कारण पुढे काय वाढून ठेवले आहे, याची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती.)

इथून पुढे – –

गर्दीच्या लाटांतून वाट काढत, ढकलले जात आम्ही कसेबसे मंदिराच्या मुख्य आवारात पोहोचलो. साधारणपणे आपण कोणत्याही मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ चप्पल-बुटांचे जोड काढून ठेवतो. आम्हीही चपला काढणार होतो. पण त्या अथांग गर्दीचा अथांग पसारा पाहून आम्ही ठरवले, आधी जरा रांग कुठे आहे ते शोधूया, मग चपला काढू.

आणि आमचा हा निर्णय किती योग्य होता, हे पुढच्याच क्षणी कळाले!

दर्शन रांगेचा शोध घेता घेता, दर्शनापूर्वीच आम्हाला संपूर्ण मंदिराला एक भव्य प्रदक्षिणा घालावी लागली. वाटेत प्रत्येक दुकानदाराचा आग्रह सुरू होता, “मावशी, चप्पल इथे काढा, नारळ-फुल घ्या!” पण आम्ही त्या आग्रहाला बळी पडलो नाही. जर सुरुवातीलाच चपला काढल्या असत्या, तर उन्हात अनवाणी पायांनी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागली असती.

मंदिराच्या मागच्या बाजूला ३० ते ४० दगडी पायऱ्या चढून वर जायचे होते. आता तिथे पायऱ्यांजवळ आल्यावर मात्र चपला कुठे काढायच्या, हा प्रश्न निर्माण झाला. गर्दीत चप्पल हरवण्याची भीती होतीच. अशा वेळी माझी नेहमीची ‘युक्ती’ कामी आली! तशी मी फारच धोरणी आणि हुशार आहे बरं का… (असा आपला स्वतः विषयीचा गोड गैरसमज)

मी माझ्या बॅगेतून एक प्लास्टिकची पिशवी काढली, चपला त्या पिशवीत टाकल्या आणि ती पिशवी स्वतःच्या खांद्याला अडकवून घेतली! माझी ही युक्ती पाहून मैत्रिणींनीही पटकन आपापल्या चपला पिशवीत भरल्या. चला, चपला हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची एक मोठी चिंता तर कायमची मिटली!

असा गोल-गोल वळसा घालून आल्यावर आम्हाला वाटले, ‘हाहा! आता दर्शन होणार!’ आम्ही एका छोट्या लाकडी दरवाजातून मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश केला. पण आत पाऊल ठेवताच देव आपल्यापासून किती दूर आहे, याची दाहक कल्पना आली!

आतमध्ये अथांग पटांगणात बांबूच्या भल्यामोठ्या काठ्या बांधून गोल-गोल फिरणाऱ्या शेकडो ओळी (Barricades) तयार केल्या होत्या. तो एक प्रकारचा चक्रव्यूहच होता! आम्ही त्या रांगेत उभे राहिलो. १० मिनिटे… २० मिनिटे… १ तास… २ तास… ३ तास उलटून गेले! तरीही त्या रांगा संपण्याचे नावच घेत नव्हत्या. आम्ही जसे पुढे जायचो, तशी नवीन रांग समोर उभी राहायची.

आता चपला पिशवीत असल्याने आम्ही अनवाणी होतो. पायाखाली छोटे-छोटे खडे टोचत होते. काही वेळाने आम्हाला त्या रांगा न संपण्याचे खरे गुपित कळले. गर्दीतली बरीच हुशार माणसे बांबूच्या काठ्यांच्या खालून सरपटत, रांग ओलांडून मधल्या मध्ये पुढच्या रांगेत शिरत होती! लोक सर्रास नियम मोडत होते. मग प्रामाणिकपणे रांगेत उभ्या असणाऱ्या आमचा नंबर कसा बरं लवकर लागणार?

पण त्या कंटाळवाण्या आणि त्रासाच्या रांगेतही अनेक गमतीजमती अनुभवायला मिळाल्या. रांगेत उभ्या उभ्याच अनोळखी लोकांशी गप्पा सुरू झाल्या. कित्येक वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या काही जुन्या मैत्रिणी तिथे अचानक भेटल्या. लहान मुले तर बांबूच्या खालून इकडून तिकडे पळण्याचा आणि रांगेत लपाछपी खेळण्याचा आनंद घेत होती. काही चतुर महिला तर आपल्या लहान मुलांना बांबूच्या खालून पुढे पाठवायच्या आणि “अहो, माझे लहान बाळ पुढे गेले!” असे सांगून मुलाच्या निमित्ताने स्वतःही ४-५ रांगा ओलांडून पुढे जायच्या!

आम्ही मात्र शांत होतो. आमच्या मनात एकच विचार सुरू होता ‘मोक्षदात्या कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला चाललोय, तर थोडे कष्ट तर होणारच ना! ईश्वरप्राप्ती एवढी सोपी कुठे असते? ‘ या सात्विक मानसिकतेमुळे आम्ही त्या शारीरिक त्रासाचाही आनंद घेत होतो.

त्याच वेळी आमच्या रांगेत शेजारी एक अतिशय सात्विक, भाविक महिला भेटली. तिने मंदिराचे महत्त्व, तिथल्या वृक्षाची महती आणि दर्शनाने कशी ‘मोक्षप्राप्ती’ होते, यावर प्रवचनवजा भाषण सुरू केले.

ती अगदी भारावून सांगू लागली, “हे बघा बायकांनो! देवाच्या दारी रांगेत मधे शिरणे पाप आहे! देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर शरीराला कष्ट सोसावेच लागतात. जेव्हा पायात खडे टोचतात, तहान-भूक व्याकुळ करते आणि शरीर थकते… तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या पापांचे क्षालन होते आणि ते दर्शन आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते!”

तिने स्वतः आजवर कोणकोणत्या तीर्थक्षेत्री किती शारीरिक कष्ट सहन करून, उपाशी पोटी रांगेत उभे राहून दर्शन घेतले, याचे असे काही रंगवून रंगवून वर्णन केले, की आम्ही अगदी भारावून गेलो! आम्हाला वाटले, ही कुणी सामान्य स्त्री नसून प्रत्यक्ष मोक्षाचा रस्ता दाखवणारी साक्षात सात्विक मूर्तीच आहे. आम्ही तर तिच्या पाया पडायच्या विचारात होतो!

इतक्यात कुणाचा तरी धक्का लागला आणि आमचे लक्ष क्षणभर विचलित झाले. २-३ मिनिटांनी जेव्हा आम्ही त्या ‘मोक्षदात्री’ महिलेकडे पुन्हा पाहिले, तर ती गायब! आम्ही आजूबाजूला तिला शोधू लागलो. ‘अचानक ही कुठे गेली? ‘

काही वेळाने आमची नजर पुढे गेली आणि आमचा डोळ्यांवर विश्वासच बसेना! जी महिला आम्हाला एक मिनिटापूर्वी ‘कष्ट सोसून दर्शन घेतल्याने कसा मोक्ष मिळतो’ याचे ज्ञान पाजळत होती… ती स्वतःच बांबूच्या खालून अत्यंत शिताफीने सरपटत, ७ ते ८ रांगा ओलांडून, प्रामाणिक भाविकांना मागे टाकत कपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी बरीच पुढे निघून गेली होती!

तिचा तो ‘अद्भूत मोक्ष मार्ग’ पाहून आम्ही डोक्याला हात लावला आणि आम्हाला हसू आवरेनासे झाले!

बरेच बांबू ओलांडणाऱ्या लोकांचे धक्के सहन करत, पायात शेकडो खडे टोचवून घेतल्यानंतर, तब्बल ५ तासांच्या खडतर वाटचालीनंतर अखेर आम्ही कपर्दिकेश्वराच्या गर्भगृहाच्या समोर उभे राहिलो!

आणि… समोरचे ते दृश्य पाहताच आमचे भान हरपले!

गर्भगृहात महादेवाची ती अलौकिक, नयनरम्य तांदळाची पिंडी साक्षात तेजाने तळपत होती. एका चिमुकल्या लिंबावर संपूर्ण तांदळाची पिंडी अत्यंत कौशल्याने आणि श्रद्धेने तोललेली होती. त्या पिंडीचे दर्शन होताच, मनातील सर्व थकवा, पायांच्या वेदना आणि ५ तासांची पायपीट एका सेकंदात गायब झाली! ५ तासांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले होते. डोळे भरून आम्ही त्या ‘मोक्षदात्याचे’ रूप मनात साठवून घेतले. हात आपोआप जोडले गेले आणि तोंडून शब्द बाहेर पडले “हर हर महादेव! कपर्दिकेश्वर महाराज की जय!”

दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. ५ तास सतत रांगेत उभे राहिल्यामुळे शरीर पूर्णपणे गळून गेले होते. सकाळी गाडीत ठरवलेली ती जत्रा, खरेदी, बांगड्या, भांडी… या कशाचीही आता इच्छा उरली नव्हती.

पण त्या गर्दीत एक चांगली गोष्ट घडली. परतीच्या वाटेवर रस्ता चुकण्याची किंवा चालण्याचे कष्ट करण्याची अजिबात गरज नव्हती! कारण भाविकांची ती अथांग गर्दीच मागून ढकलून ढकलून आम्हाला पुढे नेण्याचे काम करत होती! आम्हाला फक्त एकमेकींचे हात घट्ट धरून उभे राहायचे होते. गर्दीच्या त्या मानवी प्रवाहाने आम्हाला थेट मंदिरापासून २ किलोमीटर दूर असलेल्या पार्किंगपर्यंत आणून सोडले!

इतके तास दर्शनातच निघून गेल्यामुळे आणि शरीर थकल्यामुळे, इतर ठिकाणी फिरण्याचा किंवा कुठल्या दुसऱ्या मंदिरात जाण्याचा प्रश्नच उरला नव्हता. आम्ही सरळ गाडीत बसलो आणि घराची वाट धरली.

अशा प्रकारे, ओतूरच्या त्या मोक्षदात्या कपर्दिकेश्वराचे अद्भुत दर्शन, रांगेतील त्या ‘मोक्ष’ सांगणाऱ्या बाईची गंमत आणि तो संपूर्ण प्रवास आमच्या आयुष्यातील एक ‘अविस्मरणीय भावयात्रा’ बनून राहिली!

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “विलक्षण मराठी भाषा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “विलक्षण मराठी भाषा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

रस्ता – मार्ग

  • जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
  • जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

खरं – सत्

  • बोलणं खरं असतं
  • सत्यला सोबत पुरावा जोडावा लागतो.

घसरडं – निसरडं

  • पडून झालं की घसरडं.
  • सावरता येतं ते निसरडं.

अंधार – काळोख

  • विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
  • निसर्गात जाणवतो तो काळोख.

पडणं – धडपडणं

  • पडणं हे अनिवार्य.
  • धडपडणं हे कदाचित सावरणं.

पाहणं – बघणं

  • आपण स्वत:हून पाहतो.
  • दुस-यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

पळणं – धावणं

  • पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
  • ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

झाडं – वृक्ष

  • जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.
  • जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.

खेळणं – बागडणं

  • जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
  • जे मुक्त असतं ते बागडणं.

ढग – मेघ

  • जे वा-याने ढकलले जातात ते ढग.
  • जे नक्की बरसतात ते मेघ.

रिकामा – मोकळा

  • वेळ जो दुस-याकडे असतो तो रिकामा.
  • आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.

निवांत – शांत

  • *कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
  • काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

आवाज – नाद

  • जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
  • जो घ॔टेचा होतो तो नाद.

झोका – हिंदोळ*

  • जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.
  • जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

स्मितं – हसणं

  • मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
  • जे लोकांसमोर दाखवावं लागतं ते हसणं.

अतिथी – पाहुणा

  • जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
  • जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

घोटाळा – भानगड

  • जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
  • जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.

आभाळ- आकाश

  • भरून येत ते आभाळ
  • निरभ्र असत ते आकाश

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ओडिसी” – मूळ लेखक : होमर – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ओडिसी” – मूळ लेखक : होमर – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : ओडिसी 

लेखक : होमर

अनुवाद : प्रणव सखदेव

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे 

पृष्ठ :- १८४ 

मूल्य: २५०₹ 

प्रकार:- पुराणकथा, साहसकथा

होमरचं ‘ओडिसी’ हे एका वीराच्या घरी परतण्याची कथा आहे. ट्रॉयचं युद्ध संपल्यानंतर इथाका या आपल्या राज्यात परतण्यासाठी ओडिसियसला तब्बल दहा वर्षांचा संघर्ष करावा लागतो. युद्ध संपलं असलं तरी त्याच्यासाठी खरी लढाई तेव्हाच सुरू होते. समुद्र, राक्षस, जादूगारिणी, देवतांचा कोप, मोह, फसवणूक आणि स्वतःच्या निर्णयांची किंमत आणी प्रत्येक टप्प्यावर त्याची परीक्षा घेतली जाते. दुसरीकडे इथाकामध्ये त्याची पत्नी पेनेलोपी वीस वर्षांपासून त्याची वाट पाहत आहे. सर्वांना ओडिसियस मरण पावल्याचं वाटत असल्याने तिच्यावर दुसरं लग्न करण्यासाठी दबाव टाकला जातो. मुलगा टेलीमॅकस वडिलांचा शोध घेण्यासाठी निघतो. त्यामुळे ही केवळ साहसकथा राहत नाही; ती एका कुटुंबाची, निष्ठेची आणि घरी परतण्याच्या अटळ इच्छेची कथा बनते.

या महाकाव्यात देवतांचं स्थानही तितकंच महत्त्वाचं आहे. अथेना सतत ओडिसियसच्या पाठीशी उभी राहते, तर पोसायडन त्याच्या प्रत्येक पावलावर अडथळे निर्माण करतो. त्यामुळे संपूर्ण कथा ही एका माणसाच्या संघर्षाइतकीच दोन देवतांमधील अदृश्य संघर्षाचीदेखील कथा वाटते. ओडिसियस बुद्धिमान आहे, धाडसी आहे; पण हट्टीही आहे. अनेकदा त्याच्या स्वतःच्या निर्णयांमुळे संकटं ओढवतात. त्याच्या चुका, त्याचं चातुर्य आणि संकटांमधून मार्ग काढण्याची वृत्ती हेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं वैशिष्ट्य आहे. होमरचं लेखन आजही प्रभाव टाकतं, कारण ते केवळ साहस सांगत नाही; ते युद्धाची किंमत, माणसाची मानसिकता, घरापासून दूर राहण्याची वेदना, सत्तेचा मोह आणि आशा न सोडणाऱ्या मनुष्यस्वभावाबद्दलही बोलतं. म्हणूनच ओडिसी हजारो वर्षांनंतरही तितकीच जिवंत वाटत.

प्रणव सखदेव यांनी केलेला मराठी अनुवाद अत्यंत प्रवाही आहे. ग्रीक पुराणातील अनेक व्यक्तिरेखा, स्थळं आणि प्रसंग असूनही वाचन कुठेही क्लिष्ट वाटत नाही. उलट प्रत्येक प्रकरणासोबत पुढे काय घडणार याची उत्सुकता वाढत जाते. तुम्ही यावर आधारित चित्रपट पाहणार असाल तर आधी हे पुस्तक नक्की वाचा, कारण त्यामुळे कथानक, पात्रं आणि त्यामागची पार्श्वभूमी अधिक चांगल्या प्रकारे समजते. आणि जर पुस्तक आधीच वाचलं असेल, तर चित्रपटातील अनेक प्रसंग नव्या दृष्टीने अनुभवता येतात. जर तुम्हाला ग्रीक पुराणकथा, साहसकथा वाचण्याची आवड असेल, तर ‘ओडिसी’ नक्की वाचा. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा आजही तितकीच ताजी, रंजक आणि विचार करायला लावणारी वाटते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # १५८ – बुन्देली कविता – ”वे पथरा खों दूद पिवा रय” ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – वे पथरा खों दूद पिवा रय।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # १५८ ☆

☆  बुन्देली कविता – वे पथरा खों दूद पिवा रय ☆ आचार्य भगवत दुबे ✍

बे पथरा खों दूद पिबा रय

देखौ कैंसो भ्रम फैला रय

आइ महामारी, व्यापारी

रोज कफन कौ, रेट बढ़ा रय

 *

पंडत जी छप्पन भोगों की

ओ गरीब खें कथा सुना रय

 *

दिवता सें कम नइँ बे सेवक

जो भूखों के पेट भरा रय

 *

ऐड़ी-चोटी कर चुनाव में

नेता अपने दाँव लगा रय

 *

बम्म पटकबे बारे भग गय

घायल रिश्ते, घाव दिखा रय

 *

भगवतसाम्हूँ प्यासो तड़पत

बे नदिया कौ पता बता रय

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “ये अजीब इत्तेफाक़ है” ☆ मिर्ज़ा अज़ीज़ बेग ☆

मिर्ज़ा अज़ीज़ बेग

?  कविता – ये अजीब इत्तेफाक़ है… ? मिर्ज़ा अज़ीज़ बेग ☆

दिल के प्याले में

स्याही भरी होती है

यादों में आए उबाल से

छलक कर बाहर निकल आती है

गीले हरुफ़ लिखती हुई

किसी इबारत, किसी तहरीर को

शक्ल देती है

कभी ये हरुफ़ जल्दी सूखते हैं

कभी एक लंबे अरसे को गीले

रह जाते हैं

छूना नहीं इन गीले हरुफ़ों को

रोशनाई फैल कर,

सफ़े को धुंधला कर देगी

ये धुंधलापन सालता रहेगा

कचोटता रहेगा

लिहाज़ा, स्याही के सूखने का इंतज़ार

तो करना ही होगा…!!!!!

© मिर्ज़ा अज़ीज़ बेग

संपर्कबिलासपुर (छ ग) मो नं 8319743682

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – एकाक्षी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

श्रावण मास निमित्त पुनर्पाठ में पढ़िए ‘निर्वाणषटकम्‘ पर  छह अंकों की यह शृंखला-

? संजय दृष्टि – एकाक्षी ? ?

एकाक्षी होना चाहता हूँ,

आवश्यक नहीं

एक आँख बंद कर लूँ,

वांछित है; दोनों में

समत्व विकसित कर लूँ!

?

© संजय भारद्वाज   

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️  श्रावण साधना गुरुवार दि. 30 जुलाई से आरंभ होकर शनिवार 28 अगस्त (रक्षाबंधन) तक चलेगी 🕉️

  💥 

इस साधना में-

ॐ नमः शिवाय का मालाजप होगा।

गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ करेंगे।

इस बार हम आदि शंकराचार्य के निर्वाण षटकम् / वैराग्य षटकम् का भी प्रतिदिन कम से कम एक पाठ अवश्य करेंगे।

मालाजप, रुद्राष्टकम्, निर्वाण षटकम् के साथ आत्मपरिष्कार व ध्यानसाधना भी नियमित रूप से चलेंगे।

हमारा प्रयास है कि महत्वपूर्ण स्तोत्रों का अधिकाधिक प्रसार हो।

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # २१३ ☆ “लेखक, आलोचक और गोलगप्पेवाला” – लेखक : श्री अरविंद तिवारी ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हमप्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है श्री अरविंद तिवारी जी द्वारा लिखित  “लेखक, आलोचक और गोलगप्पेवालापर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा#  २१३ ☆

☆ “लेखक, आलोचक और गोलगप्पेवाला” – लेखक : श्री अरविंद तिवारी ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

☆ ‘लेखक, आलोचक और गोलगप्पेवाला’ : व्यंग्य की चटपटी प्लेट में समय का स्वाद – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

वरिष्ठ व्यंग्यकार अरविंद तिवारी की कृति पर विवेक रंजन श्रीवास्तव की पुस्तक चर्चा

व्यंग्य की अपनी तरह की यह गोलगप्पे वाली प्लेट हमें हास्य का स्वाद देने के बाद हमारे वैचारिक हाजमे को कितना दुरुस्त करती है? किताब बंद करने के बाद हमारे भीतर कितनी हँसी, कितनी खटास और कितनी डकारें बची रहती हैं? अरविंद तिवारी का व्यंग्य-संग्रह ‘लेखक, आलोचक और गोलगप्पेवाला’ पढ़ते हुए यही सवाल सबसे अधिक महत्वपूर्ण हो जाता है। गड्ढे, सेमिनार, पुरस्कार, पुस्तक मेले, ए.आई., साहित्यकार, आलोचक और अंततः गोलगप्पेवाला—ये पात्र और प्रसंग पुस्तक बंद होने के बाद भी मन में घूमते रहते हैं।

यह अरविंद तिवारी का चौदहवाँ व्यंग्य-संग्रह है। साहित्य और राजनीति इसके प्रमुख सरोकार हैं, लेकिन लेखक की दृष्टि प्रशासन, सामाजिक व्यवहार, प्रकाशन, पुरस्कार, मीडिया, चुनाव और नई तकनीक तक जाती है। ‘गड्ढों का विद्रोह’, ‘जाना एक सेमिनार में’, ‘ए.आई. वाला लोचा’, ‘शोक सभा के विशेषज्ञ’, ‘कवर पेज का भौकाल’, ‘किताब हाथोंहाथ ली गई’, ‘पुरस्कार चुक गए हैं’, ‘बीस करोड़ का व्यंग्य संग्रह’, ‘साहित्य के खटुआ आम’ और ‘दूधों नहाओ वोटों फलो!’ जैसी रचनाएँ समकालीन विसंगतियों के अलग-अलग चेहरे सामने लाती हैं।

संग्रह की शुरुआत ‘गड्ढों का विद्रोह’ से होती है। सड़क के गड्ढे सामान्यतः नागरिकों की परेशानी हैं, लेकिन तिवारी उन्हें व्यवस्था के स्वाभाविक अंग में बदल देते हैं। उनका कथन—“गड्ढा बिना सड़क के भी हो सकता है”—सिर्फ हास्य पैदा नहीं करता, बल्कि उस मानसिकता पर चोट करता है जिसमें पुरानी समस्या धीरे-धीरे समस्या न रहकर व्यवस्था का हिस्सा बन जाती है।

‘जाना एक सेमिनार में’ साहित्यिक दुनिया के महानगरीय मोह और छोटे शहर के लेखक की विडंबना को पकड़ता है। कई बार साहित्यकार से अधिक उसका शहर महत्वपूर्ण हो जाता है। यह विसंगति इसलिए अधिक चुभती है क्योंकि साहित्य की दुनिया भी उससे मुक्त नहीं है।

तिवारी की खासियत यह है कि उनका व्यंग्य केवल राजनीति पर नहीं चलता। वे साहित्यिक संसार को भी उसी निर्ममता से कटघरे में खड़ा करते हैं। ‘कवर पेज का भौकाल’, ‘किताब हाथोंहाथ ली गई’, ‘पुरस्कार चुक गए हैं’, ‘साहित्य के खटुआ आम’ और ‘बीस करोड़ का व्यंग्य संग्रह’ साहित्यिक प्रतिष्ठा, औपचारिक मित्रता, पुरस्कार-व्यवस्था और बाजारवाद की पोल खोलते हैं।

‘किताब हाथोंहाथ ली गई’ में मुहावरा ही व्यंग्य का हथियार बन जाता है। किताब का हाथोंहाथ घूमना साहित्यिक मित्रता और दिखावे की विडंबनाओं को उजागर करता है। इसी तरह ‘पुरस्कार चुक गए हैं!’ में सब्जी मंडी की भाषा साहित्यिक पुरस्कारों की दुनिया में प्रवेश करती है। थोक, रिटेल, खरीददार और माल जैसे शब्द हँसाते तो हैं, लेकिन पुरस्कारों के बाजारीकरण का गंभीर प्रश्न भी खड़ा करते हैं।

‘दूधों नहाओ वोटों फलो!’ चुनावी संस्कृति के प्रदर्शन और राजनीतिक गणित को निशाना बनाता है। वहीं ‘ए.आई. वाला लोचा’ और ‘इस बार ए.आई. वाली दीवाली’ में नई तकनीक के बहाने आभासी छवि, प्रचार और असली-नकली की धुंधली होती सीमा पर टिप्पणी की गई है। इससे तिवारी की समकालीनता स्पष्ट होती है। वे पुराने मुहावरों के व्यंग्यकार हैं, लेकिन विषयों में पुराने नहीं हैं।

इस संग्रह की भाषा सहज, बातचीत के करीब और मुहावरेदार है। तिवारी असंगत चीजों को एक साथ रखकर नया व्यंग्यार्थ पैदा करते हैं—गड्ढा और व्यवस्था, सब्जी मंडी और पुरस्कार, आम और साहित्यकार, ए.आई. और दीवाली। यही उनका विशिष्ट व्यंग्य-कौशल है।

उनके व्यंग्य की एक और महत्वपूर्ण विशेषता आत्मव्यंग्य है। साहित्यिक संसार पर चोट करते हुए वे स्वयं को उससे बाहर खड़ा नहीं करते। यही ईमानदारी उनके व्यंग्य को उपदेश बनने से बचाती है। हाँ, कुछ रचनाओं में व्यंग्य की ऊर्जा इतनी अधिक है कि लेखक एक ही प्रसंग पर कुछ अधिक देर ठहर जाते हैं; किंतु यह उस लेखक की स्वाभाविक सीमा भी है जिसके पास कहने को बहुत कुछ है।

अरविंद तिवारी छोटी-सी विसंगति पकड़ते हैं और उसे इस तरह विस्तार देते हैं कि उसमें पूरा समय दिखाई देने लगता है। ‘लेखक, आलोचक और गोलगप्पेवाला’ की सार्थकता इसी में है कि यह दूसरों पर हँसने वाली किताब भर नहीं, बल्कि साहित्य और स्वयं साहित्यकार को भी हँसी के कटघरे में खड़ा करती है।

शायद हमारे समय की हर गंभीर चीज के भीतर सचमुच एक गोलगप्पा छिपा है। उसे फोड़ने के लिए व्यंग्यकार की उंगली चाहिए और उसमें चटपटा पानी भरने की कला भी। अरविंद तिवारी यह काम बखूबी करते हैं।

मेरी दृष्टि में यह संग्रह समकालीन हिंदी व्यंग्य की सशक्त धारा में अपनी जगह बनाता है। इसे पढ़कर मुस्कान आती है, लेकिन मुस्कान के पीछे एक असुविधाजनक सवाल भी रह जाता है—जिन विसंगतियों पर हम हँस रहे हैं, कहीं वे हमारी अपनी आदतें तो नहीं?

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

इन दिनों लंदन में

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, apniabhivyakti@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # २३० – बरगद बनकर छाँव बनाई… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “सजल – बरगद बनकर छाँव बनाई...। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # २३० ☆

☆  बरगद बनकर छाँव बनाई…  श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

(समांत—- पदांत -आना, मात्रा भार-16, (चौपाई छंद))

सोते को है सरल जगाना।

पर जगते को कठिन उठाना।।

*

जीवन दाँव लगाया फिर भी।

मात-पिता का लुटा खजाना।।

*

बरगद बनकर छाँव बनाई।

चिड़िया उड़ती सुना बहाना।।

*

उँगली थामे बड़े हुए पर।

सबल पैर का नहीं ठिकाना।।

*

उमड़-घुमड़ कर आँसू सूखे।

पर मुखड़े को है हर्षाना ।।

*

प्रश्न चिन्ह तब लगा हुआ है।

कैसा आया नया जमाना।।

*

संस्कृति और सभ्यता रूठी।

जागो मानव क्यों पछताना।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # २७३ – स्वतंत्रता ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ ☆

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है सामाजिक विमर्श पर आधारित विचारणीय लघुकथा “स्वतंत्रता”।) 

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # २७३ ☆

🌻लघु कथा🌻 स्वतंत्रता 🌻

आज 15 अगस्त तिरंगे झंडे की टोकरी लिए बैठी सड़क पर स्वतंत्रता दिवस की भोर देख रही थी। अभी कुछ झंडे और छोटे – छोटे बैच बिकने को बाकी रह गया था। सोच रही थी अब तो लगभग सभी भीड़ खत्म होने चली है।

मेरी टोकरी में  यह बच गया नही बिक पाया। तभी एक नौजवान दौड़ता भागता आया, पूरा सामान उठा कई गुना ज्यादा राशि देकर चलता बना।

वह खुश होकर टोकरी उठा, मुखड़े पर मुस्कान और सरपट चल दी घर की ओर।

दरवाजे पर पहुची ही थी कि झपट्टा मार टोकरी को फेंकते उसका पतिदेव पैसे झींनते हुए

—मना आई स्वतंत्रता दिवस

अब देख गुलामी क्या है। इससे तू आजाद नही हो सकती।

धम्म से धरा पर बैठते सिसक पड़ी – – क्या स्वतंत्र होना इतना निर्मोही होता है। अश्रुं धारा बह चली तुझे तो उम्र भर की गुलामी मिली है जो सदैव जीवन्त रहेगी।

शायद शहीद होने के बाद ही स्वतंत्र हो सकूंगी. 

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # १८७ – देश-परदेश – हर दिन ना होत एक समान ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख # १८७ ☆ देश-परदेश – हर दिन ना होत एक समान ☆ श्री राकेश कुमार ☆

उपरोक्त चित्र वर्षा ऋतु में होने वाली वर्षा से ठंडे खाद्य पदार्थों की बिक्री को प्रभावित करता हुआ बता रहा हैं।अब समय बदल चुका हैं।हम सब तो प्रकृति के विरुद्ध शंखनाद बजा चुके हैं। सर्दी के मौसम में रजाई में बैठ कर हीटर की गर्मी के पूरे मज़े लेने के लिए आइसक्रीम खाना आम बात हो चुकी है।

छाता खरीद कर अब लोग आइसक्रीम खाते हैं, इससे छाता विक्रेता भी खुश रहता है, और आइसक्रीम विक्रेता भी खुश। हम सब ने प्रकृति को नीचा दिखाने में कोई कसर नहीं छोड़ी है।

कोल्ड ड्रिंक आदि ठंडे पेय का अब कभी भी ऑफ सीज़न नहीं होता है। ठंड में विवाह के समय मुफ्त के गर्म गुलाब जामुन के साथ वनिला आइसक्रीम की जुगलबंदी कुछ दशकों से लोक प्रिय हो चुकी हैं। गर्म खाद्य पदार्थ के बाद चिल्ड पानी पीना हो या ठंडी बियर के बाद  गरमा गर्म मुर्गा हलक से नीचे करने में हमारा स्वास्थ्य भी खराब नहीं होता है।

हमारा शरीर भी विचार करता होगा, हमें क्या जो करेगा वो ही ना भरेगा। रोग होने पर मौसम और हवा पर दोषारोपण कर हम  पाक साफ बन जाते हैं।

साठ के दशक यानि हमारे बचपन की बाते यदि आज के किसी जेन ज़ी से करो तो उल्टा जवाब मिलता है, “यू ओल्डीज़” हमेशा आदि मानव की तरह क्यों बिहेव करते हैं?

हमारी दादी तो गर्म भोजन करने के पश्चात तुरंत ठंडे जल से हाथ तक धोने के लिए मना करती थी। किसी भी मौसम में बाहर से घर प्रवेश के दस मिनट के बाद ही साधारण जल तक ग्रहण करने दिया जाता था। कारण पूछने पर परिवार के बड़े, बाहर और घर के टेम्प्रेचर के अंतर को शरीर को एडजेस्ट करने का कूलिंग पीरियड बता कर घर के छोटे बच्चों की जिज्ञासा को वैज्ञानिक तथ्य से शांत कर दिया करते थे। आज की युवा पीढ़ी तो गूगल की दलीलों से बुजर्गों की खिल्ली उड़ा देते हैं।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान)

मोबाईल 9920832096

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares