हिन्दी साहित्य – कविता ☆ अभिव्यक्ति # -१२० – घिर आई काली काली बदरी… ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

श्री राजेन्द्र तिवारी

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता घिर आई काली काली बदरी।)

☆ अभिव्यक्ति # १२० ☆

☆ घिर आई काली काली बदरी☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

 

घिर आई काली काली बदरी,

खाली गागर, वाली बदरी.

न धरती की प्यास बुझेगी,

सूखी सूखी काली बदरी.

घिर आई काली काली बदरी,

*

प्यासी धरती, बंजर धरती.

किसका पेट भरेगी धरती,

धरती को कैसे सहलाए.

खुद भी तो है प्यासी बदरी,

घिर आई काली काली बदरी.

*

हम सब तुमसे,यही मनायें,

सागर से गागर, भर लायें.

फिर धरती पर बरस बरस कर,

इस धरती की प्यास बुझायें.

बन जाओ जीवन दाता बदरी,

घिर आई काली काली बदरी.

 

© श्री राजेन्द्र तिवारी  

संपर्क – 70, रामेश्वरम कॉलोनी, विजय नगर, जबलपुर

मो  9425391435

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # १०६७ ⇒ उंगलियों का अंक गणित ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “उंगलियों का अंक गणित।)

?अभी अभी # १०६७ ⇒ आलेख – उंगलियों का अंक गणित ? श्री प्रदीप शर्मा  ?

हम आज न तो हाथों की चंद लकीरों का जिक्र करेंगे और न ही आसन, प्राणायाम से जुड़ी मुद्राओं का, हमारे दोनों हाथों की दस उंगलियों का सीधा सादा गणित है यह, जिसका न तो सामुद्रिक शास्त्र से कुछ लेना देना है, और न ही हस्त रेखा और ज्योतिष अथवा एक्यूप्रेशर से।

जिन उंगलियों पर आज नारियां पुरुषों को नचा रही हैं, कभी उन उंगलियों पर बचपन में हमने गिनती सीखी है, जोड़ना घटाना सीखा है। कहने को हमारी उंगलियां पांच हैं, लेकिन हर उंगली के बीच तीन आड़ी लकीरें हैं, और दाहिने अंगूठे के बीच चार। वैसे जरूरी नहीं, आपके हाथ में भी ऐसा ही हो। जोड़ने वाले इसे किसी भी विज्ञान से जोड़ें, हम तो मुट्ठी बांधते हैं और खोलते हैं, जहां जहां से उंगलियां मुड़ती हैं, वहां लकीरें स्वाभाविक रूप से ही बन जाती हैं।।

हमने इन उंगलियों पर दिन रात गिने हैं, सप्ताह के दिन गिने हैं, इंतजार के दिन गिने हैं और बैंक की नौकरी में इन्हीं उंगलियों से नोट भी गिने है। इन्हीं उंगलियों को हमने कभी कैसियो और हारमोनियम पर नचाया है तो इन्हीं उंगलियों से हमने घंटों टाइपराइटर पर थीसिस भी टाइप की है। हमारे जीवन में हमने कभी किसी पर अनावश्यक उंगली नहीं उठाई और न ही किसी ने कभी हमें उंगली दिखाई।

हमारा अंकों और अक्षरों का ज्ञान पट्टी पेम अर्थात् स्लेट से ही तो शुरू होता था। गिनती के लिए एक लकड़ी अथवा प्लास्टिक का बोर्ड आता था, जिसके अंदर दस पतले तारों के बीच कुछ लकड़ी अथवा प्लास्टिक के मोटे, गोल गोल दाने झूलते रहते थे। हर खाने में दस दाने होते थे। आप उनको हाथ से चलाकर गिन सकते थे। गिनती सीखने का यह बोर्ड एक खिलौना था बच्चों के लिए। फिसलपट्टी की तरह दाने फिसल रहे हैं, एक, दो, तीन, चार और इस तरह गिनती भी सीखी जा रही है, एक से सौ तक। मोतियों की माला की तरह ही तो था यह टेबल बोर्ड।।

स्लेट पट्टी और ऐसे खिलौने छूट गए लेकिन उंगलियों पर गिनने की कला आज भी जारी है। सभी चीजें उंगलियों पर ही तो याद की जाती हैं, आटा, दाल, शकर, माचिस, तेल और बच्चों की मैगी भी खत्म हो गई। क्या क्या याद रखें।

घर के सदस्यों और रिश्तेदारों की लिस्ट तो हम पहले उंगलियों पर ही बनाते थे। तीस तक की संख्या तो उंगलियों के बीच आसानी से समा जाती थी। जब कोई बड़े अंकों वाली संख्या पढ़ने में आती थी, तो उंगलियों पर गिनना पड़ता था, इकाई, दहाई, सैकड़ा, हजार, दस हजार, लाख, दस लाख, बाप रे, यह तो पच्चीस लाख है।।

हमने बहुत कुछ याद किया है इन उंगलियों पर। हनुमान चालीसा हो अथवा दोहा चौपाई। दादी जी को हमने इन्हीं उंगलियों से माला जपते देखा है। हमने इन्हीं उंगलियों पर अगर समय को नापा है तो पैदल चलते समय, दूरी को भी नापा है। चलते वक्त हम अपने ही कदम उंगलियों पर गिनते जाते हैं। इन उंगलियों पर हमने हजारों तक गिनना सीख लिया है। कितने कदम चलने पर एक किलोमीटर होता है, हमें अच्छी तरह ज्ञात है। आजकल यह काम भी महंगी महंगी घड़ियां कर रही हैं।

कभी जो अपना हाथ जगन्नाथ था, उसके बीच आज एड्रॉयड, डेस्कटॉप और पीसी आ गया है। उंगलियों के साथ आंखें भी व्यस्त हो गई हैं। जो उंगलियां कभी आजाद थी, आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस की गुलामी कर रही है। इंसान वर्कोल्हिक और बच्चे भी आपस में ऑनलाइन हो गए हैं। इतना होमवर्क और कितने कंप्यूटर गेम्स, क्या करे बेचारे। आंखों पर चश्मा तो चढ़ना ही है।।

हम किसी पर उंगली नहीं उठा रहे, बस आज भी अपनी उंगलियों का कमाल देखते हैं। इसी उंगली पर किसी ने गोवर्धन पर्वत धारण किया था और समय आने पर सुदर्शन चक्र भी चलाया था। एकलव्य ने गुरु दक्षिणा में अपना अंगूठा भेंट किया था, फिर भी वह अर्जुन जैसा ही धनुर्धर था।

हम भी अगर चाहें तो हमारी पांचों उंगलियां घी में हो सकती हैं, बस अपने सर को कढ़ाई से बचा लीजिए। अनावश्यक कहीं उंगली मत कीजिए, अपनी उंगलियों का सदुपयोग कीजिए। किसी कंप्यूटर से कम नहीं आपकी दसों उंगलियां।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ रात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

दमदार पावलांनी हळुवार रात आली

काळोख संपवाया या पेटवू मशाली

 

पेठेत आज इथल्या विकतात माणसे ही

करतात लोक काही चोरून ही दलाली

 

ज्याना घरात त्यांच्या काहीच वाव नाही

बदलून चेहऱ्याना फिरतात ते मवाली

 

आहेत मंद बुद्धी लाचार दास काही

म्हणतात मालकांची हळवी नवी कवाली

 

जिंकून जे आले ते झालेत आज राजे

गद्दार सर्व त्यांच्या जमलेत भोवताली

 

मागून रोज पाणी घायाळ लोक झाले

आल्या समोर त्यांच्या पण कोरड्या पखाली

 

देशात वैभवाच्या चालू किती वराती

जनतेस नाचण्याची संधी कुठे मिळाली

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्ञान… ☆ दीप्ती कोंदड कुलकर्णी ☆

दीप्ती कोंदड कुलकर्णी

? विविधा ?

☆ ज्ञान… ☆ दीप्ती कोंदड कुलकर्णी 

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते? खरोखर, ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. ज्ञानाच्या शाखा अमर्याद आहेत. ज्ञान लिपीतून, चित्रातून, लिखित स्वरूपात किंवा अगदी मौखिक स्वरूपात सुद्धा दिले जाते. पूर्वीची सर्व ग्रंथसंपदा संस्कृत भाषेत आहे. कारण संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. लॅटिन सुद्धा पुरातन भाषा आहे. आपले धर्मग्रंथ संस्कृत भाषेत आहेत तसेच प्राकृत भाषेतही आहेत. अलीकडे मात्र इंग्रजी (आंग्ल) भाषेला “Window of the World” म्हणतात. म्हणजे जगातील कोणत्याही देशाशी संवाद साधताना इंग्रजी भाषेचा सर्रास उपयोग केला जातो. आपण अनेक भाषांतून विविध देशातील ज्ञानाचा प्रसार होत असलेला पाहतो. इतिहास, भूगोल, कृषी, क्रीडा, उद्योग, वाणिज्य, वैद्यकशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कुंभारकला, चित्रकला, युद्धकला, शस्त्रनिर्मिती, वस्त्रविणणे, नाट्यशास्त्र, छायाचित्रण, इ. अनेक विषयांचे ज्ञान घ्यायचे म्हटले तर आपला जन्म अपुरा पडेल इतके ज्ञानाचे साठे अमर्याद आहेत.

पूर्वी मौखिक परंपरेनुसार गुरूकडून शिष्य ते पुढील पिढीपर्यंत असे ज्ञान पठण करून पोहोचवित. भूर्जपत्रावर लेखन करणे सुरू झाल्यानंतर ग्रंथनिर्मितीस प्रारंभ झाला. या लेखनानंतर मोडी लिपी किंवा पुढे मोडीचा वापर सुरू झाला. पूर्वी गुरूपदावर विराजमान झालेली व्यक्ती ज्ञानी, अनुभवी व विविध विषयात पारंगत असे. आजही शाळा व महाविद्यालयात अनेक पदव्या प्राप्त केलेले शिक्षक, प्राध्यापक आपण पाहतो. आज संगणकावर, मोबाईलवर, लॅपटॉपवर कोणत्याही विषयाचे अगदी अद्ययावत ज्ञान क्षणात मिळू शकते;

ही एक प्रकारची क्रांतीच आहे. खरी ज्ञानी व्यक्ती ही अहंकाररहित आणि विनम्र असते. याउलट ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या न्यायाने अनेक क्षेत्रातील ज्ञानातील थोडे थोडे मोजके ज्ञान असणारी व्यक्ती अहंकारी असू शकते.

मूलभूत ज्ञान मिळवून निरनिराळ्या साहित्यकृती निर्माण करून अनेक लेखक, संत आज अजरामर झालेले आपण पाहतो. कालिदासांचे ‘अभिज्ञान शाकुंतल’ भारतातच नव्हे तर जर्मनी व इतर देशात गाजले आहे. शेक्सपिअर ची लोकप्रियता जगन्मान्य आहे. ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचे अनेक भाषात भाषांतर झाले आहे. महाभारतास तरी ‘व्यासोच्छिष्टं’ असे म्हणतात कारण असा एकही विषय नाही की ज्याचा उहापोह महाभारतात झाला नाही. व्यासांनी सांगितलेले महाभारत साक्षात श्रीगणेशाने लिहून घेतले आहे.

दिल्याने वाढते ते ज्ञान आणि जे घेतले जात नाही ते अज्ञान असे म्हणणे अगदी योग्य ठरेल. ज्ञानाचा उपयोग करून व्यक्ती उच्च पदी विराजमान होते. ज्ञानामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते. पूर्वी ज्ञानसंपन्न अशा व्यक्तींना राजाश्रय मिळत असे. आजशी ज्ञानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणून ज्ञान हा माणसाला तिसरा डोळा आहे, असे म्हणतात.

© दीप्ती कोंदड कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मेजवानी ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 जीवनरंग 🔅

☆ मेजवानी ☆ विभावरी कुलकर्णी

एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घडलेली ही गोष्ट केवळ दोन जनावरांची नाही, तर मैत्री, भिती आणि जगाच्या अजब न्यायाची एक वेधक कहाणी आहे.

तांबडं फुटायला अजून अवकाश होता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात थंडीचा कडाका भयंकर वाढला होता. शेतकरी गणपतराव यांच्या प्रशस्त गोठ्यात नेहमीसारखी गजबज नव्हती. तबेल्याच्या एका कोपऱ्यात गणपतरावांचा सर्वात आवडता आणि नखरेल घोडा ‘तुफान’ पडलेला होता.

तुफान हा काही साधा घोडा नव्हता. त्याचा रुबाब, त्याची चाल आणि त्याची चपळाई संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध होती. गणपतरावांच्या शेतीची आणि प्रतिष्ठेची ती एक शान होती. पण गेल्या चार दिवसांपासून तुफानला अचानक कसला तरी आजार झाला होता. त्याच्या अंगात भयंकर ताप होता आणि त्याचे मजबूत पाय त्याला साथ देत नव्हते. तो जमिनीवर असा पडून होता की जणू त्याच्यातील प्राणच निघून गेले आहेत.

तुफानच्या शेजारीच एका खांबाला बांधलेला होता ‘बब्या’.. गणपतरावांचा बोकड. बब्या स्वभावाने अतिशय खोडकर, चतुर आणि प्रेमळ होता. तुफान आणि बब्या यांची मैत्री फार जुनी होती. घोडा जरी आकाराने मोठा आणि ऐटबाज असला, तरी बब्याशी बोलताना तो नेहमी नम्र असायचा. बब्या रोज रात्री तुफानच्या पाठीवर तोंड टेकवून झोपायचा.

पण आज परिस्थिती वेगळी होती. तुफान निपचित पडला होता आणि बब्या चिंतेने त्याच्याभोवती फेऱ्या मारत होता.

सकाळच्या प्रहरी गणपतराव गावातील पशुवैद्यकीय डॉक्टर पाटणकरांना घेऊन गोठ्यात आले. डॉक्टरांनी आपली पिशवी बाजूला ठेवली, स्टेथॉस्कोप लावून तुफानची तपासणी केली, त्याचे डोळे तपासले आणि एक मोठा उदास सुस्कारा सोडला.

गणपतरावांनी चिंतेने विचारले, “डॉक्टर साहेब, काय होतंय माझ्या तुफानला? बरा होईल ना तो? पुढच्या महिन्यात बैलपोळ्याच्या दिवशी मला शहरात जायचंय, त्याच्याशिवाय माझं अडेल. “

डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले, “गणपतराव, परिस्थिती नाजूक आहे. तुफानच्या शरीरात भयंकर विषबाधा किंवा संसर्ग झाला आहे. त्याचे स्नायू अजिबात प्रतिसाद देत नाहीत. मी त्याला काही कडक औषधं आणि इंजेक्शन देतोय. आपण तीन दिवस वाट पाहू. “

“तीन दिवस? ” गणपतरावांचा आवाज कापरा झाला.

“हो, ” डॉक्टर ठामपणे म्हणाले. “आजचा पहिला दिवस. जर येत्या तीन दिवसांत हा स्वतःच्या पायावर उभा राहिला नाही, तर याचा अर्थ याचे शरीर पूर्णपणे निकामी झाले आहे. अशा स्थितीत याला वेदना देत जगवण्यात काही अर्थ नाही. जर तीन दिवसांत तो उठला नाही, तर दयामरण म्हणून त्याला मारून टाकावं लागेल नाहीतर हा आजार गोठ्यातील इतर जनावरांमध्ये पसरू शकतो. “

हे ऐकून गणपतरावांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी होकारात मान हलवली. डॉक्टर औषधे देऊन निघून गेले.

गणपतराव आणि डॉक्टर निघून गेल्यानंतर गोठ्यात स्मशानशांतता पसरली. पण या संभाषणाचा एक-एक शब्द शेजारी उभ्या असलेल्या त्या बोकडाने स्पष्ट ऐकला होता. बब्याचे काळीज धडधडले.

डॉक्टर निघून गेल्यावर बब्याने गणपतरावांनी मारलेली गाठ कशीबशी सोडवली आणि तो धावतच तुफानजवळ गेला. तुफानचे डोळे अर्धे मिटलेले होते आणि तो निपचित पडला होता.

बब्याने तुफानच्या कानाजवळ तोंड नेले आणि त्याला ढकलत म्हणाला, “तुफान! अरे भावा, ऐकतोयस का? उठ! तुला उठावच लागेल! “

तुफानने मंद आवाजात हुंकार दिला, “बब्या, मला त्रास देऊ नकोस रे. माझ्या अंगात अजिबात ताकद उरलेली नाही. माझे पाय लाकडासारखे कडक झालेत. मला वाटतं माझं शेवटचं नक्षत्र जवळ आलंय. “

“अरे वेड्या! ” बब्या ओरडला, “तू काय समजतोयस? डॉक्टर काय सांगून गेलाय माहित्येय तुला? त्यांनी तुला तीन दिवसांची मुदत दिलीये! जर तू या तीन दिवसांत स्वतःच्या पायावर उभा राहिला नाहीस, तर ते तुला मारून टाकतील! औषधाचा डोस देऊन तुझा खेळ खलास करतील! “

तुफानने अंधुक डोळ्यांनी बब्याकडे पाहिले, “मरू दे रे बब्या… या वेदनांपेक्षा मरण सोपं वाटतंय मला. “

“नाही! ” बब्या ठामपणे म्हणाला. “मी तुला मरू देणार नाही. तू तुफान आहेस! वाऱ्याच्या वेगाने पळणारा घोडा! तू असा हार मानू शकत नाहीस. तुला माझ्यासाठी, तुझ्या अस्तित्वासाठी उठावं लागेल. आजचा पहिला दिवस आहे, प्रयत्न कर! “

पहिल्या दिवशी बब्याने दिवसभरात शंभर वेळा तुफानला उठवण्याचा प्रयत्न केला. तो त्याला डोक्याने धक्के देई, त्याच्या कानात ओरडे, त्याला हिंमत देई. पण तुफान अजिबात हलला नाही. संध्याकाळी गणपतराव आले, त्यांनी तुफानची अवस्था पाहून दुःखाने सुस्कारा सोडला आणि निघून गेले. दिवस वाया गेला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर पुन्हा आले. त्यांनी तुफानला दुसरे इंजेक्शन दिले आणि म्हणाले, “गणपतराव, आज दुसरा दिवस संपत आलाय. अजूनही काहीच हालचाल नाही. उद्या शेवटचा दिवस असेल. जर उद्या सकाळी हा उठला नाही, तर मला विषारी इंजेक्शन आणावे लागेल. “

गणपतराव काहीच बोलले नाहीत, त्यांनी फक्त अश्रू पुसले.

डॉक्टर गेल्यावर बब्या अक्षरशः वेडापिसा झाला. काळ वेगाने निघून चालला होता. आपल्या मित्राचे आयुष्य अवघ्या काही तासांचे उरले होते. बब्याने तुफानच्या पाठीवर चढून त्याला शिंगांनी हळूच टोचायला सुरुवात केली.

“तुफान, उठ! अरे मित्रा, बघ बाहेर सूर्य उगवलाय. तू उठणार नाहीस तर उद्या हा सूर्य तुला पाहायला मिळणार नाही! विचार कर, त्या गणपतरावांचा, ज्यांनी तुला लहानसा असल्यापासून पाळलं. विचार कर माझा… तू गेलास तर मी कोणाशी खेळणार? कोणाच्या पाठीवर बसणार? उठ तुफान, ताकद लाव! ” बब्या कळवळून सांगत होता.

बब्याच्या शब्दांतील ती तळमळ, तो त्रास आणि प्रेम तुफानच्या हृदयापर्यंत पोहोचले. तुफानने आपले पुढचे दोन पाय हलवण्याचा प्रयत्न केला.

“हो! असाच! प्रयत्न कर! ” बब्या उत्साहाने ओरडला.

तुफानने संपूर्ण ताकद पणाला लावली, मान वर केली, पण शरीर जड पडल्यामुळे तो पुन्हा धप्पकन खाली कोसळला. तुफानच्या डोळ्यातून अश्रू आले. “बब्या, माझ्याने नाही होत रे… माझे पाय साथ देत नाहीत. “

“होईल! तुला करावच लागेल! उद्या शेवटचा दिवस आहे तुफान, ताकद दाखव तुझी! ” बब्या रात्रभर तुफानच्या शेजारी बसून त्याला जागे ठेवत होता, त्याला सतत प्रोत्साहन देत होता.

तिसरा दिवस उजाडला. थंडी अजूनही तशीच होती. आज डॉक्टरांनी दिलेली अंतिम मुदत होती. गणपतराव आणि डॉक्टर गोठ्याकडे येत असल्याचे पावलांचे आवाज आले.

बब्या मनातून पूर्ण घाबरला होता. त्याने पाहिले, डॉक्टरांच्या हातात एक वेगळीच, मोठी पिशवी होती. ज्यात कदाचित तुफानचा जीव घेणारे औषध होते.

“तुफान! ” बब्या जोरात ओरडला. “बघ, ते आलेत! तुला मारायला आलेत! ही तुझी शेवटची संधी आहे. उठ! उभं राहा! त्यांना दाखवून दे तू अजून जिवंत आहेस! उठ मित्रा, माझ्यासाठी उठ! “

बब्याने तुफानच्या तोंडाजवळ जाऊन त्याला जोराने डोके मारले. बब्याची ती धडपड, त्याचा तो आक्रोश पाहून तुफानच्या आत काहीतरी पेटून उठले. मृत्यू समोर उभा होता आणि मैत्री पाठीशी उभी होती!

तुफानने एक मोठा दीर्घ श्वास घेतला अंगातील उरलीसुरली सर्व ताकद गोळा केली. त्याच्या नसा-नसांमध्ये रक्ताचा प्रवाह वेगाने धावू लागला. त्याने आपले मागचे पाय टेकवले… पुढच्या पायांवर जोर दिला… आणि…

धडपडत, थरथरत, तुफान स्वतःच्या चारही पायांवर उभा राहिला!

बब्याच्या आनंदाचा सीमा उरली नाही. तो आनंदाने गोठ्यात उड्या मारू लागला. “उठला! माझा तुफान उठला! “

तुफानने दोन पावले पुढे टाकली. त्याचे पाय अजून थरथरत होते, पण तो उभा होता! त्याने मान वर केली आणि खणखणीत खिंकाळला.

समोर उभे असलेले गणपतराव आणि डॉक्टर गोठ्याच्या दारातच थांबले. त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

“अरे वा! चमत्कार झाला! ” डॉक्टर आनंदाने ओरडले. “गणपतराव, तुमचा घोडा वाचला! औषधाने काम केलं आणि याच्या अंगातली जगण्याची इच्छा जिंकली. बघा, तो चालू लागलाय! “

गणपतरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी धावत जाऊन तुफानच्या गळ्याला मिठी मारली. तुफान आता सावकाश सावकाश बाहेर पडला. मोकळ्या हवेत आल्यावर त्याच्या अंगात नवीन ऊर्जा संचारली. तो मोकळ्या मैदानात हळूहळू पळू लागला. वाऱ्याच्या वेगाने नाही, पण एका आजारातून उठलेल्या घोड्यासारखा तो उत्साहाने पळत होता.

आपल्या मित्राला पळताना पाहून गोठ्याच्या कोपऱ्यात उभा असलेला बब्या समाधानाने हसत होता. त्याची मेहनत, त्याची तळमळ यशस्वी झाली होती. त्याने आपल्या मित्राचा जीव वाचवला होता.

दुपार झाली. तुफानची प्रकृती आता पूर्णपणे पूर्ववत होत होती. गणपतरावांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांचा सर्वात मौल्यवान घोडा मरणाच्या दारातून परत आला होता. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

गणपतरावांनी मनात विचार केला, “आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. माझा तुफान वाचला! या आनंदाच्या प्रसंगी देवाला नैवेद्य दाखवायला हवा आणि गावातल्या चार प्रमुख लोकांना, डॉक्टरांना घरी जेवायला बोलवायला हवं. असा मोठा आनंद साजरा करायचा तर घरात काहीतरी विशेष मेजवानी झालीच पाहिजे! “

गणपतराव घरात गेले. त्यांनी आपल्या मुलाला आणि काही गड्यांना बोलावले.

गणपतराव तबेल्याकडे चालत आले. त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद होता. तुफान झाडाखाली शांतपणे घास खात होता. बब्या तुफानच्या शेजारीच बसून आरामात रवंथ करत होता. बब्याला वाटले, गणपतराव तुफानचे कौतुक करायला आले आहेत.

गणपतरावांनी बब्याकडे पाहिले. त्यांच्या मनात एक विचार आला ‘आजच्या या मोठ्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या दिवशी मटणाचा बेत करायला काय हरकत आहे? ‘

गणपतरावांनी गड्याला हाक मारली, “अरे सोमा, इकडे ये! “

सोमा धावत आला, “हो मालक? “

गणपतराव बब्याकडे बोट दाखवत म्हणाले, “आज आपला तुफान बरा झालाय. एवढा मोठा आनंद झालाय आपल्याला! या आनंदाच्या निमित्ताने आज घरात मटणाची छान मेजवानी झाली पाहिजे. डॉक्टर साहेबांना आणि सरपंचांना जेवायला बोलवायचंय. जा, या बकऱ्याला कापा आणि मस्त मटणाचा बेत करा! “

सोमाने दोरी हातात घेतली आणि तो बब्याकडे वळला.

बब्या स्तब्ध झाला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी त्याने तीन दिवस रात्रीचा दिवस केला, ज्याच्यासाठी तो कळवळून ओरडला, ज्याच्या जीवाच्या आनंदासाठी त्याने देवाला नवस बोलले… त्याच मित्राच्या ‘वाचण्याच्या आनंदाचा’ मोबदला म्हणून आज बब्याचा जीव घेतला जाणार होता!

सोमाने बब्याची दोरी घट्ट पकडली आणि त्याला ओढू लागला. बब्याने तुफानकडे पाहिले. तुफान अजूनही अज्ञानीपणे गवत खाण्यात आणि स्वतःच्या नवसंजीवनीचा आनंद घेण्यात मग्न होता. त्याला बहुदा कळतच नव्हते की त्याला मिळालेले हे नवीन जीवन त्याच्या मित्राच्या मृत्यूच्या किंमतीवर आले होते.

बब्याला आता कळून चुकले होते, जगाचा न्याय किती विचित्र आणि क्रूर असतो. ज्याच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावता, शेवटी तुमचाच बळी देऊन लोक स्वतःचा उत्सव साजरा करतात.

त्या दिवशी संध्याकाळी गणपतरावांच्या वाड्यात हशा आणि आनंदाचे उधाण आले होते. तुफान सुखरूप बरा झाल्याच्या आनंदात सर्वजण मटणाच्या मेजवानीवर ताव मारत होते… आणि गोठ्यात तुफान, एकाकी उभा राहून आपल्या गायब झालेल्या मित्राची वाट पाहत होता.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निद्रेच्या उंबरठ्यावरचे गूढ ध्यान – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ निद्रेच्या उंबरठ्यावरचे गूढ ध्यान – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

रात्र हळूहळू पृथ्वीवर उतरते. दिवसाचा गोंगाट शांत होऊ लागतो. मनाच्या आकाशात दिवसभर उडणारे विचारांचे पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागतात. आणि मग येतो तो क्षण—जेव्हा मनुष्य डोळे मिटतो.

पाहता पाहता एक अद्भुत घटना घडते.

… दिवसभर “मी”, “माझं”, “माझ्यासाठी” या भावनांनी व्यापलेला मनुष्य अचानक सर्व काही सोडून देतो. पद, प्रतिष्ठा, संपत्ती, नाती, चिंता, स्वप्नं, संघर्ष, यश-अपयश—सगळं काही मागे राहतं. झोपेच्या दारातून आत जाताना तो काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही.

हे केवळ झोपणं नसतं… हे एका अज्ञात शक्तीसमोर केलेलं पूर्ण समर्पण असतं.

.. कारण झोप म्हणजे एक छोटासा मृत्यू आणि सकाळ म्हणजे एक नवा जन्म. रात्री आपण स्वतःला विश्वाच्या स्वाधीन करतो. आपल्या हृदयाची धडधड, श्वासांची लय, शरीरातील असंख्य प्रक्रिया—हे सर्व आपण नियंत्रित करत नसतो. तरीही काही अदृश्य कृपा आपल्याला सांभाळत असते.

कधी विचार केला आहे?

झोपताना आपल्याला खात्री नसते की पहाटे डोळे उघडतीलच. तरीही आपण निर्धास्तपणे निद्राधीन होतो. हा विश्वास कुठून येतो?

… कदाचित तो विश्वास आपल्या आत्म्याला त्या परमचैतन्याशी असलेल्या नात्यातून मिळत असावा.

ध्यानात साधक जाणीवपूर्वक स्वतःला शांततेकडे नेतो. पण झोपेत निसर्ग स्वतः आपल्याला त्या शांततेच्या गर्भात घेऊन जातो. म्हणूनच गाढ झोपेत एक अवर्णनीय आनंद असतो. त्या क्षणी ना इच्छा असते, ना अपेक्षा, ना दुःख, ना सुख.

… फक्त अस्तित्व असतं…

.. निराकार…

.. निर्विचार…

.. निशब्द…

आणि कदाचित त्या गहन शांततेत आत्मा क्षणभर स्वतःच्या मूळ स्वरूपाला स्पर्श करत असतो.

पहाट होते.

पूर्व दिशेला प्रकाशाचा पहिला किरण जन्म घेतो.

आपले डोळे उघडतात.

श्वास अजूनही सुरू असतो.

हृदय अजूनही धडधडत असतं.

आणि जीवन पुन्हा एकदा आपल्याला हाक देतं.

… तो क्षण साधा नसतो. ती कृपा असते.

… कारण प्रत्येक सकाळ ही आपल्या पात्रतेमुळे मिळत नाही; ती आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते.

विश्व जणू हळूच सांगत असतं—

“अजून तुझा प्रवास पूर्ण झालेला नाही… अजून काही अनुभव घ्यायचे आहेत… अजून काही कर्म पूर्ण करायची आहेत… “

अध्यात्माची सुरुवात कदाचित याच जाणिवेतून होते—

… की जीवनावर आपला अधिकार नाही, फक्त सहभाग आहे.

… आपण या विश्वाचे मालक नाही.

… आपण केवळ निमित्त आहोत.

जेव्हा मनुष्य रात्री झोपताना संपूर्ण समर्पण करतो आणि सकाळी उठताना कृतज्ञतेने मस्तक झुकवतो, तेव्हा त्याचं प्रत्येक श्वास ध्यान बनतो, प्रत्येक दिवस साधना बनतो आणि प्रत्येक रात्र ईश्वराच्या कुशीत विसावल्यासारखी वाटू लागते.

… मग झोप ही फक्त विश्रांती राहत नाही.

… आणि जाग येणं ही फक्त दिनचर्या राहत नाही.

… तो दररोज घडणारा एक गूढ आध्यात्मिक उत्सव बनतो—

… जिथे प्रत्येक रात्र अहंकाराचा विसर्जन सोहळा असते,

… आणि प्रत्येक पहाट आत्मजागृतीचा नवीन उदय.

ज्याला या रहस्याची अनुभूती आली, त्याला समजतं की जीवन हे जगायचं नसतं—ते कृतज्ञतेने स्वीकारायचं असतं. 

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वतःवर प्रेम करा… ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ स्वतःवर प्रेम करा☆ सुश्री सुरेखा चिखलकर

आपण अनेकदा म्हणतो, “कोणी माझी काळजी घेत नाही, कोणी मला समजून घेत नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही “

… पण या प्रत्येक प्रश्नापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा; मी स्वतःसाठी काय करतो? जो माणूस स्वतःच स्वतःला सतत दोष देतो, स्वतःची किंमत कमी करतो आणि स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो, त्याला इतरांनी कायम आनंद द्यावा, ही अपेक्षा पूर्ण होणे कठीण असते.

स्वतःवर प्रेम करणे म्हणजे आरशात स्वतःचे रूप पाहून आनंदी होणे एवढेच नाही.

… स्वतःच्या चुका स्वीकारून त्यातून शिकणे, स्वतःला माफ करणे, स्वतःचा सन्मान राखणे आणि गरज पडल्यास स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे हेही स्वतःवर प्रेम करण्याचेच रूप आहे.

जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो, तेव्हा इतरांकडून प्रेमाची भीक मागावी लागत नाही. कारण त्यावेळी आपला आनंद इतरांच्या स्वीकृतीवर नाही, तर स्वतःच्या आत्मविश्वासावर उभा असतो.

… म्हणून आयुष्यात सर्वप्रथम स्वतःशी मैत्री करा. कारण जो स्वतःचा होऊ शकत नाही, त्याच्यासाठी दुसऱ्यांचे प्रेमही अनेकदा अपुरे ठरते. *_

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘यूपीआय’ चे शिल्पकार…  – लेखक : श्री प्रसन्न आठवले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘यूपीआय’ चे शिल्पकार…  – लेखक : श्री प्रसन्न आठवले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(UPI – Unified Payments Interface)

श्री. दिलीप असबे 

आज जगातील जवळपास निम्म्या रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये एकट्या भारताचा वाटा आहे. हे केवळ भारताच्या अथांग लोकसंख्येमुळे नाही, तर या पेमेंट सिस्टीममुळे शक्य झाले आहे जी पूर्णपणे मोफत आहे, २४ तास अखंड चालते आणि वाराणसीतील रस्त्यांवरील फेरीवाल्यापासून ते मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वांसाठी समान रीतीने काम करते.

ही प्रणाली डिझाइन करणारे आणि यशस्वीपणे अमलात आणणारे अभियंते म्हणजे दिलीप असबे. रोजच्या जीवनात यूपीआय (UPI) वापरणाऱ्या बहुतांश भारतीयांनी त्यांचे नाव कदाचित ऐकलेही नसेल.

यूपीआय येण्यापूर्वी, डिजिटल पेमेंटचे गणित सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होते. जेव्हा जेव्हा एखादे कार्ड स्वाइप केले जायचे, तेव्हा व्यापाऱ्याला व्हिसा (Visa) किंवा मास्टरकार्डला (Mastercard) १ ते २ टक्के शुल्क द्यावे लागायचे. या परदेशी कंपन्या भारतातील प्रत्येक व्यवहारावर व्यापाऱ्यांकडून पैसे उकळत होत्या. लहान व्यापाऱ्यांना हे परवडणारे नव्हते. बँकेतून पैसे ट्रान्सफर करायला तास जायचे आणि ते फक्त बँकेच्या दिवशीच व्हायचे. परिणामी, कोट्यवधी भारतीयांसाठी रोख रक्कम (Cash) वापरणे ही त्यांची आवड नसून एक गरज बनली होती.

मुंबईचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या दिलीप असबे यांनी एनपीसीआय (NPCI) च्या सुरुवातीच्या दिवसांत तिथे काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी आयएमपीएस (IMPS), एनईएफटी (NEFT) आणि रुपे (RuPay) यांसारख्या भारताच्या मुख्य पेमेंट प्रणाली उभारण्यात तब्बल एक दशक घालवले. २००९ पर्यंत, त्यांच्या टीमने आधारच्या (Aadhaar) आधारे एक नवीन पेमेंट लेयर तयार करता येईल का यावर काम सुरू केले.

२०१५ पर्यंत त्यांच्या लक्षात आले की आयएमपीएस प्रणाली पुरेशी नाही. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये यूपीआय लॉन्च करण्यात आले. ही एक मोफत, २४ तास चालणारी आणि सर्व बँकांशी एकाच वेळी जोडली गेलेली प्रणाली होती, ज्यावर कोणतेही ॲप सहज तयार करता येत होते. शुल्काबाबत दिलीप असबे यांचे तत्त्व अगदी स्पष्ट होते: तुम्ही ग्राहकांकडून कोणतेही शुल्क वसूल करू शकत नाही, अन्यथा हे संपूर्ण मॉडेल अपयशी ठरेल.

आज यूपीआय ५० कोटींपेक्षा जास्त (+500 Million) वापरकर्ते आणि ६ कोटी ५० लाख (65 Million) व्यापाऱ्यांना ६७५ बँकांच्या माध्यमातून सेवा देत आहे. यूपीआयद्वारे दरमहा १८ अब्जांपेक्षा जास्त (18 Billion) व्यवहार होतात आणि व्यवहारांचे एकूण मूल्य २० लाख करोड पेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचे वर्णनजलद पेमेंट क्षेत्रातील जगाचा नेताअसे केले आहे.

दिलीप असबे हे २०१८ पासून NPCI चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत.

एका बिगर-नफा (Non-profit) संस्थेत काम करणाऱ्या एका मराठी सरकारी अभियंत्याने १४० कोटी लोकांसाठी ही आर्थिक क्रांती उभारली.

लक्षात घ्या या UPI साठी कोणताही आयपीओ (IPO) नाही, कोणतीही युनिकॉर्न (Unicorn) कंपनी नाही… फक्त यूपीआय (UPI).

जाता जाता पण महत्वाचं :::: 

ज्या नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वात UPI च्या योजनेचा पाया घातला गेला, आणि दिलीप असबे यांच्या टीमने अखंड मेहनत घेऊन एप्रिल 2016 मध्ये लाँच केलेली ही सिस्टिम आजही अखंड कार्यरत आहे, त्याच नंदन निलेकणी यांना पेपर फुटी विरोधातील तंत्रज्ञान निर्मितीची जबाबदारी मोदींजींनी दिली आहे. त्यामुळे एक सर्वंकष लिकप्रूफ व्यवस्था नक्की निर्माण होईल याची खात्री बळगूया.

 – मला आलेल्या इंग्रजी लेखाचा मराठी भाषेत अनुवाद सादर करत आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक / अनुवादक : प्रसन्न आठवले

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सहजीवनाचं दैवत्व…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सहजीवनाचं दैवत्व…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

तिच्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन होतं, त्याच्या खांद्यावर वीणा होती. दोघांच्याही पायात चप्पल नव्हती. पण…

त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं, ते आज लाखोंच्या गाड्यांतून फिरणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरही क्वचितच दिसतं…

मी त्यांच्या मागे बराच वेळ चालत होतो…

 त्यांनी एकदाही तिचा हात हातात घेतला नाही, एकदाही त्यांनी त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन केलं नाही, एकदाही कुठली अतिशयोक्ती नव्हती…

पण प्रत्येक पावलागणिक त्यांचं प्रेम बोलत होत.

तो वृद्ध वारकरी चार पावलं पुढे जाई? 

 अचानक मागे वळून पाही ती येतेय ना…

हे पाहण्यासाठी.

 तीही काही बोलत नव्हती. फक्त त्यांच्या मागे वळून पाहण्यावर हलकंसं हसायची. बस्स… इतकंच.

दुपार झाली…

दिंडी एका ठिकाणी विसावली…

 सगळे आपापल्या शिदोऱ्या सोडू लागले…

तिने जुन्या कापडात बांधलेली भाकरी काढली. मिरचीचा ठेचा आणि भाकरी…

ती म्हणाली…

 “आधी तुम्ही तुकडा मोडा”

तो म्हणाला…

 नको गं… तू आधी घे,

दोन मिनिटं दोघेही एकमेकांनाच आग्रह करत राहिले…

शेवटी…

 तिने भाकरीचा तुकडा मोडून त्याच्या हातात ठेवला, आणि स्वतःचा घास नंतर घेतला.

 त्या क्षणी मला जाणवलं… आजची पिढी प्रेम व्यक्त करण्यासाठी महागड्या हॉटेलला जाते,

 कितीतरी मोठं सेलिब्रेशन करते,

 तरी अखेर असमाधानीच…

 

आणि ही पिढी..

 अर्ध्या भाकरीतही एकमेकांना पूर्ण आयुष्य देऊन टाकते…

सायंकाळी मुक्काम झाला…

 तिने मुक्कामाच्या अलीकडे नदीवर जाऊन त्याचं धोतर धुतलं…

हात थरथरत होते.

कंबर वाकली होती.

डोळ्यांना नीट दिसत नव्हतं.

तरी…

 तिने धोतरावर एकही डाग राहू दिला नाही…

तो दूर बसून तिच्याकडे पाहत होता… कोणी पाहू नये म्हणून.

 त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं…

 कारण तिच्या हातात आता ताकद नव्हती,

 पण त्याच्यासाठीची माया अजून तरुण होती,

वीणा वाजवत तो गुणगुणू लागला…

 ‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना,

 केल्या विठुरायाला हो संसार पेलनाss’

रात्री झोपताना त्याने आधी तिच्या अंथरुणाखालचे दगड काढले,

 ती म्हणाली काय करता?

तो हसला…

“झोपताना पाठ दुखेल”

इतकंच… ते वाक्य छोटं होतं,

 पण त्यात 55 वर्षाचा संसार दडला होता…

आज प्रेमाचा अर्थ बदलला आहे,

 लोक म्हणतात मला माझी स्पेस हवी,

त्या दोघांनी मात्र आयुष्यभर एकमेकांना जागा दिली,

 पण अंतर कधी दिलं नाही…

आज लग्नाच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर शंभर फोटो टाकले जातात… ,

 यांनी कधी एक फोटोही काढला नाही,

कारण त्यांच्या आठवणी कॅमेऱ्यात नव्हत्या.

 त्या एकमेकांच्या डोळ्यात आणि हृदयात जपलेल्या होत्या…

आजची पिढी प्रेम सिद्ध करण्यासाठी भेटवस्तू देते, त्या देण्यात काही गैर नाही,

पण ती तिथे चुकते जिथे ते एकमेकांना न पेलणारे वचन देते,

 या जुन्या पिढीने एकमेकांना तारुण्य दिल, श्रम दिले, त्याग दिला, संयम दिला आणि शेवटी म्हातारपणातही एकनिष्ठेने साथ दिली…

वारकरी दिंडीतली ती म्हातारी जोडी पाहिली की वाटतं…

 प्रेमाचा सर्वात मोठा आवाज हा कधीच शब्दांत नसतो,

 तो आयुष्यभर निभावलेल्या जबाबदाऱ्यांच्या शांततेत असतो…

ती आजही त्याच्या मागून चालते,

 कारण पुढे जाण्याची तिची इच्छा नसते,

आणि तो आजही अधून मधून मागे वळून पाहतो, कारण तिला मागे सोडण्याची त्याची हिंमत नसते…

 त्यांनी एकमेकांना कधी गुलाब दिला नाही,

 पण आयुष्यभर एकमेकांच्या वाटेवरचे काटे वेचत राहिले…

 त्यांच्या संसारात आय लव यूनव्हतं,

‘पण तुम्ही आधी घास घ्या’..

 हेच त्यांचे सर्वात मोठं प्रेम पत्र होतं…

 आजकाल प्रेमाचा शेवट लग्नात होतो,

 आणि त्यांचं प्रेम तर लग्नानंतरच सुरू झालं होतं…

सुरकुत्या चेहऱ्यावर पडल्या,

 पण नात्यावर नाहीत,

देह थकला…

 पण एकमेकांची काळजी करण्याची सवय कधी म्हातारी झाली नाही…

ती वारकरी जोडी दिंडीत विरून गेली…

मी बराच वेळ त्यांच्याकडे पाहत राहिलो,

 क्षणभर वाटलं…

पंढरपुराकडे चालणारे ते दोन वारकरी नव्हतेच,

 

तो विठ्ठल होता…

ती रखुमाई होती..

कारण देव असाच असतो..

तो आयुष्यभर एकमेकांच मन राखणाऱ्या नात्यात असतो…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मित्र…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “मित्र…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

मैत्री केली तर

 जात पाहू नका,

 आणि मदत केली तर

 ती बोलून

 दाखवू नका.

 कारण कोणत्याही

 बाटलीचा सील,

 आणि दोस्तांचा दिल

एकदा तोडला की,

 विषय संपला.

 मित्र गरज म्हणून

 नाही तर

 सवय म्हणून

 जोडा.

 कारण गरज

 संपते,

पण सवयी कधीच

 सुटत नाहीत.

 ‘मित्रनावाची ही दैवी

 देणगी जिवापाड

 जपून ठेवा,

 कारण,

 जीवनातील अर्धा

 गोडवा हा मित्रांमुळेच

असतो.

 कोणीतरी विचारले,

 मित्रांमध्ये एवढे

 काय विशेष

 नातेवाईकांपेक्षा?

 त्यांना सांगितले,

 मित्र हे फक्त

 मित्र असतात.

त्यात सख्खे, चुलत, मावस,

 सावत्र असं

 काही नसते.

 ते थेट मित्रच

 असतात.

 मैत्रीचे धागे

 हे कोळ्याच्या जाळ्या

 पेक्षाही बारीक असतात.

पण लोखंडाच्या तारेहूनही

 मजबूत असतात.

 तुटले तर श्वासानेही

 तुटतील,

 नाहीतर

 वज्राघातानेही

 तुटणार नाहीत.

 प्रत्येक दुखण्यावर

दवाखान्यात उपचार होतातच

 असे नाही,

 काही दुखणी

 कुटुंब आणि

 मित्र मंडळी

 यांच्याबरोबर

 हसण्या आणि

 खिदळण्यानेही

 बरी होतात.

 माणसाने कितीही प्रयत्न

 केले तरी

 अंधारात सावली

 म्हातारपणात

 ‘शरीरआणि

 आयुष्याच्या शेवटच्या

 काळात पैसा

कधीच साथ देत नाहीत,

 साथ देतात ते

 फक्त आपण

 जोडलेले

 जवळचे मित्र.

 मित्र बोलवित

 आहेत पण तुम्हाला

 जावेसे वाटत नसेल तर,

समजा की तुम्ही

 म्हातारे झालात.

 म्हातारपण येऊ

 न देणे आपल्या

 हातातच

 आहे ना?

 मित्रांसोबत रहा

 व आनंदात जीवनभर

जगत राहा.

 

 कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares