मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुभं करोती की मालिका…? ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ शुभं करोती की मालिका…? ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

शुभं करोती कल्याणं

आरोग्यम धनसंपदा..

हातपाय धुऊन देवासमोर दिवा लावण्याची, शुभंकरोती म्हणण्याची संध्याकाळची वेळ आजकाल कुणी पाळत नाही. कारण यावेळी घराघरातील ‘इडियट बाॅक्स’ रंगीबेरंगी प्रकाशाच्या दिव्यानी भिंती उजळवून टाकतो. त्यातील भावना प्रेक्षकांच्या हृदयात घर करतात. नायकांबरोबर रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जवळीक निर्माण करतात. एखाद्या करमणूकप्रधान मालिकेतील कलाकार हसतात तेव्हा प्रेक्षकही हसतात. मालिकेत नायिका रडते तेव्हा प्रेक्षक भगिनींचा पदर, रूमाल डोळ्याला लागतो. खलनायिका कट कारस्थान करते तेव्हा प्रेक्षक रागाचं टोक गाठतात. मध्यमवर्गीय कौटुंबिक कथानक भाव खातं. तर भक्तीचं कथानक भक्त तयार करतं. संतांच्या मालिका सुरू झाल्या की भक्तगणात पूर्वीच्या तुलनेत नक्कीच वाढ झाली. त्याचबरोबर ऐतिहासिक मालिका प्रचंड लोकप्रिय होतात. याचं कारण भारतात दूरदर्शन पाहणार्‍यांची संख्या खूपच जास्त आहे. इथं दूरदर्शन हे मनोरंजनाचं सर्वात मोठं माध्यम आहे. भारतातील प्रेक्षकांच्या भावनांचा ‘रिमोट कंट्रोल’ मालिकातील पात्रांच्या हातात आहे. पात्रांच्या उद्याच्या स्वप्नाबरोबर आपलं स्वप्न रंगवणं हे भारतीय प्रेक्षकांकडून सवयीने घडतं. प्रेक्षकांचा स्वभाव घडण्यात मालिकांचा प्रचंड मोठा हात आहे.

‘रामायण’ ‘महाभारत’ ‘मालिका यायच्या तेव्हा प्रेक्षक दूरदर्शन संचाला हळदी कुंकू लावायचे. रामाचा प्रवेश झाला तर औक्षण करायचे. तेव्हा लोक घराबाहेर पडत नसत. भक्ती उफाळून यायची. रावण आणि कौरवांचा राग मनामनात रूजला गेला.

काही वर्षांपूर्वी सासू सुनेवर आधारीत एक मालिका सुरू होती, तेव्हा मालिका सुरू असताना नवरा घरी आला तर त्याने त्याला हवं ते आपापलं घ्यायचं. त्यावेळी चहा, पाणी असं काहीही मागायचं नाही. असा कित्येक घरातला नियम होता.

अलिकडच्या काही मालिकांमधील घरात ज्याचं चुकतं त्याला शिक्षा करण्याचा नियम असतो. प्रत्यक्षात एका सुनेने कामात असल्याने सासर्‍यांचा फोन उचलला नाही तर त्यानी दहा दिवस तिचा फोन काढून घेतला.

अशा गंमतीजमती आजूबाजूला घडतात तेव्हा प्रेक्षकांची मानसिकता बदलली की बिघडली असे प्रश्न पडतात. मोबाईलवर मालिका पाहणार्‍यांची संख्या सुद्धा मोठी आहे. सतत हा आरशासारखा दिसणारा दूरदर्शन, त्याचंचं प्रतिबिंब प्रेक्षकांच्या मनावर पडावं याची पुरेपूर काळजी घेतो. मग प्रेक्षकांची मानसिकता बिघडली तर…?

पात्रांची चिंता – मालिकेतील पात्राचा अपघात झाला. पात्र बदलण्याची वेळ आली, आर्थिक अडचणी आल्या तर प्रेक्षकांची चिंता वाढते. त्याचं आता काय होणार या विचाराने ते चिंताग्रस्त होतात.

मानसिक शक्तीचा र्‍हास – स्वत:च्या वास्तव दैनंदिन जीवनाकडे दुर्लक्ष होतं. मालिका बघून दैनंदिन जीवनातील कडवट आठवणीना विसरण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं वास्तवापासून दूर पळण्याची सवय लागते. खर्‍या आयुष्यातील समस्या हाताळण्याचं कौशल्य विकसित होत नाही. मानसिक शक्तीचा र्‍हास होतो.

भावनांचा उद्रेक – मालिकातील आरडा ओरडा, सतत रडणं, सततची षडयंत्र बघून विनाकारण भावना तीव्र होतात. विशेषकरून याचा ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम होतो. तसेच मालिकांमधे दिसणारी घरं, कपडे, उदयोग, करोडो रूपयांमधील व्यवहार सगळं ऐकून समाधानाची भावना निर्माण होत नाही. ईच्छा अतृप्त राहायला लागतात. कारण मालिकांमधील सर्व भौतिक सुखांबरोबर प्रेक्षक तुलना करायला लागतात. नात्यातलं प्रेम कळेनासं होतं. धारणांचं निश्चयीकरण व्हायला लागतं. सासू अशीच असते. सून तशीच असते. अशा धारणा तयार होतात.

मालिका म्हणजे बाजारपेठ – मालिका प्रेक्षकाना गुंतवून ठेवतात. मधेमधे येणार्‍या जाहिराती प्रेक्षकांच्या मनात घर करतात. जाहिरातीत असणारी नायिका मुलाना भरपूर प्रोटीन मिळावं, त्याचे कपडे पांढरे शुभ्र असावेत म्हणून काळजी घेते. पाळण्यातल्या बाळापासून आजोबांपर्यंत सगळ्यांचा मोह वाढतो. बाजारातून आपसूक त्या वस्तू घरोघरी येतात. मालिका या जणू बाजारपेठेचं एक साधन होय. खरतर मालिकांमधून एखादी कथा जितकी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेते. तितकीच ती प्रेक्षकांची तार्किक विचार करण्याची क्षमता नष्ट करते. मालिका पाहण्यात महिलांचा वेळ वाया जातो असं प्रत्येकीला वाटतं पण तरीही मालिका पाहणं कुणी बंद करत नाही. म्हणून मालिका आपल्या खिशावर राज्य करते. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकते. आपण काय पाहतो त्यापेक्षा कंपन्याना काय विकायचं आहे हे मालिकांची बाजारपेठ ठरवते.

टी आर पी – मालिकांमधे सगळ्याच भावनांचं अतिभयंकरीकरण केलेलं दिसतं. एक नायिका असते. एक खलनायिका असते. एक अति सुसंस्कृत, तर दुसरी टोकाची वाईट असते. एकटीचे निर्णय कधीच चुकत नाहीत. ती नेहमी अति सहनशील असते. दुसरी सतत कट कारस्थानच करत असते.

उदा: ठरलं तर मग मधील सायली आणि प्रिया. आपल्या आजुबाजुला सायली इतकं सहनशील, विचारी, कार्यतत्पर, कधीही न चुकणारी अशी सून आणि प्रिया इतकं टोकाचं कट कारस्थान करणारी अशी सून कुठल्याच घरात नसते. पण अशा सुना, त्यात सासू अशी जिला एक सून प्रचंड आवडती असते. दुसरी प्रचंड नावडती असते. असं वास्तवात नसतं. पण घराघरात तसंच दिसायला हवं असतं. म्हणून मालिकांचा टी आर पी वाढतो.

उपाययोजना –

मालिकांची निवड – स्क्रीनच्या मालिकांच्या ढिगार्‍यातून आपल्या आवडीची, सोयीची एखादी मालिका निवडायला हवी. सगळ्या मालिका बघायलाच हव्यात का याचा सारासार विचार करायला हवा. त्यामुळे वेळ वाचेल. चुकीची मानसिकता, भावनिक गोंधळ, विचारांचा ओव्हर लोड कमी करता येईल.

उत्तम समीक्षक व्हा – मालिकांतील पात्रांचा अभ्यास करता येतो. मालिका समीक्षकाच्या भुमिकेतून बघता आली पाहिजे. तार्किक विचार जागृत ठेवले पाहिजेत. भावनांच्या आहारी जाणं थांबवता आलं पाहीजे.

नो टी. व्ही डे – आठवड्यातून किमान एक दिवस टी व्ही न बघण्याचा निर्णय घ्यावा. त्या दिवशी इतर छंदाना वेळ द्यावा. नैसर्गिक डोपामाईन वाढीवर लक्ष द्यायला हवं.

चांगली वाईट मालिका – मालिका बघताना त्यातून चांगलं काय घेता येईल याचा विचार करावा. त्यातील पात्रांवर चर्चा करावी. पात्र वाईट असेल तर ते का वाईट आहे. अशा विचारांची मुलांबरोबर देवाणघेवाण व्हावी.

काय टाळायचं – रडक्या मालिका बघणं बंद करावं. एकटं बसून मालिका बघू नये. झोपण्यापूर्वी थ्रिलर मालिका बघू नये.

च्युईंगम जसं चव संपली तरी चघळली जाते अगदी तसंच मालिका ‘मानसिक च्युईंगम’ सारख्या चिवट होईपर्यंत चघळल्या जातात. शेवटपर्यंत चिकटून राहतात. रबरासारख्या ताणतात. तशी प्रेक्षकांची नाती पण ताणली जातात. नात्यातील कडवटपणा चिघळला जातो. त्यामुळं मानसिक वेळ खर्ची पडतो. वेळ कधीच उलट चक्र फिरवत नाही. वेळ, विचार याना मालिकांच्या ताब्यातून या स्वत:च्या हातात घ्यायला हवं. तरच मन खर्‍या दिव्यातील प्रकाशात तेजोमय, भक्तीमय होईल हेच खरं..!!!

२०२४ – २५ मधील विविध मीडिया रिपोर्ट्स नुसार…

॰ भारतात सुमारे ९० कोटी लोक टी व्ही पाहतात.

॰ भारतात जवळपास २३ कोटी कुटुंबाकडे टी. व्ही आहे.

॰ भारतात ‘स्मार्ट टी व्ही आणि इंटरनेट’ असं जोडून पाहणार्‍यांच्या संख्येत ८५% वाढ झाली आहे.

॰ भारतातील ग्रामीण भागात सध्या प्रेक्षकांची संख्या ४८ दशलक्ष कुटुंबाच्या पार गेली आहे.

॰ भारतातील ६०% पेक्षा जास्त मालिका या नकारात्मक भावनांवर आधारीत असतात.

॰ भारतात पुरुषांच्या तुलनेत मालिका बघण्याचं महिलांचं प्रमाण साधारणपणे ७० ते ७५ % जास्त आहे.

॰ महाराष्ट्रात मराठी मालिका पाहणार्‍यांचे प्रमाण ९०% आहे.

॰ एक सामान्य भारतीय कुटुंब दिवसाला सुमारे ३. ५ तास टी व्ही पाहतं.

॰ विशेषत: जवळजवळ ७५ % महिला प्रेक्षक दुपारी १ ते ५ या वेळेत टी. व्ही पाहतात.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उरते फक्त आमसुलाची चटणी… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

??

☆ उरते फक्त आमसुलाची चटणी…  ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

दुपारचा चहा करताना खट् खट् खट् आवाज आला म्हणून खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोरच्या कंपाउंडमधील भरगच्च हिरव्या पिसाऱ्याच्या फणसाच्या फांद्या तोडण्याचं काम चाललं होतं. झाडावरची पाखरं आजूबाजूला आसरा घेऊन भयचकित नजरेने पाहत होती. थोड्या वेळाने झाडाची भलीमोठी, फणस लगडलेली, जाडजूड फांदी कडाकडा आवाज करत कोसळली. जमीन शहारली. पाखरं भीतीनं दूर उडून गेली. साठ- सत्तर वर्षांचं भारदस्त भक्कम झाड रीतं मुकं झालं. कावळेबुवांनी चार दिवस उरलेल्या झाडावर बसून कर्कश्श निषेध व्यक्त केला. धिटुकल्या चिमण्यांनी पुन्हा काडी- काडी जमवून राहिलेल्या बुंध्यावर घरटी बांधायला घेतली.

सत्तर वर्षांची जुनी घनदाट हिरवी सोबत आठवून काही जण हळहळले. तर खिडकीसमोरची जागा मोकळी झाली म्हणून काही जण सुखावले. काही जण ट्रकभर ओंडके घाईघाईने घेऊन गेले आणि मी माझ्या कामाला लागले.

अनेक दिवस पुढे- पुढे ढकललेलं कपाट आवरायचं काम काढलं होतं. किती ॓पसारा ॔ साठवलाय मी त्यात! आवडलेल्या कवितांच्या जुन्या वह्या, ज्ञानेश्वरीच्या निरूपणाची वर्तमानपत्रातील कात्रणं, मैत्रिणींची पत्र, काही अर्धवट लिहिलेले लेख, काही छापून आलेले लेख, वाचकांची खुशीपत्र… सगळं हाताळताना जाणवलं ॓संध्याकाळ ॔ झालीय. हा मनाचा हिरवा पिसारा आता त्या समोरच्या झाडासारखा छाटून टाकायला हवा. आठवणींच्या फांद्यांवरचे फणसभरले भार कमी करायला हवेत. या साऱ्या पसाऱ्यातून मोकळं व्हायला हवं… सारं कळतंय, पण…

फोन वाजला म्हणून उठले. मैत्रिणीचा फोन होता. मगाशी कपाट आवरायला काढायच्या आधी तिलाच फोन केला होता सहज गप्पा मारायला म्हणून. पण तो उचलला गेला नव्हता. ती म्हणाली,  ॓अगं गाढ झोप लागली होती सुस्तावून. आज आमच्या पुतणसुनेच्या वडिलांचा तेरावा दिवस होता. हल्ली क्रिया कर्म सगळं बाहेरच उरकून घेतात आणि जेवायला हॉलवर बोलावतात. घरात कुणी पसारा घालत नाहीत .॔

 ॓आजारी होते का ते ?॔

 ॓ फार नाही. पण वृद्ध होतेच. सगळा संसार झाला होता आणि लोळत पडण्यापेक्षा… त्यांच्याबद्दलच्या आठवणींची थोडीफार उजळणी झाली आणि सगळेजण जेवायला बसले. इथले तांबे केटरर्स प्रसिद्ध आहेत. अळूच्या भाजीपासून आमसुलाच्या चटणीपर्यंत सगळे पदार्थ अगदी उत्तम झाले होते. सगळेजण मुकाट्याने पण मनापासून जेवले.

 हल्लीच्या धावपळीच्या गतिमान जगात गेलेल्या माणसाच्या थोड्याफार आठवणी तेवढ्या उरतात. कुणाला घराचं म्हातारपण संपल्याचा आनंद वाटतो. झाड तुटल्याची हळहळ असली तरी मोकळं झाल्याची भावना असतेच!॔ मी म्हटलं.

दोन दिवसांनी संध्याकाळी फिरताना वाटेत एक बाई भेटल्या. त्यांचे शेजारी आमच्या चांगल्या परिचयाचे. ते आजोबा नुकतेच गेल्याचं कळलं होतं. त्यांचा एक मुलगा- सून अमेरिकेत असतात. सहज म्हणून त्या बाईंना विचारलं की, ते गेले तेव्हा मुलगा- सून आली होती का?

  ॓छे हो, इतक्या लांबून, एवढा खर्च करून कसं येणार? रजेची व्यवस्थाही व्हावी लागते ना. इकडच्या नातवंडांनी त्यांना तिकडे सगळं काही व्हिडिओवर दाखवलं. त्यांनी तिथून नमस्कार केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा. शिवाय इथेही लोकांना ताटकळत बसावं लागलं नाही.

  ॓आता आलीत का ती दोघं? बऱ्याच वर्षात या दोघांची भेट झाली नाहीये म्हणून विचारलं .॔

  ॓आली आहेत. कालच आम्ही तेराव्याला जाऊन आलो. सगळं कॉन्ट्रॅक्टच दिलं होतं. कॉन्ट्रॅक्टरनेच फोल्डिंग टेबलं मांडून, त्यांच्या मोठ्या हॉलमध्ये पानं वाढली.

  ॓चांगलंच की. आता आपल्यालासुद्धा वाकून वाढायला होत नाही.॔

  ॓ पण जेवण मात्र छान होतं.

आमसुलाची चटणी इतकी टेस्टी झाली होती आणि अळूची भाजी… .॔

माझा आपोआप वासलेला आऽऽ बंद करून त्यांना अडवून मी म्हटलं,  ॓एकदा सवडीने भेटायला जाईन त्यांच्याकडे. मुलगा- सून आहेत ना अजून?  ॔

  ॓ हो तर. अहो, आता आईचा प्रश्न सोडवावा लागेल. वाटण्या होतील. थोडी रजा घेऊनच आलीत ती दोघं .॔

मनात म्हटलं ॓बरोबर. तिकडे अमेरिकेत समृद्धीचा भरगच्च हिरवा फणस दारात डोलत असला, तरी इथल्या फणसाचे गरे हक्काचेच.. .॔ 

चालता- चालता एका मैत्रिणीच्या बहिणीची आठवण झाली. तिच्या बहिणीने आयुष्याच्या उत्तरार्धात घरच्या दोन साड्यांव्यतिरिक्त बाहेर जाण्यासाठी फक्त एकच साडी ठेवली होती. नाटकाला जायचं असो की कुठे समारंभाला, तीच एक साडी आणि एक पर्स. बस्.. बाकी सारं तिनं स्वहस्ते वाटून टाकलं होतं.

  ॓नाही बाई… इतकं निरिच्छ व्हायला जमणार नाही.॔ माझ्या मनानं प्रांजळ कबुली दिली. लगेच दुसऱ्या मनानं फटकारलं

॓ इतकं नाही, पण तो गोतावळ्यासारखा इतक्या वर्षांचा पसारा जमवला आहेस, तो तरी मार्गी लावायला हवा. कळलीय ना किंमत? उरते काय तर फक्त आमसुलाची चटणी! ती सुद्धा चविष्ट झाली असली तरच थोड्याफार आंबट गोड आठवणी… .॔ 

दुपारचा चहा करताना सवयीनं खिडकीतून बाहेर पाहिलं तर, समोरच्या फणसाच्या एका उंच गेलेल्या शेलाट्या फांदीवर एक फणस वाऱ्याने डुलत होता. त्याच्या खालची भक्कम फांदी तोडल्यामुळे आता तिथे पोचून फणस काढणं अशक्य होतं,  ॓असू दे. डुलू दे त्याला. त्याची वेळ झाली की तो अलगद गळून पडेल. मग होईल फांदी मोकळी.॔ मनात म्हटलं.

॓आज आत्ता चहा झाल्यावर तीऽऽऽ कपाटाची आवराआवरी करायची ना?॔ दुसऱ्या मनानं आठवण करून दिली.

  ॓बरं आठवलं. उद्या ऑफिस- ग्रुपमधल्या एका मैत्रिणीच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला जायचं आहे. लवकरच निघायला हवंय. खूप दिवसांनी सगळ्याजणी भेटल्या की मजा येते. आत्ताच सगळी तयारी करून ठेवायला हवी .॔

आणि तेऽऽऽ आवराआवरीचं काम? दुसऱ्या मनानं थोपवलं.

असू दे. बघू नंतर. होईल ते कपाट मोकळं, त्याची वेळ झाली की. नाही तरी चटणीसाठी आमसूलं भिजत घालायला अजून किती वेळ आहे ते कुणाला माहितेय?

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४५ आणि ४६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४५ आणि ४६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

भक्तीसूत्र ४५.

तरङ्गायिता अपीमे सङ्गात्समुद्रायन्ती ॥ ४५ ॥

अर्थ : दु:संगानें जडणारे विकार सुरुवातीला जरी मंद लहरींप्रमाणे वाटले तरी त्या दु:संगामुळेच ते सागराप्रमाणे विशाल बनतात.

विवेचन : विकार हे नेहमी सौजन्याचा बुरखा घालून येत असतात असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपल्याकडे परिणामी जे चांगले असते, त्याला चांगले म्हटले जाते. गुढी पाडव्याला आपण कडुनिंबाची पाने खातो, ती खाताना आपल्याला कडू लागतात, पण अंतिमतः ते आपल्या फायद्याचे असते. विषय सुरुवातीला आपल्याला छान वाटतात, पण अंतिमतः मात्र ते मनुष्याचा घात करतात.

या विकारांची बाधा कळून येत नाही. कारण ते अगदी सूक्ष्म प्रमाणात असतात. पण जसा त्यांना विषयांचा संबंध होत जाईल तसे तसे ते समुद्राप्रमाणे वाढत जातात. अग्नीची ठिणगी लहान असते, पण पेंढ्यांची गंजी जाळायला पुरेशी ठरते.

ज्ञानेश्वर माउली सांगतात.

‘देखे खेळता अग्नि लागला । मग तो न सावरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥’

(द्न्यानेश्वरी ३-२०४)

पारध्यांनी पसरलेले जाळे हरिणास प्रथम बाधक वाटत नाही पण परिणामी त्यातच त्याचा सर्वनाश असतो. जोपावेतो हे विकार तरंगासारखे अल्प परिमाणात असतात तोपावेतो त्यांतील दोषदर्शन न झाल्यामुळे त्यांचा त्याग शक्य असूनही केला जात नाही. मग एकदा का ते समुद्रासारखे विशाल व्यापक झाले की आवरले जाणे शक्य नाही. सागराचा दृष्टांत देण्यात त्याची भयानकता, विशालता दाखविणे हा उद्देश असावा. सागर तरून जाणे जसे कठीण तसेच हे कामक्रोधादि विकार तरून जाणेही कठीण आहे.

आपण समाजात राहतो. समाजातील बऱ्यावाईट माणसांशी आपला संबंध येणे अगदीच स्वाभाविक आहे. पण त्या वाईट लोकांचा गुण आपल्या अंगी येणार नाही, यासाठी आपण दक्ष रहाण्याची नितांत गरज आहे. काही लोकं घराच्या वाशासारखे असतात, त्यांना टाळणे शक्य नसते. मग त्यांना सोबत घेऊनच जीवन जगावे लागते. यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते. क्रोध आणि काम या प्रमुख विकारांवर आपण ताबा मिळविला तर अर्धे मैदान जिंकले असे समजायला हरकत नाही.

जय जय रघुवीर समर्थ

—– 

नारद भक्तिसूत्र ४६

कस्तरति कस्तरति मायाम्? यः सङगान्स्त्यजति यो

महानुभावं सेवते, निर्ममो भवति ॥ ४६ ॥

अर्थ : माया तरुन कोण जातो? मायेच्या पार कोण जातो? जो आसक्तींचा त्याग करतो. जो ममत्व रहित होतो. (तोच मायेच्या पलिकडे जातो.

विवेचन : मागील सूत्रातून दुःसंग हा कसा बाधक आहे व कामादिकांच्या द्वारे सर्वनाशास कारण आहे हे सांगितले. पण या सर्व विकारांचा समूल नाश झाला पाहिजे. केवळ कामक्रोधादिकांचा नाश झाला पण त्यांचे मूळ जी माया ती राहिली तर तिच्यापासून पुन्हा सर्व संसार निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून माया-तरण झाले पाहिजे. ते कोण करू शकतो याचा विचार या सूत्रात केला आहे. प्रथम माया म्हणजे काय पाहिले पाहिजे. उपनिषदे, पुराणे, स्मृती, गीता व संत-वाङ्‍मयातून, तसेच शास्त्रकारांच्या दर्शन-ग्रंथातून मायेचा फार विचार केला आहे. मायेचीच अविद्या, प्रकृती, प्रधान, कल्पना, संसार, भ्रम इत्यादी नावे आढळतात.

समर्थ म्हणतात,

*”माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे । माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥”*

(दास. १४. १०. ०१)

शुद्ध चैतन्याला जीवदशेत आणून संसारात अडकवणारी ती माया असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे.

*”तैसे भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगे जीव । दशे आले ॥”*

(ज्ञा. ७-६६)

मायेच्या दोन महत्त्वाच्या शक्ती आहेत. आवरण आणि विक्षेप. आवरणशक्तीने चैतन्याच्या विशेष स्वरूपास झाकून ती त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडते हेच अज्ञान.

*”आपुला आपणपया । विसरू जो धनंजया । तेचि रूप यया । अज्ञानासी ॥”*

(ज्ञा. १४-७१.)

ही माया आपल्या विक्षेपशक्तीने ब्रह्मांडस्वरूप सर्व सृष्टी उत्पन्न करते. तसेच जीवाला देहद्वयाचा अहंकार घ्यावयास लावून त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोर्क्तृत्वादी धर्माचा तादात्म्य अध्यास निर्माण करते; असे वेदांतग्रंथांतून म्हटले आहे. माया ही भगवंताची सद्‍सद्विलक्षण अशी अनिर्वचनीय शक्ती आहे.

जीवाला दुःख शोकात्मक संसार भोगण्याचे कारण केवळ मायाच आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

*”दुःख शोकाचिया घाई । मारिलिया सेचि नाही । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥”*

(ज्ञा. ७-१०७)

वरील सूत्रात ‘तरति’ हे क्रियापद घेतले आहे ते महत्त्वाचे आहे. तरणे ही क्रिया एखाद्या मोठ्या नदीतून पोहून पलीकडे जाणे, तिचे अतिक्रमण करणे या अर्थी होत असते. गीतेमध्येही सातव्या अध्यायात ‘मायामेतां तरन्ति ते’ असे म्हटले आहे. पोहणे ही क्रिया एखाद्या नदीतून, सामान्य जलाशय, तळे, विहीर, इत्यादिकांतून होत असते. ती अल्पकाळ श्रमपरिहाराकरिता होते. पण पोहणे व तरणे यांत अंतर आहे. जलाशय, तळे, विहीर इत्यादिकांत पोहणारा जेथे पोहण्यास प्रारंभ करतो तेथेच परत येतो. पण तरून जाणे म्हणजे एका तीराहून निघून मधला पाण्याचा भाग ओलांडून परतीराला जाणे. याकरिता महानदी किंवा समुद्रच घ्यावा लागतो. तरुन जाण्यासाठी तर वापरली जाते. आपण सगळे या भवनदीत, अर्थात भवसागरात आहोत असे सर्व संत सांगतात. या मायेला जिंकल्याशिवाय हा भवसागर तरुन जाणे शक्य नाही. भगवंत म्हणतात,

*”माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा| कासेस लागले माझ्या ते चि जाती तरुनिया|| “*

(गीताई ०७. १४)

अंतरंग व बहिरंग असे संगाचे दोन प्रकार आहेत. बहिरंग स्त्री, पुत्र, वित्त, गृहक्षेत्रादी व अंतरंग काम-क्रोध, लोभ, अहंकारादि हे दोन्हीही जीवाला परमात्म्याकडे जाऊ देत नाहीत. वास्तविक वर पुत्र, वित्त, कलत्रादी विषय बहिरंग म्हटले आहेत. जोपावेतो देह आहे तोपावेतो यांचाही संबंध राहील, मग त्याग कसा होणार? येथे संपूर्ण विषयांचा त्याग हा अर्थ अभिप्रेत नाही. कारण स्वरूपाने ते बाधक नाहीत. बाधक अंश संग म्हणजे आसक्ती, अभिनिवेश, अहंत्व, ममत्व, प्रियत्वबुद्धी होय. तीच साधकाला घातक असते, त्या आसक्तीचा त्याग म्हणजेच संगत्याग होय, पण या विषयांच्या ठिकाणी अनेक जन्माचा संबंध असल्यामुळे नित्यत्व बुद्धी, सुखरूपतेची बुद्धी, अनुकूल बुद्धी असते. केवळ मनच काय पण अंतःकरणचतुष्ट्य सर्व त्या विषयात रंगून जाते. असा हा संग दृढ झालेला आहे.

असे जरी आहे तरी जेव्हा अंतःकरणात विवेक निर्माण होतो तेव्हा अंतःकरण, बुद्धी, विषय यांचे अनित्यत्व पटते व एक वेळा अनित्यत्व, अनात्मत्व पटले म्हणजे तो साधक पुन्हा त्यात अडकला जात नाही. तो विवेक महात्म्यांच्या कृपेविना प्राप्त होऊ शकत नाही.

येथे ‘संगान्स्त्यजति’ असे बहुवचन आहे. संगाचे अंतरंग व बहिरंग असे दोन प्रकार वर सांगितले आहेत. बाह्यसंग काही अवांतर कारणाने म्हणजे दोषदृष्टीने सुटू शकतील पण फार बाधक असणारे अंतरसंग हे विना विवेक ज्ञानाच्या टाकले जाणार नाहीत. याकरिता ”यो महानुभावं सेवते” हे वाक्य सूत्रात आले आहे. येथे ‘महानुभाव’ हा शब्द महत्त्वाचा आहे. मागे अडतीस व एकूणचाळिसाव्या सूत्रात ‘महत्’ पद संतांच्याकरिता वापरले आहे. त्यांनाच येथे महानुभाव असे म्हटले आहे. महान म्हणजे मोठा आहे अनुभव ज्यांना, त्यांना महानुभाव म्हणावे. अनुभव हा एक जीवनाचा स्थायीभाव आहे. जीवनातून अनुभव वगळता येणार नाही. जीवन हे अनुभवस्वरूप असते. अनुभव हा एक ज्ञानाचा प्रकार आहे. मुख्य ज्ञानाचे दोन प्रकार वेदान्तशास्त्रात सांगितले आहेत. स्मृती आणि अनुभव. प्रमाणापासून झालेल्या ज्ञानास अनुभव म्हणतात व अनुभवापासून जे संस्कार होतात त्या संस्कारांपासून जे ज्ञान होते ते स्मृतिज्ञान होय.

अनुभवातही यथार्थ-अयथार्थ, प्रमा अप्रमा (भ्रम) असे प्रकार आहेत. योग्य प्रमाणाने योग्य विषयाचे जे यथार्थ ज्ञान होते त्यास प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान म्हटले जाते. जेव्हा प्रमाणात दोष शिरतो, विषय अयोग्य असतो म्हणजे बाधित असतो. त्याचे जे ज्ञान ते अप्रमा (भ्रम) म्हटले जाते. दोरीवर जर एखाद्याला सर्पज्ञान झाले तर तो भ्रम होय. कारण तो दोरीच्या अज्ञानाने इंद्रियदोषादिकांमुळे झालेला असतो व कालांतराने राहत नाही म्हणजे सर्पभ्रम बाधित होतो. म्हणून तो अनुभवही बाधित, अप्रमा, भ्रम म्हटला जातो. संसारात काही अनुभव प्रमाणभूत म्हणजे खरे असतात व काही अनुभव अप्रमा म्हणजे भ्रमरूप असतात, निष्फल नव्हे बाधक असतात. अनेक विषयांचा अनुभव मनुष्य घेत असतो पण तो टिकत नाही. सुखप्रद होत नाही. तसेच विषय कार्य असल्यामुळे अल्प आहेत. “यदल्पंतन्मर्त्य” जे अल्प ते मर्त्य म्हणजे विनाशी असते असा उपनिषदाचा सिद्धान्त आहे. सामान्यच काय पण इंद्रादिक देवांच्या स्वर्गीय अलौकिक अनुभवालाही तुच्छता आहे. तेही अनुभव घेणारे महान म्हटले जात नाहीत. महान अनुभव म्हणजे ज्या अनुभवाचा विषय मोठा, प्रमाण निर्दोष व अनुभव घेणारा अधिकारी योग्य तो महान एक परमात्माच आहे. याचा विचार मागे आला आहे. त्याचा प्रत्यक्ष तादात्म्याने अनुभव भक्तांना येत असतो.

जलात बुडणार्‍यांना जशी बळकट नौका तारून नेते त्याप्रमाणे या घोर संसारात गटंगळ्या खाणार्‍या जीवास शांत चित्त असलेले ब्रह्मवेत्ते संतच या संसारसागरांतून तरून जाण्याला मोठा आधार असतात.

जन्माला आलेला मनुष्य मरणार आहे, हे अंतिम सत्य आहे. येताना मनुष्य रिकाम्या हाताने येतो, आणि जाताना रिकाम्या हाताने जातो. इथुन जाताना जर तो सर्व गोष्टींची आसक्ती त्यागून जाऊ शकला, तर त्याला मुक्ति मिळण्याची शक्यता असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत असे सांगतात की प्रापंचिक मनुष्याला, साधकाला परमार्थ मार्गात पत्नी कधीही अडथळा ठरत नसते, तर तिच्याबद्दल असलेले *ममत्व* त्याला बाधक ठरत असते.

काळोखात मनुष्याला भीती वाटते. पण त्याचवेळी त्याला जर कुठे अग्नी दिसला, तर त्याची थंडी, भय आणि अंधार तिन्ही एकाच वेळी नष्ट होतात. त्यासाठी भगवंताचा आश्रय सर्वोत्तम ठरू शकतो.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४५ आणि ४६.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वो जफा करे..!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “वो जफा करे..!” ☆ श्री संभाजी बबन गायके

जम्मू-कश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे, हे जगाला माहित आणि मान्य आहे… पाकिस्तानचा अपवाद वगळता!

पाकिस्तान स्थानिक भारतीय काश्मिरी जनतेला धर्माच्या नावावर भडकावून त्यांना तथाकथित स्वातंत्र्याची मागणी करायला लावत आलेले आहे.

काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने आधीच बळकावून ठेवला आहे. उर्वरित काश्मीर स्वतंत्र झाला की तो ही पाकिस्तानला जोडून घ्यायचा पाकिस्तानचा डाव जगाला ठाऊक आहे. त्यासाठी पाकिस्तान त्यांच्या प्रशिक्षित अतिरेक्यांना काश्मिरातील घुसवून बंडखोरांना ‘साहाय्य’ करतो. पाकिस्तानी आणि स्थानिक अतिरेकी प्रामुख्याने भारतीय लष्कराला लक्ष्य करतात. अर्थात निष्पाप नागरिकही त्यांच्या कचाट्यातून सुटत नाहीत.

मानवी हक्क आणि इतर नियमांमुळे भारतीय लष्कराला कारवाईमध्ये मर्यादा पडतात. स्थानिक नागरिक लष्कराच्या वाहनांवर, सैनिकांवर दगडफेक करीत असत (हल्ली हे प्रमाण खूप कमी झाले आहे!)… तरीही लष्कराला संयमित कारवाई करीत शांत राहावे लागते. काश्मीरातील जनतेचे मन वळवण्याचा प्रयत्न तरीही भारतीय लष्कर अतिशय नेटाने करीत आलेले आहे. वैद्यकीय, शैक्षणिक, आपत्कालीन सेवांच्या माध्यमातून या प्रयत्नांना उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. पण यासाठी लष्कर मोठी किंमत देत असते. एकवेळ समोरासमोरचे युद्ध तुलनेने सोपे वाटावे, अशी इथली परिस्थिती आहे! असो.

काल काश्मीरातील एक तरुणी प्रसूती संदर्भातील गुंतागुंतीमुळे अत्यवस्थ झाली. बर्फवृष्टी झाली होती… रस्ते बंद होते. तिला रुग्णालयात नेण्यासाठी पाठवली गेलेली रुग्णवाहिका बर्फात रुतून बसली! इकडे रुग्ण महिलेची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली होती. तेथे तैनात असलेल्या सैन्याला ही खबर मिळताच त्यांनी युद्धपातळीवर rescue mission हाती घेतले.

गुडघ्याएवढा बर्फ, बर्फाचे वादळ, अंधार आणि चढ उताराचा रस्ता… आणि अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता अशा भयावह स्थितीमध्ये जवानांनी त्या महिलेला लाकडी खाटेवर निजवून सुमारे साडे अकरा किलोमीटर्स पायी प्रवास केला… महिलेला रुग्णालयात दाखल केले… आणि तिची सुखरूप सुटका झाली… तिला मुलगा झाला!

भारतीय लष्कराचे कौतुक होत असतानाच दुसऱ्या बाजूला काहींना असे वाटते की… आपले जवान तेथील जनतेला साहाय्य करीत असतात… पण जनता लष्कराला अपेक्षित सहकार्य करीत नाही!

 पण परिस्थिती पूर्णपणे अशी नाही. है इसी में प्यार की आबरू… वो जफा (बेइमानी) करे… मैं वफा करूं! या चालीवर आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही…! काळ दखल घेत असतो! हजारो सैनिकांनी प्राणार्पण करीत भारतीय लष्कराची लोकसेवेची परंपरा जतन करून ठेवली आहे… त्यांच्या त्यागाला, बलिदानाला आणि अविरत सेवेला विनम्र अभिवादन! जय हिंद… जय हिंद की सेना!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गाथा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “गाथा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एके दिवशी तुकोबा

असे तीरावरी आले..

अन् इंद्रायणीलागी थोडे

हसून म्हणाले…

*

तुला द्यायचीच होती

माझी गाथा परतून..

मग पहिल्याच दिशी,

दिली का न तू आणून?

*

उगा मला तिष्ठविले असे

तुझिया काठाला

दिस चवदा असा तू माझा

अंत का पाहिला..?

*

बोले इंद्रायणी मग..

तुम्ही भक्तांचे भूषण

अशा जगाच्या गुरुचा

 अंत मी कसा पाहीन..?

*

ऐका तुकोबा.. कधीच

कोणा कळली न मात..

काय घडले सांगते

खोल माझिया डोहात..

*

अशी गाथा त्या दिवशी

आली डोहाच्या तळाशी..

जणू कुबेराचे धन

आले माझिया हाताशी..

*

असा अमृताचा घट

येता सहजी चालून..

कोणी देईल का

थोडी चव घेतल्यावाचून?

*

तशी गाथा अवचित

माझ्या हाताला लागली..

सारे विसरून जग

मीही वाचाया घेतली..

*

पुरे चवदा दिवस

 केले तिचे पारायण

आणि मगच तुकोबा..

दिली तुम्हा परतून..!

*

तुम्ही आभाळाएव्हढे..

अंत मी काय पाहीन..

गाथा तारी जगताला

तिला मी काय तारीन?

*

सारे जग शुद्ध होते..

बुडी माझ्यात घेऊन..

गाथा वाचून तुमची

गेले मीच उद्धरून

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # २७८ ☆ फागुनी आहट : रंगों से पहले का उजास… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना फागुनी आहट : रंगों से पहले का उजास। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख # २७८ ☆ फागुनी आहट : रंगों से पहले का उजास…

फाल्गुन का शुक्ल पक्ष जैसे ही आरंभ होता है, प्रकृति के स्वभाव में एक सूक्ष्म परिवर्तन दिखाई देने लगता है। यह परिवर्तन अचानक नहीं होता—यह धीमा, संयत और मधुर होता है। जैसे कोई कलाकार रंग भरने से पहले कैनवास पर हल्की रेखाएँ उकेर रहा हो।

हवा में एक नई पारदर्शिता है। धूप में कोमलता घुल गई है। वृक्षों की शाखाओं पर नवांकुरों की हरियाली केवल मौसम का संकेत नहीं, बल्कि जीवन की पुनरावृत्ति का संदेश है। सरसों के खेतों का पीत आभास, आम्र-मंजरियों की गंध, और दूर कहीं कोयल की प्रथम तान—ये सब मिलकर एक ऐसी भूमिका रचते हैं, जिसे हम “फागुनी आहट” कह सकते हैं।

यह वह समय है जब रंग अभी खुले नहीं हैं, पर उनकी उपस्थिति महसूस की जा सकती है। जैसे मन के भीतर कोई सुप्त ऊर्जा जाग रही हो।

और इसी जागरण को शब्द मिलते हैं—

खुशियाँ अपार लायी,

हौले-हौले मुस्कायी।

झूम के गुलाल संग,

देखो हमजोली आयी।।

*

तोड़ सारे बंधनों को,

बोलती उदासी देखो।

कलियाँ सजी हैं सारी,

रंग बिखराती देखो।।

फागुन केवल ऋतु नहीं, एक मनःस्थिति है। यह हमें याद दिलाता है कि ठहराव स्थायी नहीं होता। जमी हुई ठंडक के बाद ऊष्मा अवश्य आती है। रिश्तों में आई दूरी पिघल सकती है। संवाद फिर से आरंभ हो सकते हैं।

आज का युवा वर्ग, जो गति और प्रतिस्पर्धा के बीच जी रहा है, उसके लिए भी फागुन एक संदेश है—रुककर अपने भीतर के रंगों को पहचानो। जीवन केवल लक्ष्य नहीं, उत्सव भी है।

और शायद इसी भाव को आगे बढ़ाते हुए—

भावनाओं के तो बाँध

टूट-टूट बहते हैं।

जाने-अनजाने सारे

भेद सदा कहते हैं।।

*

लाल, नीले, पीले, हरे—

करते कमाल रंग।

फाग और फगुआ का

साथी ये धमाल रंग।।

फागुनी आहट हमें सिखाती है कि परिवर्तन शोर से नहीं, संकेत से आता है। उत्सव अचानक नहीं उतरते, वे भीतर तैयार होते हैं।

अभी रंगों का उत्सव दूर है, पर यह प्रारंभिक स्पर्श ही सबसे कोमल और सच्चा होता है। यही वह क्षण है जहाँ प्रकृति और मन एक साथ मुस्कुराते हैं।

फागुन की यह धीमी दस्तक हमें आमंत्रित करती है—

अपने भीतर के धुंधले कोनों में भी थोड़ा उजास भरने के लिए।

**

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – आलेख ☆ जब दिल गुनगुनाने लगे: हिन्दी फ़िल्मी गीतों का अमर जादू ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

🌷जब दिल गुनगुनाने लगे: हिन्दी फ़िल्मी गीतों का अमर जादू 🌷

कुछ फ़िल्में होती हैं।

कुछ कहानियाँ होती हैं।

और फिर होते हैं गीत — वे मधुर, काँपते हुए स्वर, जो चुपके से हमारी ज़िन्दगी में उतरते हैं और फिर कभी साथ नहीं छोड़ते।

हिन्दी सिनेमा ने हमें बहुत-से उपहार दिए हैं, पर सबसे अनमोल, सबसे स्थायी, सबसे आत्मा को छू लेने वाला उपहार है उसके गीत।

परदे से दृश्य उतर जाते हैं, सिनेमाघर बदल जाते हैं, कलाकार समय के साथ ओझल हो जाते हैं — पर गीत? वे चलते रहते हैं।

वे हमारे साथ बस-यात्राओं में होते हैं, विवाह की रातों में, बरसाती खिड़कियों के पास बैठी उदास शामों में, और सुबह की चाय के साथ आती धीमी धूप में।

हिन्दी फ़िल्म का गीत केवल गीत नहीं होता।

वह कविता है, जिसे सुरों का आकाश मिला है।

वह स्मृति है, जिसे लय का स्पर्श मिला है।

वह जीवन है, जो संगीत बनकर बह रहा है।

और जब शब्द, स्वर, संगीत और छायांकन एक साथ मिलते हैं — तब कुछ अलौकिक घटता है।

कुछ ऐसा, जो समय से परे हो जाता है।

🌷जब कविता ने परदे पर कदम रखा

 हर महान गीत की शुरुआत शब्द से होती है।

वे शब्द, जो केवल तुकबन्दी नहीं थे, बल्कि धड़कनों की भाषा थे। हमारे गीतों को गढ़ा उन कवियों ने, जिन्होंने बाज़ार के लिए नहीं, मनुष्य के लिए लिखा। उनकी कलम में विरह भी था, विद्रोह भी; करुणा भी थी, करिश्मा भी।

उनकी एक पंक्ति दशकों तक स्मृति में गूँजती रहती है।

कभी प्रेम की तरह, कभी प्रार्थना की तरह, कभी प्रश्न की तरह।

“सजन रे झूठ मत बोलो…” — कितनी सरल पंक्तियाँ, पर जीवन का सारा दर्शन समेटे हुए।

“ये महलों, ये ताजों, ये तख़्तों की दुनिया…” — मानो सफलता की चकाचौंध के पीछे छिपे खालीपन पर सीधा प्रश्न।

कविता ने सिनेमा में आकर अपनी गरिमा नहीं खोई; उसने परदे को गरिमा दे दी।

🌷वे आवाज़ें, जो घर-सी लगती हैं

फिर आए वे स्वर — जिनमें मिठास भी थी, दर्द भी; चंचलता भी थी, तप भी।

कुछ आवाज़ें ऐसी होती हैं, जिन्हें सुनकर लगता है जैसे कोई अपना पास बैठा हो।

जब कोई गायिका ऊँचे सुर में जाती है, तो वह केवल गाती नहीं — प्रार्थना करती प्रतीत होती है।

जब कोई गायक धीमे से शब्दों को थामता है, तो लगता है जैसे दिल की परतें खुल रही हों।

“चौदहवीं का चाँद हो…” सुनते ही मन में चाँदनी उतर आती है।

“मेरे सपनों की रानी…” की सीटी आज भी किसी साधारण दोपहर को उत्सव बना देती है।

“जाने कहाँ गए वो दिन…” में बीता हुआ समय जैसे आँखों के सामने लौट आता है।

और जब “जाने वो कैसे लोग थे…” सुनाई देता है, तो लगता है जैसे अधूरी मोहब्बत का कोई पुराना पत्र फिर खुल गया हो।

ये आवाज़ें केवल गायक-गायिकाओं की नहीं थीं — वे हमारी अपनी भावनाओं की प्रतिध्वनि थीं।

🌷धुनों के वे जादूगर

इन स्वरों के पीछे थे वे संगीतकार, जिन्होंने रागों में आत्मा भरी, लोकधुनों को शास्त्रीय गरिमा से जोड़ा, और पश्चिमी वाद्यों को भारतीय संवेदना में पिरो दिया।

उनकी रचनाएँ दृश्य को सजाती नहीं थीं; वे दृश्य को अर्थ देती थीं।

“ओ दुनिया के रखवाले…” में भक्ति की पुकार है।

“रमैया वस्तावैया…” में मिलन की सरल प्रसन्नता है।

“मेरा सुंदर सपना बीत गया…” में टूटे हृदय की करुणा है।

और फिर वह शाही वैभव — “प्यार किया तो डरना क्या…”

शीशमहल की चमकती दीवारों के बीच प्रेम का निर्भीक उद्घोष।

शब्द, स्वर और छायांकन — सब मिलकर प्रेम को अमर कर देते हैं।

🌷गीत, जो जीवन बन गए

कुछ गीत अब फ़िल्मों के नहीं रहे; वे हमारे हो चुके हैं।

“मेरा जूता है जापानी…” — कितनी सहज शरारत, कितना मासूम गर्व!

आज भी जब वह बजता है, तो भीतर कहीं एक भोला-सा आत्मविश्वास जाग उठता है।

कौन-सा विवाह ऐसा होगा जहाँ “ऐ मेरी ज़ोहरा जबीं…” पर मुस्कान न खिल उठे?

उम्र को ठेंगा दिखाता प्रेम — यही तो जीवन का सबसे सुंदर उत्सव है।

“एक चतुर नार…” की शरारत आज भी उतनी ही ताज़ी है।

हँसी और संगीत का ऐसा संगम, जो मन को हल्का कर दे।

और फिर वह गीत, जिसे सुनते ही आँखें नम हो जाती हैं —

“ऐ मेरे वतन के लोगों…”

यह केवल गीत नहीं, सामूहिक स्मृति है।

यह शहादत की याद है, यह कृतज्ञता की आँसू भरी सलामी है।

🌷हमारी साझा स्मृति

ये गीत मनोरंजन नहीं हैं; ये हमारी साझा डायरी हैं।

रेडियो के उन दिनों से, जब बिजली चली जाती थी और कोई ट्रांजिस्टर अँधेरे में गुनगुनाता रहता था…

रेलवे स्टेशन की चाय की दुकानों से…

कैसेट, सीडी और अब मोबाइल की प्लेलिस्ट तक —

इन गीतों ने हमारे जीवन के हर मोड़ पर साथ निभाया है। 

  • पहला प्रेम।
  • पहली विफलता।
  • पहली तनख़्वाह।
  • पहली विदाई।

जब भी कहीं से कोई पुरानी धुन तैरती हुई आती है — किसी कार की खिड़की से, पड़ोसी के घर से, या अचानक किसी याद की तह से —

मन ठिठक जाता है।

एक हल्की-सी मुस्कान आ जाती है।

जैसे कोई पुराना मित्र अचानक सामने आ खड़ा हुआ हो।

🌷जब तक भावनाएँ हैं, गीत रहेंगे

समय बदलेगा।

तकनीक बदलेगी।

रुचियाँ बदलेंगी।

पर ये गीत रहेंगे।

क्योंकि ये समय से बँधे नहीं हैं — ये भावनाओं से जुड़े हैं।

और जब तक मनुष्य प्रेम करेगा, खोएगा, आशा करेगा, प्रतीक्षा करेगा —

तब तक हिन्दी फ़िल्मी गीत गूँजते रहेंगे।

धीमे-धीमे।

अनवरत।

हमारे भीतर।

© श्री जगत सिंह बिष्ट

साधक

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

Please feel free to call/WhatsApp us at +917389938255 or email lifeskills.happiness@gmail.com if you wish to attend our program or would like to arrange one at your end.

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – पहाड़ी नदी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – पहाड़ी नदी ? ?

सब कुछ जमा है

मेरे भीतर

पहाड़ी नदी की तरह

और तुम प्रवाह की

प्रतीक्षा में हो,

जबकि

पहाड़ी नदी

जमी हुई भी

होती है काँच-सी पारदर्शी

तल-अतल के बीच

कुछ छिपा नहीं पाती,

जाने दो

परदेसी हो न

नहीं समझोगे

पहाड़ की भाषा

और

जमे हुए

प्रवाह की परिभाषा!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 21 दिवसीय आशुतोष साधना रविवार दि. 8 फरवरी से शनिवार 28 फरवरी तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा। साथ ही शिव पंचाक्षर स्तोत्र का पाठ भी करेंगे 💥

॥ श्रीशिवपञ्चाक्षरस्तोत्रम् ॥

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय,
भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय,
तस्मै न काराय नमः शिवाय ॥१॥

मन्दाकिनी सलिलचन्दन चर्चिताय,
नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय ।
मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय,
तस्मै म काराय नमः शिवाय ॥२॥

शिवाय गौरीवदनाब्जवृन्द,
सूर्याय दक्षाध्वरनाशकाय ।
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय,
तस्मै शि काराय नमः शिवाय ॥३॥

वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य,
मुनीन्द्रदेवार्चितशेखराय।
चन्द्रार्क वैश्वानरलोचनाय,
तस्मै व काराय नमः शिवाय ॥४॥

यक्षस्वरूपाय जटाधराय,
पिनाकहस्ताय सनातनाय ।
दिव्याय देवाय दिगम्बराय,
तस्मै य काराय नमः शिवाय ॥५॥

पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥

💥 मालाजप शिव पंचाक्षर स्तोत्र के साथ आत्मपरिष्कार एवं मौन-साधना भी नियमित रूप से चलेंगे 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Articles ☆ From New York ~ The Sweetness of Krishna, the Restraint of Rama: Spiritual Indications ☆ Mr. Vivek Ranjan Shrivastava ☆

Mr. Vivek Ranjan Shrivastava

 

🌌 From New York ~ The Sweetness of Krishna, the Restraint of Rama: Spiritual Indications 🌌 Mr. Vivek Ranjan Shrivastava 🌌

If we do not judge Bhagavan Krishna’s multi‑marriage “lila” and Shri Rama’s vow of monogamy on the criteria of “history” or “social conduct”, but understand them as “philosophical–spiritual symbols”, then both the profound difference and the inner harmony between them become clear. 

The Difference of Incarnational Mode: Lila and Maryada 

In the Vaishnava tradition, Shri Krishna is called the complete Lila‑Purushottama, and Shri Rama is called the Maryada‑Purushottama. 

In the Rama‑avatar, God presents Himself as the ideal human being, so that ordinary house holders may learn rules of conduct from His life. Therefore we see strict adherence in His behaviour to monogamy, duty of a king, duty of a son, devotion to parents, and so on. 

In the Krishna‑avatar, that same Supreme Being appears as the pinnacle of an unbound, spontaneous, rasa‑filled consciousness. 

Here, the goal of the divine lila is only to unveil the mystery of the highest summit of “infinite love”. 

One form of the same God takes maryada (ethical restraint) as the ideal, the other takes madhurya(sweet, intimate love) as the ideal , philosophically, together they compose the completeness of dharma and love. 

Krishna’s Many Wives: Symbol and Meaning 

In the Puranas, Rukmini is described as the chief queen of Krishna in Dwarka. 

She is the daughter of Bhishmaka, king of Vidarbha, and the “lawful wife” of Krishna. 

Rukmini and the other queens indicate the fullness of household dharma, social responsibilities, and worldly order. 

The polity of Dwarka, the family structure, the honour of the lineage ,  all these are organized through them. 

Here, the many queens do not point towards sensuous indulgence, but to the truth that the Supreme Being is the shelter of countless individual souls. 

Each jiva establishes a “relationship” with Him in its own way , someone like a queen, someone like a friend, someone like a disciple. 

In this sense, Krishna’s multi‑marriage is not the tendency of an ordinary man, but a symbol of His infinite relationships with infinite beings, souls. 

Radha–Gopis and the Summit of Devotion 

Radha’s name may not appear prominently and explicitly in the Bhagavata and similar texts, but she is central in later Vaishnava traditions, especially Gaudiya, Nimbarka, Radha‑Vallabha, and others, where she is regarded as the supreme embodiment of devoted love for Krishna. 

In many traditions, the relation between Radha and Krishna is explained in two ways: 

– Svakiya– like husband and wife, 

– Parakiya – beyond social bonds, a purely emotional, love‑based relationship. 

Gaudiya Vaishnavism considers parakiya‑bhava to be the highest, where only love and surrender remain above all social injunctions. 

When the gopis, though being householders, abandon everything and run to Krishna, it is not worldly adultery. 

It is the teaching that, when the question is of “supreme love” for the Divine, all worldly insistences become secondary. 

Hence, in the philosophy of bhakti, the love of Radha and the gopis , the “beloved”  is considered more important than that of Rukmini as “wife”. 

For it is spiritual love that springs not from rules, but from pure overflowing of the heart. 

Radha–Krishna and Rukmini–Krishna: Philosophical Reading of Relationship 

From a philosophical standpoint, Rukmini–Krishna and Radha–Krishna are not two separate relationships, but two dimensions of the same devin. 

The relationship of Rukmini–Krishna is the ideal of a “righteous household bond sanctioned by dharma”. 

This is necessary for instruction in the world, so that humans may understand that marriage is a bond of responsibility, protection, and compassion. 

The relationship of Radha–Krishna is the allegory of “supreme love”, where no distance or formality remains between the soul and the Supreme. 

Vaishnava acharyas have described Radha as Krishna’s own shakti, the manifest form of His love itself ,meaning that lover and beloved are not ultimately two, but one single reality of ultimate love. 

Therefore, it is said that Krishna is connected with Rukmini as “wife”, but He stands on the peak of love with Radha. 

Rukmini strengthens dharma, whereas Radha gives the highest form to bhakti and rasa. 

Shri Rama’s Vow of One Wife: The Philosophical Need of Maryada 

Scriptures present Ramachandra as the ideal of one‑wife‑vow, throughout His life He did not take any wife or physical relation with any woman other than Goddess Sita. 

This vow is not just personal morality, but a powerful social message for that age, when it was common for kings and upper classes to have several wives. 

Rama’s conduct establishes an ideal of household dharma and honour of womanhood. 

Many Vaishnava authors call the Ramayana the “Veda of Surrender (Sharanagati‑Veda)”. 

Its central teaching is that a person must first become an “excellent human being”. 

One who learns maryada from Rama becomes qualified later to understand the emotional lila of Krishna. 

That is, Rama‑charita is the grammar of dharma, and Krishna‑charita is the poetic beauty of love. 

Without grammar, poetry too cannot be understood, in the same way, only along with Rama’s restraint can one truly grasp the inner essence of Krishna’s lila. 

Vivek Ranjan Shrivastava

♥ ♥ ♥ ♥

© Mr. Vivek Ranjan Shrivastava 

Contact: 87, Monitor Street, Jersey City, Opposite Liberty Park, 07304 Mo. +917000375798

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # ८२ – व्यंग्य – पाइपलाइन में पड़ा स्वर्ग ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ ☆

डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

(‘उरतृप्त’ उपनाम से व्यंग्य जगत में प्रसिद्ध डॉ. सुरेश कुमार मिश्रा अपनी भावनाओं और विचारों को अत्यंत ईमानदारी और गहराई से अभिव्यक्त करते हैं। उनकी बहुमुखी प्रतिभा का प्रमाण उनके लेखन के विभिन्न क्षेत्रों में उनके योगदान से मिलता है। वे न केवल एक प्रसिद्ध व्यंग्यकार हैं, बल्कि एक कवि और बाल साहित्य लेखक भी हैं। उनके व्यंग्य लेखन ने उन्हें एक विशेष पहचान दिलाई है। उनका व्यंग्य ‘शिक्षक की मौत’ साहित्य आजतक चैनल पर अत्यधिक वायरल हुआ, जिसे लगभग दस लाख से अधिक बार पढ़ा और देखा गया, जो हिंदी व्यंग्य के इतिहास में एक अभूतपूर्व कीर्तिमान है। उनका व्यंग्य-संग्रह ‘एक तिनका इक्यावन आँखें’ भी काफी प्रसिद्ध है, जिसमें उनकी कालजयी रचना ‘किताबों की अंतिम यात्रा’ शामिल है। इसके अतिरिक्त ‘म्यान एक, तलवार अनेक’, ‘गपोड़ी अड्डा’, ‘सब रंग में मेरे रंग’ भी उनके प्रसिद्ध व्यंग्य संग्रह हैं। ‘इधर-उधर के बीच में’ तीसरी दुनिया को लेकर लिखा गया अपनी तरह का पहला और अनोखा व्यंग्य उपन्यास है। साहित्य के क्षेत्र में उनके योगदान को तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के हाथों) से सम्मानित किया गया है। राजस्थान बाल साहित्य अकादमी के द्वारा उनकी बाल साहित्य पुस्तक ‘नन्हों का सृजन आसमान’ के लिए उन्हें सम्मानित किया गया है। इनके अलावा, उन्हें व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों साहित्य सृजन सम्मान भी प्राप्त हो चुका है। डॉ. उरतृप्त ने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने और समन्वय करने में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई है। बिहार, छत्तीसगढ़, तेलंगाना की विश्वविद्यालयी पाठ्य पुस्तकों में उनके योगदान को रेखांकित किया गया है। कई पाठ्यक्रमों में उनकी व्यंग्य रचनाओं को स्थान दिया गया है। उनका यह सम्मान दर्शाता है कि युवा पाठक गुणवत्तापूर्ण और प्रभावी लेखन की पहचान कर सकते हैं।)

जीवन के कुछ अनमोल क्षण 

  1. तेलंगाना सरकार के पूर्व मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से  ‘श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान’ से सम्मानित। 
  2. मुंबई में संपन्न साहित्य सुमन सम्मान के दौरान ऑस्कर, ग्रैमी, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, दादा साहब फाल्के, पद्म भूषण जैसे अनेकों सम्मानों से विभूषित, साहित्य और सिनेमा की दुनिया के प्रकाशस्तंभ, परम पूज्यनीय गुलज़ार साहब (संपूरण सिंह कालरा) के करकमलों से सम्मानित।
  3. ज्ञानपीठ सम्मान से अलंकृत प्रसिद्ध साहित्यकार श्री विनोद कुमार शुक्ल जी  से भेंट करते हुए। 
  4. बॉलीवुड के मिस्टर परफेक्शनिस्ट, अभिनेता आमिर खान से मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ।
  5. विश्व कथा रंगमंच द्वारा सम्मानित होने के अवसर पर दमदार अभिनेता विक्की कौशल से भेंट करते हुए। 

आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य – पाइपलाइन में पड़ा स्वर्ग।)  

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # ८२ – व्यंग्य  – पाइपलाइन में पड़ा स्वर्ग ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ 

(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)

शहर के पास वाले उस ढाबे पर, जहाँ चाय कम और धूल ज़्यादा मिलती है, मेरी भेंट एक ‘डिजिटल स्वामी’ से हो गई। स्वामी जी ऐसे थे कि अगर उन्हें किसी मल्टीनेशनल कंपनी के बोर्डरूम में बैठा दिया जाए, तो वे वहाँ भी ‘परमपिता की कृपा’ का प्रेजेंटेशन पावर-प्वाइंट पर दे दें। बदन पर मलमल का कुर्ता, गले में रुद्राक्ष की ऐसी माला जिसे देखकर किसी भी जौहरी का ईमान डोल जाए, और बगल में एक आईपैड, जिस पर वे निरंतर ‘स्टॉक मार्केट’ और ‘अध्यात्म’ का संतुलन बिठा रहे थे।

मैंने पूछा, “स्वामी जी, यह झोला और लैपटॉप लेकर किस महाकुंभ की ओर प्रस्थान हो रहा है?”

स्वामी जी ने एक ऐसी रहस्यमयी मुस्कान फेंकी, जो केवल उन लोगों के पास होती है जिनके पास स्विस बैंक का खाता और मोक्ष का नक्शा, दोनों साथ होते हैं। बोले, “बच्चा, हम ‘स्मार्ट विलेज’ का शिलान्यास करने जा रहे हैं। गाँव की मिट्टी को सिलिकॉन वैली बनाना है।”

मैंने चाय का घूँट भरा—जिसमें चीनी इतनी थी कि मधुमेह को भी शर्म आ जाए। पूछा, “महाराज, गाँव में तो बिजली आठ घंटे रहती है और सड़कें ऐसी हैं कि आदमी चलते-चलते ही योग की कठिन मुद्राएं सीख जाए। वहाँ आप स्मार्टनेस का कौन सा इत्र छिड़केंगे?”

स्वामी जी ने आईपैड पर एक ग्राफ दिखाया। “यही तो तुम्हारी अज्ञानता है। हम गाँव वालों को यह नहीं सिखाएंगे कि खेती कैसे करें, हम उन्हें यह सिखाएंगे कि ‘खेती को इवेंट’ कैसे बनाएं। हम वहाँ एक ऐसा आश्रम बना रहे हैं जहाँ शहर के अमीर लोग आकर ‘गरीबी का अनुभव’ करेंगे। वे देखेंगे कि गोबर कैसे थापा जाता है और फिर उसकी सेल्फी लेकर इंस्टाग्राम पर ‘मिट्टी की सौंधी खुशबू’ लिखेंगे। इसे ही हम ‘ग्रामीण पुनरुद्धार’ कहते हैं।”

मैंने कहा, “पर महाराज, गाँव का असली किसान तो कर्ज में दबा है, उसे तो खाद और बीज चाहिए।”

स्वामी जी हँसे, जैसे किसी ने उनसे कह दिया हो कि कद्दू के पेड़ पर आम लगते हैं। बोले, “बच्चा, किसान को खाद मिल गई तो वह आत्मनिर्भर हो जाएगा, फिर हमारे प्रवचनों में भीड़ कौन लगाएगा? हमें उसे ‘संतोष’ सिखाना है। हम उसे समझाते हैं कि ‘साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाए’। जब उसके पास कम होगा, तभी तो वह चमत्कार की उम्मीद में हमारे पास आएगा। और रही बात खाद की, तो हमने योजना बनाई है कि गाँव के पास एक बड़ा गोल्फ कोर्स बनाएंगे। वहाँ की घास को ‘पवित्र घास’ घोषित कर देंगे, जिसे उगाने के लिए किसान मुफ्त में श्रम करेगा। इसे हम ‘श्रमदान’ का नाम देंगे।”

मैंने कहा, “वाह! यानी ‘आम के आम और गुठलियों के दाम’। पर स्वामी जी, आप तो खुद गाँव में रुकेंगे नहीं, आपकी काया तो एसी की आदी लगती है?”

स्वामी जी ने एक डकार ली, जो सीधे देसी घी के पराठों की गवाही दे रही थी। “बच्चा, शरीर तो नश्वर है, पर इसे ठंडा रखना आत्मा का कर्तव्य है। हम शहर में रहकर गाँव का ‘विजन’ तैयार करते हैं। देखो, विकास का सबसे बड़ा नियम यह है कि वह कभी ज़मीन पर नहीं दिखना चाहिए। अगर विकास दिख गया, तो वह खत्म हो गया। उसे हमेशा ‘पाइपलाइन’ में रहना चाहिए। जैसे हमारे यहाँ की सरकारी फाइलें—चलती रहती हैं, पहुँचती कभी नहीं।”

मैंने पूछा, “और इन सबमें धर्म का क्या योगदान होगा?”

स्वामी जी की आँखें चमक उठीं। “धर्म ही तो वह गोंद है, बच्चा, जो टूटे हुए विकास को चिपका कर रखता है। जब सड़क पर गड्ढा हो, तो वहाँ एक पत्थर रखकर उसे ‘स्वयंभू महादेव’ घोषित कर दो। फिर जनता सड़क की शिकायत नहीं करेगी, बल्कि वहाँ मत्था टेकेगी। जब पानी न आए, तो ‘वरुण देव’ की उपेक्षा पर प्रवचन दो। राजनीति और धर्म का यही तो गठबंधन है—एक हाथ से स्वर्ग दिखाओ, दूसरे हाथ से जेब साफ करो।”

मैंने अंतिम सवाल किया, “स्वामी जी, क्या इस ‘स्मार्ट विलेज’ में आम आदमी के लिए भी कुछ है?”

स्वामी जी ने अपना बैग उठाया और खड़े होते हुए बोले, “आम आदमी के लिए ‘उम्मीद’ है, बच्चा! और उम्मीद ही वह चीज़ है जो आदमी को तब भी जीवित रखती है जब उसकी थाली खाली हो। हम उसे सपने बेचते हैं और वह हमें श्रद्धा देता है। सौदा खरा है।”

इतने में उनकी लग्जरी गाड़ी धूल उड़ाती हुई आ गई। स्वामी जी उसमें ऐसे ओझल हुए जैसे चुनावी वादे चुनाव के बाद होते हैं। मैं वहीं बैठा रहा, और ढाबे वाले से कहा, “भाई, एक चाय और दे, ज़रा चीनी कम रखना, क्योंकि कड़वा सच सुनने के बाद मीठा अब झेला नहीं जाता।”

© डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

संपर्क : चरवाणीः +91 73 8657 8657, ई-मेल : drskm786@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  ≈

Please share your Post !

Shares