हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # १०७१ ⇒ मियाँ की तोड़ी ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “मियाँ की तोड़ी।)

?अभी अभी # १०७१ ⇒ आलेख – मियाँ की तोड़ी ? श्री प्रदीप शर्मा  ?

राजनीति जोड़-तोड़ है, गठ-जोड़ है, तोड़-फोड़ है। राजनीति कुर्सी है, जिस पर बैठकर आसमान सर पर उठा लिया जाता है। संगीत केवल जोड़ है, उसका कोई तोड़ नहीं। सङ्गीत ज़मीन से जुड़ा हैजिसके लिए सदा आसमान अदब से झुका है।

राजनीति में कोई किसी का गुरु नहीं होता ! सङ्गीत में गुरु गुड़ ही रहता है, चेला कभी शक्कर नहीं होता। क्योंकि उसका गुरु, कोई योगगुरु नहीं, उस्ताद होता है।

यह उस्ताद किसी बाबा की तरह तावीज़ और भभूत नहीं, शिष्य को गण्डा बाँधता है, सङ्गीत के ज़रिए उसे ईश्वर से जोड़ता है।।

राजनीति में केवल हिन्दू-मुसलमान होता है, संगीत और अध्यात्म के क्षेत्र में गुरु-शिष्य संबंध होता है। आप भले ही तमाम मुल्क की सराय से मुग़लों को खदेड़ फेंकें, ताजमहल को शिवाला बना दें और कुतुब-मीनार को नेस्तानबूद ही क्यों न कर दें, उस्ताद बिस्मिल्लाह खान से शहनाई अलग नहीं कर सकतेबाप-बेटे उस्ताद अल्ला रक्खा और ज़ाकिर हुसैन से तबले की थाप को जुदा नहीं कर सकते।

अकबर के गले से नवरत्नों की माला नोंच लीजिये, तानसेन की संगीत की दुनिया में आग नहीं लगा सकते, रसखान के पदों में से कृष्ण-भक्ति और बांसुरी की धुन अलहदा नहीं कर सकते।

आत्मा को तो आप अमर समझें और रूह को आप मार नहीं सकते, रानी रूपमती को महान और बाज-बहादुर के प्रेम को लव ज़िहाद का दर्ज़ा दे नहीं सकते। कहाँ कहाँ मज़हबी तोड़-फोड़ करेंगे, मियाँ की तोड़ी को तोड़, सुरों की तान छेड़ नहीं सकते। इस धरती की हरियाली से उसकी हरियाली छीन हरा झंडा और कश्मीर के केसर से उसके केसरिया रंग और खुशबू को मिला केसरिया ध्वज आप भले ही बना लें, उन्हें इस खुले आसमान में साथ-साथ लहराने से किसी को रोक नहीं सकते। चाँद हम सबका हैकभी दूज का, तो कभी चौदहवीं का। सूरज अगर खुशियों की सक्रांति है, तो गुरु पूनम हमारी गुरु पूर्णिमा है। हम सूरज चाँद को मज़हबों में बाँट नहीं सकते।।

जुगलबंदी ही जीवन-संगीत है !

जीवन में कहीं लता का स्वर है तो रफी का गीत। पंडित ओंकारनाथ अगर ठाकुर हैं तो बड़े गुलाम अली खां भी उस्ताद है। रविशंकर के सितार के साथ अल्ला रक्खा के तबले की जुगलबंदी होती है, तो मुँह से वाह ताज ही निकलेगा। मुमताज़ को क्यों बीच में लाते हो।

मियाँ की तोड़ी हो, या राग मेघ मल्हार ! जीवन की इन खुशियों में राग शिवरंजिनी हो, या यमन राग ! जहाँ मालकौंस हो, वहाँ मन तड़फत हरि दर्शन को आज।

कोई भी साज़ हो, कोई भी आवाज़ हो, एक ही रंग, एक ही रूप, बस हो एक ही रागदेस राग।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०४ – बोलणाऱ्या भिंती…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०४– विजय साहित्य ?

☆ बोलणाऱ्या भिंती…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

सुख, दुःख, राग, लोभ

चार भिंती बोलतात

भाव भावनांच्या ‌रंगी

सुखैनैव रंगतात. .!१

अस्तित्वाचे ओरखडे

जाती बोलूनीया बोल

शिकविती एकमेका

साधुनीया समतोल…!२

 *

भिंती बोलक्या घराच्या

देती घरा घरपण

नात्या नात्यांतील वाद

दडवीती क्षण क्षण…!३

 *

बोलणाऱ्या भिंतीतून

कळे जग आहे कसे

मनातल्या स्पंदनांचे

भिंतीवर खोल ठसे…!४

 *

भिंती बोलक्या शाळेच्या

संस्कारांची पाठशाळा

सुविचार, नकाशांची

रेखाटती चित्रमाला…!५

 *

सामाजिक संदेशाचे

काम करी बिनचूक

रंग उडालेल्या भिंती

जाती बोलूनीया खूप…!६

 *

लोक कला संस्कृतीचे

भिंती बोलक्या माहेर

पिढ्या जपती वारसा

माया ममता आहेर…!७

 *

संसाराचा गोतावळा

चार भिंतीतला खेळ

शब्दाविना सांधतात

नात्या नात्यांमध्ये मेळ…!८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वासुदेव… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ वासुदेव… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मोरपिसांचा शिरी मुकुट घे वासुदेव येई दारा

जीवनार्थ सांगे न्यारा ||ध्रु||

काळप्रवाहावरी तरंगे आयुष्याचा बुडबुडा

फेस किती जाहला तरीही क्षणभंगुर हा देई धडा ||||

 *

आयुष्याच्या बाजारातुन कृपा विकत घ्या देवाची

भावभक्ती हे मोल तयाचे ना दडवुनी ठेवायाची ||||

 *

देह लाभला आत्म्याला हा कर्म कराया उद्धारा

फलासी ना गांठी राखावे अर्पण करणे मार्ग बरा ||||

 *

आपुल्यासाठी नाही जगणे हाच जीवना अर्थ खरा

जीवन अर्पण सकलांसाठी जगण्याचा परमार्थ धरा ||||

 *

घाम गाळुनी कमविलेस ते इथेच भोगुनिया जावे

पुढे आपुला मार्ग एकला मोह सोडुनिया जावे ||||

 *

आयुष्याचा खडतर मार्ग आपुल्यासाठी जगतांना

काय हरवले काय गवसले हिशेब याचा मांडा ना ||||

 *

कुठून आलो कुठे जायचे नाही कुणाला हे ज्ञात

प्रवास जीवनी असा करू या करून षड्रिपुंचा अंत ||||

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ Gen Z… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “Gen Z…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आणि हे बघ पिंटू वर्गात दंगा मस्ती बिल्कुल करायची नाही… जे टिचर शिकवतात त्याकडे नीट लक्ष देऊन ऐकायचं.. आणि घरी आल्यावर शाळेत काय काय शिकवलं ते सगळं मला सांगायचं म्हणजे मला तशी तुझ्याकडून तयारी करून घेता येईल.. शिवाय टिचरांनी दिलेला होमवर्क लगेचच करून ठेवायचा… यामुळे आपला अभ्यास चांगला लक्षात राहतो. परीक्षेतही चांगले मार्क मिळतात… चांगले मार्क मिळाले कि टाॅप टेन मधले रॅकिंग येते… तुला पुढे मोठा झाल्यावर डॉक्टर व्हायचं ना? तेव्हा शहाण्या मुलासारखे वागायचं, छान अभ्यास करायचा बरं का? … टिचरांना नीट उत्तर द्यायची… त्यांचा आदर ठेवायचा… शाळेत तुला गुणवान विद्यार्थी म्हणून मेडल मिळायला हवं कि नको… आणि ते मिळालं कि आपले पप्पा तुला छान बायसिकल घेऊन देणार आहेत म्हणालेत परवा मला… आणि हे बघं शाळेत आपली वह्या पुस्तके हरवायची नाहीत… खराब तर मुळीच करायची नाहीत… त्या स्कूल बस मधून जाता येता कुणाशीही दंगामस्ती करायची नाही.. आपल्याला कुणी त्रास देत असेल तर त्या बस अटेंडनां लगेच सांगायचं.. म्हणजे त्या त्रास देणाऱ्याला चांगले रागवतील… कुठे पळापळी, धडपडून हातापायाला लावून घेऊ नकोस… जर असं काही झालं तर तुझी विनाकारण शाळा चुकेल नि त्या दिवसातला अभ्यासही बुडेल… पुन्हा तो भरून काढण्यासाठी तू एकदा का मागे राहिलास ना तर कायमच मागेच राहिलास म्हणून समज… मग टाॅप टेन च्या रेसमधून तुझा नंबर बाहेर गेला कि… तुझ्या करियरला धक्का बसेल… बघ बाबा पिंटू मी इतका वेळ तुला जे समजुतीने काॅन्सुलिंग केलयं ते सिरियली लक्षात येतंय ना तुझ्या… मग मी सांगितले तसं फाॅलो कर… जा आता बस यायची वेळ झालीय… वेळेत खाली नाही गेलास तर बस आणि चुकायची आणि पुन्हा मला रिक्षाचा भुर्दंड बसून तुला शाळेत सोडण्यासाठी माझा टाईम वेस्ट होईल… जा जा… “

“हो मम्मा तू सांगिलेलच मी नेहमी फाॅलो करतो… कालपासूनच तर शाळा सुरू झाली.. आणि पहिला दिवस उलटून चोवीस तास देखील झाले नाहीत… मम्मा एक विचारू तुला… इतका वेळ जे मला लेक्चर झोडत होतीस ते ऐकून असं वाटतंय तुच शाळेत माझ्या ऐवजी जावंस आणि मी घरी बसून फक्त आराम करावा… अरे चाललयं काय तुम्हा मोठ्या माणसांचं इकडे तू लेक्चर देतेस तिकडे शाळेत मॅडम डिसिप्लीनच्या नावाखाली आमची तासंनपट्टी करतात… आम्ही लहान आहोत हा काय आमचा गुन्हा तर झाला नाही ना… ते शाळेच्या वह्या पुस्तकांच्या भरमसाठ वजनाचे दफ्तर पाठीवरून नेण्यात जितका शारिरीक त्रास होत नाही ;त्यापेक्षा कितीतरी पट या तुमच्या Do’s & Don’t च्या सूचनांच्या भडीमाराने नि तुम्ही माझ्याकडून ठेवलेल्या अपेक्षेच्या ओझ्यानेच मी माझं बालपण गमावून बसलोय गं… आणि इतक्या सगळ्या सुचनाचं पालन करूनही तुमचं समाधान होईल का नाही याची शाश्वती नाही… जरा कुठे एका मार्काने जर माझी मेडिकलची ॲडमिशन चुकली तर.. तर इतकं वर्षे प्रामाणिकपणे कष्ट घेऊन केलेल्या अभ्यासाकडे क्षणात दुर्लक्ष करून माझ्या अंगी नसलेल्या अवगुणांचा मात्र जाहीर उद्धार कराल… जणू काही त्या एका मार्काने माझ्ं करियर हुकलं नसून माझं सगळचं आयुष्य विस्कटून गेलं… माझं नव्हे तुमचा अपेक्षाचा तारू उधळला गेल्यानं समाजातील पत कमी झाली नि पुढच्या जीवनातली एनकॅशमेंटही बुडाली… हा न पचवता येणारा धक्का तुमचं जगणं नको नको करेल… काय कमी केलं आम्ही तुझ्यासाठी… वगैरे वगैरे अपेक्षाभंगाचे ताशेरे माझ्यावर उर्वरित आयुष्यात मारत बसणार… तेव्हा मला असं वाटतं मी या शाळा काॅलेजच्या शिक्षणाच्या फंदात पडू नये… तसाही बाहेर बाजारात शिक्षणाचा बोजवारा का कमी उडतोय… आहे का तिथं विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काही काळजी… भरपूर प्रमाणात पैसा ओतला कि हि सगळी काळजी आपोआप दूर होते नि घरबसल्या काही न करता घरच्या भिंतीवर पदवी द्विपदवीधारक प्रमाणपत्र झळकत राहतं… शिवाय दारावर डॉ. अबक नावाची पाटी अख्ख्या जगाला सांगत सुटते… आमचा मुलगा मेडिकल मध्ये गोल्ड मेडिलिस्ट आहे म्हणून… पण खऱ्या अर्थाने ते मात्र नकली सोनं असतं… तेव्हा मम्मा मला काही घरातल्या नि शाळेतल्या सुचनांच पालन करणं जमणार नाही… आणि माझं बालपणही तुम्हा कोणालाच हिरावून घेऊ देणार नाही… मी जो आहे तसाच वागणार आणि वयाच्या वाढीनुसार माझ्यातला बदल घडत जाणार… हे मात्र नक्की… आणि जर का त्याहुन तुम्ही मला विरोध केलात तर मला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल… घटनेने दिलेले अधिकार व हक्कांची जाणीव मला देखील आहे.. आणि त्याची पायमल्ली जर कुणी करत असेल तर हमसे कोई बुरा नही होगा… सो समझने वाले को इशारा काफ़ी है… आजच्यासाठी इतकच़ पूरे.. जातो खाली स्कूलबसवाला हाॅर्न देतोय मी निघतो आता… “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘मुक्तछंद : मुक्ततेलाही छंद असतो’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘मुक्तछंद : मुक्ततेलाही छंद असतो’ ☆ श्री दिवाकर बुरसे

(कविता, गद्य आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुनर्विचार)
कविता : शब्दांच्या पलीकडचा स्पंदनानुभव. 

कविता ही केवळ शब्दांची रचना नसते; ती शब्दांना लाभलेले स्पंदन असते. विचार गद्यही व्यक्त करू शकते, माहिती निबंधही देऊ शकतो; पण एखाद्या अनुभूतीला जेव्हा भाषेची लय, प्रतिमेचे सौंदर्य आणि भावनेचा नाद लाभतो, तेव्हा कविता जन्म घेते. म्हणूनच कविता वाचली जात नाही; ती अनुभवली जाते. तिचा अर्थ केवळ शब्दांत नसतो, तर शब्दांतील विरामांत, ध्वनीत आणि न बोलल्या गेलेल्या सूचकतेतही दडलेला असतो.

मानवी संस्कृतीच्या आरंभीपासून लय ही माणसाच्या जगण्याचा भाग राहिली आहे. अंगाईगीत, ओव्या, अभंग, भारूड, लोकगीते, भजन, आरत्या—या सर्वांचा पाया लयीत आहे. त्यामुळे भारतीय काव्यपरंपरेत छंदाला केवळ तांत्रिक नियम मानले गेले नाही; तो कवितेचा प्राण मानला गेला. छंदामुळे कविता बांधली जाते, असे नाही; छंदामुळे ती वाहते.

मात्र काळ बदलतो, अनुभव बदलतात, भाषेची संवेदना बदलते. प्रत्येक युगाला स्वतःची अभिव्यक्ती शोधावी लागते. या शोधातूनच मुक्तछंदाचा जन्म झाला. तो परंपरेचा निषेध नव्हता; तर परंपरेचा विस्तार होता. अभिव्यक्तीला अधिक व्यापक अवकाश देताना कवितेच्या अंतःस्वरूपाचे जतन करण्याचा तो प्रयत्न होता.

आजचा प्रश्न मुक्तछंदाच्या अस्तित्वाचा नाही; तर त्याच्या आकलनाचा आहे. मुक्तछंद आणि छंदमुक्त या दोन संकल्पना अनेकदा एकाच अर्थाने वापरल्या जातात. परिणामी कविता, गद्य आणि मुक्त अभिव्यक्ती यांतील सूक्ष्म भेद धूसर होऊ लागतो. हीच या लेखामागची प्रेरणा आहे.

मुक्तछंद आणि छंदमुक्त : गोंधळ नेमका कुठे? 

“मुक्तछंद” या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. मुक्त आहे तो छंद; छंदापासून मुक्त झालेली कविता नव्हे.

छंदोबद्ध कवितेत वृत्त, मात्रा, यमक आणि लय यांचे ठरावीक नियम असतात. त्या चौकटीत राहून कवी आपली अनुभूती व्यक्त करतो. परंतु काही वेळा आशयाची व्यापकता किंवा भावनेची सूक्ष्मता अशी असते की, पारंपरिक चौकटीत ती पूर्णपणे व्यक्त करणे कठीण जाते. अशा वेळी कवी छंद मोडत नाही; तो त्याला आवश्यक तेवढीच लवचिकता देतो. त्या लवचिकतेतून मुक्तछंद आकाराला येतो.

म्हणून मुक्तछंद म्हणजे नियमभंग नव्हे; तो नियमांच्या आत्म्याशी प्रामाणिक राहून केलेला सर्जनशील विस्तार आहे. त्यात बाह्य छंदाची चौकट सैल झालेली असली, तरी अंतःलय जिवंत असते. शब्दांची निवड, विरामांची जागा, प्रतिमांचा क्रम, भावनेचा चढ-उतार आणि भाषेचा नाद यांमधून ही लय सतत जाणवत राहते.

याउलट छंदमुक्त या शब्दाचा अर्थ छंदाच्या सर्व बंधनांपासून मुक्त असा होतो. परंतु त्याचाही अर्थ शिस्तशून्यता असा होत नाही. कारण कविता कोणत्याही प्रकारची असो, तिच्या अभिव्यक्तीला एक अंतर्गत संघटन आवश्यक असते. भाषा, प्रतिमा, सूचकता आणि आशय यांचा सुसंवाद हरवला, तर ती रचना कविता न राहता गद्याचा तुकडा ठरते.

म्हणून मुक्तछंद आणि छंदमुक्त या संज्ञांमधील भेद केवळ शब्दांचा नाही; तो काव्यदृष्टीचा आहे.

मुक्ततेलाही असते एक अंतःलय

छंद म्हणजे केवळ मात्रा मोजण्याची पद्धत नव्हे; छंद म्हणजे लयीची शिस्त. ही शिस्त कधी बाह्य असते, तर कधी अंतर्मनात विलीन झालेली असते. मुक्तछंदाने बाह्य चौकट शिथिल केली; पण अंतःलयीचा त्याग कधीच केला नाही.

नदीचा प्रवाह मुक्त असतो; तरी त्याला दिशा असते. पक्षी स्वच्छंद उडतो; तरी त्याच्या उड्डाणात सहज क्रम असतो. झाडाची फांदी आपल्या इच्छेनुसार वाढते; पण तिची मुळे मातीत घट्ट रोवलेली असतात. मुक्तछंदाचेही तसेच आहे. त्याची मुक्तता ही बेबंदपणाची नव्हे, तर अंतःशिस्तीची अभिव्यक्ती आहे.

म्हणूनच मुक्तछंद लिहिणे हे सोपे नसते. उलट, बाह्य छंदाचा आधार नसल्यामुळे कवीवर अधिक जबाबदारी येते. शब्दांचा प्रत्येक स्पर्श, प्रत्येक विराम, प्रत्येक प्रतिमा आणि प्रत्येक ओळ ही स्वतःची लय घेऊन उभी राहिली पाहिजे. अन्यथा रचना माहिती देईल; पण कविता होणार नाही.

याच कारणामुळे मुक्तछंदाचा खरा छंद कागदावर दिसत नाही; तो संवेदनशील वाचकाच्या मनात ऐकू येतो.

मराठी मुक्तछंदाची परंपरा : साधनेतून आलेले स्वातंत्र्य

मराठीतील मुक्तछंद ही अचानक घडलेली घटना नाही. तो मराठी कवितेच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

कवी अनिल यांनी मुक्तछंदाला सैद्धांतिक आणि कलात्मक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कवितेत मुक्तता आहे; पण ती कधीही शिस्तभंगात परिवर्तित होत नाही. आशयाच्या आग्रहामुळे छंदाला दिलेली मोकळीक हीच त्यांच्या काव्यदृष्टीची ओळख ठरते.

बा. सी. मर्ढेकर यांनी आधुनिक जीवनातील विसंगती, यंत्रयुगाची धडधड आणि मानवी अस्तित्वाची अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी भाषेलाच नवे रूप दिले. त्यांनी केवळ छंद मोडला नाही; त्यांनी कवितेच्या अभिव्यक्तीची क्षितिजे विस्तारली.

विंदा करंदीकर यांच्या कवितेत विचार आणि लय यांचा अद्भुत मेळ आहे. इंदिरा संत यांच्या कवितेत अंतर्मुख भावविश्वाची नाजूक हालचाल आहे. कुसुमाग्रजांच्या मुक्तछंदात भाषेचे वैभव आणि चिंतनाची उंची आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितेत श्रमिक जीवनाची धग आहे; पण ती घोषणेत रूपांतरित होत नाही, कारण तिच्यामागे काव्यात्मक संघटन आहे. ग्रेस यांच्या कवितेचा अर्थ कधी धूसर भासतो; पण तिची अंतःसंगीतमयता वाचकाला सतत गुंतवून ठेवते.

या सर्व कवींमध्ये शैली वेगवेगळी असली, तरी एक समान धागा दिसतो—त्यांनी मुक्तछंदाला स्वैरपणा मानले नाही. त्यांच्या कवितेत प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक निवडलेला आहे, प्रत्येक विराम अर्थवाही आहे आणि प्रत्येक प्रतिमा अनुभवातून जन्मलेली आहे.

म्हणूनच त्यांच्या कविता वाचताना त्या गद्य वाटत नाहीत. त्या वाचून संपतात; पण त्यांचा नाद मनात दीर्घकाळ घुमत राहातो.

गद्य आणि कविता : सीमारेषा कुठे आखायची? 

मुक्तछंदावरील चर्चेत वारंवार एक प्रश्न समोर येतो—गद्य आणि कविता यांतील नेमका फरक काय?

या प्रश्नाचे एकच सूत्रबद्ध उत्तर देता येणार नाही; कारण कविता ही व्याख्येपेक्षा अनुभूतीचा विषय आहे. तरीही एवढे निश्चितपणे म्हणता येईल की, सुंदर आशय म्हणजे कविता नव्हे. तितकेच खरे म्हणजे सुंदर भाषा म्हणजेही कविता नव्हे. कविता तेव्हा घडते, जेव्हा आशय आणि अभिव्यक्ती यांचे विलक्षण रसायन तयार होते.

एखादा विचार निबंधात प्रभावी वाटू शकतो, एखादा अनुभव आत्मकथनात मन हेलावून टाकू शकतो, एखादे वर्णन ललित लेखात मंत्रमुग्ध करू शकते; पण त्यांना आपण कविता म्हणत नाही. कारण कवितेचे वेगळेपण तिच्या आशयात जितके असते, तितकेच तिच्या अभिव्यक्तीच्या स्वभावातही असते.

आज अनेकदा असे दिसते की, गद्य वाक्ये ओळीओळीने मांडली, विरामचिन्हांचा वापर केला, शब्दांचा क्रम बदलला आणि त्याला भावनिक स्पर्श दिला की कविता तयार झाली, असा समज वाढताना दिसतो. ही प्रवृत्ती चिंताजनक आहे. कारण ओळी मोडल्याने गद्याचे रूप बदलते; परंतु त्याचा स्वभाव बदलत नाही.

कवितेचा आत्मा तिच्या अंतर्गत ऊर्जेत असतो. शब्दांमध्ये स्पंदन निर्माण करण्याची, प्रतिमांना अर्थाच्या पलीकडे नेण्याची आणि वाचकाच्या मनात अनुभव पुन्हा जन्माला घालण्याची क्षमता तिच्यात असावी लागते. ही ऊर्जा नसली, तर रचना कितीही प्रामाणिक असली तरी ती कविता होत नाही.

माध्यमयुगातील कविता : संधी आणि आव्हान

आजच्या काळात कविता लिहिणे, प्रकाशित करणे आणि वाचकांपर्यंत पोहोचवणे पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झाले आहे. सामाजिक माध्यमांनी अभिव्यक्तीचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. ही साहित्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे. अनेक नवे कवी, नवे अनुभव, नवे भाषिक प्रदेश आणि नवे संवेदनविश्व यांमुळे मराठी कविता समृद्ध होत आहे.

परंतु या सहजतेने एक भ्रमही निर्माण केला आहे. लेखन सहज झाले म्हणजे कविता सहज घडते, असे मानले जाऊ लागले. मुक्तछंदाची निवड ही अनेकदा अभिव्यक्तीची अपरिहार्यता म्हणून न होता, सुलभतेचा पर्याय म्हणून होऊ लागली. त्यामुळे काही ठिकाणी कविता अनुभवाचे कलात्मक रूप न राहता अनुभवाचे निवेदन बनते.

हे चित्र संपूर्ण मुक्तछंदाचे नाही; पण या प्रवृत्तीची नोंद घेणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही साहित्यप्रकाराचा दर्जा त्याच्या संख्येने नव्हे, तर त्याच्या गुणवत्तेने ठरतो.

आजही अनेक तरुण कवी आशय, भाषा आणि रचनाशैली यांचे सुंदर संतुलन साधत मुक्तछंदात उल्लेखनीय कविता लिहित आहेत. त्यामुळे प्रश्न मुक्तछंदाचा नाही; तर त्याच्या निकषांचा आहे.

कविता : सहज उमलते, पण सहज घडत नाही

कविता अनेकदा एका क्षणात सुचते; पण ती एका क्षणात घडत नाही.

भावना हा कवितेचा आरंभ असतो; परंतु तिचे अंतिम रूप घडवते ती साधना. भाषेची जाण, परंपरेचे भान, शब्दांची निवड, प्रतिमांची समृद्धी, लयीची जाणीव आणि स्वतःच्या अनुभवाशी असलेली प्रामाणिकता—या साऱ्यांतून कविता आकार घेत असते.

ज्याप्रमाणे गायकाला रियाज, चित्रकाराला रेखाटन आणि शिल्पकाराला दगडाशी संवाद आवश्यक असतो, त्याचप्रमाणे कवीलाही भाषेशी अखंड मैत्री करावी लागते. चांगल्या कविता वाचल्याशिवाय चांगली कविता लिहिता येत नाही. परंपरा जाणल्याशिवाय नवे मार्ग सापडत नाहीत.

म्हणूनच मुक्तछंद हा नवशिक्याचा शॉर्टकट नसून परिपक्व अभिव्यक्तीचा मार्ग आहे.

रसिकाचीही एक जबाबदारी

साहित्याचा दर्जा केवळ लेखकावर अवलंबून नसतो; तो वाचकाच्या अभिरुचीवरही अवलंबून असतो.

क्षणिक दाद, टाळ्या किंवा सामाजिक माध्यमांवरील प्रतिसाद यापलीकडे जाऊन कविता समजून घेण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. एखादी कविता आपल्याला पुन्हा वाचावीशी वाटते का? तिची एखादी प्रतिमा मनात रेंगाळते का? तिच्या एखाद्या ओळीने आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडले का? असे प्रश्न रसिकाने स्वतःलाच विचारले पाहिजेत.

रसिक अधिक सजग झाला की कवीही अधिक जबाबदार होतो. तेव्हाच भाषेची आणि कवितेची अभिरुची समृद्ध होते.

शेवटचे काही शब्द… 

मुक्तछंदावर बोलताना दोन टोकांच्या भूमिका अनेकदा समोर येतात. एकीकडे छंद म्हणजे जुने बंधन, तर दुसरीकडे मुक्तछंद म्हणजे कवितेचा ऱ्हास—अशा दोन्ही भूमिका वस्तुस्थितीचे पूर्ण चित्र दाखवत नाहीत.

छंदोबद्ध कविता आणि मुक्तछंद हे परस्परविरोधी प्रवाह नाहीत. ते एकाच काव्यपरंपरेची दोन रूपे आहेत. एका रूपात लय बाहेरून ऐकू येते; दुसऱ्या रूपात ती आतून जाणवते. एका ठिकाणी छंद स्पष्ट दिसतो; दुसऱ्या ठिकाणी तो शब्दांच्या नसानसांत मिसळलेला असतो.

म्हणून मुक्तछंदाला विरोध करण्याचे कारण नाही; परंतु त्याच्या नावाखाली छंदशून्यता, भाषिक बेफिकिरी आणि वर्णनात्मक गद्य यांना कवितेचा दर्जा देणेही योग्य नाही. मुक्तछंदाची खरी ओळख त्याच्या मुक्ततेत नसून त्याच्या अंतःलयीत आहे.

झाडाच्या फांद्या कितीही दूरवर पसरल्या, तरी त्यांची मुळे जमिनीत असतात. नदी कितीही वळणे घेत वाहिली, तरी तिचा प्रवाह हरवत नाही. आकाशात मुक्त विहरणाऱ्या पक्ष्यालाही दिशेचे भान असते. निसर्गाचा हा नियम कवितेलाही लागू होतो.

कविता ही केवळ शब्दांची मांडणी नाही; ती संवेदनांची शिस्त आहे. ती केवळ आशयाची अभिव्यक्ती नाही; ती भाषेचा आत्मानुभव आहे.

आजच्या प्रत्येक कवीने आणि प्रत्येक रसिकाने एवढेच स्मरावे—

मुक्तछंद म्हणजे छंदापासून मुक्त होणे नव्हे; तर छंदाला अंतःकरणात इतके सामावून घेणे की, तो दिसेनासा होईल; पण त्याचा नाद प्रत्येक शब्दातून ऐकू येत राहील.
आणि कदाचित म्हणूनच…

मुक्ततेलाही छंद असतो.

🙏🏻🙏🏻🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

६ ऑगस्ट २० २६

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाढदिवस… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वाढदिवस… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(“आई एक गडबड झालीये. माझं एक कानातलं सापडतच नाहीये. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते. आता मात्र डाव्या कानातच आहे” ती रडकुंडीला येऊन बोलत होती.)

इथून पुढे – – 

“अरे बापरे!ते डायमंडचे कानातले ना? हो बरोबर. तू इथे आलीस तेव्हा तुझ्या कानात होते. पण घरातच शोध ना. तिथंच कुठतरी पडलं असेल”

“आई दोन तासापासून शोधतेय. घराचा सगळा कानाकोपरा शोधून झालाय” ती आता रडायला लागली होती

“विश्वासरावांना कळवलं का? त्यांनीच तुझ्या वाढदिवसाला घेऊन दिले होते ना? “

” हो. पण ते आता चेन्नईत आहेत. त्यांना कळवायचा धीर होत नाहिये. कळलं तर चिडतीलच ते माझ्यावर. अडीच लाखाचे होते आई ते कानातले. एक गेलं म्हणजे सव्वा लाखाचं नुकसान… “तिला पुढे बोलवेना

“जाऊ दे रडू नकोस. मी शोधते इथे. सापडलं तर तुला कळवते”

सुलक्षणेबाईंनी दोन तास घरात शोधाशोध केली पण काही तपास लागेना.

सकाळी उठल्या उठल्या त्यांनी सिक्युरिटीला फोन केला. झालेल्या घटनेची माहिती देऊन सोसायटीच्या आवारात शोध घ्यायला सांगितलं. घरातही त्यांनी परत शोधायचा प्रयत्न केला. या दरम्यान मुलीचे चारपाच फोन येऊन गेले. कानातलं सापडत नाही म्हणून ती कासावीस झाली होती. पोलिसात तक्रार देऊ या का असं सुलक्षणेबाईंना विचारत होती. सुलक्षणेबाई आणि त्यांच्या मिस्टरांनी तिला धीर धरायला सांगितलं कारण तक्रार केली की सोसायटीत पोलिस चौकशीला येणार. त्याचा सगळ्यांनाच मनस्ताप होणार होता.

दुपारी चार वाजता त्यांच्या दाराची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं. बाहेर दिनू उभा होता.

“काय रे दिनू? “

दिनूने त्यांच्यासमोर हात उघडला. त्या हातावर ते डायमंडचं कानातलं होतं.

” हेच आहे का ते हरवलेलं?

सुलक्षणेबाईंचे डोळे विस्फारले. हो!तेच तर होतं ते. त्यांच्या लाडक्या लेकीने कौतुकाने त्यांना दाखवलेलं.

” हो. हेच आहे ते “त्या आनंदाने ओरडल्या”कुठं सापडलं हे? “हातात घेऊन त्यांनी विचारलं

“गेटच्या बाहेर. रस्त्यावर. सगळे सोसायटीच्या आत शोधत होते. पण ताईंनी गाडीत बसतांना स्कार्फ काढतांना मी पाहिलं होतं. म्हणून मला शंका आली की ते बाहेरच पडलं असेल. आणि खरंच ते तिथंच सापडलं” दिनू हसऱ्या चेहऱ्याने सांगत होता. सुलक्षणेबाईंनी ते घेऊन आपल्या पर्समध्ये टाकलं. पर्समधूनच त्यांनी शंभरची नोट काढली आणि त्याच्यासमोर धरली

“हे घे तुझं बक्षीस आणि थँक्यू व्हेरी मच. खरंच खुप गुणी मुलगा आहेस तू”

“नाही. नको”असं म्हणून दिनू वळला आणि निघून गेला. तो गेल्यावर सुलक्षणेबाईंनी मोबाईल उचलून लेकीला फोन लावला.

“अगं ज्योती सापडलं बरं का तुझ्या कानातलं”

ज्योती आनंदाने ओरडली

“कुणाला आणि कुठे सापडलं आई? “

सुलक्षणेबाईंनी दिनूचं नांव आणि कुठे सापडल्याचं सांगितलं.

“हा दिनू खरंच स्मार्ट पोरगा आहे. बरं तू त्याला काही बक्षीस दिलं की नाही? “

“मी त्याला शंभर रुपये देत होते त्याने घेतले नाही”

“काय आई!अगं सव्वा लाखाचं इयरिंग आहे ते आणि तू फक्त शंभर रुपये देत होतीस? अगं कमीतकमी हजार रुपये तर द्यायचेस. मी परत केले असते तुला”

“जाऊ दे गं! या लोकांना फार डोक्यावर चढवू नये”

“कमाल करतेस तू आई. सापडलं नसतं तर सव्वा लाख पाण्यातच गेले असते ना? “

सुलक्षणा बाई काही बोलल्या नाहीत.

दोन दिवसांनी पवार आपल्या कुटुंबासहित जयपूरला लग्नाला गेले. जातांना एकनाथला घरी राहिलेल्या आपल्या आईकडे लक्ष द्यायला सांगून गेले. पासष्ट वर्षांची त्यांची आई प्रवासाची दगदग सहन होणार नाही म्हणून घरीच राहिली. पवार सकाळी गेले आणि रात्री त्यांच्या आईच्या छातीत वेदना होऊ लागल्या. जीव घाबराघुबरा होऊ लागला.

त्रास जास्त वाढला तशी त्यांना दिनूची आठवण आली. त्यांनी एकनाथच्या रुममध्ये फोन करुन दिनूला पाठवायला सांगितलं. दिनू त्यांच्या फ्लॅटमध्ये गेला. आजींनी त्याला कपाटातली औषधं द्यायला सांगितली. ॲसिडिटीने अस्वस्थ वाटत असेल म्हणून पाण्यात इनो टाकून द्यायला सांगितलं. दिनूने त्यांनी जे जे सांगितलं ते केलं पण बऱ्याचदा ऐकून आणि वर्तमानपत्रात वाचून ही लक्षणं हार्ट अटॅकचीसुध्दा असू शकतात हे त्याला माहीत होतं. त्याला इमरजंसी नंबर्स तोंडपाठ होते. आजी नाही नाही म्हणत असतांना त्याने आजीच्या मोबाईलवरुन सोसायटीच्या डाॅक्टरला फोन लावला. तो फोन उचलेना म्हणून त्याने सरळ अँब्युलंस ड्रायव्हरला फोन लावला. सुदैवानं त्यानं तो उचलला. दिनूने त्याला लगेच सोसायटीत यायला सांगितलं. पाचच मिनिटांनी सोसायटीच्या डाॅक्टरचा फोन आला. दिनूने त्यालाही लगेच यायला सांगितलं. जवळच रहात असल्याने तोही लगेच आला. आजीचा बी. पी. चांगलाच वाढला होता. थोड्याच वेळात अँब्युलंस आली. दिनू आजीसोबत एखादी बाई असावी याकरीता आईला उठवून सोबत घेऊन गेला. आजीला हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट केल्या गेलं. उपचार सुरु झाले.

बातमी कळताच सकाळी लोढाशेठ हाॅस्पिटलमध्ये आले. तिथे दिनूला पाहून त्यांचा जीव कळवळला. पोरगा रात्रभर जागा होता. मग त्यांनी पवारांना फोन लावून सगळी कल्पना दिली. पवारांचं संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होतं. दिवसभरात इतर गाड्यात जागा मिळाली नाही तर ते संध्याकाळीच निघणार होते. त्यांनी लोढाशेठला दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आईची काळजी घ्यायला सांगितलं. लोढाशेठनी ते मान्य केलं.

सात दिवसांनी पवारांची आई एंजिओप्लास्टी करुन घरी परतली. भेटायला येणाऱ्या सर्वांना ती दिनूने तिची किती काळजी घेतली याबद्दल भरभरुन सांगत होती. तोंड फाटेस्तोवर त्याचं कौतुक करत होती.

” अरे सुभाष त्या दिनूला काहितरी बक्षीस दे रे. फार गुणाचं पोरगं आहे. सख्ख्या आजीसारखी माझी काळजी घेत होता तो “

आईने असं म्हंटल्यावर पवारांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

“आई मी त्याला पाचशे रुपये दिले होते. त्याने घेतले नाहीत. फार मातला आहे तो. आता काय त्याला लाख रुपये द्यायचे? नाही घेत तर गेला उडत “

” अरे लाख रुपये नाही म्हणत मी. कमीतकमी पाच हजार तर द्यायचे. दोन दिवस त्याने आणि त्याच्या आईने तुझी आणि सुनबाईची कमतरता भासू दिली नाही”

पवार काही बोलले नाहीत. फक्त नाराजीने त्यांनी होकारार्थी मान हलवली. अर्थात ते एवढे पैसे दिनूला देणार नव्हतेच.

एक दिवस एकनाथने लोढाशेठना फोन केला

” शेठजी मला एका कंपनीत नोकरी मिळतेय. वीस हजार पगार देणार आहेत. मी त्यांना पुढच्या महिन्यात येण्याचं कबुल केलंय. सिक्युरिटी एजन्सीला सांगून तुम्ही एखादा सिक्युरिटी गार्ड मागून घ्या “

लोढाशेठ काळजीत पडले. नवीन सिक्युरिटी गार्ड तर त्यांना केव्हाही मिळाला असता पण एकनाथ सारखा केयरटेकर मिळणं मुश्कील होतं. त्यातून दिनूसारखा सर्वांना मदत करणारा पोरगा मिळणं तर त्याहून कठीण होतं. त्यांनी हा विषय सोसायटीच्या मिटिंगमध्ये मांडायचं ठरवलं. दिनूच्या वाढदिवसाला आता सात दिवस उरले होते आणि त्याचा वाढदिवस साजरा करायचा विषय आता बंदच झाला होता. “कुणी नाही केला तरी मी दिनूचा वाढदिवस साजरा करेन”हे मिटिंगमध्ये तावातावाने म्हंटलेलं वाक्य आता लोढाशेठला सलत होतं. सोसायटीचे सदस्य मिटिंगमध्ये हा विषय काढून त्यांची टिंगलटवाळी करणार होतेच. त्यांना काय उत्तर द्यायचं याचाही विचार करणं भाग होतं. पण आता एकट्याने साजरा करायची शेठजींची इच्छा मरुन गेली होती. शेवटी एका सिक्युरिटी गार्डच्या मुलासाठी एवढे पैसे खर्च करणं त्यांच्या व्यवहारात बसत नव्हतं. पण त्यांनी ठरवलं. दिनूला घरी बोलावून त्याला शर्टपँटचं कापड देऊन टाकायचं. त्यासोबत एखादं कॅडबरीचं चाॅकलेट नाहितर मिठाईचा बाॅक्स. बस झालं. चांगुलपणाचा ठेका त्यांनी एकट्याने थोडाच घेतला होता.

१६ ऑक्टोबर. आज दिनूचा वाढदिवस. संध्याकाळची वेळ. क्लबहाऊसला लावलेली लायटिंग चमचम करत होती. हाॅलमध्ये खुप गर्दी जमली होती नव्हे झाडून सगळी सोसायटी हजर होती. सजवलेल्या स्टेजच्या मागच्या भिंतीवर “हॅपी बर्थडे दिनू”चा बॅनर झळकत होता. ठेवणीतली शानदार शेरवानी घातलेला दिनू प्रसन्न चेहऱ्याने स्टेजवर उभा होता. त्याच्या बाजूला त्याचे आईवडील, सोसायटीचे अध्यक्ष पाटीलसाहेब आणि लोढाशेठ उभे होते. समोरच्या गर्दीकडे आणि टेबलवर ठेवलेल्या भल्या मोठ्या केककडे पाहून दिनूचा वाढदिवस खरंच साजरा होतोय यावर लोढाशेठचा विश्वास बसत नव्हता. पाचसहा दिवसांपूर्वी झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी एकनाथला दुसरी नोकरी मिळाल्याचं आणि एकनाथ आणि त्याचं कुटुंब सोसायटी सोडून जात असल्याचं सांगितलं आणि चमत्कार घडला. एकनाथचा पगार वीस हजार करण्यापासून ते दिनूचा वाढदिवस साजरा करण्यापर्यंतचे सगळे मुद्दे धडाधड मंजूर होत गेले. लोकांना दिनू आणि त्याच्या कुटूंबाची किंमत अखेर कळली होती आणि आज तो दिवस उजाडला होता ज्याची ते मनापासून वाट बघत होते.

दिनूने केक कापायला सुरुवात केली आणि “हॅपी बर्थडे टू यू दिनू ” चा जोरदार जल्लोष झाला. लोढाशेठनी दिनूला उचलून घेतलं तसे सगळे स्टेजवर धावत आले. दिनूच्या तोंडात केक भरवण्याची जणू स्पर्धा लागली. केक भरवून झाल्यावर जो तो दिनूशी हात मिळवून, त्याला जवळ घेऊन शुभेच्छा देऊ लागला. मग त्याला गिफ्ट देण्यासाठी भली मोठी रांग लागली. कुणी एक हजार, कुणी दोन हजाराची पाकीटं तर कुणी कपडे देत होतं. जोशी आले. त्यांनी आठ हजाराचा मोबाईल त्याला गिफ्ट दिला. सुलक्षणेबाई आल्या. त्यांनी पाच हजाराची सोन्याची चेन त्याला दिली. मग पवार त्यांच्या आईसोबत आले तेव्हा त्यांच्या हातात होती एक चमचमती नवी कोरी सायकल. जिची किंमत होती बारा हजार.

सगळ्यांचे गिफ्ट्स देणं झाल्यावर लोढाशेठ बोलायला उभे राहिले.

“मित्रांनो खुप खुप धन्यवाद. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या लाडक्या दिनूचा वाढदिवस साजरा केला. सगळ्यांनी त्याला स्वखुशीने गिफ्ट्स दिलेत. आता माझं गिफ्ट मी जाहीर करतो. दिनूच्या डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी अध्यक्ष असलेल्या “हेल्प” या फाऊंडेशनने स्विकारली आहे”

टाळ्यांचा कडकडाट झाला. मग अध्यक्ष बोलायला उभे राहिले.

” सगळ्यांनी इतके गिफ्ट दिनूला दिले आहेत की मी त्याला काय द्यावं हेच मला समजेनासं झालंय. जितकं दिनूचं कौतुक होतंय त्यापेक्षा जास्त कौतुक त्याच्या आईवडिलांचं व्हायला पाहिजे. कारण त्यांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळेच दिनू आपल्या सगळ्यांच्या मदतीला धावून येतो. तोही कसलीही अपेक्षा न ठेवता. अशा निरपेक्ष भावनेने कुणालाही मदत करण्याचे संस्कार आपणही आपल्या मुलांवर केले पाहिजेत. आजकालची तरुण पिढी मोबाईल, लॅपटाॅपमध्ये गुरफटून स्वकेंद्रित झाली आहे. त्यांनी दिनूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अशा सुसंस्कारी मुलाला घडवल्याबद्दल माझं गिफ्ट मी दिनूच्या ऐवजी त्याच्या आईवडिलांना देणार आहे. त्यांची मोठी मुलगी आता लग्नाची झालीये. तिच्या लग्नाच्या खर्चाची सर्व जबाबदारी मी उचलणार आहे”

टाळ्यांचा परत एकदा कडकडाट झाला.

लोढाशेठनी माईक हातात घेतला.

“कुणाला दिनूबद्दल दोन शब्द बोलायचे असतील तर त्यांनी स्टेजवर यावं “

दिनूच्या वाढदिवसाला विरोध करणारे पवार स्टेजवर आले. दिनूच्या वाढदिवसाला आपण विरोध केला होता त्याबद्दल सर्वांची माफी मागून त्यांनी दिनूचे एकेक स्वभावगुण सांगून त्याची प्रशंसा सुरुवात केली. मग एकेक जण येऊ लागला. दिनूने केलेल्या मदतीचे प्रसंग सांगू लागला. अनुभव सांगतांना बऱ्याच जणांना गहिवरून येत होतं. सगळ्यांच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून दिनू अवघडून बसला. त्याच्याच बाजूला बसलेल्या एकनाथच्या आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यातून मात्र आनंदाश्रूंच्या धारा वहात होत्या.

समाप्त

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हणोनि ठेविली पायी डोई… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ म्हणोनि ठेविली पायी डोई… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“माऊलींची माया हाये ओ आमच्यावर. ती तुमास्नी नाय कळायची. ” असं तो म्हणाला अन् डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रूंचे दोन चार थेंब ओघळले. समोर माऊलींच्या तळावर तंबूचे कळस दिसत होते अन् त्या कळसांकडे पाहून हात जोडून तो आनंदानं रडत होता. नेमकं काय घडलं होतं, ते त्याला अन् माऊलींनाच ठाऊक. त्यांचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाशी त्यांचं काही ना काहीतरी नातं असतंच.

“त्यांच्यामुळं तरलो बगा यंदा. ” असं म्हणत त्यानं हात जोडले. माझ्याकडं लक्षच नव्हतं. त्याचं आपलं स्वतःशीच बोलणं सुरु होतं. तो इतका भावूक झाला होता की, कुणी नुसता स्पर्श जरी केला असता तरीही त्याच्या भावनांचा बांध फुटला असता.

माऊलींशी आणि तुकोबारायांशी असा भावनिक संवाद साधणारे कितीतरी वारकरी आपल्याला दिसतील. इतक्या सहजतेनं ते माऊलींशी मनातलं सगळं सगळं बोलतात, सुख-दुःखाच्या गूजगोष्टी करतात, त्यांना प्रश्न विचारतात, त्यांचा सल्ला घेतात, कधी कधी त्यांच्यावर रागावतात सुद्धा. पण हेही तितकंच खरं आहे की, त्यांना त्या संवादातून मार्ग सापडतात, प्रश्नांची उत्तरं मिळतात, रस्ते दिसतात, आपल्या हातून जाणते- अजाणतेपणी घडलेल्या चुकांची जाणीव होते. अशावेळी, पटकन क्षमा मागून मोकळेही होतात.

वारी हा स्वतःला अधिकाधिक निर्मळ, अधिकाधिक सात्विक करण्याचा एक प्रवास आहे. शुद्ध सकारात्मक वातावरणात महिनाभर राहण्याचा अनुभव मोठा विलक्षण असतो. अत्यंत साध्या जीवनशैलीत राहायचं, पहाटेपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जगण्याचं शहाणपण शिकवणाऱ्या संतांच्या अभंग रचना गात गात चालायचं, निश्चित वेळी मोजकं आवश्यक तितकंच खायचं, आवश्यक तेवढंच पाणी घ्यायचं, संपूर्ण स्वावलंबी आयुष्य जगायचं, आपल्यापासून कुणाला उपद्रव त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घ्यायची, तोंडून चुकून सुद्धा एकही अपशब्द येऊ द्यायचा नाही, ऊन- वारा- पाऊस- थंडी जे जे अनुभवाला येईल ते गोड मानून घ्यायचं, कुठल्याही अपेक्षांमध्ये अडकून पडायचं नाही, असं जगणं आपल्या जगण्याचा पाया दिवसेंदिवस भक्कम करत जातं.

रोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी थांबलं की, पालखी तळावर कीर्तन असतं. आपण एकटेच असतो. दिवसभर चालून पाय थकलेले असतात. पण मन मात्र थकलेलं नसतं. अशावेळी साध्या पण अत्यंत मार्मिक संतवचनांमधून जगण्याचं प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांच्या प्रासादिक वाणीचा प्रभाव पडतोच. संतांची चरित्रं उलगडली जातात. पुस्तकी साक्षरता आणि प्रत्यक्ष जगण्यासाठी लागणारी मूल्यं यांच्यात किती फरक असतो, याची जेवढी अनुभूती कीर्तनातून होते, तेवढी अन्य कोणत्याही माध्यमातून होणं कठीण. आपण माणूस म्हणून स्वतःमध्ये आणखी किती सुधारणा करायला हवी, याची फार रोखठोक जाणीव कीर्तनकार करुन देतात. कीर्तनानंतर हरिपाठ झाला की, धरणीवर अंग टाकून द्यायचं. एका क्षणात आपण निद्रादेवीच्या अधीन होतो. वारीच्या वीस दिवसांत जशी गाढ झोप लागते, तशी पुन्हा वर्षभर लागत नाही, असा अनुभव तुम्हाला कित्येकजण सांगतील. म्हणूनच, आपली विस्कटलेली आयुष्यं अन् चुकलेली जीवनशैली ताळ्यावर आणण्यासाठी वारी केली पाहिजे.

“काय झालं माऊली? ” मी अगदी शांतपणे विचारलं.

“काय नाय ओ. माऊलींनी माजं भिजत पडलेलं घोंगडं निस्तारलं बगा. ” तो रडत म्हणाला.

“कसलं घोंगडं? ” मी विचारलं. वारीत मुक्कामाच्या जागी असा संवाद होतोच. पण, एक फार मोलाची आणि आपण शिकण्यासारखी गोष्ट माझ्या लक्षात आली की, खरा वारकरी कधीही रडगाणं गात नाही. तोही माणूस आहे, त्यालाही भावना आहेत. पण समस्या, अडचणी यांना आहे तसं स्वीकारुन पुढं पाऊल टाकण्याची एक विलक्षण क्षमता त्यांच्याकडं आहे.

“अवो, पोरगा गेली तीन वर्षं ऐकतच नव्हता. यंदा तयार झाला. ” असं तो म्हणाला, पण मला काहीच उलगडा झाला नाही.

“जरा विस्कटून सांगा की. ” 

“काय नाय. बारावीला दोनदा नापास झाला. मी त्याला सांगत हुतो, आपल्याला जे जमंल ते करावं. उगं दुसऱ्यानं अमकं केलं म्हंजे आपनही त्येच करायला जाऊ नये. पन ऐकायला तयारच नई. “

“मग? “

“मी लई गोष्टी सांगून बघितल्या. इलेक्ट्रिक काम शिक, मोटार मेकॅनिकी शिक, टेलरिंग शिक. पन ते काय त्येला समजत नव्हतं. त्येच्या डोक्यात एकच खूळ – फॉरेनला जायचं अन् भरपूर पैसा मिळवायचा. ” 

“पण हे फॉरेनचं अचानक कुठून आलं डोक्यात? ” 

“अवो, मोबाईलवर काय ते बघायचं अन् तेच धरुन बसायचं. फॉरेनला जाऊन मोठ्या हॉटेलात काम करतो असं म्हनायचा. आता माजी धा एकर शेती, वीस पंचवीस जनावरं हयेत. एक पिठाची चक्की हाये. एक दुकान गाळा भाड्यानं दिलाय. उन्हाळ्यात ऊसाचं गुऱ्हाळ असतंय. डेअरीला दूध घालतो. थोडीफार तरकारी केली तर ती विकतो. आजून काय पायजेल सांगा. “

एक मिनिटभर मला काही कळलंच नाही. माझ्या शेजारी साध्या प्लॅस्टिकच्या कागदावर बसलेला तो माणूस. पायात साधी चप्पल, शेजारी एक कपड्याची पिशवी. दोन जोड कपडे, एक पंचा, एक पांघरुणाची गुलाबी शाल, एक टाळ एवढ्यावर पंचवीस दिवस पायी प्रवास करणारा एकदम कॉमन मॅन. त्याचं वार्षिक उत्पन्न बारा-चौदा लाख रुपये असेल असं मलाच काय, पण कुणालाच खरं वाटलं नसतं.

“पण मग हा तिढा सुटला कसा? “

“असल्या गोष्टीत घाई करुन उपयोग नसतोय, हे मी आमच्या मंडळीला अगोदरच सांगितलं होतं. त्यामुळं, घरी आमी त्याला काय टोचत बिचत नव्हतो. एक दिवस मी आमच्या चक्कीवर बसलो होतो. मनात विचार आला, हा गुंता माऊलींना सांगाया पायजे. घरी बोललो. दुसऱ्या दिवशीची एसटी धरली अन् पोराला घेऊन आळंदीला गेलो.” 

“मग? “

“देवापाशी डोकं टेकीवलं अन् अजानबागेपाशी सावली धरुन बसलो. मी पोराला म्हनलं, ‘हे काय खरं नाय गड्या. दोन वर्षं झाली, आपन अडकलोय. काई तरी तोड काडली पायजेल. मला काय वाटतं तुला सांगू का? ‘” 

“मग पोरगा काय म्हणाला? ” 

“पोरगा म्हनला ‘सांगा.’

“मी म्हनलं, भायेर जाऊन नोकरी करायची, यापतुर आपलंच कायतरी सुरु करु. हा अभ्यास काय तुला झेपत नई. मग कशाला वेळ काढायचा? मी म्हनलं, ते पोराला पटलं. इचार करु म्हनला. ” 

“मग जमलं का? “

“जमलं तर. दुसऱ्या दिवशी गडी एकटाच कॉलेजात गेला. बारावीला बाहेरुन बसायचा फॉर्म भरला. विषय बदलले. त्येचं तेनीच केलं. कॉलेजातले सर म्हनले, कुठं काय अडलं तर मी सांगतो. कामच झालं. रोज संध्याकाळी मी डेअरीला दूध घालून येईस्तोवर चक्कीवर बसायचा. दुपारी अभ्यास करायचा. “

“व्वा. चांगलं झालं की माऊली. तुमचं टेन्शनच गेलं. ” मी म्हटलं.

“तर ओ. फेब्रुवारीत परीक्षा पार पडली. दुसऱ्या दिवसापासून आमच्या एका मित्राच्या हॉटेलात त्येच्या हाताखाली कामाला जायला लागला. वडे, भजी, पुऱ्या तळायला शिकला. दीड दोन महिन्यात चांगला तयार झाला. लग्नसराई जोरदार सुरु होती. मसालेभात, रस्सा करायला शिकला. चांगला खुश असायचा. रात्री दमून भागून येऊन गाढ झोपायचा. त्येच आमचं सुख. ” 

मी एकदम गहिवरुन गेलो. कुणालाही न लुटता, न लुबाडता, खोटारडेपणा फसवाफसवी न करता, इमाने इतबारे कष्ट करुन, आपलं पोरगं दमून गाढ झोपलंय, यातच सुख मानणारा बाप मी बऱ्याच वर्षांत पहिल्यांदाच बघत होतो. सरळमार्गानं जग अन् हवा तेवढा मोठा हो, एवढीच अपेक्षा होती त्याची. “जिथे राबती हात तेथे हरी” इतकाच त्या वडिलांचा साधा सिद्धांत..!

बऱ्याचदा मुलांच्या त्यांच्या आयुष्याविषयीच्या अवास्तव अपेक्षा तयार होतात, त्याला कारणीभूत असतात पालकच..! पण इथं प्रकरण उलटं होतं.

“बारावी सुटला की नाही? ” माझी उत्सुकता तिथंच घुटमळत होती.

“सुटला? चांगल्या मार्कानी सुटला. साठ टक्के पडले. स्वतःच्या हातानं शिरा केला, सगळ्याना खाऊ घातला. आता दिवसभर हॉटेलात काम करुन नाईट कॉलेजात शिकायचं म्हनतोय. तर आपन कशाला अडवा? चांगलंच ठरवलंय त्यानं. “

“हे सगळ्यात बेस्ट. काम करत करत शिकलेलं चांगलं. त्याचं त्याला जाणवलं, हेच सगळ्यात महत्त्वाचं. पण मग आता डोळ्यात पाणी कशाला आणताय? ” 

“मी तुमाला काय म्हनलं, माऊलींची माया हाये आमच्यावर. इतरांना ती कळायची न्हाई. यंदा वारीला निघालो. आठ तारखेला प्रस्थान. मी तीन दिवस आधीच जात असतो, पन यावर्षी पाऊस जोरदार झाला. आळंदीला कुठनं जानार? पुन्यातच थांबायचं ठरत होतं. तर आमचा लेक आला पुढं अन् म्हनला, मी येतो दिंडीत. आचाऱ्याच्या हाताखाली काम करीन. मी कशाला नाई म्हनतोय? म्हनलं चला. पोरगं मार्गी लागतंय. आज रात्रीचा दीडशे मानसांचा पिठलं भाताचा सैपाक त्येनं एकट्यानं केलाय. सगळी दिंडी जेवून झोपली. नंतरच दोन घास खाऊन झोपलाय बगा तिथं. आता पहाटं तीनाला उठून चहा करंल. ” 

मी मागं वळून बघितलं. सामानाच्या ट्रकबाहेर एक विशितला पोरगा बसल्याजागी गाढ झोपून गेला होता..

“आपन एकदा त्यांना मनातलं सांगितलं की, मार्ग काढायची जबाबदारी त्यांची. ते बरोब्बर वाट दावत्यात. बसल्याजागी काय सुदा मिळत नाई ओ. आता पोरगं फॉरेनला जाईल नायतर नाई जाईल, पन आज घाम गाळाया शिकलं ना.. हुईल की तयार हळूहळू. बाकी काय का असंना, आज मोबाईल मधून भायेर आला, काम कराया लागला. परीक्षा पास झाला. आपनहून वारीला आला. आता देवानं अजून काय द्यावं म्हनता? सांगा.. “

विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । 

रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ 

*

उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । 

रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ 

*

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । 

तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ 

*

ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । 

नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

 हा माऊलींचा शब्द त्यांनीच सकळ सिद्ध करुन दाखवला. गुरु आपल्याला आपला हात धरुन योग्य वेळी योग्य मार्गे नेतातच, याची खात्री पटण्यासाठी आणखी दुसरा कुठला दृष्टांत हवा?

“चित्ती असो द्यावे समाधान” चा खरा अर्थ मला माऊलींच्याच तळावर माऊलींच्याच समोर साक्षात अनुभवायला मिळाला होता. शिबी आणि मिडास दोघेही राजेच होते. पण शिबी राजाला त्याचं कर्तव्य पूर्ण समजलं होतं अन् मिडास राजा मात्र सोन्याच्या मोहातून बाहेरच येऊ शकला नाही. जितक्या कमी अपेक्षा, जितक्या कमी महत्त्वाकांक्षा, तितकं समाधान जास्त.. दोघांपैकी कुणाची निवड करायची, याचा निर्णय आपणच घ्यायचा. मी शिबी राजाची निवड केली. माऊलींच्या सहवासात, त्यांच्या प्रकाशात…

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”कभी हां कभी ना” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “कभी हां कभी ना!” ☆ संध्या बेडेकर ☆

काल ताईकडे नातवाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्य मोठा कार्यक्रम होता. तसा आता थोडक्यात कार्यक्रम करायची पद्धत राहिलेली नाहीच. कार्यक्रम कोणताही असो, कार्यक्रम लहानसा असू शकतो पण तो event म्हणून जोरदार पद्धतीने साजरा होतो.

एकतर आता एकच एक चा जमाना आहे ना. म्हणजे मुलगा एक, त्याचे सर्व कार्यक्रम एकदाच, मग त्या मुलाचा मुलगा.. तो पण एकटाच. म्हणून कोणताही कार्यक्रम एकदाच करायचा, त्यामुळे तो event म्हणून करायचा असतो. पैसा भरपूर आहे, जवळचे मित्र मैत्रिणी High status चे मग… त्यांच्या status प्रमाणे करायचे असते. या अशा कार्यक्रमात कधी बायको, तर कधी नवरा दबक्या आवाजात विरोध करत असतो. पण शेवटी एकदाच तर करायचय… अस म्हणत सर्व तामझाम होतोच.

मित्र मैत्रीणिंच्या गृपमध्ये कार्यक्रम करायचा म्हणजे पाकिटावर जरा जास्त भार पडतो. कारण तेंव्हा स्वतःचे social status चा पण विचार असतो / किंवा दाखवायचे पण असते…

 नातेवाईंकासाठी करायचा असेल तर… त्यावेळेस नातेवाईकांचे status बघून कार्यक्रम होतो. Status प्रमाणे मेन्यू ठरतो. कोणाला बोलवायचे? कोणाला नाही? हे ठरत. status प्रमाणे हाॅटेल ठरत. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांकडे लक्ष दिलच पाहिजे, अशी जबाबदारी वगैरे नसते. किंवा कधी कधी तर दुर्लक्ष केल तरी चालत.. कभी हां कभी ना कॅटेगरीतील नातेवाईकही असतातच की.

म्हणजे काही नातेवाईक असे असतात, म्हणजे बोलवाव लागतय म्हणून बोलवलय.

बाकी खूप लक्ष वगैरे द्यायची गरज नसतेच. पण असे लोक जेंव्हा नात कस असाव? या विषयावर बोलतात, तेंव्हा आ हा हा!!!. ऐकत रहावस वाटत. म्हणजे एवढी समज असलेले great च नाही का? म्हणजे मला वाटत राज्य स्तरीय स्पर्धेत या भाषणाला पहिल बक्षीस नक्की मळेल.

 हे लोक आयुष्यात कस वागतात? हे त्यांनाही माहित असत आणि आपल्यालाही. ते अगदीच तस वागत नाहीत, अस म्हणता येणार नाही. काही specific मोजक्या लोकांबरोबर तस वागतात. वेळ पडली तर झुकतात. आपला फायदा लक्षात ठेवून चमचेगीरी पण व्यवस्थित करतात.

शेवटी Status हा एक Issue सध्या खूप महत्वाचा झालाच आहे. दुसर्यांच status तेच ठरवतात.

पैसा बोलता है। म्हणतात ना ते खरच आहे.

 status issue म्हणजे पैसा, मोठ्ठ घर rather बंगला, मोठी कार, आणि मुख्य म्हणजे तो कामाचा आहे का? हे सर्व त्या माणसापेक्षा जास्त महत्वपूर्ण असत. अशा माणसाबरोबर काढलेली Selfie म्हणजे पण एक achievemet च असत. त्या माणसाबद्दल रंगवून रंगवून सांगण, हा त्यांचा छंद असतो.

 कधी बोलवून अपमान होणे, किंवा न बोलवून अपमान करणे ही या so called / self proclaimed high status वाल्यांचे common behavior असत. केंव्हा पलटी मारतील ते सांगता येत नाही.

काल एक so called/ self proclaimed श्रीमंत नातेवाईक भेटले. मागच्याच आठवड्यात त्यांच्या मुलाचे लग्न झाले. या वेळेस आम्ही कभी ना या option category त होतो. आम्हाला म्हणाले… तुम्ही आला नाहीत हो लग्नाला.

 खर म्हणजे ही गोष्ट खूप जूनी विसरण्यासारखी नव्हतीच.

मी आणि ताई एकमेकींकडे बघतच राहिलो. अरे! म्हणजे तुम्ही काहीही करा, चूक आमचीच.

अशा लोकांच काय करायच? समजत नाही.

एकदा वाटत स्पष्ट उत्तर द्याव. हे आपल्याला बुद्धु समजतात बहुतेक.

आपली चूक पण दुसर्यांच्या माथी मारायचा प्रयत्न करतात

We r different. असा समज असणारे हे लोक 

Occasion प्रमाणे this time only few dignitaries r invited. Not everyone. अस सहज वागतात…

ही अशी कभी हां कभी ना. वाली नातेवाईकांची category पण असते बर का…

आपण नाही का? काही वस्तू गरजेनुसार वापरतो, गरज संपली की आपण सहज म्हणतो… आता जरा बाजूला, वर माळ्यावर ठेवा. सध्या आपल्याला यांची गरज नाही ना, मग नंतर जर गरज लागली तर, तेंव्हा बघू. असा विचार करून ती वस्तू बाजूला ठेवतो.

ही वस्तुंची कभी हां कभी ना वाली कॅटेगरी झाली.

तसच माणसांच्या बाबतीत पण असत.

कभी हां, कभी ना.

हे असे equations समजायला वेळ लागतो. एकदा समजल्यावर त्रास होतो. रागही येतो. स्वतःशीच खूप वाद/ संवाद होतात. एका दृष्टीने बर होत. आपल्याला आपली पूढची line of action ठरवायला सोप्प होत. आपल्यालाही कुठे लाईन ओढायची हे ठरविता येत.

समोरच्याला आता आपण नकोय हा विचार मानसिक त्रास देणारा नक्कीच आहे.

उद्या या म्हणतील, तेंव्हा आपण नाही गेलो तर तुम्ही आला नाहीत? का बर?

म्हणजे चित भी मेरी, पट भी मेरी.

या अशा परिस्थितचा आनंद घेणारे/ आग लावणारे पण असतातच की. लगेच कधी कधीच फोन करणारे, पण अशा वेळेस नक्कीच फोन करतात…

हो का? अग बाई! तुम्हाला मेसेज नाही मिळाला का? अस नक्कीच म्हणतील…

वाढत्या वयाबरोबर, अनुभवांवरून बरच काही समजू लागल आहे.

नात सांभाळण ही फक्त एकाच पार्टीची जबाबदारी नाही/ नसते.

हे खरय… At the same time…

You cannot force someone to 

respect you. but you can choose to walk away when they don’t. and that decision can change the direction of your life.

हर तकलीफ से इंसान का दिल दूखता बहुत है। पर हर वह तकलीफ से वो सीखता भी बहुत है।

आजकाल दिवसातून शंभरदा फोनवर डिलीट चे बटन दाबतोच ना. आपण unwanted messages delete कतोच ना.. तसच आपले विचार शांतमनाने फिल्टर करायचे, आणि आपली माणसांची लिस्ट Review करायची आणि जिथे आपल्याला

 value नाही, त्यांना महत्व द्यायची गरज नाही. तेथे डिलीट चे बटन दाबायचे. Option कॅटेगरीत स्वःतला ठेवायचे नाही.

तिथे आपला वेळ एनर्जी, वाया घालवायची गरज नाही. लगेचच आपल्या महत्वाच्या कामांची लिस्ट काढायची आणि त्यावर फोकस करायचे.

Distance is the new and only answer for such people.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ३७ हजार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ ३७ हजार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य! ☆ श्री संभाजी बबन गायके 

शिवरायांचा ‘गनिमी कावा’ पुढे चालवणारे ब्रिगेडीअर बसंत पंवर! 

 भारताला पाकिस्तान आणि चीनसोबतची समोरासमोरची थेट युद्धे जंगलात लढावी लागली नाहीत. परंतु नक्षलवादी, माओवादी, विघटनवादी इत्यादी शक्तींशी लढताना मुख्य लढाई घनदाट जंगलातच होती आणि आहे. अर्थात भारतीय जनमानस या संघर्षाला अजूनही लढाई आणि त्यात लढणा-यांना सैनिक मानत नाही, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. जनमानसात युद्ध म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमापार प्रचंड हल्ले, मोठी शस्त्रे… लढाई आणि हारजीत! 

 त्यामुळेच आरंभी मुघल शिवरायांच्या मावळ्यांना सैनिक आणि त्यांच्या समूहाला सैन्य मानत नव्हते… पुढे शिवरायांच्या गनिमी काव्याने मुघलांच्या साम्राज्याची राखरांगोळी केली, हा इतिहास आहे. छत्रपती महाराज साहेबांनी विकसित करून प्रचंड यशस्वी करून दाखवलेला हा गनिमी कावा म्हणजेच Guerrailla warfare!

 जंगलात लढण्यासाठी विशिष्ट पद्धतीची युद्धनीती अवलंबावी लागते. Guerra म्हणजे लढाई आणि illa म्हणजे छोटी… लहान! guerrailla म्हणजे लहान लढाई… चकमक! 

 ही युद्धनीती आरंभी भारतीय सैनिकांना आरंभी तितकीशी अवगत नव्हती आणि ही नीती शिकवण्याची कोणती व्यवस्था. ही कमतरता भरून काढली ती ब्रिगेडीअर बसंत पनवर साहेबांनी. साहेब त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य. त्यांचे वडील मेजर देवीसिंग पनवार दुस-या महायुद्धात सहभागी होते. तर आजोबा म्हणजे आईचे वडील कर्नल मंगल सिंग हेही पहिल्या महायुद्धात सैनिकी अधिकारी होते. मामा कर्नल अजित सिंग, लेफ्ट. कर्नल ओंकार सिंग, मेजर रामसिंग हेही सैन्याधिकारीच होते!

 साहेबांना अगदी शालेय वयापासून घोडेस्वारीची आवड होती. आपण एक घोडा विकत घ्यावा, असं त्यांना कायम वाटे. आणि पुढील आयुष्यात त्यांनी खरोखरीच एक घोडा विकत घेतलाही. घोड्यावरून खेळले जाणारे अनेक साहसी खेळ साहेब लीलया खेळत असत! 

 साहेबांच्या वडिलांची बदली होई त्या शहरात साहेबांचे शिक्षण होत गेले… पण कळत्या वयात त्यांना पुण्याच्या बिशप्स स्कूल बोर्डिंगमध्ये राहण्याची संधी प्राप्त झाली.. ज्या ठिकाणी ब्रिटीश आर्मीमधील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. खेळांमध्ये प्रगती साधता आली. पुढे साहेब वडिलांकडे आग्रह करून सैनिकी शाळेत आणि तिथून पुढे एन. डी. ए. खडकवासला येथे प्रवेश घेते झाले. ते एन. डी. ए. मध्ये जिमनास्टीक्स, घोडेस्वारी या प्रकारांत अव्वल होते. त्यामुळे एन. डी. ए. चा अभ्यासक्रम आणि पुढे आय. एम. ए. चाही अभ्यासक्रम सहजी पूर्ण झाला!

मेरीटमध्ये उत्तीर्ण झाल्याने साहेबांना कुठल्या पलटणमध्ये जायचे हे ठरवण्याची विशेष सवलत मिळाली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांनी ज्या पलटणीमध्ये कारकीर्द घडवली होती त्या फर्स्ट मराठा पलटणीत प्रवेश मिळवला! ही पलटण जंगी पलटण म्हणजे लढाऊ पलटण म्हणून ख्यातकीर्त आहे. साहेबांना पहिली नेमणूक मिळाली ती Nagaland मध्ये.

३, सप्टेंबर, १९७०. पंवर साहेबांनी यंग ऑफिसर्स नुकताच पूर्ण केला होता. नागा बंडखोरांनी त्यावेळी तिथे प्रचंड उच्छाद मांडला होता, सैनिकांना कोंडीत पकडून त्यांचा अनन्वित छळ केला होता. आणि याच ठिकाणी पंवर साहेब दाखल झाले होते.

इथे नागा बंडखोर अतिरेक्यांनी भारतीय सैन्याला मुद्दाम त्यांच्या एका प्रशिक्षण शिबिराची माहिती मिळेल अशी व्यवस्था केली… जेणेकरून एकाच वेळी अनेक सैनिक त्यांच्या तावडीत सापडू शकतील!

 त्यावेळी तरुण तडफदार सेकंड लेफ्टनंट पदावर असलेल्या पंवर साहेबांनी या छावणीवर त्यांच्या अगदी जवळ जात हल्ला चढवला. बंडखोर पळून आत जंगलात जाऊन लपले. आपल्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला, प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली… त्यामुळे नागा बंडखोरांच्या मनात भारतीय फौजेविषयी धाक निर्माण झाला! 

 पुढे १९७१ मध्ये पाकिस्तानशी घोषित युद्ध सुरु होण्याआधी साहेबांनी सीमापार घुसत, स्थानिक मुक्ती वाहिनीच्या सदस्यांना हाताशी धरून पाकिस्तानी फौजेवर डोन मोठे छुपे हल्ले चढवले आणि यशस्वी करून दाखवले… पुढे होणार असलेल्या युद्धाची ही एक चुणूकच म्हणावी लागेल… पंवर साहेबांचा आत्मविश्वास एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता. इतका का ते मोहिमेवर जाताना चक्क स्वत:चा कॅमेरा घेऊन जात आणि फोटो घेत.

 आपल्याला या वयातच युद्धावर जाण्याची संधी मिळणार आहे, याचा त्यांना खूप अभिमान वाटला होता! अशा अनेक चकमकी सुरु झाल्या. अशाच एका संघर्षात आपल्या सैनिकांनी २३४ पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले… आणि त्यामुळे त्यांचे उर्वरीत सैन्य त्यांच्या कमांडरसह ढाक्यामध्ये पलायन करते झाले! याचवेळी मुक्ती वाहिनीच्या सैनिकांची आणि आपल्या सैनिकांची भेट झाली.. त्यांनी विचारले… दुश्मन किधर है? पंवर साहेब म्हणाले… दुश्मन भाग रहा है! पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि मग पंवर साहेबांना थोडी उसंत मिळाली… तोवर ते कॅप्टन पदी पोहोचले होते. पण लगेचच एक महत्त्वाची जबाबदारी दिली गेली… ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, मद्रास येथे प्रशिक्षक नेमले गेले… इतरांपेक्षा साहेबांचा अनुभव चार-पाच वर्षांनी कमी असला, त्यांचे प्रशिक्षणार्थी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असले तरी साहेबांनी त्यांच्या दर्जेदार प्रशिक्षण, स्वत: उदाहरण बनून दाखवल्याने त्यांचा कार्यकाल खूप यशस्वी झाला! घोडेस्वारी करता करता खेळला जाणारा अतिशय रोमांचक आणि अवघड खेळ, पोलो या खेळामध्ये कॅप्टन साहेबांना खास गती होती.. त्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले. राष्ट्रपती भवनातल्या घोडदळ दलामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली. पुढे देशाच्या अनेक भागांत, अनेक जबाबदा-या पार पाडत पाडत साहेब त्रिपुरा मध्ये आसाम रायफल्समध्ये आले.

त्या भागात भारतविरोधी कारवाया खूप मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. साहेबांनी बंडखोरांना सक्त ताकीद दिली… भारतीय सेनेविरोधात तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही… हत्यारे खाली ठेवा! 

पुढे Nagaland, मिझोरम मध्ये साहेबांनी उत्तम काम करून दाखवले. मिझोरममधल्या जोराम्थांगा सरकारशी त्यांनी बोलणी केली. जोराम्थांगा हे मुख्यमंत्री होते, जे पूर्वाश्रमीचे सशस्त्र आणि भूमिगत बंडखोर होते. आणि त्यांनी guerrilla युद्धनीतीने भारतीय सैन्याशी संघर्ष केला होता… सुमारे वीस वर्षे. ते पुढे राष्ट्रीय प्रवाहात सामील झाले व राजकरणात येऊन मुख्यमंत्री बनले. पंवर साहेबांनी याच जोराम्थांगा यांना भारतीय सेनेने स्थापन केलेल्या अतिरेकी विरोधी कारवायांना कसे तोंड द्यायचे यासाठी स्थापन केलेल्या सैन्य शैक्षणिक संस्थेत ‘गनिमी कावा’ युद्ध अर्थात guerrilla युद्ध कसे करावे? या विषयावर व्याख्यान द्यायला येण्याचे आमंत्रण देण्याचे धाडस दाखवले होते! 

 पंवर साहेबांनी त्यांचे हे युद्धकौशल्य पुढे अमेरिकन सैन्यातील काही सैनिकांनाही शिकवले… त्यावर त्यांच्या संरक्षणमंत्र्यां प्रशंसोद्गार काढले होते. पुढे भारत-अमेरिका संयुक्त सैन्य सरावात guerrilla warfare आणि पंवर साहेब हे एक समीकरण बनले होते.

 पुढे २००४ वर्ष उजाडले आणि पंवर साहेबांच्या हातून एक मोठे कार्य पार पडण्याचे दिवस आले… नक्षलवाद विरोधी अभियान! साहेबांना छत्तीसगढमध्ये आमंत्रित करण्यात आले. पोलिसांना जंगलात नक्षली बंडखोरांशी नेमके कसे लढावे याचे प्रशिक्षण फारसे नव्हते. साहेबांनी सुरुवातीला १०० पोलिस आणि पुढे आणखी काही पोलिस अधिका-यांना प्रशिक्षित केले. साहेबांच्या सेवानिवृत्तीला त्यावेळी केवळ दोन महिने उरले होते. छत्तीसगढ सरकारने पंवर साहेबांना पोलिसांना प्रशिक्षण देण्याची विनंती केली. त्यावेळी खरंतर साहेबांना कांगो या आफ्रिकी देशात जाण्याची इच्छा होती… पण भारतातही तसेच जंगल आहे आणि आपली इथे खूप गरज आहे, हे त्यांना विनंतीपूर्वक सांगण्यात आले आणि साहेबांच्या आणि नक्षलवाद विरोधी चळवळीला एक नवे वळण प्राप्त झाले… जे खूप महत्त्वाचे ठरले! 

३१ मार्च, २००५ रोजी भारतीय सैन्यातून साहेब निवृत्त झाले… कुटुंबियांना घरी सोडले आणि आणि साहेब रायपूर साठी रवानाही झाले… इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस या पदाची सूत्रे हाती घेतली! आणि त्यांनी पहिला आदेश काढला… नक्षलवाद्यांशी लढायचे ते सैनिकी वेशात… खाकी रंगाचा गणवेश नको… combat uniform वापरायचा! यामुळे पोलिसांच्या आत्मविश्वासाला मोठी झळाळी आली.

मग साहेबांनी प्रशिक्षणासाठी विशेष जागा पाहिजे म्हणून आग्रह धरला. तीन मोठ्या डोंगरांच्या मध्ये असलेली जागा निवडली. जणू ही प्रत्यक्ष युद्धभूमीच होती. नक्षली ज्या वातावरणात राहतात… तसे वातावरण तयार करून घेतले… ते जसे हल्ले चढवतात, तसेच हल्ले आपणही करायचे… एवढेच नव्हे जंगलात सैनिकांसाठी शौचालये किती आकाराची बांधायची, तयार करायची याची मोजमापे ठरवून दिली. आरंभी केवळ शंभर एक एकर जमीन मिळाली होती या कामासाठी… ती विविध प्रयत्न करून तीनशे एकरांवर नेली. वनखात्याची जमीन वापरात आणली. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर संघर्षही केला. विशेष helipad बांधून घेतले… विशिष्ट रुंदीचा रस्ताही बांधून घेतला… या रस्त्याला ELG नाव दिले. याचा full form कित्येक लोकांना लवकर समजला नाही… emergency landing ground! ज्याचा पुढे अनेकांना उपयोग झाला. जखमी सैनिकांना वेगाने रुग्णालयात नेता येऊ लागले. परिसरात ८५ हजार झाडे लावली… जंगल आणखी घनदाट केले. साडेचार महिन्यात जंगल युद्ध प्रशिक्षण केंद्र सुरु झाले. हे भारतातील पहिले प्रशिक्षण केंद्र होते… गनिमी कावा शिकवणारे! 

 प्रशिक्षण अतिशय कडक. कुणी सलग तीन दिवस अनुपस्थित राहिले की त्याने संपूर्ण अभ्यासक्रम पहिल्यापासून पुन्हा करायचा असा दंडक घालून दिला! शारीरिक व्यायाम तर होताच, पण मानसशास्त्रीय कसोट्यासुद्धा घेतल्या गेल्या… स्वत:वर नियंत्रण कसे आणावे, रागावर काबू कसा ठेवावा, कठीण परिस्थितीत निर्णय कसे घ्यायचे याचे वस्तुपाठ घालून दिले साहेबांनी. त्यामध्ये त्यांचा स्वत:चा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या शब्दांना धार आणत होता.

 या प्रशिक्षणातून तयार झालेल्या सर्वांना पोलिस ते सैनिक असा बदल अनुभवाला येऊ लागला. अतिरेक्यांसोबत चकमकी तर होतच होत्या, पण त्यात पोलिसांची हानी लक्षणीयरीत्या कमी होऊ लागली, बहादुरी गाजवणा-या पोलिसांना पदके प्रदान केली जाऊ लागली. या भागात नेमणूक म्हणजे शिक्षा हा समज हळूहळू कमी होऊ लागला.

 पंवर साहेबांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती मग झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी दहा राज्यांनी केली.. साहेबांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपापल्या पद्धती विकसित केल्या. पूर्वी नक्षली अतिरेकाविरोधात भारतीय सैन्य बोलवावे, त्यांची मदत घ्यावी अशी मागणी होत असे. आता सैन्यासारखीच क्षमता पोलिसांमध्येही ब-याच प्रमाणात आल्याने तशी फारशी वेळ आली नाही… पोलिसांचे रुपांतर सैनिकांत होऊ लागले होते… पंवर साहेब या कार्यात थोडीथोडकी नव्हेत… अठरा वर्षे सक्रीय राहिले! सैन्यातील प्रत्यक्ष सेवा आणि नंतरची ही सेवा मिळून साहेबांनी किमान पन्नास वर्षे देशसेवा बजावली. यावर्षी नक्षलवादी सशस्त्र संघर्ष जवळपास संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत… येत्या काळात सर्वच नक्षलवादी मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील.. अशी आशा आहे. पण ही प्रक्रिया कित्येक वर्षांपूर्वी सुरु झाली होती… त्यात ब्रिगेडीअर बसंत पंवर (पन्वर) या महान योध्याच्या कार्यकुशलतेचा, नियोजन, नेतृत्व आणि मुख्य देशसेवेच्या अपार इच्छाशक्तीचा सिंहाचा वाटा होता… हे काळाला मान्यच करावे लागेल! 

आपल्याकडे महान माणसांची महती त्यांच्या मृत्यूनंतरच सामान्य लोकांना समजते… ब्रिगेडीअर साहेबांचेही काही निराळे झाले नाही… १ फेब्रुवारी, २०२३ रोजी साहेबांनी या दीर्घ सेवेतून निवृत्ती घेतली… कारण मिशन पूर्ण झाले होते! शरीराला आरामाची आवश्यकता होतीच… शिवाय कुटुंब आता वाट पहात होते… २०११ मध्ये अर्धांगिनी स्वर्गवासी झाल्या होत्या. दोन सुपुत्र तर सेनेत अधिकारी बनून सीमेवर सेवा करीत होतेच. त्यामुळे तेही फारसे घरी नसत. पण आई वाट पहात होती. त्या बिचारीने ७१ च्या लढाईतून आपला पोर सहीसलामत परत यावा यासाठी देवाला साकडे घातले असेल… पोरगं लढत राहिले पुढची कित्येक वर्षे. साहेबांनी २०२३ मध्ये २७ फेब्रुवारीला अत्यंत वृद्ध झालेल्या आईच्या गळ्यात हार घातला… आणि चरणस्पर्श केला! आई… मी घरी आलो आहे… सुरक्षित! 

 साहेबांना विशिष्ट सेवा मेडल तर मिळाले होतेच… पुढे अति विशिष्ट सेवा मेडलही तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते दिले गेले… त्याही वयात साहेबांनी उत्कृष्ट परेड चाल म्हणजे विशिष्ट सैनिकी पद्धतीने चालत जात राष्ट्रपती महोदयांना अभिवादन केले होते! 

७७ वर्षे, ४ महिने आणि २४ दिवसांच्या देदीप्यमान आयुष्यानंतर २७ जुलै, २०२६ रोजी ब्रिगेडीअर बसंत पंवर साहेबांनी या जगाचा निरोप घेतला… हाती घेतलेलं कार्य तडीस नेले… असे सैन्याधिकारी देशाला लाभले हे आपले मोठेच सुदैव. साहेबांना करावे तेवढे अभिवादन कमीच पडेल! Maratha Light Infantry मधून सैनिकी जीवन सुरु करणा-या या महान सैनिकाने बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! हा जयजयकार खरा करून दाखवत शिवरायांची युद्धनीती जगून दाखवली आणि 37 हजार जवानांना शिकवली सुद्धा! Fight a guerrilla like a guerrilla पोलिसांतून कमांडो निर्माण करणारे ब्रिगेडीअर पंवर साहेब आपले भूषण आहेत. जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ९१ – – 

नको वीट मानू रघुनायेकाचा ।

अती आदरे बोलिजे राम वाचा ।

न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।

करी घोष त्या जानकीवल्लभाचा ।।९१।।

अर्थ : समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात, ” हे मना, भगवंताच्या नामाचा कंटाळा (वीट) येऊ देऊ नकोस. आपल्या मुखाने अत्यंत आदरपूर्वक रामाचे नाव घे. त्यासाठी एक पैसा देखील खर्च करावा लागत नाही. जानकीला म्हणजे सीतेला अत्यंत प्रिय असलेल्या अशा त्या श्रीरामांच्या नामाचा सतत घोष कर.

(वाचा – मुखाने, न वेचे – खर्च करावे लागत नाही)

विवेचन :  मनामाचे महत्वच या ठिकाणी अधोरेखित करताना समर्थ म्हणतात की हे मना, राघवाच्या नामाचा म्हणजे ते नाम घेण्याचा मुळीच कंटाळा करू नकोस. सामान्य माणसांची मानसिकता समर्थ जाणून आहेत. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली तरी आपल्याला कंटाळा येतो. भगवंत हा तर निर्गुण, निराकार. काही काळ हे नाम घेतल्यानंतर त्याचा काही अनुभव जेव्हा मिळत नाही, तेव्हा सामान्य माणूस ती गोष्ट सोडून देतो. आपण दृश्य जगात जास्त अडकतो. ध्यान करायला बसलो तर डोक्यात नाना विचार येतात. चित्त एकाग्र होत नाही. एखादे उत्तम पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला टीव्ही पाहायला, मोबाईल बघायला जास्त आवडते. दृश्याकडे आपली धाव जास्त असते. तसा अनुभव नामात मिळायला दीर्घ काळ जावा लागतो. नामाची साधना न कंटाळता सातत्याने निश्चयपूर्वक सुरु ठेवावी लागते. हे नामच मला तारून नेईल. या जन्मी जरी मला भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी पुढील जन्मी का होईना पण ती होईल. परंतु मी भगवंताचे नाम घेणे सोडणार नाही असा निर्धार हवा. ज्याला भगवंत हवा आहे, त्याला श्रद्धेने भगवंताचे नाम अखंड मुखात यायलाच हवे.

ते नाम किती सोपे आहे! त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. भगवंत प्राप्तीचे इतरही मार्ग आहेत. काही मार्गात कठोर तपश्चर्या करावी लागते, तर कोठे तीर्थयात्रा, यज्ञयागादी गोष्टींसाठी भरपूर पैसा लागतो. नामासाठी या कोणत्याच गोष्टी लागत नाहीत. बसल्याजागी काम करताना देखील हरिनामाचा जप करता येतो. म्हणूनच भगवंत प्राप्तीचा हा सोपा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात. या मार्गाने भगवंत विनासायास प्राप्त होतो. आपण हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट शोधत असतो. भगवंत प्राप्तीसाठी ‘ नाम ‘ हाच शॉर्टकट समजायला हरकत नाही. संत सोयराबाई म्हणतात, ” सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ” सर्व संतांचे हेच सांगणे आहे. शब्द वेगळे असतील पण सांगण्यात एकवाक्यता आहे.

समर्थांनी या श्लोकात श्रीरामाच्या एका लोकप्रिय नामाचा उल्लेख केला आहे. ‘ जानकीवल्लभ ‘ हे ते नाम! सीता जनक राजाची कन्या म्हणून जानकी. जानकीला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे. ती म्हणजे श्रीराम!अशा या सीतामातेला जो प्रिय आहे, तो श्रीराम आपल्यालाही प्रिय व्हावा. त्याचेच नाम आपल्या मुखात सातत्याने यावे असे समर्थाना वाटते. ज्यांनीं ज्यांनी त्याचे नाम घेतले ते हा भवसागर तरून गेले. त्यानेच आपले कल्याण होईल. “अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं।” या मंत्रातला गोडवा जो प्रेमाने आणि आदराने ते नाम घेईल, त्यालाच कळेल. गोंदवलेकर महाराज रामनामात पेढ्यासारखी गोडी आहे असे म्हणतात. पण पेढा गोड आहे असे नुसते म्हटले तर त्याची गोडी थोडीच जिभेवर येते? त्यासाठी तो खाऊनच पाहावा लागतो. पेढ्याचा कोणताही तुकडा खाल्ला तरी तो गोडच लागणार. तसेच भगवंताचे नाम आहे. त्याचे कोणतेही नाम गोडच आहे. ‘ केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. ‘अनुभवून तर बघा!

स्वसंवाद :: 

१. मोबाईल किंवा टीव्ही तासनतास बघताना मला कंटाळा येत नाही, मग विनामूल्य असणारे रामनाम घेताना माझ्या मनाला ‘वीट’ (कंटाळा) का येतो?

२. “नामस्मरण हाच भवसागर तरून जाण्याचा सर्वात सोपा आणि विनासायास मिळणारा शॉर्टकट आहे, ” या संतांच्या वचनावर माझा दृढ विश्वास बसला आहे का?

३. जानकीवल्लभ श्रीरामांचे नाम केवळ ओठांवरून उच्चारण्याऐवजी, मी कधी पेढ्यासारखी त्याची आंतरिक गोडी अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का?

४. संत चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे, मी माझ्या रोजच्या कामाच्या व्यापातून किती वेळ ‘आवडीने आणि आदराने’ त्या विठोबाचे किंवा राघवाचे नाव घेण्यासाठी काढतो?

=====

श्लोक क्र. ९२ – – 

अती आदरे सर्व ही नामघोषे ।

गिरीकंदरे जाइजे दुरि दोषे ।

हरी तिष्ठतु तोषला नामतोषे ।

विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।

अर्थ : भगवंताच्या नामाबद्दल अत्यंत आदर बाळगून जो कोणी त्याचे नामस्मरण करतो, त्याचे सर्व दोष दूर गिरिकंदरी म्हणजे लांब निघून जातात. ज्या ठिकाणी आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंतांचे नामस्मरण सुरु असते, तिथे भगवंत अत्यंत संतुष्ट होऊन वास्तव्य करीत असतो. भगवान शंकरांना रामनामाचे विशेष वेड लागले आहे (आणि ते सतत त्याचे नामस्मरण करीत असतात)

(गिरिकंदरी – पर्वतांमधील गुहेत, तिष्ठतु – थांबून राहतो, तोषणे – संतोष/आनंद होणे, पिसे – वेड)

विवेचन : भगवंताचे नाम सर्व दोष हरण करणारे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे माहात्म्य स्पष्ट करताना समर्थ म्हणतात की जो कोणी भगवंताचे आदरपूर्वक नामस्मरण करतो त्याचे दोष दूर म्हणजे गिरिकंदरी निघून जातात. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की समर्थ भोजन प्रसंगी आपल्याला भगवंताचे नाम मोठ्याने गजर करून आदरपूर्वक म्हणायला सांगतात. या श्लोकात ते भगवंताचे नाम आपल्याला मोठ्याने उच्चारून म्हणायला सांगतात. मोठ्याने म्हणणे म्हणजे वैखरीने म्हणणे. आधी सुरुवात वैखरीपासून करावी लागते. मग ते नाम क्रमाक्रमाने मध्यमा, पश्यन्ती या वाणींच्या प्रकारांमार्फत परा वाणीपर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा मनातल्या मनात नामजप सुरु असतो. पण त्यावेळी मन दुसरीकडे कुठेतरी असते. म्हणजे मानसिक जपात यांत्रिकता येण्याचा संभव असतो. मुखाने हे नाम उच्चारले तर आपले लक्ष त्या नामाकडे राहते. आपल्या भोवती असणाऱ्या इतर लोकांच्या कानावरही हे नाम आपोआप पडते.

भगवंताचे नाम घेण्यासाठी दूर कुठे गिरिकंदरात जावे लागत नाही. आपण त्याचे नाम घेऊ लागलो की आपल्यातील दोषच दूर गिरिकंदरात निघून जातात. जिथे नाम आहे तिथे दोष राहणे शक्य नाही. जिथे उजेड आहे, तिथे अंधार कसा राहील? तुकाराम महाराज सुद्धा नामाचे महत्व सांगताना म्हणतात

नामसंकीर्तन साधन पैं सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वदा ॥

– – श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत समर्थ आपल्याला परमेश्वराचे वास्तव्य नेमके कुठे असते हे सांगतात. जिथे परमेश्वराचे नामस्मरण, गुणगान आदरपूर्वक किंवा मोठया प्रेमाने चाललेले असते, तिथे तो स्वतःच उपस्थित असतो. त्याला शोधण्यासाठी कुठे दुसरीकडे जावे लागत नाही. आपल्याजवळच तो सदैव उभा असतो. वरील अभंगात तुकाराम महाराजांनी पण हेच सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा ‘ जेथे नाम तेथे माझे प्राण ‘ असे म्हणतात.

नाम घेणे हे वरवर सोपे वाटते. गोंदवलेकर महाराजांचे ३६५ दिवसांच्या प्रवचनाचे एक पुस्तक आहे. यातील प्रत्येक प्रवचनात गोंदवलेकर महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळी उदाहरणे देऊन नामाचा महिमा आपल्याला पटवून दिला आहे. त्यामुळे नाम घेणे सोपे आहे, त्यात विशेष ते काय असे आपल्याला वाटते? पण जी गोष्ट ऐकायला सोपी वाटते, ती करायला तेवढीच कठीण असते. कारण ती करण्यासाठी निर्धाराची गरज असते. आपण कमी पडतो ते इथेच! रामनामाचे किंवा भगवंताच्या नामाचे वेड लागले पाहिजे. ज्यांना एखाद्या गोष्टीचे वेड लागते, असेच लोक जीवनात काही करून दाखवतात. इथे समर्थ आपल्याला पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यांना रामनामाचे पिसे म्हणजे वेड लागले आहे असे समर्थ म्हणतात. भगवान शंकर एवढे देवाधिदेव. परंतु ते देखील रामनाम जपत असतात. त्याचे महत्व वारंवार माता पार्वतीला समजावून सांगत असतात.  

रामाची भूपाळी गाताना समर्थ म्हणतात…

उठोनिया प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।

स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥

भाविक जनहो, प्रातःकाळी उठून रामनामाचे स्मरण करा. तो चंद्रमौळी म्हणजे स्वतः शिवशंकर देखील शैलपुत्रीसह म्हणजे माता पार्वतीसोबत श्रीरामांचे ध्यान करतो.  

स्वसंवाद :: 

१. मी माझे दोष दूर करण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी बाह्य साधनांमागे धावतो आहे, की माझ्याच अंतरी रामनामाचा उजेड पाडून अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतोय?

२. मनातल्या मनात नाम घेताना माझे मन संसाराच्या चिंतेत ‘यांत्रिकपणे’ भटकत राहते का? माझ्या नामात आदर आणि एकाग्रता आणण्यासाठी मी काय करायला हवे?

३. गोंदवलेकर महाराजांच्या वचनानुसार, “जेथे नाम तेथे माझे प्राण” यावर माझा विश्वास आहे का?

४. भूपाळीत म्हटल्याप्रमाणे जर प्रत्यक्ष चंद्रमौळी शिवशंकर शैलबाळीसमवेत उठोनिया प्रातःकाळी रामनाम जपत असतील, तर मग माझ्या दिवसाची सुरुवात मी रामनामाने करतो का?

– क्रमशः श्लोक ९१ आणि ९२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares