मराठी साहित्य – ई-अभिव्यक्ति संवाद ☆ दिग्गज श्रेष्ठ साहित्यिक  ‘पद्मभूषण’ श्री. पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन. – मनःपूर्वक श्रद्धांजली ☆ संपादक मंडळ,  ई – अभिव्यक्ति ☆

 

💐🙏 १२ जून… केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी रसिकांचे अतिशय लाडके आणि आदरणीय व्यक्तिमत्व अशीच ओळख असणारे दिग्गज श्रेष्ठ साहित्यिक ‘पद्मभूषण’ श्री. पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन. 💐🙏

खरं तर पु.ल. हे एक असं व्यक्तिमत्व जे रसिकांच्या विस्मरणात कधीच जाऊ शकत नाही. मानवी स्वभावाचे अगदी अचूक परीक्षण करून त्यावर नेमकेपणे प्रकाश टाकणारे ‘ व्यक्ती आणि वल्ली ‘, ‘ बटाट्याची चाळ’ सारखे त्यांचे कथासंग्रह, ‘ अपूर्वाई ‘,’ पूर्वरंग ‘ यासारखी त्यांची बोलकी आणि चित्रमय भाषेतली प्रवासवर्णने, ‘ तुझे आहे तुजपाशी ‘, ‘ ती फुलराणी ‘ सारखी समाजातल्या विसंगत मनोवृत्तीवर नेमके बोट ठेवणारी आणि बोधप्रद कथाबीज असणारी त्यांची नाटके, अशी त्यांची  साहित्य-क्षेत्रातली अष्टपैलू कामगिरी ‘ कालातीत ‘ म्हणावी अशीच आहे यात दुमत असणारच नाही. 

पु.ल. हे केवळ लेखक नव्हते हे तर सर्व रसिक जाणतातच. ते एक उत्तम हार्मोनियम वादक तर होतेच, पण तितकेच उत्तम संगीतकारही होते…. हो, आणि उत्तम अभिनेतेही. ‘ गुळाचा गणपती ‘ सारख्या मोजक्याच चित्रपटातला त्यांचा अभिनय मनाला भिडणारा होता. आणि ‘ बटाट्याची चाळ ‘ सारखे त्यांचे एकपात्री प्रयोग तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारे .. आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे. 

या असामान्य साहित्यिकाबद्दल आणि त्यांच्या अमर साहित्यकृतींबद्दल बोलावे तितके कमीच. पण या बरोबरच त्यांच्या व्यक्तित्वातला एक असामान्य गुण म्हणजे त्यांचे “ दातृत्व “. “ पु.ल.देशपांडे फाउंडेशन “ या स्वस्थापित संस्थेच्या नावाने त्यांनी आपल्या कमाईतला खूप मोठा हिस्सा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आणि शाळांना देणगी म्हणून दिलेला होता.  

त्यांच्या अष्टपैलू साहित्यासाठी आणि कलासेवेसाठी अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले होतेज्यात प्रामुख्याने १९६५ चा साहित्य अकादमी पुरस्कार (व्यक्ती आणि वल्लीसाठी), १९६६ चा पद्मश्री आणि १९९० चा पद्मभूषण यांचा समावेश आहे. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६७), कालिदास सन्मान (१९८७) आणि महाराष्ट्र भूषण (१९९६) पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.पु.ल. देशपांडे यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार:साहित्य अकादमी पुरस्कार: १९६५ (व्यक्ती आणि वल्लीसाठी)पद्मश्री: १९६६संगीत नाटक अकादमी पुरस्कार: १९६७संगीत नाटक अकादमी फेलोशिप: १९७९कालिदास सन्मान: 

शिवाय १९८७ पद्मभूषण: १९९० पुण्यभूषण: १९९२ महाराष्ट्र भूषण पुरस्कार: १९९६ महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार… असे कितीतरी मानाचे पुरस्कार मिळालेले होते.  

१९९९ साली त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांच्या नावानेपु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ‘ ही त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत उभारलेली संस्था ही त्यांना दिलेली सर्वात मोठी आदरांजली म्हणायला हवी. 

आज त्यांच्या स्मृतिदिनी आपल्या ई-अभिव्यक्ती समूहातर्फे या ‘ग्रेट’ साहित्यिकाला मनःपूर्वक श्रद्धांजली देतांना त्यांचे आत्मचिंतनपर आणि हृद्य विचार नक्कीच विचार करावा असेच – – – 

मला एकच समाधान आहे. हे जे काही केलं त्यातून कुणाच्या तरी जीवनामध्ये थोडाफार आनंद निर्माण करू शकलो. म्हणूनच …. ‘ तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हांसी । ‘ असे म्हणणारे तुकाराम मला आप्त वाटतात. माझं गणगोत खूप आहे. आता संध्याछायांना केव्हा दाटायचं तेव्हा दाटू देत. ऐलतीरावरचं पाहण्यासारखं इतकं आहे, की पैलतीराची चिंता मी कशाला करायची ? माझी मैफिल चालूच आहे ….  

मनःपूर्वक श्रद्धांजली 💐🙏


संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ति, मराठी विभाग. 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ – अखिल भारतीय एवं प्रादेशिक कृति पुरस्कार – कैलेण्डर वर्ष 2024 के पुरस्कारों की घोषणा – ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹– अखिल भारतीय एवं प्रादेशिक कृति पुरस्कार – कैलेण्डर वर्ष 2024 के पुरस्कारों की घोषणा –🌹

(हमारे लिए यह गौरव का विषय है कि पुरस्कार की घोषणा की इस सूचि में  ई-अभिव्यक्ति के श्री विवेक रंजन श्रीवास्तव जी, संपादक (हिंदी) को उनकी सुविख्यात कृति “जलनाद” पर प्रादेशिक हरिकृष्ण प्रेमी (नाटक) सम्मान की घोषणा की गई है. ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से उन्हें हार्दिक बधाई 💐

– हेमन्त बावनकर, संस्थापक संपादक 

भोपाल। साहित्य अकादमी, मध्यप्रदेश संस्कृति परिषद्, मध्यप्रदेश शासन संस्कृति विभाग, भोपाल द्वारा अखिल भारतीय एवं प्रादेशिक कृति पुरस्कार कैलेण्डर वर्ष 2024 के पुरस्कारों की घोषणा कर दी गई है। अखिल भारतीय प्रति पुरस्कार रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख) एवं प्रादेशिक प्रति पुरस्कार रुपये 51,000/- (रुपये इक्यावन हजार) के साथ शाॅल, श्रीफल, स्मृति चिह्न और प्रशस्ति के साथ रचनाकारों को अलंकृत किया जाता है। साहित्य अकादमी के निदेशक डाॅ. विकास दवे ने बताया कि अधिकांश पुरस्कारों हेतु दो श्रेष्ठ कृतियों को संयुक्त रूप से जूरी द्वारा चयनित किया गया है।

अखिल भारतीय कृति पुरस्कार

अखिल भारतीय पं. माखनलाल चतुर्वेदी (निबंध) डाॅ. शकुंतला कालरा-दिल्ली की कृति ‘बच्चे और आप’ एवं श्री अखिलेन्द्र मिश्र-मुम्बई की कृति ‘अभिनय अभिनेता और अध्यात्म’, 2. अखिल भारतीय गजानन माधव मुक्तिबोध (कहानी) श्री चरणसिंह अमी-इंदौर की कृति ‘अतुकांत’ एवं डाॅ. पूजा हेमकुमार अलापुरिया-मुम्बई की कृति ‘कभी पैसा तो कभी किताब’, 3. अखिल भारतीय राजा वीरसिंह देव (उपन्यास) डाॅ. वीणा सिन्हा-भोपाल की कृति ‘अग्निगर्भ में जलती पंखुरियाँ’ एवं श्री सुयश त्यागी-भोपाल की कृति ‘छूटते किनारे’, 4.अखिल भारतीय आचार्य रामचन्द्र शुक्ल (आलोचना) श्री पवन विजय-गाजियाबाद की कृति ‘मास्क मैनिफेस्टो’ एवं श्री लहरी राम मीणा-वाराणसी की कृति ‘सृजन के विविध रूप और आलोचना’, 5. अखिल भारतीय पं. भवानी प्रसाद मिश्र (गीत एवं हिन्दी गजल) श्री सुशील साहिल-गोंडा की कृति ‘यहाँ सब लोग हँसते बोलते हैं’ एवं श्री शैलेन्द्र पाण्डेय-सरायकेला की कृति ‘आईने के जाविये’, 6. अखिल भारतीय अटल बिहारी वाजपेयी (कविता) श्री अजीत कुमार पुरी-दिल्ली की कृति ‘आह्लादित है अयोध्या’ एवं  डाॅ. कौशल दुबे-जबलपुर की कृति ‘तथागत’, 7. अखिल भारतीय कुवेरनाथ राय (ललित निबंध) श्री संजीव शर्मा-भोपाल की कृति ‘अयोध्या 22 जनवरी’ एवं श्री संजय सक्सेना-राजगढ़ की कृति ‘डायरी का मुड़ा हुआ पन्ना’, 8. अखिल भारतीय विष्णु प्रभाकर (आत्मकथा-जीवनी) पं. कमलकांत शर्मा-दतिया की कृति ‘शबरी दर्शन’ एवं श्री मनीष कुमार पाटीदार-महेश्वर की कृति ‘जिंदगी का सफर किशोर कुमार’, 9. अखिल भारतीय निर्मल वर्मा (संस्मरण) श्री रवीन्द्र कुमार दुबे-इंदौर की कृति ‘एक दुनिया ऐसी भी’ एवं ऋचा दीपक कर्पे-देवास की कृति ‘यादों का सुनहरा सफर’, 10. अखिल भारतीय महादेवी वर्मा (रेखाचित्र) डाॅ. प्रीति खरे-भोपाल की कृति ‘नानी का घर ढूँढ़ रही हूँ’ एवं श्री अशोक पटेल-शहडोल की कृति ‘वनगीता’, 11. अखिल भारतीय प्रो. विष्णुकांत शास्त्राी (यात्रा-वृत्तांत)  डाॅ. जितेन्द्र कुमार सोनी-जयपुर की कृति ‘ओकुहेपा’ एवं डाॅ. शिव कुमार व्यास-जबलपर की कृति ‘हिंदी में यात्रा वृत्तांत’, 12. अखिल भारतीय भारतेन्दु हरिश्चन्द्र (अनुवाद) डाॅ. श्रीनिवास शुक्ल ‘सरस’-सीधी की कृति ‘लोकपुराण’ एवं डाॅ. दंतू मुरली कृष्ण-भोपाल की कृति ‘जीवन गीता’, 13. अखिल भारतीय नारद मुनि (फेसबुक/ब्लाग/नेट) श्री मनोज जैन मधुर-भोपाल का पेज ‘फेसबुक/ब्लाॅग/नेट’ एवं श्री कृष्णमुरारी त्रिपाठी ‘अटल’-रायपुर का पेज ‘फेसबुक/ब्लाॅग/नेट’ को दिया गया है।

प्रादेशिक कृति पुरस्कार

प्रादेशिक वृन्दावन लाल वर्मा (उपन्यास) श्री ब्रजेश राजपूत-भोपाल की कृति ‘द एवरेस्ट गर्ल’ एवं गीता शुक्ला गीत-रीवा की कृति ‘चांद मायूस क्यों है’, 2. प्रादेशिक सुभद्रा कुमारी चैहान (कहानी) श्री सूर्यकांत नागर-इंदौर की कृति ‘ग्यारह कहानियाँ’ एवं कला जोशी-इंदौर की कृति ‘जागते सपने’, 3. प्रादेशिक श्रीकृष्ण सरल (कविता) श्री राजेंद्र कोचला अम्बर-इंदौर की कृति ‘इस देश के लिए’ एवं श्री गोकुल प्रसाद सोनी-भोपाल की कृति ‘सीता-स्वयंबर’, 4. प्रादेशिक आचार्य नंददुलारे वाजपेयी (आलोचना) श्री रमण रावल-इंदौर की कृति ‘युग पुरुष मोदी’ एवं डाॅ. सांत्वना श्रीकांत-भोपाल की कृति ‘भारतीय नारी स्थिति और गति’, 5. प्रादेशिक हरिकृष्ण प्रेमी (नाटक) श्री विजय ‘बेशर्म’-गाड़रवाड़ा की कृति ‘जिंदगी ही नाटक है’ एवं श्री विवेक रंजन श्रीवास्तव-भोपाल की कृति ‘जलनाद’, 6. प्रादेशिक राजेन्द्र अनुरागी (डायरी) डाॅ. अभय अरविन्द बेडेकर-अलीराजपुर की कृति ‘कोरोना योद्धा की संघर्ष कथा’, 7. प्रादेशिक पं. बालकृष्ण शर्मा ‘नवीन’ (प्रदेश के लेखक की पहली कृति) श्री जवाहर कर्णावत-भोपाल की कृति ‘विदेश में हिंदी पत्राकारिता’ एवं डाॅ. राकेश सिंघई-इंदौर की कृति ‘वक्रोक्ति’, 8. प्रादेशिक ईसुरी (लोकभाषा विषयक) अर्चना मण्डलोई-इंदौर की कृति ‘गेरी-गेरी छाँव’ एवं श्री सौरभ लाड़-इंदौर की कृति ‘गरीब मनुस का उल्टा पांय’, 9. प्रादेशिक हरिकृष्ण देवसरे (बाल साहित्य) श्री राजा चैरसिया-कटनी की कृति ‘बचपन है फुलवारी’ एवं नीना सिंह सोलंकी-भोपाल की कृति ‘मुनिया की खुशी’, 10. प्रादेशिक नरेश मेहता (संवाद, पटकथा लेखन)  डाॅ. मीनाक्षी दुबे-भोपाल की कृति ‘कथा कल्पतरु’, 11. प्रादेशिक जैनेन्द्र कुमार ‘जैन’ (लघुकथा) श्री देवेन्द्र सिंह सिसोदिया-इंदौर की कृति ‘शुभ मुहूर्त’ एवं डाॅ. यशोधरा भटनागर-देवास की कृति ‘एक मुट्ठी मिट्टी’, 12. प्रादेशिक सेठ गोविन्द दास (एकांकी) डाॅ. साधना शुक्ला-भोपाल की कृति ‘नाट्योन्मेष’ एवं  श्री अभिमन्यु जैन-जबलपुर की कृति ‘लोकमाता अहिल्याबाई होलकर’, 13. प्रादेशिक शरद जोशी (व्यंग्य) श्री सुधीर देशपाण्डे-खण्डवा की कृति ‘परम सत्ता से पे्रम’ एवं डाॅ. सौरभ जैन-इंदौर की कृति ‘रील नाम सत्य है’, 14. प्रादेशिक वीरेन्द्र मिश्र (गीत) सुश्री मीरा भार्गव ‘सुदर्शना’-कटनी की कृति ‘परम सत्ता से प्रेम’ एवं श्री अमन अक्षर-मून्दी की कृति ‘एक लड़की’, 15. प्रादेशिक दुष्यंत कुमार (ग़ज़ल) श्री वृन्दावन राय सरल-सागर की कृति ‘गजलों का गुलशन’ एवं श्री हरिवल्लभ शर्मा ‘हरि’-भोपाल की कृति ‘ये अँधेरों की पैरवी वाले’ को दिया गया है।

(डाॅ. विकास दवे)

निदेशक

≈संस्थापक संपादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसृष्टी… + संपादकीय निवेदन – सौ. दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

कोकण मराठी साहित्य परिषद,विले पार्ले यांनी प्रकाशित केलेल्या काव्यतरंग या सामुहिक काव्यसंग्रहात , आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका दीप्ती कुलकर्णी यांची     शब्दसृष्टी ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे .एकूण १७५ कवितांपैकी फक्त निवडक ७५ कविता या संग्रहात घेतल्या आहेत.कवितेच्या निवडीबद्दल दीप्ती कुलकर्णी यांचे मन: पूर्वक अभिनंदन

आज ही कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ?

☆ “शब्दसृष्टी” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

कविता ही माझी |

शब्दांचाच साज ||

प्रतिभेचा बाज |

संगतीला………||||

शब्दांचे ते रुप |

वेधक ही ठरे ||

क्षणातच स्फुरे |

आनंदात……..||||

 *

एकली मी नसे |

सोबतीस येते ||

मनोमनी लेते |

शब्दलेणे ………||||

 *

अक्षरांचा गंध |

घेई वेडे मन ||

फुलतसे तन |

चाहुलीने………||||

 *

माझी ही कविता |

ठाव लेते जनी ||

बोलविता धनी |

निसर्ग तो ………||||

 *

मनाचा गाभारा |

भावनांचा स्नेही ||

प्रतिबिंब पाही |

सुखदु:ख ………..||||

 *

मनी शब्दसृष्टी |

निसर्गाचे रुप ||

वाटते अप्रुप  |

दीप्ती म्हणे……..||||

© सौ. दीप्ती कुलकर्णी

भ्र. ९५५२४४८४६१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीराम गाथा.. + संपादकीय निवेदन – सौ.मंजुषा सुधीर आफळे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. मंजुषा सुधीर आफळे

🌹 अभिनंदन 🌹

तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत श्रीराम नवमी निमित्त आयोजित काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. मंजुषा सुधीर आफळे यांच्या काव्य रचनेस सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐

त्यांची पुरस्कार प्राप्त काव्य “श्रीराम गाथा” आज प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रीराम गाथा… ☆ 🖋 सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆

(पुरस्कार प्राप्त काव्य)

 श्रीराम गाथा महान

आदर्श जीवन तत्व

आचरावे जीवनात

साधावया ते ममत्व.

शब्द शब्द जो सुखाचा

सारासार तो विचार

शिकवण मानवास

हलका करेल भार.

 *

राम नाम सत्य थोर

कल्याण ते साधताना

एकनिष्ठ, सत्यवचनी

कठोर, न्याय देताना.

 *

अती नम्र, मृदू वाणी

कोमल हृदयी गोडवा

ग्रंथ, थोर रामायण

कथा मनात ठसवा.

 *

राम गाथा जप तप

सतत नामस्मरणी

चिंता संपेल मानवा

बोलती मारूती स्वामी.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

सांगली.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ बच्चों में वैज्ञानिक सोच और कल्पनाशीलता बढ़ाने का अनोखा जरिया: ‘चंद्र बस्ती का रहस्य’ ☆ साभार – श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ बच्चों में वैज्ञानिक सोच और कल्पनाशीलता बढ़ाने का अनोखा जरिया: ‘चंद्र बस्ती का रहस्य’ ☆ साभार – श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’

यह समाचार आज के समय में बच्चों के बढ़ते स्क्रीन टाइम को कम करने और उनमें ‘वैज्ञानिक सोच’ (Scientific Temperament) पैदा करने जैसे सामाजिक सरोकार से जुड़ा है। नेशनल बुक ट्रस्ट की यह प्रस्तुति अभिभावकों और शिक्षकों के लिए बेहद मार्गदर्शन करने वाली साबित होगी। – श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’

रतनगढ़ (निप्र)। आज के डिजिटल युग में जहाँ बच्चे मोबाइल स्क्रीन और गेमिंग की दुनिया में खोए जा रहे हैं, वहीं उनकी कल्पनाशीलता को आसमान की उड़ान देने और उनमें वैज्ञानिक दृष्टिकोण (Scientific Temperament) विकसित करने के लिए एक बेहतरीन पहल की गई है। नेशनल बुक ट्रस्ट (NBT) द्वारा प्रकाशित नया किशोर उपन्यास ‘चंद्र बस्ती का रहस्य’ बाल-मन को भविष्य के विज्ञान से जोड़ने में एक मील का पत्थर साबित हो रहा है।

भविष्य की परिकल्पना को साकार करता उपन्यास:

आज पूरी दुनिया के वैज्ञानिक चंद्रमा और मंगल ग्रह पर मानव बस्ती बसाने की नई-नई परिकल्पनाओं पर काम कर रहे हैं। भविष्य के इसी गर्भ में छिपे सपने को आज के बच्चों के सामने एक रोमांचक ताने-बाने में पिरोकर प्रस्तुत किया है जाने-माने बाल साहित्यकार ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ने। यह उपन्यास केवल एक कहानी नहीं, बल्कि भविष्य के विज्ञान का एक सजीव खाका है।

अभिभावकों और शिक्षकों के लिए क्यों है बेहद उपयोगी?

शिक्षाविदों और बाल मनोवैज्ञानिकों का मानना है कि बच्चों को केवल किताबी ज्ञान देने के बजाय यदि उन्हें कल्पना की उड़ान दी जाए, तो उनकी सोचने की क्षमता कई गुना बढ़ जाती है। यह उपन्यास इस मामले में समाज के लिए बेहद उपयोगी है क्योंकि:

तनावमुक्त ज्ञान: यह बच्चों को भारी-भरकम विज्ञान की बातें बेहद मनोरंजक और सरल तरीके से सिखाता है।

रचनात्मकता का विकास: मोबाइल की लत छुड़ाकर बच्चों में फिर से पढ़ने (Reading Habit) की आदत को विकसित करता है।

भविष्य के वैज्ञानिक: यह कहानी बच्चों के मन में सवाल उठाती है कि “चंद्रमा पर जीवन कैसे संभव होगा?” जो उन्हें भविष्य का वैज्ञानिक बनने के लिए प्रेरित करता है।

‘नेशनल बुक ट्रस्ट’ की सराहनीय प्रस्तुति:

भारत सरकार के नेशनल बुक ट्रस्ट द्वारा इस उपन्यास का प्रकाशन यह साबित करता है कि इसकी सामग्री बच्चों के लिए कितनी स्तरीय और सुरक्षित है। ‘चंद्र बस्ती का रहस्य’ को पढ़कर बच्चे न सिर्फ अंतरिक्ष विज्ञान के रहस्यों को करीब से जान सकेंगे, बल्कि वे यह भी समझ सकेंगे कि आने वाले समय में मानव सभ्यता का विस्तार कैसे होने वाला है।

यदि आप भी अपने बच्चों को गैजेट्स की दुनिया से बाहर निकालकर एक अद्भुत और ज्ञानवर्धक दुनिया की सैर कराना चाहते हैं, तो यह उपन्यास हर घर की लाइब्रेरी और स्कूल के पुस्तकालय में होना अनिवार्य है।

साभार – श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’

≈ संस्थापक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचनाएँ/Information ☆ संपादकीय निवेदन – “वुमेन आयकॉन अवॉर्ड” – डॉ. भारती माटे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 अ भि नं द न !! 💐 हार्दिक अभिनंदन !!!💐

☆ “वुमेन आयकॉन अवॉर्ड” – डॉ. भारती माटे – अभिनंदन ☆

‘वुमेन वर्ल्ड रेकॉर्ड्स’ द्वारे “वुमेन आयकॉन अवॉर्ड ” हा विशेष असा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो, आणि त्यायोगे प्रेरणादायी आणि अपवादात्मक कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या यशोगाथांचा आणि त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा सन्मान करण्यात येतो.

… आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे, २०२६ सालच्या या प्रतिष्ठित सन्मानासाठी पुणे येथील फाइन आर्टमधील प्रसिद्ध व्हिज्युअल प्रॅक्टिशनर डॉ. भारती माटे यांना निवडले गेले.

… डॉ. भारती माटे या आपल्या ई – अभिव्यक्ती साहित्य- मंचाच्या पहिल्या दिवाळी विशेषांकापासून गेली सतत चार वर्षं या अंकाचे अतिशय सुंदर आणि आकर्षक मुखपृष्ठ तयार करून देणाऱ्या आपल्या समूहातील ज्येष्ठ सदस्या आहेत.

डॉ. भारती माटे यांनी फाइन आर्ट पेंटिंगच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय आणि सर्जनशील कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संस्कृतीतील ‘रांगोळी’ सारख्या प्राचीन लोककलेला स्वतःच्या नवनव्या सिद्धहस्त प्रयोगांतून साकार केलेल्या भावपूर्ण आणि अर्थपूर्ण कलाकृतींद्वारे त्यांनी एक नवे आणि सुंदर रूप दिले आणि त्याद्वारे जमिनीवर असणारी रांगोळी त्यांनी कॅनव्हासवर आणली आहे …जी फ्रेम करून भिंतीवर लावता येते.

ललित कलांच्या दालनात समृद्ध आणि सुंदर भर घालणाऱ्या या कामातले त्यांचे कौशल्य आणि त्यातली त्यांची सफाई विलक्षण आहे. व्हिज्युअल आर्ट्सबद्दलची त्यांची उत्कटता, त्यांच्या नवनवोन्मेषशाली कल्पना आणि सौंदर्यशास्त्राबद्दलचा त्यांचा गाढा अभ्यास आणि त्यासोबतच त्यांचा वचनबद्धपणा यामुळे या विशेष क्षेत्रात त्यांनी स्वतःचा मोठाच ठसा उमटवलेला आहे. याच्या जोडीनेच त्यांच्या या कलात्मक प्रवासाद्वारे उद्याच्या उदयमान कलाकारांना प्रेरणा देत असतांनाच, सांस्कृतिक आणि सर्जनशील अभिव्यक्तीना समृद्ध करण्यात त्या मोठेच योगदान देत आहेत.

त्यांना देण्यात आलेला हा जागतिक पातळीवरचा विशेष पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रतिभेचे, प्रयोगशीलवृत्तीचे, चिकाटीचे आणि फाइन आर्ट्सच्या जगातील त्यांच्या मौल्यवान योगदानाचे प्रमाणपत्र आहे. आणि आपल्या समूहासाठी ही नक्कीच अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

ह्याशिवाय कविता, ललित लेखन, भरतकाम, विविध विषयांवरील संशोधनात्मक लेखन, आणि ही अंगभूत कला आणखी विकसित करण्यासाठी करत असलेली विविध प्रांतांमधली डोळस भटकंती.. अशी त्यांची चौफेर मुशाफिरी नित्य चालूच असते.

आपल्या सर्वांतर्फे भारतीताईंचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि यापुढेही या वेगळ्याच क्षेत्रातली त्यांची विलक्षण म्हणावी अशी वाटचाल याहूनही जास्त दैदिप्यमान ठरो या त्यांना अगदी मनःपूर्वक शुभेच्छा.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ ✒️ प्रा. सुनंदा पाटील – अभिनंदन – ✒️ ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

✒️ प्रा. सुनंदा पाटील ✒️

🌺 अ  भि  नं  द  न  🌺

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री सुनंदा पाटील यांना मुंबईस्थित ‘सर्वद फाउंडेशन‘ या प्रसिद्ध संस्थेतर्फे “ स्टार लेखिका “ हा सन्मानजनक पुरस्कार नुकताच प्राप्त झालेला आहे. सुनंदाताई या कवयित्री, कादंबरीकार, कथालेखिका आणि गझलकार म्हणून साहित्यक्षेत्रात परिचित आहेत. ‘गझलनंदा‘ या नावाने गेली ५० वर्षे त्या गझल-लेखन करत आहेत.

या पुरस्काराबद्दल सुनंदाताईंचे आपल्या सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन, आणि यापुढील अशाच उत्तम आणि यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.💐

आजच्या ‘ मनमंजुषा ‘ सदरात वाचूया त्यांचा एक छान लेख.

संपादक मंडळ

 ई-अभिव्यक्ती मराठी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? सुश्री संगीता कुलकर्णी  – अभिनंदन ?

💐 संपादकीय निवेदन 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ कवयित्री व लेखिका सुश्री संगीता कुलकर्णी यांना नुकताच सर्वद फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे “सर्वद स्टार उत्कृष्ट साहित्यिका” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सर्वद फाउंडेशन, मुंबई ही संस्था मराठी भाषा आणि मराठी संस्कृती-संवर्धन या ध्येयाने कार्यरत असून, या ध्येयाशी निगडीत अनेक कामे या संस्थेमार्फत केली जातात, ज्या अंतर्गत राज्यस्तरीय साहित्य संमेलनही आयोजित केले जाते. या संस्थेतर्फे संगीताताईंना हा मानाचा पुरस्कार मिळणे ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे.

 तसेच “ठाण्याचे विचारदीप” या पुस्तकात त्यांचा साहित्य प्रवास उलगडणारा विशेष लेखही प्रकाशित केला गेला आहे ही सुद्धा अभिनंदनीय गोष्ट आहे.

ई अभिव्यक्ती समूहातर्फे संगीताताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि साहित्य क्षेत्रातली त्यांची वाटचाल उत्तरोत्तर अशीच यशस्वी होत राहो या आपल्या सर्वांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. ?

आजच्या ‘ मनमंजुषा ‘ सदरात वाचू या कवितेविषयीचे त्यांचे विचार.

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अस्सा संसार सुखाचा बाई.. + संपादकीय निवेदन – राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

साहित्य संवेदना प्रस्तुत ‘कवितेचे पान’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत कवयित्री राधिका भांडारकर यांची अस्सा संसार सुखाचा बाई ही कविता सर्वोत्कृष्ट काव्यरचना म्हणून निवडण्यात आली आहे.

राधिका भांडारकर या आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका आहेत. त्यांचे ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!

आपली लेखणी अशीच साहित्याचे अर्थपूर्ण विश्व समृद्ध करत राहो, हीच सदिच्छा व शुभेच्छा ❄️❄️

💐 हार्दिक अभिनंदन! 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

पुरस्कार प्राप्त काव्य

? कवितेचा उत्सव ?

☆ अस्सा संसार सुखाचा बाई… ☆ सौ. राधिका भांडारकर

माझा डाव मजेत मी खेळेन

पिसून आलेले पत्ते नीट लावेन…

 

कशाला ढुंकावे शेजरच्या डावात

असेनाका तिथे एक्क्यांची खैरात..

 

दोघांनी पाळावे हेच सूत्र जीवनी

नाते प्रेमाचे जपावे असे मनोमनी..

 

तुझे माझे कोण्या कारणे करावे

तुझ्यात माझ्यात अहं भेद नसावे…

 

होतील ही मतभेद नि भांडणे

मनी असू द्यावे सुखाचे नांदणे..

 

बंधने कधी नसावीत लादलेली

असावीत ती स्वानंदे पेललेली..

 

स्वातंत्र्य अभिव्यक्ती सदा जपावी

सुखाची हीच गुरुकिल्ली मानावी..

 

‘मीच का?’ प्रश्न दोघात न यावा

संसार दोघांचा सावरून घ्यावा..

 

एकमेकांचा सन्मान हाच महत्त्वाचा

विरोधातही आदर व्हावा विचारांचा..

 

नाते इतके लवचिक असावे

प्रेमातले काटेही कधी न बोचावे…

 

नाही जिथे संशय उथळ आततायी

असा संसार होईल सुखाचा बाई..

©  राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ श्री विश्वास देशपांडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? श्री विश्वास देशपांडे – अभिनंदन ?

💐 संपादकीय निवेदन 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकाला नुकताच तितीक्षा इंटरनॅशनल, पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा – – 

उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

आपल्या सर्वांतर्फे श्री विश्वास देशपांडे यांचे मनःपूर्वक खूप अभिनंदन, आणि त्यांच्या यापुढील अशाच दैदीप्यमान साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

आजच्या अंकातील ‘ पुस्तकावर बोलू काही ‘ या सदरात करून घेऊ.. या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा थोडक्यात परिचय.

संपादक मंडळ

ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares