मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मूकं करोति वाचालं!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मूकं करोति वाचालं! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मूकं करोति वाचालं!

 – – – एका साधू हृदयी सैनिकाची अजरामर कहाणी!

ती केवळ पाच-सात वर्षांची अजाण बालिका… कोणत्याही काश्मिरी कन्येसारखी छान, सुंदर आणि निष्पाप! रुक्साना तीच नाव… रुखसाना म्हणजे गुलाबी गालांची मुलगी! त्या रात्री तिच्या घरातले सर्वजण निद्रेच्या अधीन असतानाच घराच्या दारावर थाप पडली… तिच्या बाबांनी दरवाजा उघडला. एवढ्या रात्री कोण आलं असावं याचं आश्चर्य वाटून डोळे किलकिले केलेली रुक्साना एके-४७ रायफलींच्या गोळीबाराच्या भयावह आवाजाने खडबडून जागी झाली… ती उठून दाराकडे धावली आणि वडीलांना रक्ताच्या प्रचंड थारोळ्यात पडलेली पाहून जागीच थिजली… जणू बर्फाचा एखादा कडा! रुक्सानाच्या वडिलांचा अतिरेक्यांनी खून केला होता… ते भारतीय फौजेला साहाय्य करतात अशा संशयातून. गोष्ट आहे वर्ष १९९८ ची. या प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्याने रुक्साना अशी अबोल झाली जणू जन्मत:च मुकी!

इकडे याच महिन्यात एक तरुण लष्करी अधिकारी, विजयंत थापर नेमणुकीस आला होता. विजयंत यांच्या रूपाने थापर कुटुंबातील चौथा पुरुष भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाला होता… वय केवळ २१ वर्षांचं. डॉक्टर कॅप्टन कर्ताराम थापर पणजोबा, आर्मी ऑफिसर जे. के. थापर आजोबा आणि कर्नल वीरेंद्रनाथ थापर वडील आणि आता लेफ्टनंट विजयंत थापर अशी ही वंशवेल होती. मातोश्री तृप्ता या गृहिणी होत्या. वडील १९९९ मध्ये सेवानिवृत्त व्हायचे होते त्याआधी १९९८ मध्ये विजयंत सेनेत दाखल झाले… एक परंपरा पुढे पाऊल टाकीत होती!

बारकुड्या पण देखण्या, तरतरीत सरळ नाक असलेल्या विजयंतला वडिलांनी ‘रॉबिन’ हे लाडाचे नाव दिले होते… विजयंत होताच तसा रॉबिन पक्षासारखा दिसायला नाजूक पण अत्यंत उत्साही… मृदू काळजाचा. अगदी लहानपणापासून विजयंतच्या वर्तनात एखाद्या साधूची झलक दिसे. कधी कुणाला दुखावणे नाही की शब्दांनी घायाळ करणे नाही. जवळच्या वस्तू आनंदाने दुस-याला देऊन मोकळे होणे त्याला सहजी जमायचे. घरी पाळलेल्या श्वानांचे लाड करणे त्याला आवडायचे. पण हाच नाजूक विजयंत त्याच्या हातात सैनिकी बंदूक आली की एकदम निराळा अवतार धारण करी. तो मोठ्या भावाला ‘पाकिस्तान’ व्हायला लावायचा आणि स्वत: ‘हिंदुस्तान’ बनत युद्धात ‘पाकिस्तान’वर मात करायचा… थापर घराण्यातील आणखी एक तरुण सैनिक होण्याच्या मार्गावर अग्रेसर होत होता! लहानपणी म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी विजयंतने त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसलेला असताना त्यांचे पिस्टल अचूकपणे फायर करून दाखवले होते!

सैनिकी शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून विजयंत प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला, पुणे येथे सैनिकी अधिकारी प्रशिक्षणास पात्र ठरले. मांसाहार, मद्यपान, धुम्रपान यांपासून आयुष्यभर दूर राहण्याचा संकल्प केलेले, विजयंत हे इंद्रदेवाचे नाव धारण केलेले, धार्मिक उपासनेत रत असणारे विजयंत व्यायाम करून शरीर संपदा कमावण्यात मात्र खूप गंभीर असत. त्यामुळे बारीक चण असली तरी त्यांची शारीरिक क्षमता अतिशय उत्तम होती. त्यामुळे एन. डी. ए. आणि पुढे इंडीयन मिलिटरी अकदामी, देहराडून येथून ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांना खरेतर लढाऊ वैमानिक व्हायचे होते पण २, राजपुताना रायफल्स या पायदळ विभागात त्यांची कारकीर्द घडायची होती… ते वडिलांच्या पावलावर पाऊल टाकीत लढाऊ सैनिक बनले. वडील मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी होते!

२, राजपुताना त्याच वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवली गेली. पंजाब राज्यातील रुपनगर मधल्या नांगल येथे बालपण गेलेला विजयंत नावाचा तरुण आता थेट बर्फाळ प्रदेशात आला होता. कुपवाडा येथे नेमणूक असताना रुक्सानाची घटना घडली. कोमल हृदयाच्या विजयंत यांची आणि रुक्सानाची योगायोगानेच गाठ पडली आणि त्यांचे अबोल मैत्र जुळले! तिच्या घरच्यांनी आता रुक्साना कायमची मुकी झाली, असेच गृहीत धरले होते. मात्र विजयंत साहेबांनी हा समज खोटा ठरवला… आणि चमत्कार करून दाखवला.

धकाधकीच्या लष्करी कारवाया आणि अन्य कामांतून वेळ काढून विजयंत साहेब रुक्सानाची भेट घ्यायचे.. तिला खाऊ द्यायचे आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे… दुस-या महिन्यात रुक्सानाची वाचा परत आली… देवाची कृपा असेल तर ‘मुकं करोति वाचालं… हा श्लोक खरा ठरला होता!

१९९९. मे महिन्याच्या आरंभी भारत-पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध सुरु झाले… भारतीय हद्दीत विश्वासघात करून घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला हाकलून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ हाती घेतले!

युद्धात पराक्रम गाजवण्याची मनोमन इच्छा असलेल्या कॅप्टन विजयंत थापर यांना हे युद्ध म्हणजे lifetime opportunity म्हणजे नशीबाने मिळणारी संधी वाटली नसती तरच नवल.

वीरचक्र विजेते कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. बी. रबिन्द्रनाथ साहेबांच्या नेतृत्वात आणि कंपनी कमांडर मेजर पद्मपाणी आचार्य यांच्या सोबत विजयंत तोलोलिंग पर्वत पाकिस्तानी सेनेकडून हिसकावून घेण्याच्या कामगिरीवर निघाले. १२ जून, १९९९ची रात्र. मेजर मोहित सक्सेना साहेबांनी चढवलेल्या हल्ल्याला अपेक्षित यश मिळालेले नव्हते, आपली बरीच हानी झालेली होती. पर्वतावर ‘बर्बाद’ नावाचा एक बंकर (खंदक) होता. यात बसून पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांवर तुफान हल्ला चढवत होते. त्यामुळे पुढे जाण्याचे आपले सर्व प्रयत्न फोल ठरत होते. मग निकराचा प्रयत्न म्हणून याच बंकर वर एकाच वेळी अनेक बोफोर्स तोफांनी तुफान मारा करण्यात आला… आणि त्याच्या आडोशात भारतीय सैनिकांची तुकडी त्या बंकरच्या दिशेने निघाली… समोरून स्वयंचलीत आधुनिक रायफलीमधून अचूक गोळीबार सुरु होता… दगडांचा जमेल तसा आडोसा घेत विजयंत साहेब आणि त्यांचे सहकारी त्या गोळीबाराच्या वर्षावात भिजत पुढे गेले… काहीजण धारातीर्थी पडले! विजयंत साहेबांवरही तुफान गोळीबार झाला… पण ते बचावले… आणि त्यांनी खंदकात झेप टाकली… दोन पाकिस्तानी सैनिकांशी त्यांची झटापट झाली… पण विजयंत यांनी त्यांना यमसदनी धाडले… खरं तर त्यांची शत्रूला जिवंत पकडायची इच्छा होती… पण बाकीचे शत्रूसैनिक पळून जाण्यात यशस्वी ठरले! विजयंत यांनी त्याच रात्री आपल्या रोजनिशीमध्ये या लढाईची थरारक हकीकत लिहिली… दोन शत्रू टिपले… पण शत्रूला जिवंत पकडण्याची मनीषा अपुरी राहिली! पण या चकमकीतील Point 4590 वरील विजय कारगिल लढाईला भारताच्या बाजुने झुकवून गेला! इथे कशमिरी अतिरेकी नव्हते.. संपूर्ण पाकिस्तानी फौज होती… त्यांनी कित्येक महिने आधी तयारी करून ठेवली होती. त्यांच्यापर्यंत पोहोचायला भारतीय सैनिकांना अगदीच चिंचोळी जागा होती… त्यांच्या तोफखान्याच्या मा-यातून पुढे जावे लागत होते… उंच चढण होती, थंडी होती… खाली खोल द-या होत्या!

तोलोलिंग वर भारतीय ध्वज फडकवल्यावर विजयंत साहेबांनी आईशी फोनवर संवाद साधून तिला त्याच्या कामगिरीची खबर दिली होती.

अनेक बलिदाने द्यावी लागली पण आता यशही मिळू लागले होते… भारतीय फौजेचा आत्मविश्वास खूप वाढला होता. २८ जून. आता आणखी मोठी कामगिरी २, राजपुतानाकडे आली. थ्री पिंपल्स, नोळ आणि लोन टेकडी भाग ही तीन महत्त्वाची ठिकाणे काबीज करायची होती. पौर्णिमेची रात्र होती. शुभ्र चांदणे पडले होते.

हल्ल्यावर निघण्यापूर्वी विजयंत यांना काही तरी जाणवले… बहुदा या मोहिमेतून आपण जिवंत परतू शकणार नाही आहोत… कारण त्यांचे अनेक सहकारी माघारी येऊच शकले नव्हते… लढाई थांबणार नव्हती जिंकल्याशिवाय! त्यांनी घाईघाईत एक पत्र लिहायला घेतलं… विजयंत साहेब कारगिल युद्धात लढायला गेले आहेत… हे त्यांच्या घरी ठाऊक नव्हते.

अतिप्रिय पपा आणि आई,… आणि आज्जी!

तुमच्या हाती हे पत्र लागेल तेंव्हा मी स्वर्गातील सुंदर अप्सरांचा पाहुणचार घेत घेत आकाशातून तुमच्याकडे पहात असेन!

मला माझ्या आयुष्याबाबत कोणतीही खंत नाही. खरं तर, पुन्हा मानव देह मिळाला तर मी पुन्हा भारतीय फौजेत भरती होईन आणि मातृभूमीसाठी लढेन!

आपल्या सैनिकांनी जिथे देह ठेवले, ती जागा तुम्हांला शक्य झाल्यास इथे प्रत्यक्ष भेट देऊन एकदा पहा… बघा… देशाच्या भविष्यासाठी तरुण सैनिकांनी त्यांचा सुंदर वर्तमानकाळ कसा अर्पण केला ते!

नवीन सैनिकांना या बलिदानांबद्दल माहिती द्यायलाच हवी. मला आशा आहे, माझे छायाचित्र माझ्या ए कंपनीच्या मंदिरात लावले जाईल… हुतात्मा विजयंत थापर! कारगिल युद्ध, १९९९!

माझे शक्य होतील ते अवयव दान करावेत! अनाथश्रमांना शक्य होतील तेवढ्या देणग्या द्याव्यात. आणि हो… रुक्सानाला दरमहिना रोख रक्कम पाठवीत रहा माझ्यातर्फे… ती आता आणखी छान बोलायला लागली असेल! आणि योगी बाबांचीही भेट घ्या.. त्यांना चरणस्पर्श सांगा माझा!

सैनिकांचे बलिदान विसरू नका! पपा, तुम्हांला माझा अभिमानच वाटेल… तुम्हीही सैनिकच होता. तुम्हांला न मिळू शकलेलं सैन्य शौर्य पदक मला मिळेल…!

आई, तू ——–ला भेटलंच पाहिजे हं! तिची माझी प्रेमकहाणी पूर्ण होऊ नाही शकली या जन्मी. तिला माझ्या शुभेच्छा सांग! तिच्यावर माझं जीवापाड प्रेम होतं!

चला, आता माझ्या डझनभर मित्रांन सोबत घेऊन लढाईला निघायची वेळ झाली आहे… सर्वांना शुभेच्छा… राजा सारखं जगा!

तुमचा रॉबिन…

आणि मरणावर स्वार व्हायला दल निघाले… पाकिस्तानी तोफखाना आग ओकत होता… मग १२० भारतीय तोफा अचूक गोळाबारी करू लागल्या… धुराचे लोट, आगीचा डोंब उसळत होता… विजयंत साहेब त्यातून पुढे निघाले… त्यांचा प्रिय सहकारी शिपाई जगमल सिंह धारातीर्थी पडला… काही वेळाने कंपनी कमांडर पद्मपाणी आचार्य साहेब हुतात्मा झाले… आता विजयंत यांच्या तळपायाची आग मस्तकी गेली! नाईक तिलक सिंग यांना हाताशी घेत ते त्या गोळीबाराच्या वर्षावात सरळ पुढे घुसले! आता शत्रू आणि त्यांच्या केवळ १५ मीटर्स एवढेच अंतर उरले होते… दोन मशीनगन्स यांच्याच दिशेला फायर करीत होत्या… लपायला नीट जागा नव्हती… गोळीबाराला तशाही स्थितीत उत्तर दिले जात होते… यात दीड तास गेला! आता मात्र विजयंत साहेबांचा संयम संपला… आता माघारी फिरणे तर शक्य नव्हतेच… पुढेच जावे!

गोलियां आणि गालियां यांचेही आदान-प्रदान सुरु होते दोन्ही बाजूंनी. पाकिस्तानी म्हणत होते… काफरांनो, तुम्ही काय लढणार आमच्याशी? यावर विजयंत साहेब म्हणत… तुमची इथून पळून जाण्याची संधीही आता निघून गेली आहे… आता आम्हीच तुमचे जनाजे काढू!

त्यांनी पुढे मुसंडी मारली… एवढ्यात मशीनगनचा एक मोठा फायर आला आणि साहेबांच्या मस्तकाचा वेध घेऊन गेला… साहेब त्यांच्या सहका-याच्या बाहुपाशात कोसळले… लहानगा रॉबिन पक्षी आसमंतात कायमचा उडून गेला होता… कधीही न परतण्यासाठी! पुढे भारताने शत्रूला यमसदनी धाडले! पण आपले मोती विखुरले गेले होते… मातीत मिसळून गेले कारगिलच्या पर्वतांवरच्या!

कॅप्टन विजयंत थापर यांच्या वडिलांनी लेकाचा शब्द लक्षात ठेवला… वाढते वय… बिघडणारी प्रकृती यांची तमा न बाळगता… ते तोलोलिंगची चढण चढत त्यांचा लेक जिथे धारातीर्थी पडला त्या ठिकाणाला भेट देतात… दरवर्षी… आई तिथे जाऊ शकत नाही… पण तिच्या मनात मात्र तिचा रॉबिन अजून भरारी घेतच असतो…! मरणोत्तर वीर चक्र देऊन देशाने कॅप्टन विजयंत थापर साहेबांचा गौरव केला आहे. साहेबांच्या आठवणी त्यांच्या कुटुंबाने, मित्रांनी आणि त्यांच्या दलाने मोठ्या प्रेमाने जतन करून ठेवल्या आहेत. तोलोलिंगवर त्यांच्या स्मृती एक छोटे मंदिर उभारून जतन केल्या गेल्या आहेत… आणि त्यांच्या ए कंपनी मंदिराच्या भिंतीवर एक छान, सुरेख तैलचित्र लावलेले आहे… हुतात्मा कॅप्टन विजयंत थापर… दी रॉबिन!

१९९९ मध्ये अर्थात युद्धासाठी कारगिल येथे जाण्यापूर्वी लेफ्टनंट वैजयंत थापर यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये आयुष्याची रूपरेषा लिहून ठेवली होती… स्वत:शीच काही गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या…

मी भारताचा ध्वज सतत उंचावत राहीन. मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान आहे. मी मरणोत्तर नेत्रदान करेन, अवयवदानही करेन. मी धुम्रपान करणार नाही, मांसाहार करणार नाही, अंडी खाणार नाही. मी माझ्या सैनिकांसमवेत राहीन. मी स्वत:ला खाली बघायला लागेल असे वर्तन करणार नाही. मी आयुष्यात एका तरी अनाथ मुलाचा शिक्षणाचा आणि इतर सर्व खर्च करीन… आणि मी मरताना राम स्मरेन!

कॅप्टन विजयंत थापर यांच्या सारखे, वयाच्या एकविसाव्या-बाविसाव्या वर्षी एवढे स्पष्ट विचार, ज्ञान, चारित्र्य कमावलेला सैनिकी अधिकारी आपल्याला आणखी खूप वर्षे लाभायला हवे होते… असे राहून राहून वाटते. त्यांच्या शौर्याच्या कथा काही लोकांना ठाऊक आहेत… पण त्यांची ही वैचारिक बाजू तशी कमी प्रकाशात आलेली आहे. कॅप्टन विजयंत थापर डॉट कॉम या संकेतस्थळावर साहेबांच्या आयुष्याचा अतिशय सविस्तर आणि सुंदर आलेख मांडण्यात आला आहे. इंटरनेटवर साहेबांच्या पालकांनी अनेक विडीओज मधून खूप छान माहिती दिली आहे. कुणाला ना कुणाला तरी देशसेवेसाठी पुढे यावेच लागेल… असेही विजयंत साहेबांचे वडील नेहमी म्हणतात! वरील बरीचशी माहिती मी तिथूनच घेतली आहे. छायाचित्रे साभार. आणखी खूप काही लिहायचे होते. विशेषत: त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या वडिलांविषयी. पण त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सेप्टोलेसेंट म्हणजे काय?…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सेप्टोलेसेंट म्हणजे काय?…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

सेप्टोलेसेंट म्हणजे ७० वर्षांवरील पुरुष किंवा स्त्री, जी वृद्धत्वाचा स्वीकार पारंपरिक पद्धतीने करत नाही, तर जीवनाबद्दलच्या उत्साहासह एक वेगळी जीवनशैली निवडते.

त्यांची वैशिष्ट्ये:

१) ते नेहमी सक्रिय असतात. ते काम करू शकतात, अभ्यास करू शकतात किंवा एखादा नवा उपक्रम निर्माण करू शकतात, ज्यामुळे त्यांना विचार करावा लागतो आणि तो उपयुक्त वाटतो.

२) त्यांचे किमान तीन चांगले मित्र असतात. ते त्यांच्याशी कॉफी, पाणी किंवा वाईनसाठी वारंवार भेटतात.

३) ते आलिशान गोष्टींपासून दूर राहून प्रवास करतात आणि नवीन ठिकाणे व संस्कृती अनुभवतात. पण जीवनातील चांगल्या गोष्टींचा आनंद घेणे ते सोडत नाहीत.

४) ते आपल्या जोडीदार, मुले, नातवंडे आणि नातेवाईकांशी प्रेम, आदर आणि परस्पर सहारा यावर आधारित नाती जोपासतात.

५) ते आशावादी आणि उत्साही असतात. त्यांच्या मनात नेहमी एखादा नवा प्रकल्प किंवा ध्येय असते आणि ते जीवनात अडकून न पडता पुढे जातात.

६) ते आपल्या आरोग्याची काळजी घेतात. ते आजारपणाला जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारतात. ते दररोज किमान २० मिनिटे चालतात आणि निरोगी अन्न खातात.

७) त्यांना छोट्या गोष्टींत आनंद मिळतो. तो वाढदिवस असू शकतो, एखादा सोहळा, एखादी आवडती मालिका किंवा एक नवा दिवस. ते दररोज देवाचे आभार मानतात.

८) ते दिवसभरात मिळालेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असतात. ते इतरांचे चांगले करण्याचा प्रयत्न करतात.

९) ते दररोज हसतात. कारण त्या अनेक सुंदर गोष्टींचा आनंद घेतात, ज्या इतरांना दिसत नाहीत किंवा महत्त्वाच्या वाटत नाहीत.

१०) ते आपल्याकडे जे आहे त्यात आनंदाने राहतात, जे नाही त्याची चिंता न करता. म्हणूनच ते स्वतःला करोडपती मानतात.

मी तुम्हालाही “सेप्टोलेसेंट” होण्याचे आमंत्रण देतो.

“वृद्धत्व थांबवणे अशक्य आहे. पण वृद्धत्वाचा सन्मान आणि आदराने स्वीकार करणे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे.”

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

संग्राहिका आणि प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

मी कोण?

नोकरी संपली,

दिनक्रमही गेला,

घरातली गजबजही थांबली,

आणि शांततेच्या प्रतिध्वनीत

मी स्वतःला शोधायला लागलो.

 

मी कोण?

बंगलो बांधले,

फार्महाऊस उभारले,

मोठी-लहान गुंतवणूक केली,

आणि आता?

चार भिंतीत अडकून पडलोय.

 

सायकलवरून मोपेड,

मोपेडवरून मोटार,

मोटारीतून गाडी,

गती आणि स्टाईलच्या मागे धावलो,

पण आता?

हळूहळू पाय रेंगत रेंगत

आपल्या खोलीतच फिरतोय.

 

निसर्गाने विचारलं—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी म्हणालो,

“मी… फक्त मीच.”

 

राज्य, देश, खंड फिरलो,

पण आज

माझे प्रवास

हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंतच.

 

संस्कृती, परंपरा जाणून घेतल्या,

पण आता माझ्या कुटुंबाने

मला समजून घ्यावं

अशी इच्छा आहे.

 

निसर्ग हसून म्हणाला—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी उत्तर दिलं,

“मी… फक्त मीच.”

 

पूर्वी वाढदिवस,

लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात केले,

पण आज

फक्त छान झोप लागली,

भूक लागली,

हेच साजरं करतो.

 

सोने, चांदी, हिरे, मोती

सगळं बँकेत गप्प बसलंय.

सूट-बूट कपाटात लटकलेले.

आता फक्त मऊ सुताचे कपडे,

साधेपणातला आराम.

 

इंग्रजी, फ्रेंच, हिंदी शिकलो,

पण आता

माझ्या मायबोलीतच

सुख मिळतं.

 

व्यवसायासाठी

जगभर धावलो,

नफा-तोट्यांची गणितं केली,

पण आज

फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो.

 

व्यवसाय सांभाळला,

कुटुंब जोडलं,

खूप नाती केली,

पण आता?

शेजारचा साधा-सोपा माणूसच

माझा जिवलग सोबती आहे.

 

नियम पाळले,

शिक्षण घेतलं,

पण आता कळतंय—

खरं महत्त्वाचं काय आहे.

 

जीवनाचे चढउतार अनुभवून,

शांत क्षणी

माझ्या आत्म्यानेच मला सांगितलं:

 

“पुरे झालं आता…

तयार हो प्रवासी,

अंतिम प्रवासासाठी…”

 

निसर्ग पुन्हा हसून विचारतो—

“कोण आहेस रे मित्रा?”

 

मी हळूच म्हणतो:

“अरे निसर्गा,

तूच मी…आणि मीच तू.

एकेकाळी आकाशात झेपावलो,

आता जमिनीलाही

प्रेमाने स्पर्शतो.

मला माफ कर…

एकदा पुन्हा जगू दे मला—

पैशाच्या यंत्रासारखा नव्हे,

तर खराखुरा माणूस म्हणून—

मुलांसह, कुटुंबासह, आणि प्रेमासह.”

 

वरिष्ठ नागरिकांना समर्पित

 संपत्ती एका झटक्यात,

सौंदर्य एका आजारात,

आणि प्रतिष्ठा एका चुकीत

नष्ट होते,

म्हणूनच या तिन्ही गोष्टींचा

कधीही गर्व नको ..!

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कल्पवृक्ष… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

?️? चित्रकाव्य ?️?

? कल्पवृक्ष… ? प्राची अभय जोशी ☆

 प्राजक्त भामेच्या दारचा

 हळूवार अलगद उमलला

*

त्याचा पसाभर सडा मात्र

 रुक्मीणीच्या अंगणी सांडला..

*

प्राजक्त वेचला कितीही ढिगाने

 तरी तो काट्यावर नाही तोलला 

*

त्याच्या नाजूकपणाचा त्याने

 कधीच बाजार नाही मांडला…

*

प्राजक्त असा असावा अंगणी

 कृष्णाच्या कथेची अशी महती

*

त्याच्या फुलण्या उमलण्यातच

 श्रीकृष्णाची दडलेली भक्ती…

*

प्राजक्ताचा असा सुवासिक वृक्ष

 त्याचे खरे स्थान तर स्वर्गातच 

*

इंद्रदेवाचे आहे हे तेरावे रत्न

 स्वर्गीय आनंदाचा निखळ स्त्रोत

*

प्रत्येकाच्या मनी वसलेला मात्र

 हा एक कल्पवृक्ष 

 हा एक कल्पवृक्ष…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पारिजातक… ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पारिजातक... ? शालिनी जोशी 

 पारिजातक पुष्प लहान

 परी असे कीर्ति महान 

*

 त्रिलोकांचा प्रवास तरुला 

 समुद्रमंथनातून इंद्र वनाला

*

 श्रीकृष्णाने भूलोकी आणिला

 सत्यभामेचा स्त्री हट्ट पुरविला

*

 शुभ्र पाकळ्यात सुगंध साठा 

 केशरी रंग खुले नाजूक देठा

*

कळ्या रात्रीच्या चांदण्या झाडावर 

 सकाळी केशरी पांढरा सडा भूवर

*

 भरल्या तबकी खुले मोहकपण

 हात न लावता जपा कोमलपण

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – लघुकथा – ☆ मेरा  परिवार… ☆ सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा ☆

सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा

(सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा जी पिछले 40 वर्षों से अधिक समय से लेखन में सक्रिय। 5 कहानी संग्रह, 1 लेख संग्रह, 2 लघुकथा संग्रह, 1 पंजाबी कथा संग्रह 1 तमिल में अनुवादित कथा संग्रह,मराठी में अनुवादित लघुकथा संग्रह, मराठी में अनुवादित  कहानी संग्रह, कुल 12 पुस्तकें प्रकाशित।  पहली पुस्तक मेरी प्रतिनिधि कहानियाँ को केंद्रीय निदेशालय का हिंदीतर भाषी पुरस्कार। एक और गांधारी तथा प्रतिबिंब कहानी संग्रह को महाराष्ट्र हिन्दी साहित्य अकादमी का मुंशी प्रेमचंद पुरस्कार 2008 तथा २०१७। प्रासंगिक प्रसंग पुस्तक को महाराष्ट्र अकादमी का काका कालेलकर पुरस्कार 2013 । लेखन में अनेकानेक पुरस्कार। आकाशवाणी से पिछले 45 वर्षों से रचनाओं का प्रसारण। लेखन के साथ चित्रकारी, समाजसेवा में भी सक्रिय । महाराष्ट्र बोर्ड की 10वीं कक्षा की हिन्दी लोकभारती पुस्तक में 2 लघुकथाएं शामिल 2018)

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा मेरा  परिवार

? लघुकथा – मेरा  परिवार ? सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा ?

अध्यापिका ने बच्चों से कहा- “ चलो बच्चों आज आप सभी अपने परिवार की जानकारी देंगे. आप सभी बताएंगे आपके परिवार में कितने सदस्य हैं और कौन-कौन हैं…  “ पहले बच्चे ने बड़े उत्साह से कहा – “मेरे परिवार में चार सदस्य हैं.  पापा, मम्मी, मैं और मेरी बहन.” दूसरे ने कहा – “मेरी फैमिली में तीन स    दस्य हैं. मैं और मेरे पापा मम्मी .”  यह गिनती 15 तक इसी तरह चलती गई. उसके पश्चात रोहन का नंबर आया वह बोला- “अध्यापक जी, मेरे परिवार में कुल 11 सदस्य  हैं. “क्लास के सभी बच्चे हंसने लगे. अध्यापक ने  भी हैरानी से पूछा- “11 सदस्य हैं… कौन-कौन  हैं…? रोहन बड़े उत्साह से बोल उठा-“ मेरे दादा दादी,  पापा मम्मी,  मैं और मेरी छोटी बहन, बड़े पापा, बड़ी मम्मी , उनका बेटा और बेटी.  दादी कहती है हम सबके साथ भगवान भी रहते हैं वह दिखाई नहीं पड़ते लेकिन वह हमारे घर में सबसे बड़े सदस्य के रूप में हमें मार्गदर्शन करते रहते हैं . इस तरह हमारे घर में कुल 11 लोग हैं…”  सभी बच्चे हैरानी से उसे देखकर हंसने लगे . एक बच्चा बोला- “लेकिन यह भगवान और दादा-दादी इनको तो मैंने कभी देखा ही नहीं.   दूसरा बोला- “हां मैंने भी उनका नाम तो सुना है लेकिन देखा नहीं…” कक्षा के कुछ और बच्चों की भी यही  प्रतिक्रिया थी. अध्यापिका के चेहरे पर गहरे तनाव की रेखाएं स्पष्ट नजर आने लगी थी. उसने भी तो लगभग इसी उम्र के अपने बेटे को अभी तक दादा दादी से नहीं मिलाया था न उनके बारे में कुछ बताया था.

© नरेन्द्र कौर छाबड़ा

संपर्क –  सी-१२०३, वाटर्स एज, विशालनगर, पिंपले निलख, पुणे- ४११०२७ (महाराष्ट्र) मो.  9325261079 

Email-  narender.chhabda@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # २९५ ☆ गुरु : जीवन पथ के आलोक स्तम्भ… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना गुरु : जीवन पथ के आलोक स्तम्भ। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख # २९५ ☆

गुरु : जीवन पथ के आलोक स्तम्भ ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

चरण वंदना आपकी , करता सकल जहान ।

तीन लोक भी कर रहे, नित्य सतत गुणगान ।।

*

बिन गुरुवर नहि मिल सके,कभी किसी को ज्ञान ।

प्रीत हृदय प्रिय धारते, शिष्य लगा कर ध्यान ।।

*

काज सहज बनने लगे, जब हो  गुरु आशीष ।

इनके पूजन से मिलें, जगदीश्वर जगदीश ।।

*

 सम्पूरण विश्वास से, सहज साधना साध्य।

ज्योतित जलती लौ रहे, गुरुवर को आराध्य।।

गुरु पूर्णिमा केवल एक पर्व नहीं, बल्कि आत्मबोध का उत्सव है। यह उस दिव्य चेतना के प्रति कृतज्ञता प्रकट करने का दिन है, जो अज्ञान के अंधकार को हटाकर ज्ञान का दीप प्रज्वलित करती है। गुरु केवल शास्त्रों का ज्ञान नहीं देते, वे जीवन को देखने की दृष्टि प्रदान करते हैं। उनके सान्निध्य में व्यक्ति स्वयं को पहचानता है, अपने भीतर छिपी संभावनाओं को जागृत करता है और सत्य की ओर अग्रसर होता है।

भारतीय संस्कृति में गुरु को ब्रह्मा, विष्णु और महेश के समकक्ष स्थान इसलिए मिला है, क्योंकि वे मनुष्य के व्यक्तित्व का पुनर्जन्म कराते हैं। वे केवल शब्दों से नहीं, अपने आचरण, तप, त्याग और करुणा से शिक्षा देते हैं।

आइए, इस गुरु पूर्णिमा पर हम अपने जीवन के प्रत्येक गुरु—माता-पिता, शिक्षक, प्रकृति और उन सभी अनुभवों—के प्रति श्रद्धा व्यक्त करें, जिन्होंने हमें बेहतर मनुष्य बनने की प्रेरणा दी। यही सच्ची गुरु वंदना है, और यही ज्ञान के प्रकाश की ओर बढ़ने का श्रेष्ठ मार्ग भी।

साचे मन आराधिए, गुरुवर गुण की खान ।

पूरण सारे काज हों,  बढ़े मान सम्मान ।।

**

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – ह्रास ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – ह्रास ? ?

इसने कहा,

उसके भीतर

कुछ कम हो रहा है,

उसने कहा,

उसके भीतर

कुछ कम हो रहा है,

सबने कहा,

सबके भीतर

कुछ कम हो रहा है,

हरेक को भीतर

कुछ कम होने का भास है,

मनुज! संभवत: यही

मनुष्यता का ह्रास है..!

?

© संजय भारद्वाज   

14 जुलाई 2020प्रात: 11:13 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

गुरु साधना 19 जुलाई से बुधवार 29 जुलाई तक चलेगी। 🕉️ 

इसका मंत्र होगा-

ॐ गुं गुरुभ्यो नम:

(उच्चारण- ओम गुम गुरुभ्यो नमह)

💥 आप अपने गुरु / मानस गुरु / मार्गदर्शक / माता /पिता / प्रेरक व्यक्तित्व आदि जिस किसी में भी आपकी श्रद्धा हो, को स्मरण कर इस मंत्र का पाठ कर सकते हैं। यदि ऐसा कोई व्यक्तित्व आपके जीवन में नहीं है तो भी अपनी सैद्धांतिक / वैचारिक प्रतिबद्धता को यह मंत्र समर्पित कर सकते हैं। सनातन ठहराव नहीं बहाव है। अतः प्रवाह की दिशा स्वयं तय करें। 💥

इसके साथ नीचे दिए श्लोक का भी अपनी सुविधा के अनुसार 11 /21 /31 /51 बार पाठ करें। 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ सबकी जुदा गेल है…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी ☆

डॉ. रामेश्वरम तिवारी

संक्षिप्त परिचय

  • हिंदी-प्राध्यापक(सेवानिवृत्त) महारानी लक्ष्मीबाई शासकीय कन्या स्नातकोत्तर महाविद्यालय, भोपाल  (म.प्र).
  • नई दुनिया, दैनिक भास्कर, वीणा, हंस, धर्मयुग, कादम्बिनी आदि पत्र-पत्रिकाओं में कविता और लघुकथाएँ प्रकाशित। पुस्तकः कविता के ज़रिए,  मध्य प्रदेश साहित्य अकादमी के सौजन्य से प्रकाशित।

आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता – सबकी जुदा गेल है…!

☆ ॥ कविता॥ सबकी जुदा गेल है…! ☆ डॉ. रामेश्वरम तिवारी

 

कुदरत का भी अजीब खेल है,

कहीं सूखा, कहीं रेलमपेल है।

*

ये कौन है जो जुल्म ढा रहा है,

कौने हाथों मेघों की नकेल है।

*

फकत जमीं पर ही नहीं होता,

ऊपरे चलता सियासी खेल है।

*

तालीमशुदा सड़कें नाप रहे हैं,

मुक़द्दर लिख रहे 5वीं फेल हैं।

*

दोषी आवारा साँड़-से घूम रहे,

निरीह- निर्दोषी भीतर जेल हैं।

*

जाना सभी को एक जगह पर,

पर सबकी जुदा-जुदा गेल है।

© डॉ. रामेश्वरम तिवारी

सम्पर्क – सागर रॉयल होम्स, होशंगाबाद रोड, भोपाल-462026

मोबाईल – 8085014478

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – लघुकथा ☆ तीन फिटनेस सर्टिफिकेट और एक अंतिम सत्य ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

🌷लघुकथा ☘️ तीन फिटनेस सर्टिफिकेट और एक अंतिम सत्य 🌺

आज सुबह सैर के लिए निकला तो देखा कि एक अख़बार का हॉकर रामचरितमानस की चौपाइयाँ गुनगुनाते हुए बड़ी तन्मयता से अख़बार बाँट रहा था। भोर की ताज़ी हवा में तुलसीदास की वाणी का वह मधुर स्वर कुछ ऐसा घुला कि कदम अनायास ही ठिठक गए। 

मैंने मुस्कराकर कहा, “भाई, यह तो बहुत सुंदर बात है। सुबह-सुबह प्रभु का स्मरण भी हो रहा है और पूरी लगन से अपना काम भी।”

बातों-बातों में उसने बताया कि वह कभी फ्रीस्टाइल रेसलिंग करता था। स्वस्थ रहने के लिए आज भी रोज़ सुबह अख़बार बाँटता है और दिन में अपना दूसरा काम करता है। फिर उसने मेरी ओर देखा। मेरे सफ़ेद होते बालों और उम्र का सम्मान करते हुए बोला, “सर, आप इस उम्र में भी बिल्कुल फिट हैं!”

मन ही मन मैंने उस युवक को आशीर्वाद दिया।

थोड़ा आगे बढ़ा तो पार्क के बाहर एक फिटनेस ट्रेनर मिल गया। मुझे दूर से आते देखकर बोला, “आपको देखकर ही अच्छा लग जाता है। आपने अपने आपको बहुत अच्छी तरह मेंटेन रखा है।”

अभी इस प्रशस्ति का सुख पूरी तरह आत्मसात भी नहीं कर पाया था कि पार्क के भीतर एक योग प्रशिक्षक ने भी लगभग वही बात दोहरा दी—“आप हमेशा प्रसन्न रहते हैं, और इस उम्र में भी एकदम फिट हैं।”

बस, फिर क्या था! पंद्रह मिनट के भीतर तीन-तीन फिटनेस सर्टिफिकेट मिल चुके थे। मन मयूर-सा नाच उठा। प्रसन्नचित्त, हल्के कदमों और कुछ अधिक ही सीधी कमर के साथ घर लौटा।

घर पहुँचते ही यथार्थ ने बड़ी आत्मीयता से मेरा स्वागत किया।

स्वर गूँजा—“पार्क में ठीक से वॉक क्यों नहीं करते? बार-बार झूले पर जाकर बैठ जाते हो। नियमित योग भी नहीं करते। तोंद निकलने लगी है, कंधे भी झुकने लगे हैं। थोड़ा फिटनेस पर ध्यान दो। ट्रैकिंग पर भी चलना है!”

मैंने बिना किसी प्रतिवाद के सब कुछ शांत भाव से सुना।

आख़िर बाहर की दुनिया हमें उत्साह देती है, और घर की दुनिया हमें वास्तविकता से जोड़े रखती है।

ऐसे अवसरों पर मैं स्थितप्रज्ञ हो जाना ही श्रेयस्कर समझता हूँ।☺️

© श्री जगत सिंह बिष्ट

साधक

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’≈

Please share your Post !

Shares
1