मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तो एक धडा’ – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

‘तो एक धडा’ – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

ती फक्त दहा वर्षांची होती. स्मिथ फॅमिली मधे जन्मलेली एक लहान मुलगी! नाव होतं टिली स्मिथ!

इंग्लंडमधील सरे नावाच्या गावांत ती रहात होती.

टिली नेहमीप्रमाणे त्या दिवशी शाळेत गेली..

टिलीचे भूगोलाचे शिक्षक मिस्टर कार्नी वर्गात आले. भूगोलाचा तास सुरू झाला. सर सुनामी म्हणजे काय हे मुलांना शिकवत होते..

सरांनी १९४६ मध्ये हवाईला उद्ध्वस्त करणाऱ्या भयानक सुनामीचं कृष्णधवल फुटेज मुलांना दाखवलं..

सुनामी येण्यापूर्वी समुद्रात काय काय बदल दिसतात हे उलगडून सांगितलं…

समुद्र अनैसर्गिकरीत्या कसा मागे मागे जातो, त्याचं पाणी कसं फेसाळतं, आणि समुद्राचं वर्तन कसं विचित्र होत जातं हे सगळं सर उत्तम प्रकारे शिकवत होते..

आणि टिली जीवाचे कान करून ऐकत होती..

दोन आठवड्यांनी ख्रिसमसची सुट्टी सुरू झाली. टिली अतिशय आनंदात होती कारण तिचे आई बाबा तिला सुट्टीसाठी थायलंडला घेऊन गेले होते. हा तिचा पहिलाच परदेश प्रवास होता.

ते फुकेट मध्ये पोचले. फुकेट हे थायलंड देशाच्या दक्षिण भागातील एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय बेट आहे. तेथील पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य अशा माई खाओ नावाच्या बीचवर ते पोचले..

साधारण शंभर लोकांना सामावून घेईल असा तो बीच होता व पूर्णपणे भरला होता..

हवा अतिशय छान होती..

पण टिलीला काहीतरी बरोबर नाही असं वाटू लागलं..

तिच्या लक्षात आलं..

समुद्राचं पाणी अजिबात शांत नव्हतं..

ते आत-बाहेर न करता फक्त आत आतच जात होतं..

समुद्र फेसाळला होता..

“बिअरवर जसा फेस येतो तसा समुद्र फेसाळला आहे.. ” ती आई बाबांना म्हणाली.. समुद्र अनैसर्गिकरीत्या मागे जाणं, फेसाळ पाणी, समुद्राचं विचित्र वर्तन सारं काही ती दोन आठवड्यांपूर्वीच भूगोलाच्या वर्गात नुकतीच शिकली होती..

“सुनामी येणार आहे…सुनामी येणार आहे” ती जोरजोरात ओरडू लागली..

पण तिच्या आई-बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना समुद्रात एकही लाट दिसत नव्हती. आकाश स्वच्छ होतं. बीच शांत होता.

“मी जाणार आहे इथून.. सुनामी येतय.. ” टिली घाबरून गेली होती.

तिच्या कापऱ्या आवाजातील भीती तिच्या बाबांना जाणवली व त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवण्याचे ठरवले. शिवाय तिथे बीचवर एक जपानी माणूस उभा होता त्याने टिलीचे बोलणे ऐकलं. तो बाबांना म्हणाला, “तुमची मुलगी बरोबर सांगते आहे! सुमात्रामधे भूकंप झालाय ही बातमी मला नुकतीच मिळाली आहे! ”

टिलीच्या बाबांनी ते ज्या हॅाटेलमधे रहात होते त्या स्टाफला सुनामीबद्दल सांगितलं. त्यांनी लगेच बीच रिकामा करायला सुरुवात केली.

सारे बीचवरून बाहेर पडण्यासाठी धावू लागले..

आई, बाबा, टिली पण धावत होते..

टिलीची आई मागे पडली होती. पाणी तिच्या मागून प्रचंड वेगाने येऊ लागलं तेव्हा तिला पळू लागली.. आपण आता मरणार असं वाटत होते पण ती पळत राहिली..

नशीबानं ते त्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले.

आणि मग ती प्रचंड लाट आली…३० फूट उंच.

बीचवरील सारं काही.. खुर्च्या, नारळाची झाडं, कचरा.. सारं काही वाहून गेलं.

२६ डिसेंबर २००४ च्या सुनामी मध्ये १४ देशांतील २३०, ००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.

फुकेतच्या प्रत्येक बीचवर हजारो लोक मरण पावले.

पण

माई खाओ बीचवर एकही जीव गेला नाही…

कारण 

एका दहा वर्षांच्या मुलीने भूगोलाचा धडा वर्गात लक्ष देऊन ऐकला होता.

टिलीला “एंजेल ऑफ द बीच” म्हणून गौरवण्यात आलं. तिला मरीन सोसायटीचा थॉमस ग्रे स्पेशल अवॉर्ड, “चाइल्ड ऑफ द इयर” घोषित केलं. युनायटेड नेशन्स मध्ये तिचं भाषण ठेवलं गेलं.. आज टिली ३० वर्षांची आहे. ती लंडनमध्ये राहते आणि याट चार्टरिंगमध्ये काम करते.

ती आजही तिच्या भूगोलाच्या सरांचे आभार मानते. “मिस्टर कार्नी नसते तर मी आणि आई बाबा आज जिवंत नसतो. ”

दोन आठवडे..

एक धडा..

शंभर जीव..

हे वर्गात लक्ष देऊन ऐकण्यातलं सामर्थ्य आहे.. शिक्षणातील सामर्थ्य आहे..

शाळेतला एक साधा धडा..

जीवन आणि मृत्यू साठी कारणीभूत ठरला..

“वर्गात लक्ष दे” माझी आई मला रोज शाळेला जाताना सांगायची. वर्गात शिकवलेलं किती लक्षात आहे ते पण नेहमी विचारायची..

आपणही मुलाबाळांना “वर्गात लक्ष दे” सांगण्यास विसरू नका!

(सत्य घटना) 

लेखिका : ज्योती रानडे

सौजन्य : कथाविश्व – गोड कथांचे अनोखे विश्व (2026 Jyoti Ranade. All rights reserved.) 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ भारतीय वैभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष ☆

वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भारतीय वैभव…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

आपल्यातील बरेच मित्र परदेश वारी आणि तेथील कौतुक सांगतात.

अमेरिकेला भेट देत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि सल्ला:

प्रिय मित्रांनो,

गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही अमेरिकेतील सिएटल, वॉशिंग्टन येथे राहत आहोत. भारतातून निघताना माझ्या पत्नीला श्वसनाचा गंभीर त्रास होता. त्यामुळे तिच्या प्रकृतीचा विचार करून आम्ही भारतातून पुरेसा औषधसाठा सोबत आणला होता. अमेरिकेत ती औषधे घेतल्यानंतर तिची प्रकृती जवळजवळ पूर्णपणे सुधारली.

मात्र औषधे संपल्यावर मला काळजी वाटू लागली की प्रवासादरम्यान पुन्हा तिचा त्रास सुरू होऊ नये. म्हणून मी माझ्या मुलीला सिएटलमधील फुफ्फुसरोगतज्ज्ञ (Pulmonologist) यांची भेट ठरवण्यास सांगितले.

परंतु आम्हाला सांगण्यात आले की तज्ज्ञ डॉक्टरांना थेट भेटता येत नाही. आधी सामान्य वैद्यकीय तज्ज्ञ (General Physician) यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एक आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट मिळाली आणि तीदेखील फक्त व्हिडिओ कॉलद्वारे.

सुमारे १० मिनिटे डॉक्टरांशी संवाद झाला. भारतात पत्नी कोणती औषधे घेत होती, याची माहिती दिल्यानंतर त्यांनी ती समजून घेतली आणि आवश्यक औषधे लिहून दिली. ती औषधे जवळच्या औषधालयातून मिळतील, असे त्यांनी सांगितले.

मात्र औषधालयात गेल्यावर कळले की ती औषधे तात्काळ उपलब्ध नाहीत आणि ती यायला ४–५ दिवस लागतील.

शेवटी पाचव्या दिवशी औषधे मिळाली. विशेष म्हणजे ती औषधे ‘Cipla’ कंपनीची होती आणि त्यावर “Made in India” असे स्पष्ट लिहिलेले होते. अमेरिकेतील वैद्यकीय विम्यामुळे ५०% सवलत मिळाल्यानंतरही आम्हाला सुमारे ₹२१, ००० मोजावे लागले. म्हणजे भारतात सुमारे ₹२, ५०० किंमतीची औषधे अमेरिकेत जवळपास ₹४२, ००० इतकी महाग पडतात.

भारतात सहज उपलब्ध होणारी ही औषधे मिळवण्यासाठी आम्हाला अमेरिकेत तब्बल १२ दिवस वाट पाहावी लागली. त्यानंतर आठवडाभराने डॉक्टरांच्या सल्लामसलतीसाठी $283 (सुमारे ₹२३, ०००) चे बिलही आले.

निवृत्तीनंतर भारतात राहण्याचे भाग्य लाभले आहे, याची जाणीव ठेवा.

आपण अनेकदा “चांगल्या जीवनाच्या” शोधात परदेशाकडे पाहतो. पण जर शांतपणे विचार केला तर लंडन किंवा न्यूयॉर्कमधील अब्जाधीशांनाही सहज उपलब्ध नसलेल्या अनेक दैनंदिन सुविधा भारतातील मध्यमवर्गीयांना सहज मिळतात.

भारतातील सामान्य माणसाचेही जीवन “व्हीआयपी” का वाटते? — ७ उदाहरणे

१. स्वस्त आणि वेगवान इंटरनेट:

जगातील अनेक देशांमध्ये साध्या इंटरनेटसाठी दरमहा $50 (सुमारे ₹४, ०००) पेक्षा अधिक खर्च येतो. पण भारतात अवघ्या ₹३०० मध्ये हाय-स्पीड 5G डेटा उपलब्ध आहे. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा भारतात आहे आणि त्यामुळेच डिजिटल क्रांती घडली.

२. १० मिनिटांत घरपोच डिलिव्हरी:

चहासाठी आले किंवा दूध संपले? Blinkit, Zepto किंवा Swiggy Instamart वर ऑर्डर करा आणि पाणी उकळण्याआधीच वस्तू घरी पोहोचते. युरोपमध्ये मात्र थंडीत चालत दुकानात जावे लागते आणि दुकान बंद असण्याची शक्यताही असते.

३. तत्काळ आरोग्यसेवा:

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास थेट रुग्णालयात जाता येते. रक्ततपासणीसाठी सकाळीच तंत्रज्ञ घरी येतो आणि दुपारपर्यंत अहवाल WhatsApp वर मिळतो. अनेक पाश्चिमात्य देशांप्रमाणे महिनोनमहिने प्रतीक्षा किंवा विम्याच्या मंजुरीसाठी धावपळ करावी लागत नाही.

४. मानवी मदतीची साखळी:

घरकाम, स्वयंपाक, वाहनचालक यांसाठी मदत मिळणे ही भारतात फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही; मध्यमवर्गीय जीवनाचाही तो महत्त्वाचा भाग आहे. यामुळे सर्वात मौल्यवान गोष्ट मिळते—वेळ.

५. UPI क्रांती:

₹५ च्या चहापासून ₹५०, ००० च्या लॅपटॉपपर्यंत—फक्त QR कोड स्कॅन करून पैसे देता येतात. पाकीट बाळगण्याची गरज नाही, कार्ड मशीन बंद असल्याचे कारण नाही आणि व्यवहार शुल्कही नाही. या बाबतीत भारत जगाच्या खूप पुढे आहे.

६. छोट्या पण महत्त्वाच्या सुविधा:

रेस्टॉरंटमध्ये मोफत पिण्याचे पाणी मिळते. गल्लीतच इस्त्रीवाला किंवा चहावाला सहज सापडतो. अशा छोट्या गोष्टी आयुष्य अधिक सोपे आणि सुखकर बनवतात.

७. सामाजिक नाती – एक मजबूत सुरक्षा कवच:

आपली संस्कृती न्यायालयीन नोटिसांची नसून नातेसंबंधांची आहे. अडचण आल्यास शेजारी कोर्टात जाण्याऐवजी प्रेमाने खिचडी करून पाठवतात.

निष्कर्ष:

भारत हा केवळ एक देश नाही; तो असंख्य सोयी-सुविधांनी परिपूर्ण असा जीवनाचा अनुभव आहे. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये लोकांना लॉन कापण्यापासून प्लंबिंगपर्यंत प्रत्येक काम स्वतः करावे लागते. भारतात मात्र सेवा-केंद्रित जीवनशैलीमुळे अनेक कामांसाठी सहज मदत उपलब्ध होते.

इथे आपण केवळ जगत नाही, तर आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेणारी एक व्यवस्था आपल्या भोवती असते. हेच “भारतीय वैभव” आहे—ज्याचा हेवा जगातील अनेक देशांना वाटतो.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अल्पायुषी कारवी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अल्पायुषी कारवी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत (वर्ण संख्या १६, यति ८ व्या अक्षरावर))

सप्तवर्ष तप हिचे आठव्यात येती फुले 

अल्पायुषी कारवी ही पश्चिम घाटात खुले ||ध्रु||

*

निळ्या जांभळ्या रंगाची पठार व्यापत जाते

आकाशाशी जीव जडे मातीशी अतूट नाते

माळ कारवी साजरी कळ्या फुलांवर डुले 

अल्पायुषी कारवी ही पश्चिम घाटात खुले ||१||

*

जांभुळली फुलराणी एकदाच फुलणारी

नीलमणी अंगावर पानासंगे झुलणारी

फनेलच्या आकाराची नाजूकशी कानडुले 

अल्पायुषी कारवी ही पश्चिम घाटात खुले ||२||

*

थंडीमध्ये लपेटली भुमीने शाल बरवी 

कोणी म्हणती बकरा कोणी टोपली कारवी

हिच्या रूपाची मोहिनी मम् काव्यातून झुले

अल्पायुषी कारवी ही पश्चिम घाटात खुले ||३||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पावसाचा पदन्यास – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – पावसाचा पदन्यास – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

झाडे दुतर्फा रंगीत 

साज खुलतो रस्त्याचा 

पडणाऱ्या जलधारा 

भास जाहला तळ्याचा ||

*
पाणी जाहले रंगीत 

शोभिवंत प्रतिबिंब 

वेडावुनी झेपावती 

वेगे नाचणारे थेंब || 

*

टपटप लयबद्ध 

आले नाचऱ्या अंगाने 

नक्षी मोहक खुलते 

जळावरी या नृत्याने ||

*

चित्र देखणे रेखिले 

निसर्गाने सौंदर्याचे 

न्याहाळीता अदाकारी 

भान हरपे मनाचे ||

*

पावसाचा पदन्यास

मन चिंब चिंब होई 

लय लाभते मनाला 

आनंदाने गाणे गाई ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # १५३ ☆ कोल्हू का बैल ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “कोल्हू का बैल” ।)

✍ जय प्रकाश के नवगीत # १५३ ☆

☆ कोल्हू का बैल ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

निरंतर एक ही पथ पर

घूमता रहता है

आँखों पर बँधी होती है पट्टी

बस इसी आशा में

कि एक दिन निश्चित ही

पा जाऊँगा अपनी मंजिल

और नियति है जो घुमाती रहती है

आदमी भी घूमता रहता है

अपने द्वारा रचे गए चक्रव्यूह में

अभिमन्यु की जिसे

घुसना तो आता था चक्रव्यूह में

निकलना नहीं सीखा था

इसलिए मारा गया

मनुष्य भी कोल्हू का बैल

और अभिमन्यु की तरह ही

अपने आपको बेबस और लाचार

पाकर अभिशप्त है मरने को

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ शेष कुशल # ६४ ☆ व्यंग्य – “मृत्यु का प्रमाणपत्र और नागरिकता का संकट…” ☆ श्री शांतिलाल जैन ☆

श्री शांतिलाल जैन

(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो  दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक  ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी के  स्थायी स्तम्भ – शेष कुशल  में आज प्रस्तुत है उनका एक अप्रतिम और विचारणीय व्यंग्य  मृत्यु का प्रमाणपत्र और नागरिकता का संकट…” ।)

☆ शेष कुशल # ६४ ☆

☆ व्यंग्य – “मृत्यु का प्रमाणपत्र और नागरिकता का संकट – शांतिलाल जैन  

मेरी एक विनम्र सलाह है श्रीमान. अपने परिजनों से कह कर रखें कि आपका अंतिम समय जब भी आए तो आपका मृत्यु प्रमाणपत्र आपके सिरहाने रख दिया जाए. साथ में ले जाने में सुभीता रहे. ट्रेवल डॉक्यूमेंट है श्रीमान्, इहलोक से परलोक तक की यात्रा का वैध दस्तावेज. हालाँकि यह आपके आर्यावर्त के नागरिक होने का प्रमाण नहीं है, तब भी यात्रा के दौरान लगता है. क्या!! पासपोर्ट के बाबत नहीं सुना आपने? पासपोर्ट आपके नागरिक होने का प्रमाण नहीं है – ट्रेवल डॉक्यूमेंट है. मृत्यु प्रमाणपत्र में इतना तो लिखा है कि आप मरे हैं मगर यह नहीं लिखा कि आप आर्यावर्त के नागरिक के तौर पर मरे हैं.

क्या कहा आपने? मरने से पहले मरने का प्रमाणपत्र कैसे बनेगा? तो या तो आप बहुत भोले हैं या बेवकूफ़. रिश्वत के बाबत नहीं सुना आपने? इसे दिए जाने के बाद आप हर उस सज्जन का डेथ सर्टिफिकेट बनवा सकते हैं जो कभी जन्मा ही नहीं. प्रॉविजिनल डेथ सर्टिफिकेट भी बनवाकर रख सकते हैं – सब्जेक्ट टू बी इफेक्टिव फ्रॉम दी एक्चुअल टाईम ऑफ़ डेथ. मेरी बात को सिंसियरली लीजिए श्रीमान्, इस बार आप झूमरीतलैया तक नहीं जा रहे, बैकुंठधाम व्हाया अंतरिक्ष जा रहे हैं. वैतरणी पड़ेगी रास्ते में. हो सकता है डेथ सर्टिफिकेट के अभाव में कामधेनु पूँछ पकड़वाने से मना कर दे. कागज़ दिखाए बगैर वैतरणी पार नहीं कर पाएँगे आप.

अब आप पूछेंगे कि मुझे कैसे पता परलोक यात्रा के बारे में? तो मैं बताना चाहता हूँ कि मैं अभी अभी जाकर वापस आया हूँ. वापस क्या आया हूँ वापस भेज दिया गया हूँ.  वो तो अच्छा है मैंने अपना डेथ सर्टिफिकेट पहले से बनवाकर रखा था, रास्ते में दिक्कत नहीं आई. लेकिन पहुँचने पर मुझे बैकुंठधाम के दरवाजे से ही बैक-टू-पेवेलियन कर दिया गया. हालाँकि मेरे पास आधार कार्ड भी था. बोले – आधार केवल आपकी पहचान और पते का दस्तावेज़ है, नागरिकता का नहीं. बैकुंठ में प्रवेश की अनुमति आर्यावर्त के नागरिक शांतिलाल जैन वल्द मोतीलाल जैन, उम्र 66 वर्ष, हाल मुकाम उज्जैन के नाम की है. आपकी पहचान तो साबित हो रही है नागरिकता साबित नहीं होती. उसके बिना आप अंदर नहीं जा सकते.

‘हे देव, मैं आया नहीं हूँ, आपके प्रतिनिधि ही मुझे लाए हैं. क्या वे सिर्फ पहचान का प्रमाणपत्र देखकर लाते हैं?’

उन्होंने कहा – “नागरिकता साबित करने की जिम्मेदारी आपकी स्वयं की है.”

“हे देव, मेरे पास मतदाता पहचान पत्र भी है.”

वे बोले – “मतदाता पहचान पत्र सिर्फ मतदान करने का अनुमति पत्र है, नागरिकता का दस्तावेज़ नहीं है. आपने 2003 में वोट दिया था? यदि हाँ, तो विधान सभा क्रमांक, बूथ क्रमांक, वोटर सीरियल नंबर बताईए.”

“वो तो याद नहीं है.”

“तब तो कुछ नहीं हो सकता. “

“हे देव, मैंने अपना जन्म प्रमाणपत्र संभालकर रखा है. कुछ देर के लिए भैंसा दिलवा दें तो जाकर ले आता हूँ.”

“अकेले आपके जन्म प्रमाणपत्र से नहीं होगा. आपके माता-पिता का, उनके माता-पिता का, उनके भी माता-पिता का बर्थ सर्टिफिकेट लगेगा.”

“वो तो नहीं है हमारे पास.”

“तब तो आप आर्यावर्त के नागरिक नहीं हैं. जल्दी वापस निकल जाईए.”

“हे देव, मैं उस दुखियारी दुनिया में वापस जाना नहीं चाहता जहाँ मुझे बार-बार अपनी नागरिकता साबित करनी पड़े.”

देखिए बैकुंठधाम केवल आर्यावर्त के नागरिकों के लिए आरक्षित है. विवश होकर  हमें आपको डिटेंशन सेंटर में रखना पड़ेगा जो पहले ही भरा पड़ा है, पाँव रखने की भी जगह नहीं है. आप तुरंत लौट जाएँ – यही बेहतर होगा आपके लिए.

मरता क्या न करता!  बल्कि मरा हुआ क्या ही करता!! परिजनों को भनक लगे उससे पहले वापस आकर शरीर में दाख़िल हो गया हूँ और अब आपसे मुख़ातिब हूँ. नागरिकता किस डॉक्यूमेंट से साबित होती – यदि आपको पता तो मुझे अवश्य बताएँ – आभारी रहूँगा आपका.

-x-x-x-

(टीप: यह आवश्यक नहीं है कि संपादक मंडल व्यंग्य /आलेख में व्यक्त विचारों/राय से सहमत हो।)

© शांतिलाल जैन 

बी-8/12, महानंदा नगर, उज्जैन (म.प्र.) – 456010

9425019837 (M)

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चुप्पियाँ – (३४) ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – चुप्पियाँ – (३४) ? ?

चुप हो जाना चाहता हूँ

जाना ही इनकी नियति है

सो चुप्पियों को

विदा कहना चाहता हूँ,

पर जाने क्या हो गया है

वे निरंतर आ रही हैं

मायके आई बेटी की तरह

लगातार बतिया रही हैं,

भरी आँखों से

निहारता हूँ इनका चेहरा

क्या करुँ

इनका पिता जो ठहरा!

?

© संजय भारद्वाज   

(2.9.2018, 1:16 बजे)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

गुरु साधना 19 जुलाई से बुधवार 29 जुलाई तक चलेगी। 🕉️ 

इसका मंत्र होगा-

ॐ गुं गुरुभ्यो नम:

(उच्चारण- ओम गुम गुरुभ्यो नमह)

💥 आप अपने गुरु / मानस गुरु / मार्गदर्शक / माता /पिता / प्रेरक व्यक्तित्व आदि जिस किसी में भी आपकी श्रद्धा हो, को स्मरण कर इस मंत्र का पाठ कर सकते हैं। यदि ऐसा कोई व्यक्तित्व आपके जीवन में नहीं है तो भी अपनी सैद्धांतिक / वैचारिक प्रतिबद्धता को यह मंत्र समर्पित कर सकते हैं। सनातन ठहराव नहीं बहाव है। अतः प्रवाह की दिशा स्वयं तय करें। 💥

इसके साथ नीचे दिए श्लोक का भी अपनी सुविधा के अनुसार 11 /21 /31 /51 बार पाठ करें। 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Satire ☆ Witful Warmth # 94 – The Organic Food Illusion… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆

Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Dr. Suresh Kumar Mishra, known for his wit and wisdom, is a prolific writer, renowned satirist, children’s literature author, and poet. He has undertaken the monumental task of writing, editing, and coordinating a total of 55 books for the Telangana government at the primary school, college, and university levels. His editorial endeavors also include online editions of works by Acharya Ramchandra Shukla.

As a celebrated satirist, Dr. Suresh Kumar Mishra has carved a niche for himself, with over eight million viewers, readers, and listeners tuning in to his literary musings on the demise of a teacher on the Sahitya AajTak channel. His contributions have earned him prestigious accolades such as the Telangana Hindi Academy’s Shreshtha Navyuva Rachnakaar Samman in 2021, presented by the honorable Chief Minister of Telangana, Mr. Chandrashekhar Rao. He has also been honored with the Vyangya Yatra Ravindranath Tyagi Stairway Award and the Sahitya Srijan Samman, alongside recognition from Prime Minister Narendra Modi and various other esteemed institutions.

Dr. Suresh Kumar Mishra’s journey is not merely one of literary accomplishments but also a testament to his unwavering dedication, creativity, and profound impact on society. His story inspires us to strive for excellence, to use our talents for the betterment of others, and to leave an indelible mark on the world.

Some precious moments of life

  1. Honoured with ‘Shrestha Navayuvva Rachnakar Samman’ by former Chief Minister of Telangana Government, Shri K. Chandrasekhar Rao.
  2. Honoured with Oscar, Grammy, Jnanpith, Sahitya Akademi, Dadasaheb Phalke, Padma Bhushan and many other awards by the most revered Gulzar sahab (Sampurn Singh Kalra), the lighthouse of the world of literature and cinema, during the Sahitya Suman Samman held in Mumbai.
  3. Meeting the famous litterateur Shri Vinod Kumar Shukla Ji, honoured with Jnanpith Award.
  4. Got the privilege of meeting Mr. Perfectionist of Bollywood, actor Aamir Khan.
  5. Meeting the powerful actor Vicky Kaushal on the occasion of being honoured by Vishva Katha Rangmanch.

Today we present his SatireThe Organic Food Illusion 

☆ Witful Warmth# 94  ☆

Satire ☆ The Organic Food Illusion… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆ 

Shopping at a modern organic grocery store is less about nutrition and more about purchasing moral superiority. The word “organic” instantly adds a three hundred percent markup to any vegetable, transforming a regular, dirt-covered potato into a rare, artisanal subterranean tuber. People willingly pay exorbitant amounts for kale, a leaf that tastes like lawn clippings but promises spiritual enlightenment and eternal youth. The packaging is always rustic brown cardboard, complete with a touching story about a happy farmer named Bob who personally massaged each tomato. We purchase gluten-free, sugar-free, taste-free water just to feel like we are saving the planet. In reality, the only thing truly being cleansed during an organic shopping spree is your bank account, leaving you broke but exceptionally well-hydrated.

****

© Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Contact : Mo. +91 73 8657 8657, Email : drskm786@gmail.com

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – लघुकथा ☆ सुबह की मुस्कान😊 ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

🌱 सुबह की मुस्कान😊

आज सुबह हमारे अपार्टमेंट की लिफ़्ट के कपाट जैसे ही ग्राउंड फ्लोर पर खुले, एक मधुर स्वर कानों में घुला — “गुड मॉर्निंग!”

मैंने मुड़कर देखा। एक प्रफुल्लित दंपत्ति मुस्कुराते हुए लिफ़्ट से बाहर निकल रहे थे। मैंने भी मुस्कान के साथ उनके अभिवादन का उत्तर दिया।

न जाने क्यों, लिफ़्ट से बाहर आते ही दोनों विपरीत दिशाओं में चल पड़े—पति बाईं ओर, पत्नी दाहिनी ओर।

पति ने हँसते हुए पुकारा, “अरे, उधर नहीं… इधर!”

पत्नी ने भी मुस्कुराकर अपनी दिशा बदल ली।

मैंने हल्के से चुटकी ली, “लगता है, आजकल रास्ते भी थोड़े-थोड़े भटकने लगे हैं!”

क्षण भर में तीनों की निश्छल हँसी एक साथ फूट पड़ी। लगा, सुबह की हवा में किसी ने थोड़ी-सी खुशबू, थोड़ी-सी आत्मीयता और थोड़ी-सी हँसी घोल दी हो।🥰

© श्री जगत सिंह बिष्ट

साधक

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ ग़ज़ल # १६० ☆ देखकर इक फ़क़ीर का हुज़रा… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “देखकर इक फ़क़ीर का हुज़रा“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # १६० ☆

✍ देखकर इक फ़क़ीर का हुज़रा… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

ग़म हुए दूर हम ख़ुशी से मिले

आप आये तो ज़िंदगी से मिले

 *

इश्क़ में क्या बड़ा है क्या छोटा

काश सागर भी आ नदी से मिले

 *

बेअदब बेटे का करुँ तो क्या

बाप की आज बेबसी से मिले

 *

देखकर इक फ़क़ीर का हुज़रा

ऐसा लगता कि सादगी से मिले

 *

गिर गया कितना आदमी लगता

जब भी मसली गई कली से मिले

 *

ब जिसमें मिले हो उस रंग का

आदमी ऐसा ही किसी से मिले

 *

करता दावा मिला वो दुनिया से

आदमी काश आप ही से मिले

 *

अश्क़ कितने अरुण छुपे इसमें

खिलखिलाती तेरी हँसी से मिले

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares