(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “संकेत…”।)
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता ‘इंद्रधनुष…‘।)
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “घोड़ा, घास और यारी…“।)
अभी अभी # १०४९ ⇒ आलेख – घोड़ा, घास और यारी श्री प्रदीप शर्मा
घोड़ा घास से यारी नहीं करता ! घोड़े पर अक्सर सवारी की जाती है। आप गाय और कुत्ते की तरह घोड़े को नहीं पाल सकते। घोड़ा बिना घुड़सवार के शोभा नहीं देता। गाय और कुत्ता तो कोई भी रहम दिल इंसान पाल सकता है, घोड़े को पालने के लिए शारीरक बल के अलावा एक अस्तबल की भी आवश्यकता होती है।
युद्ध की कलाओं में घोड़े का विशिष्ट स्थान है। अश्वारोही सेना के बिना कोई भी युद्ध अधूरा होता था। महाराणा प्रताप हों, छत्रपति शिवाजी हों या फिर रानी लक्ष्मीबाई, घोड़ा ही इनकी पहचान थी। अश्व – विश्व में चेतक का नाम अमर है।।
फ़ौज में आज भी कैवेलरी यूनिट, अश्ववाहिनी सेना होती है। कर्फ्यू के वक्त कुछ बीएसएफ के जवान सड़कों पर मार्च करते देखे जा सकते हैं। कभी इंदौर शहर भी ताँगों का शहर हुआ करता था। आज शहर से घोड़ा और घास दोनों गायब हैं।।
घुड़सवारी अगर एक शौक है, तो घुड़दौड़ एक जुनून। मुम्बई का महालक्ष्मी रेस कोर्स घुड़दौड़ के लिए प्रसिद्ध है, जहाँ घोड़ों पर दाँव लगाया जाता है। यह एक तरह का जुआ है, जिसमें कई रईस अपनी दौलत लुटा बैठते हैं। पुरानी हिंदी फिल्मों में कई राय साहब बने चरित्र अभिनेता किसी नंबर के घोड़े पर दाँव लगाकर अपना सब कुछ हार जाते हैं, और दिल के दौरे में अपनी जान गँवा बैठते हैं। तब हीरो रायसाहब की लड़की और माँ को सहारा देता है। अंग्रेजों का यह एक प्रिय खेल था, इसलिए हर छोटे-बड़े शहर में रेस कोर्स रोड और पोलोग्राउंड आज भी देखे जा सकते हैं।
कभी घोड़े तांगा और बग्घी में जोते जाते थे। महाभारत काल में कृष्ण जिस अर्जुन के रथ के सारथी बने थे, उसमें भी घोड़े ही शोभायमान होते थे। जब घोड़े को घास मिलनी बंद हो गई, तो ताँगों का स्थान सायकल रिक्शा और ऑटो रिक्शा ने ले लिया। एक आम इंसान ने भले ही ज़िन्दगी में कभी कोई घोड़ा न खरीदा हो, सोते वक्त वह अक्सर घोड़े बेचकर ही सोता है।।
जो लोग धंधे-व्यवसाय को यारी से अधिक महत्व देते हैं, वे दोस्ती के लिहाज में एक पैसा नहीं छोड़ते। उनका यह तकिया कलाम होता है, भैया ! घोड़ा घास से यारी करेगा, तो खायेगा क्या ? उन्हें यारी से ज़्यादा घास प्यारी है। उसूल अपना अपना।
अब तो घोड़ा बस बारात में देखा जा सकता है। माफ़ कीजिये, वह भी शायद घोड़ी ही होती है। घोड़ी पे हो के सवार … गाना चला करता है। दूल्हे राजा घोड़े पर बैठे हैं। एक रस्म में घोड़े को आग्रहपूर्वक एक पात्र में भीगी हुई चने की दाल खिलाई जाती है। बस शायद यही एक मौका होता है, जब घोड़ा घास से नहीं, चने की दाल से भी यारी कर लेता है।।
एक काळ असा होता की मुलगी जन्माला आली की तिचे संगोपन करताना किंवा तिला वाढवताना आई-वडिलांच्या मनात महत्त्वाचा जर कुठला विचार असेल तर “आपली मुलगी वयात आल्यावर तिच्यासाठी एखादा चांगला कुटुंबस्थित जोडीदार पाहायचा आणि तिचा विवाह जमवून द्यायचा म्हणजे आपली जबाबदारी संपली.”
आणि हाच विचार मनाशी बाळगून ती एक सक्षम गृहिणी बनावी, सासर माहेरचा मान तिने वाढवावा असे संस्कार तिच्यावर केले जात. म्हणजे मुलगी म्हटली की तिला स्वयंपाकपाणी आणि घर कामाचे धडे प्रथम विनाअट घ्यावेच लागायचे. तिने किती शिकावे अथवा तिने तिच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी की न करावी या सगळ्या आघाडीवर तिला मान्यता देण्याआधी या सगळ्यांमुळे तिचा विवाह जमवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात हा प्राथमिक पण प्रबळ विचार असायचा. थोडक्यात त्या काळात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणे ही स्त्रीच्या आयुष्यातली अत्यंत अडथळ्याची शर्यतच होती पण हळूहळू काळ बदलला अगदी शंभर टक्के नसला तरी बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच क्षेत्रात, जवळजवळ सर्वच क्षेत्रात आजची स्त्री अग्रेसर होत असल्याचं चित्र दिसू लागलं आणि या परिणामाचा विचार करताना मनात येते की एखाद्या स्त्रीच्या जडणघडणीत आई-वडिलांचा जर डोळस, समंजस सहभाग आणि सामाजिक विचारसरणीला डावलण्याचे बळ असेल तर ती नक्कीच काहीतरी दैदिप्यमान असे करू शकते हे बऱ्याच अंशाने सिद्ध झालेले आहे. याच विचारांचे प्रतिबिंब डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या अवकाशाची सीमा या गीतात मला दिसलं. खरोखरच मन आनंदलं आणि या गीताचा रसास्वाद घ्यायलाच हवा असे अगदी मनापासून वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
☆ अवकाशाची सीमा ☆
☆
तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ध्रु
*
ती : हो वीणा सरस्वतीची
हो पद्मिनी पदन्यासाची
सुरसमाधि गंधर्वाची
प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१
*
तो : खेळाडू मैदानाची
मासोळी जलतरणाची
पाकोळी अवकाशाची
यश राहू दे सदा तुझ्या साथीला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला २
*
तो: तव प्रज्ञा विनायकाची
ती: ज्ञानाची विज्ञानाची
दोघे :वर्षा तुजवर आशीशाची
तव तेजाचा मार्ग दीप जगताला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला३
☆
– डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध)
हे गीत वाचल्यानंतर प्रथम जाणवतं ते हे एक प्रेरणा गीत आहे. या गीतात एका भाग्यशाली गुणी कन्येला आई-वडिलांकडून मिळणाऱ्या आशीर्वादाचे चित्र शब्दांकित केले आहे. आपल्या कन्येने चौफेर प्रगती करून तिचे स्वतःचे एक स्थान निर्माण करावे आणि जन्मदात्यांची मान उंच करावी अशी अपेक्षा त्यात मांडली आहे आणि त्यासाठी त्यांचं संपूर्ण पाठबळ तिला देत असताना भरभरून आशीर्वादही दिले आहेत हेच प्रथम दर्शनी गीत वाचताना लक्षात येतं. एका उदारमतवादी आईबापांचं आपल्या कन्येविषयीचं स्वप्न यात सुंदरपणे रेखाटलं आहे.
हे एक निराळेच द्वंद्वगीत आहे आणि या गीतातील गायक माता आणि पिता आहेत.
तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला
खुडुनि आणी नभिच्या नक्षत्राला।ध्रु
या गीतातलं हे ध्रुवपदच पित्याने कन्येला दिलेल्या प्रेरणेचं आहे. मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने एक बाप मुलीला सांगत आहे, “ बेटा इतकं मोठं तुझं कर्तुत्व असूदे की त्यासाठी विशाल आकाशाच्या सीमाही तोकड्या पडाव्यात. अशी उंच भरारी घे की आकाशाचा चंद्र तुझ्या झोळीत येईल. ” या ध्रुवपदाच्या दोन ओळीतच त्या कन्येच्या सामर्थ्याविषयी पित्याने विश्वास दाखवला आहे आणि तिला उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित आणि प्रेरित केले आहे.
“तुझ्या ध्येयासाठी SKY IS THE lIMIT असू दे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला ही काव्यपंक्ती रूपकात्मक आहे. नभिचे नक्षत्र आणावे यात तिने उंच भरारी घेऊन अशक्य ते शक्य करून दाखवावे ही अपेक्षा बाळगलेली आहे.
कन्येच्या स्वप्नात भागीदार असलेली तिची माता ही हेच म्हणते,
ती: हो वीणा सरस्वतीची
हो पद्मिनी पदन्यासाची
सूर समाधी गंधर्वाची
प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१
जे कुठलं क्षेत्र तू निवडशील त्यात तू स्वतःला अत्त्युत्तम सिद्ध कर. त्या क्षेत्रातील शिखर गाठण्याचा प्रयत्न कर. संगीत क्षेत्रात तुला जर एखदे तंतुवाद्य शिकायचं असेल तर त्यात इतकं यश तुला मिळो की तुझ्या हाती वाजणारी वीणा ही जणू काही साक्षात सरस्वतीचीच वाटावी.
जर तुला नृत्यकलेत काही करून दाखवायचं असेल तर पदन्यासाचे शास्त्र इतकं आत्मसात कर की तुझं नृत्य पाहताना साक्षात पद्मिनीचेच दर्शन होईल आणि श्रेष्ठ गायिका बनायचं असेल तर सुरांची कठोर तपश्चर्या करून स्वर्गीय गंधर्वांची कला आत्मसात कर. तुझे गायन हे गंधर्वगायन ठरो. कुठल्याही कलेचं सर्वार्थाने, सर्वांगाने आव्हान तुला पेलता आलं पाहिजे.
आईने व्यक्त केलेलं हे कलेचं स्वप्न तर पित्याची आणखी काही निराळी इच्छा..
तो: खेळाडू मैदानाची
मासोळी जलतरणाची
पाकोळी अवकाशाची
यश राहू दे सदा तुझ्या साथीला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला२
आपल्या उमलत्या कन्येला मोठ्या अभिमानाने हा पिता सांगत आहे, ” तुला जर क्रीडा क्षेत्रात तुझं स्थान निर्माण करायचं असेल तर मग मैदान गाजव. मैदानी खेळात असं प्राविण्य मिळव की सारं जग एक उत्तम खेळाडू म्हणून तुझं नाव घेईल. पाण्यात पोहायचं असेल तर मासोळी सारखं डोळ्यांचं पारणं फिटणारं पोहणं शिकून घे. इतकी गती, इतकं चापल्य त्यात असूदे! अंतराळात झेप घे आणि अवकाशालाच गवसणी घाल.
मी नेहमीच तुला यशासाठी शुभेच्छा देईन. जे वांछित आहे ते तुला मिळेलच. यश तुझ्या पदरात आपणहून येईल. फक्त डळमळू नकोस. असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न कर. एक लक्ष्य ठेव. कधीही ध्येयाच्या मार्गावरून तुझं पाऊल मागे पडू नये. सदैव पुढे जात रहा.”
या ओळींमध्ये पाकोळी अवकाशाची ही शब्दरचना जरा विस्मित करते. खरं म्हटलं तर पाकोळी म्हणजे एक आकाशात भिरभिरणारं लहानसं पाखरू. पाकोळी हे पित्याने कन्येच्या “आज ती लहान असल्याचं” दर्शविण्यासाठी वापरलेला प्रतिकात्मक, रूपकात्मक शब्द असावा.
“बाळ आज तू माझं छोटंसं पाखरू आहेस पण तू जर अवकाशाचा वेग घ्यायचं ठरवलंस ना तर तुझ्या पंखातील ताकद नक्कीच वाढेल आणि आत्मनिर्भरतेने तू भविष्यात अंतराळात भरारी घेऊन चंद्र तार्यांशी दोस्ती करू शकशील हा विश्वास मला आहे. एक पाकोळी अवकाश ताब्यात घेऊ शकते हे जगाला दिसू दे. ”
पुढचा चरण अतिशय वाचनीय, आणि भावना उचंबळून टाकणारा आहे
तो: तव प्रज्ञा विनायकाची
ज्ञानाची विज्ञानाची
दोघे: वर्षाव आशीशाची
तव तेजाचा मार्गदीप जगताला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ३
पहिल्या ओळीत पित्याने कन्येला म्हटलं आहे, तव प्रज्ञा विनायकाची
“विनायक म्हणजेच गणेश म्हणजेच बुद्धीची देवता. मुली तू प्रज्ञावंत आहेस, बुद्धिमान आहेस, त्या गणेशाची तुझ्यावर कृपा आहे आणि त्याने बहाल केलेल्या बुद्धीचा तू योग्य रीतीने उपयोग करून घे. ”
या म्हणण्याला त्या मातेचेही अनुमोदन आहे आणि ती लगेच म्हणते,
ज्ञानाची विज्ञानाची ईश्वराने तुला ज्ञानी बनण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. यथाशक्ती तू योग्य असे ज्ञानकण वेचून तुझ्या ज्ञानाची झोळी भरून घे. ”
या इथे कवीने वापरलेल्या विज्ञानाची हा शब्द फार सूचक आहे. यात असा अर्थ अभिप्रेत आहे की, ” जगाने विज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे. या विज्ञान युगात तू यत्किंचीतही मागे पडू नकोस. जे जे नवे ते ते स्वबुद्धीने आत्मसात कर. रचनात्मक प्रगत विज्ञानाचा सकारात्मक पाठपुरावा करून तुझ्या हातून काहीतरी अलौकिक घडू दे! ”
मातापित्यांच्या स्वप्नाचे सूर एकमेकात मिसळतात आणि दोघेही एकत्रपणे म्हणतात,
वर्षाव तुजवर आशीशाचा
तव तेजाचा मार्गदीप जगताला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला..
आम्ही दोघेही तुझ्यावर मनापासून आशीर्वादांचा वर्षाव करतोय आणि विश्वास व्यक्त करतो की जिथे कुठे जाशील, जे कुठले क्षेत्र निवडशील त्यात तुला झळाळते लखलखीत यश लाभो आणि तुझ्या यशोतेजाने तू तुझ्या मागून येणाऱ्यांना प्रकाश दे. त्यांचाही मार्ग उजळ. जगासाठी एक आदर्श उदाहरण तुझ्या रूपाने ठेव. पुढच्या पिढीसाठी तू दीपस्तंभ हो आणि आकाशातील चंद्र तारे वेचण्याचं तुझं धडाडीचं स्वप्न पूर्ण होऊ दे. ”
अशा रीतीने हे संपूर्ण गीत उलगडताना एका सुंदर प्रेरणागीताचा अनुभव मनाला प्रसन्न करतो. या गीतात आई-वडिलांनी कन्येला दिलेला प्रेमळ आणि प्रांजळ असा मौलिक आशीर्वाद आहे.
॥शुभास्ते पंथान: संतु॥ याच भावाचा तो आशीर्वाद आहे. आपल्या कन्येसाठी कला, क्रीडा, साहित्य, संगीत, विज्ञान, ज्ञानाची सर्व दालने त्यांनी खुली ठेवली आहेत. कसलाही दबाव तिच्यावर नाही. एका कळीतून सुंदर फुल पूर्ण उमलू दे हीच भावना.
डॉ. निशिकांत श्रोत्री एक महान कवी तर आहेतच पण आजपर्यंत त्यांच्या ज्या अनेक कविता मी वाचलेल्या आहेत त्यातून त्यांचं स्त्रीवादीपण प्रकर्षाने झिरपलेलं आहे. कुठलीही कविता असूदेत पण त्यांच्या शब्दातून मनापासून स्त्रीचा सन्मान करणारेच भाव प्रकट होत आले आहेत. अगदी त्यांच्या शृंगारिक कवितेत सुद्धा त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारे विकृतपणे स्त्रीचे चित्र कधीही चितारलेलं मला आठवत नाही. कदाचित माझ्याकडून हे थोडं विषयांतर होत असेल पण कवीच्या मनाचे अंतरंग किती निर्मळ असू शकतात हे आजच्या त्यांच्या अवकाशाची सीमा या गीताविषयी लिहिताना मला जाणवलं आणि ते अधोरेखित करावसं वाटलं कारण एखादं काव्य सुंदर का वाटतं तर तिथे कवीचं सुंदर मन असतं म्हणूनच.
अवकाशाची सीमा या गीतातील साधीच, फारसे क्लिष्ट अलंकार, छंद, वृत्त नसलेली पण प्रेमळ आई-वडिलांचे मुलीबद्दलच्या भविष्याचे स्वप्नरंजन करणारी प्रेमळ, वात्सल्यपूर्ण आणि प्रेरणादायी शब्दरचना वाचकाच्या मनाला थेट भिडते. फक्त इतकच नसून हे गीत समाज विचारसरणीला शंभर पावले पुढे नेतं म्हणून तेही अधिक महत्त्वाचं वाटतं. या गीतातला वात्सल्य रस आणि माता पित्यांच्या कन्येविषयीच्या उच्च भावना माझ्यासारख्या स्त्रीवाचकाला आणि दोन कन्येच्या मातेला नक्कीच भारावून टाकतात. या गीताचं हेच परमयश आहे असंच मी मानते.
अलीकडे आठ दिवस पाऊस सुरू झाला आहे. प्रतीक्षा करून थकलेल्यांना दिलासा मिळाला. पण माझ्या मनात एक वेगळाच विचार. पक्षी जीवन पूर्णपणे झाडावर अवलंबून. घरा शेजारचे आंब्याचे झाड माझ्या डोळ्यासमोर. त्यामुळे पहाटे तीन साडेतीन वाजल्यापासून सुरू होणारी पक्षी जीवनाची सुरुवात माझ्या परिचयाची. ही सुरुवात सध्या कोकीळ आणि कोकिळेच्या संवादाने. तो अधून-मधून दिवसभर चालूच. कधी सुसह्य तर कधी असह्य, कधी आर्त तर कधी श्राव्य. इतर पक्षांची हालचाल असतेच. बुलबुल आणि नाचण(fan tail) कायमचे रहिवासी. खारुताईची वटवट तर अखंड. शेवटी सांगावे वाटते, बाई आता गप्प बसायला काय घेशील? पुरे कर तो शेपटीचा तुरा घडवणे आणि त्या तालावर आवाज करणे. पोपट दिसत नाहीत पण पोपटपंची मधून मधून ऐकू येते. सुर्यपक्षी कोणाच्या अध्यात ना मध्यात. ते आपल्याच नादात, फुले असलेल्या झाडांच्या आसपास वावर. क्वचित चष्मेवाला, मैना, राॅबिन, टिट यांचेही दर्शन. मी आहे सांगणारी कावळ्यांची कावकाव कधी दूर तर कधी जवळ. अधून मधून भारद्वाजाचा भारदस्त आवाज. असे हे पक्षी जीवन, घरात बसणारी मी त्यामुळे त्यांचा विचार हाच माझा एक छंद.
पण पाऊस सुरू झाला की हे सर्व पक्षी मंडळी कोठे गायब होतात कळत नाही. आवाज नाही, दिसत नाहीत. हिरव्या पानात कसे लपून जातात कळत नाही. आणि पाऊस थांबला की परत जागृती. हालचाल सुरू. यांना पाऊस कसा लागत नाही? भिजणे, थंडी नाही का? कारण घरटे बांधले तरी त्याचा उपयोग अंडी ठेवण्यासाठी. पिल्लूला पंख फुटले उडू लागली की घरटे निकामी. मग भर पावसात पक्षी कोठे झोपतात? काय खातात? आपण छत्री रेनकोट केवढा थाट करतो. गरम चहा, भजाचा आस्वाद घेतो.
पक्षांचे कौतुक कोण करणार? त्यांचे किती हाल होत असतील? पण न कुरकुरता त्यांचे जीवन सुरू असते. असं वाचलं की पक्षांच्या शेपटी जवळ ग्रंथी असतात. त्यातून तेलकट द्रव पाझरतो. आपल्या चोचीने पक्षी तो सर्व अंगाला लावतात. त्यामुळे त्यांचे अंग भिजत नाही. निसर्गाने किती छान योजना केली आहे. त्यालाच सर्वांची काळजी. आपण मात्र मी शहाणाच्या अभिमानात. पण पक्षी काही कुरकुर न करता मिळेल ते खाद्य, पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा, मिळेल त्या आडोशाला निवास, कुणाशी भांडण नाही. अन्नाची साठवण नाही. आनंदाने एकाच झाडावर सर्व राहतात.
पिल्लू उडायला शिकली, स्वावलंबी झाले की त्यांनी कुठेही जावं. आई वडील कर्तव्यातून मोकळे. म्हणून म्हणतात पक्षासारखं जगावं. कर्तव्य करावं पण प्रपंचात अडकू नये. मिळेल त्यात समाधानी असावं. हव्यास तेथे ईर्षा तेथे असमाधान.
राजेश, त्याची बायको रजनी व त्यांची २ वर्षांची छकुली स्वीटी यांचं छोट्टं कुटुंब यमुना सोसायटीत खूप आनंदात होते. राजेशची एका बॅंकेत नोकरी होती आणि रजनीने स्वीटीच्या जन्मापासून नोकरी सोडली होती. सोसायटीचा वॉचमन नकुल सिंग याचा स्वीटीवर खूप जीव. “इसे देखता हूँ ना तो गांवमे मेरी बिटीया है ना, उसकी याद आती है! “, त्याचं नेहेमीचे पालुपद असायचे.
एकदा राजेश नेहमीप्रमाणे कामावर गेलेला. दुपारी ४ – ४:३० ची वेळ होती. सोसायटीच्या बागेत सावलीत स्वीटी व ७-८ वर्षाची सोहम, पिंकी, राजू खेळत बसली होती. सोहमची आई दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत कपडे वाळत टाकत होती. रजनीला पटकन कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊन यायचे होते. रजनीने सोहमच्या आईला खूणेनेच आपण ५ मिनीटात येतोय असे सांगितले. मुलांनाही सांगितले – “स्वीटीवर लक्ष ठेवा रे, तिला एकटीला नका सोडू. मी आलेच पाच मिनीटात. ” गेटशी नकुल सिंग अर्धवट डोळे मिटून डुलक्या काढत होता.
रजनी परतली, पाहते तर बागेत मुलं नव्हतीच. एकटी स्वीटीच तिथे आणि नकुल सिंग तिच्या जवळ बसून, तिचा स्कर्ट वर करून… रजनीच्या जीवाने ठाव सोडला. जोरात ओरडतच ती नकुलच्या अंगावर धावून गेली आणि लाथा-बुक्क्याने त्याला मारू लागली.
इमारतीशी उभी राहिलेली मुलं काहीतरी ओरडून तिला सांगत होती, नकुल हात जोडून तिला काही सांगत होता, पण ती बेभान – बेफाम झालेली.
सोहमची आई धावतच येत होती. ” अग रजनी, हात आवर, हात आवर. ही मुलं खेळत होती तर तिकडून हा एवढा मोठा नाग आला. मुलं घाबरून पळाली, स्वीटी मात्र काही न कळल्याने तिथेच तशीच फतकल मारून बसलेली. मुलांच्या आरडाओरड्याने नकुलचे लक्ष गेले; नाग स्वीटीच्या पायात घुटमळत होता. नकुलने जीवाची पर्वा न करता खाली वाकून त्याला हाताने उचलले आणि दूर भिरकावून दिले. तो तिला कुठे डसला नाही ना नकुल पहात होता. “
रजनीच्या जीवाचे पाणी पाणी झाले, मारहाण करणारे हात जोडले गेले आणि ती नकुलकडे क्षमायाचना करू लागली, तिच्या छकुलीचा जीव वाचवल्याबद्दल त्याच्या पाया पडू लागली.
— —
पंचतंत्रातील मुंगूसाची गोष्ट –
एक शेतकरी एका मुंगूसाला वाचवतो आणि घरी आणतो. एकदा तो शेतकरी आणि त्याची बायको दोघेही घराबाहेर गेले असतात, घरी त्यांचे बाळ व मुंगूस असे दोघेच असतात. बायको घरी येऊन बघते तर दारात मुंगूस उभं असतं – त्याचं तोंड आणि शरीर रक्तानं माखलं असतं. या मुंगूसाने नक्की आपल्या बाळाचा घात केला असे वाटून ती माऊली तिथल्या तिथे त्या मुंगूसाला मारून टाकते. घरात जाऊन पहाते तर बाळ मजेत खेळत असतं आणि त्याच्याजवळ एक विषारी नाग मरून पडलेला असतो – बाळाला इजा करण्याच्या आधीच मुंगूसाने त्याला मारलेले असते.
— —
संस्कृतमध्ये मुंगूसाला नकुल म्हणतात, माहित होतं का हो तुम्हाला?
☆ “स्वर्ग, नरक, आणि आपण – -” – लेखक : मुक्तक जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆
मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळावी म्हणून माणूस आयुष्यभर किती धडपड करतो. कुणी उपवास करतो, कुणी दानधर्म करतो, कुणी तीर्थयात्रा करतो, कुणी देवाला नवस बोलतो. जणू काही स्वर्ग म्हणजे एखादी नवीन हौसिंग सोसायटी आहे आणि तिथे 1 BHK बुक करण्यासाठी पॉइंट्स जमा करायचे आहेत.
पण मला एक प्रश्न पडतो.
जर आपण आधीच स्वर्गात राहत असू तर?
जरा सकाळी उठल्यावर आजूबाजूला नीट बघा.
बटण दाबलं की दिवा लागतो. दुसरं बटण दाबलं की पंखा फिरतो. तिसरं दाबलं की एसी सुरू होतो. नळ उघडला की पाणी येतं. गॅस पेटवला की काही मिनिटांत जेवण तयार होतं. मोबाईल काढला की जगभरातील माहिती हातात येते. एखादा मित्र अमेरिकेत असला तरी सेकंदात त्याचा चेहरा दिसतो.
आणि हे सगळं आपण इतक्या सहज घेतो की जणू काही ही पृथ्वीवरची नाही तर जन्मसिद्ध सुविधा आहे.
आजपासून फक्त दोनशे वर्षांपूर्वीच्या एखाद्या राजाला जर आपल्या घरात आणलं तर तो कदाचित घराबाहेर पडायलाच तयार होणार नाही.
“हे काय? ” “गरम पाणी. “
“हे? ” “थंड हवा. “
“हे? ” “जगभरातील माहिती. “
“हे? ” “दहा मिनिटांत पिझ्झा घरी. “
राजा म्हणेल, “मी आयुष्यभर राज्य केलं, युद्धं जिंकली, खजिने गोळा केले, पण हे सुख तर मला कधीच मिळालं नाही! “
म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की आजचा सामान्य माणूस अनेक बाबतीत कालच्या राजापेक्षा सुखात जगतो.
पण गंमत बघा.
आपण या सगळ्या गोष्टींकडे बघत नाही.
कारण माणसाकडे जे असतं त्याची किंमत नसते.
एसी सुरू आहे म्हणून आनंद नाही.
एसी बंद पडला की दुःख.
मोबाईल आहे म्हणून आनंद नाही.
नेटवर्क गेलं की जग संपल्यासारखं.
घर आहे म्हणून आनंद नाही.
शेजाऱ्याचं घर मोठं आहे म्हणून दुःख.
गाडी आहे म्हणून आनंद नाही.
त्याच्याकडे मोठी गाडी आहे म्हणून दुःख.
माणूस स्वतःच्या स्वर्गात उभा राहून दुसऱ्याच्या स्वर्गाची तुलना करत असतो.
पण त्याच वेळी पृथ्वीवर दुसरं चित्रही आहे.
आजही लाखो लोक प्यायच्या पाण्यासाठी रांगेत उभे असतात.
काही जणांकडे राहायला पक्कं घर नाही.
काही जणांना दोन वेळच्या जेवणाची खात्री नाही.
काही मुलांना शिक्षण मिळत नाही.
काही लोकांकडे घालायला पुरेसे कपडेही नाहीत.
आपण ज्या गोष्टींना “सामान्य” म्हणतो, त्या अनेक लोकांच्या आयुष्याचं स्वप्न असतात.
आपल्याला नळातून येणारं पाणी दिसतं.
त्यांना पाण्यासाठी किलोमीटर चालावं लागतं.
आपल्याला एसीचा रिमोट सापडत नाही म्हणून राग येतो.
त्यांना उन्हापासून बचावासाठी झाडाची सावली शोधावी लागते.
आपण डाएट प्लॅन शोधतो.
ते पुढचं जेवण कुठून येईल याचा विचार करतात.
म्हणूनच मला वाटतं स्वर्ग आणि नरक हे मृत्यूनंतरचे पत्ते नसावेत.
ते इथेच आहेत.
एकाच शहरात.
एकाच गावात.
कधी कधी एकाच रस्त्यावर.
एका घरात मुलगा नवीन मोबाईल स्लो झाला म्हणून नाराज असतो.
समोरच्या घरात मुलगा ऑनलाइन वर्गासाठी मोबाईल नसल्यामुळे शिकू शकत नाही.
एका माणसाला गरम पाणी उशिरा आलं म्हणून त्रास होतो.
दुसऱ्याला पाणीच मिळालं तर तो आनंदाने आंघोळ करतो.
फरक फक्त परिस्थितीचा नाही.
फरक दृष्टीकोनाचाही आहे.
कारण काही लोक नरकात राहूनही हसतात.
आणि काही लोक स्वर्गात राहूनही कुरकुर करतात.
माणसाची एक सवय खूप विचित्र आहे.
तो जे नाही त्याची यादी रोज बनवतो.
पण जे आहे त्याची यादी कधीच बनवत नाही.
जर प्रत्येकाने रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच गोष्टी लिहिल्या…
आज मला श्वास घेता येतो.
आज माझ्याकडे पिण्याचं पाणी आहे.
आज माझ्याकडे खायला अन्न आहे.
आज माझ्याकडे झोपायला जागा आहे.
आज माझे प्रिय माणसं माझ्यासोबत आहेत.
… तर कदाचित आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल.
आपण स्वर्ग शोधत आहोत.
पण कदाचित स्वर्ग ही एखादी जागा नसून एक जाणीव आहे.
आणि नरकही एखादी जागा नसून एक विस्मरण आहे.
जे आहे त्याची किंमत विसरणं म्हणजे नरक.
जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं म्हणजे स्वर्ग.
बाकी मृत्यूनंतर काय मिळेल हे कुणालाच माहीत नाही.
पण जिवंत असताना पृथ्वीसारखा ग्रह, श्वास घेण्यासाठी हवा, प्यायला पाणी, खायला अन्न, प्रेम करणारी माणसं आणि बटण दाबल्यावर मिळणाऱ्या हजारो सुविधा मिळालेल्या असताना सतत दुःखी राहणं… हा देखील थोडासा विनोदच आहे.
कदाचित देव वर बसून हसत असेल…
… “अरे, मी तुम्हाला स्वर्गात पाठवलं होतं. तुम्ही तिथेही तक्रार केंद्र सुरू केलंत! ”
☆
लेखक : मुक्तक जोशी
प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बघता बघता आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरून गेले. पिसाट वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू झाला.
रानात मोर आपले पिसारे फुलवून, माना उंचावून, म्याँव, म्याँव करीत आनंदाने केकारव करू लागले. क्षणातच पावसाच्या टपो-या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. बहुप्रतिक्षित वर्षाऋतुचे हवेहवेसे वाटणारे विभ्रम सुरू झाले! पाऊस आला, पाऊस आला!!
हा भावनाविष्कार
साकार करी मल्हार।।
टीप :- आई मुलाला लाडाने जसे “बबड्या, छबड्या” म्हणते तसे मल्हार या लोकप्रीय रागाला काहीजण “महुडे” या लाडक्या नावाने संबोधितात. (ही माहिती कवी कै. वसंत बापट यांच्याकडून मी ऐकली होती.)
“कुठे अंतच नाही या सरकारच्या अत्याचाराच्या सामर्थ्याचा… लोकांना तुडवून काढतयं अक्षरशः! लोक ही बिचारे कुठपर्यंत आणि किती सहन करतील?? “
“तू म्हणशील तर मी व्हाईसरॉय ला माफी पत्र लिहू का? “
“सुकुमार पोरी -बाळी तुरूंगात डांबल्या आहेत; त्या माफी मागत नाहीत ; आणि तुम्ही मागणार? …
हा संवाद आहे स्वराज्यासाठी अतीव कष्ट, असीम त्याग करणा-या दोन महनीय अशा…
महात्मा गांधी आणि त्यांची सहचारिणी कस्तुरबा या दोघांतील… आणि तोही… पुण्यातील आगाखान पॅलेस मधील कारावासातील अक्षम्य हेळसांड, अन्याय, आजारातील वेदना सहन करत असतांना!! एक लखलखणारं तेज… एक ज्योती निमाण्यापूर्वी, संपूर्ण शक्तीनिशी तेजाळून उठलीयं! रोमा-रोमांतलं प्रवाही देशप्रेम,
वैखरीतून हे असं व्यक्त झालयं!
कस्तुरबा… खरंतर भारताच्या आणि स्त्री स्वातंत्र्य लढ्याच्या पुस्तकातलं एक चमकणारं पान! पण त्यावर धूळ साचून ते नजरेआड झालयं. कस्तुरी सुगंध दरवळ जणू विरून गेलायं!
कस्तुरबा… कस्तुर ही पोरबंदर येथील गोकुळदास माखजी या एका श्रीमंत व्यापा-याची कन्या. मोहनदास गांधी… बापू… यांचा परिवार ही शेजारीच रहात होता. दोन परिवारातील स्नेह ; बंधनात बद्ध झाला तो या दोघांतील गठबंधनाने!
आणि सुरू झाला कस्तुर चा जीवन प्रवास… सामान्य गृहिणी ते असामान्य ‘ बा ‘ पर्यंतचा!!
कस्तुर… कधीही शाळेत न गेलेली एक समर्पित गृहिणी. बायको बनून आली पण नंतर आपल्याच मुलांची नाही ; तर बापूंच्या ‘साबरमती ‘ आणि ‘सेवाग्राम ‘ आश्रमातील सगळ्यांचीच बा झाली. निष्कपट श्रद्धा, निस्वार्थ भक्ती, आणि सेवा यांचा आदर्श ठरल्या कस्तुरबा.
गांधीजी जेव्हा शिक्षणासाठी इंग्लंडला गेले तेव्हा दोन लहान मुलं पदरी घेऊन बां नी, कुठलंही आदान-प्रदान नसलेलं आयुष्य कंठीलं! दक्षिण आफ्रिकेला गेले तेव्हाही बां नी त्यांना समर्थन आणि प्रोत्साहनच दिले.
दक्षिण आफ्रिकेत असतांना तर त्यांनी असाधारण असं साहस दाखवलं. गो-यांची फौज धमकावायला आल्यावर गांधीजींना इंग्रजांच्या हाती लागू न देण्याची पराकाष्ठा केली आणि वाचविले. आणि स्वतः ही मुलासह दुस-या घरी जाऊन शरण घेतली.
बघता-बघता या कस्तुरीचा सुगंध दरवळत जाणवायला लागला. त्या बापूंच्या जीवन संग्रामात अचल निष्ठेने उभ्या राहिल्या. स्वतः ला काया, वाचा, मनाने अर्पण केले त्यांच्या जीवनकार्यात एक समिधा बनून!!
आश्रमातील लोकांना आईच्या मायेनं आणि वत्सलतेनं शिस्त आणि व्यवस्थापनाचे धडे दिले.
महिलांना स्वच्छता, आरोग्य आणि साक्षरतेचे धडे दिले.
कस्तुरबा लिहायला शिकल्या ख-या पण त्यांची पद्धत लहान बालकासारखी प्रत्येक शब्द, अक्षर वेगवेगळं, दूर दूर. बापूंनी खूप शिकवलं, सराव करायला सांगितलं. सगळ्यांनी वही मागितली, बां नी ही मागितली. पण बापूंनी त्यांना वही… नोटबुक न देता, त्यांच्या हातात कागदाचं बंडल ठेवत सांगितलं… “तुझं लेखन सुधारेल तेव्हाच तुला नोटबुक मिळेल.” बां ना खूप वाईट वाटलं. दुखावल्या गेल्या त्या.
नंतर बापूंना ही जाणवले ते. सरोजिनी नायडूंना सांगून, सुशिला नायरच्या हाती एक नोटबुक पाठवली. पण बां चं मोठं स्वाभिमानी उत्तर बघा… ” मला नोटबुक ची काय गरज?”…
याच कस्तुरबांचं एक पत्नी म्हणून बलिदान प्रशंसनीय आहे. राष्ट्र आणि स्वातंत्र्य संग्रामासाठी आपलं घर खुलं केलं. पतीच्या प्रयत्नांना पूर्ण साथ दिली. पती जेलमध्ये असतांना उपवास केले, दागिने आणि इतर वस्तूंचा ही त्याग केला. बा एक समर्पित पत्नी होत्या, पण म्हणून ‘दबलेल्या ‘ कधीच नव्हत्या.
“चले जाव” चळवळीच्या वेळी बापूंना अटक झाली त्यावेळी त्यांनी बां ना सांगितले, ” तू माझ्या सोबत येण्याऐवजी मी अंगिकारलेले व्रत पूर्ण कर. ” परंतु भाषणासाठी शिवाजी पार्क वर पोहोचण्यापूर्वीच बां ना अटक झाली.
त्यावेळी प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाने करेंगे या मरेंगे… लिहिलेला बिल्ला शिवून घ्यावा असे ठरले… पण… “मला याची काय गरज आहे? तो तर माझ्या काळजावरच कोरलेला आहे. ”
अशा या बां नी, म. गांधींजींना नेहमीच असाधारण साहस, आस्था, समर्पण युक्त अशी साथ दिली. बलिदानाच्या मार्गावर न घाबरता, न डगमगता चालत राहिल्या. म. गांधीजींची विशाल छबी, प्रतिबिंब बनून राहिल्या त्या. नश्वरता पार करून अमरता प्राप्त केलीयं खर तर त्यांनी.
त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर बापूंनी त्यांच्या विषयी काढलेले गौरवोद्गार स्मरणीय आणि उल्लेखनीय असेच आहेत… ” कस्तुरबा माझ्या सगळ्या राजनैतिक संघर्षात माझ्या सोबतीने ठामपणे उभी राहिली. संकटं आल्यावर जराही घाबरली किंवा डगमगली नाही. आजच्या काळानुसार ती भले ही अशिक्षित वाटेल, पण माझ्या नजरेतून मात्र ती ख-या शिक्षणाचा एक आदर्श होती.”
स्वराज्यासाठी अतीव कष्ट, असीम त्याग केलेल्या कस्तुरबांचा आगाखान पॅलेस मधला तुरूंगवास मात्र खूपच कठीण, वेदनामय होता. त्यांच्या उपचाराबाबत अक्षम्य हेळसांड झाली. बापूंची त्या तुरूंगवासातली सोबत… अगदी शेवटच्या श्वासापर्यंत… हाच काय तो फार मोठा दिलासा होता त्यांच्या साठी!
या कारावासातच त्यांचा मृत्यू झाला.
तेथेच या समर्पितेची समाधी आहे. असं म्हणतात की, त्या समाधीवर स्वतः गांधीजींनी लहान-लहान शंखांनी हे राम! हे शब्द कोरलेले आहेत.
“करेंगे या मरेंगे”… हे भारत छोडो आंदोलनाचे घोषवाक्य कस्तुरबांनी खरे करून दाखवले.
अशी ही कस्तुर… सगळ्यांचीच, अगदी कारागृहातील महिलांची ही आई बा होऊन जगली. आपल्या पतीचा पंथ धरला. त्यांच्या कठोर दुराग्रहाचे, प्रकोपाचे विष ही पचवले. पतीच्या साधनेत आपले मूक पण संपूर्ण योगदान अर्पिले. गांधीजींच्या शक्तीची आदि स्त्रोत होती बा!!