मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मंत्रजागर… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ मंत्रजागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

केळीचे लोंगर बागेत दिसायला लागल्यावर वानरांनी बागेत येऊन धुडगूस घालायला सुरुवात केली. केळी, पपई …..  एकही फळ हाताशी लागेना. आमच्या जमिनीत वडाच्या झाडाखाली अक्कलकोट स्वामींचे मंदिर बांधलेय. देवळात वीज आल्यावर एक दिवस जपयंत्र आणलं. सूर्यास्ताला जपयंत्रावर गायत्री मंत्राचा जप सुरू करायचा, तो चांगलं उजाडल्यावर बंद करायचा. आठ पंधरा दिवसातच एक गोष्ट अनुभवाला आली. जपयंत्र जरी रात्री सुरू असलं तरी दिवसभर बागेत होणारा वानरांचा धुडगूस आपोआप बंद झाला. वानर बागेच्या कुंपणापर्यंत यायचे. पण बागेत यायचे नाहीत. नुकसान करायचे नाहीत. रात्रीच्या वेळी मात्र तोच कळप तळ्याकाठच्या त्याच झाडावर वस्तीला असायचा. आज घराभोवती पाच फळबागा उभ्या राहिल्या असून वानरांमुळे होणारं नुकसान पूर्णपणे थांबलं. गायत्री मंत्र आणि वानर यांचा नेमका काय संबंध –  हे मात्र अनाकलनीय आहे. आज अनेक शेतकरी हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहेत.

‘रानगोष्टी’  या डॉ. राजा दांडेकर यांच्या पुस्तकातील हा उतारा. गायत्री मंत्राचा महिमा सांगणारा. आजच त्याची आठवण होण्याचे कारण काय ? कारण कोकणातील एक फेसबुक मित्र श्री.अविनाश काळे यांची पोस्ट. ‘कोकणचे दुःख कोणी दूर करेल ?’  ह्या मथळ्याच्या पोस्टचा मथितार्थ असा की कोकणातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान माकडे आणि वानरे यांच्यामुळे होत आहे. त्यांचा बंदोबस्त न झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वानर आणि माकड यांना उपद्रवी पशू जाहीर करून मारायला सुरुवात केली. महाराष्ट्रातसुद्धा असे करण्याची गरज आहे.

हे वाचताना गायत्री मंत्राचा प्रभाव आठवला. वानरे, माकडे यांना जीवनिशी मारण्यापेक्षा शेतकरी मित्रांनी हा साधा, निरुपद्रवी उपाय करून पहायला काय हरकत आहे ?

‘एखाद्या मंत्राचा प्रभाव मान्य करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा?’ चा वाद जुनाच आहे. अशीही शक्यता आहे की एखादी विज्ञानाधिष्ठीत गोष्ट देवाधर्माच्या नावे सांगितली की लोकांना पटते, ते ऐकतात हे लक्षात आल्याने आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी हुशारीने लोकांच्या गळी उतरवल्या असतील. आपल्याला त्यामागचे विज्ञान माहित नसल्याने आपण त्याला अंधश्रद्धेचे लेबल लावून मोकळे होतो !

भारतीय मानसिकतेला मंत्राचा प्रभाव, त्यामुळे होणारे चमत्कार हा मुद्दा नवीन नाही. मूल अक्षरओळख शिकण्याच्या आधीपासून घरच्यांकडून रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकू लागते. अक्षरे ओळखता येऊ लागली की पौराणिक कथा वाचू लागते. (आताच्या नवीन पिढीत बहुधा हे होत नसावे.) बालवयातच ‘कुमारी माता’ कुंतीची कथा सामोरी येते. कुंतीने मनापासून दुर्वास ऋषींची सेवा केल्याने त्यांनी संतुष्ट होऊन अपत्यप्राप्तीसाठी देवांना वश करण्याचा मंत्र तिला दिला. तिने कुतूहलापोटी मंत्रजप करून सूर्याला आवाहन केले. सूर्य प्रगट होताच भयभीत होऊन त्याला परत जाण्यास सांगितले. मात्र ‘मंत्र व्यर्थ होऊ शकत नाही,’ असे सूर्य म्हणाला आणि सूर्यपुत्र कर्णाचा जन्म झाला.

भयकथा, गूढकथा यातही अघोरी विद्यांमध्ये विशिष्ट मंत्रांचे सामर्थ्य किती अचाट आहे हे वाचायला मिळते. ‘वशीकरण मंत्र साक्षात मनुष्यरुपात प्रगट झाला,’  वगैरे वाचताना मला भयंकर कुतूहल वाटत असे. जर खरेच असे काही प्रत्यक्षात घडत असेल तर ते आपल्याला निदान एकदा तरी बघायला मिळावे, असेही वाटून जाई.

विशिष्ट शब्द विशिष्ट पद्धतीने उच्चारणे म्हणजे मंत्र. या मंत्रोच्चारणाचा विधायक वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात करू शकलो तर आपले कितीतरी प्रॉब्लेम्स सुटतील!  खरंच मंत्रात शक्ती असते का ?  अलीकडेच व्हाॅट्स अप वर एक पोस्ट वाचायला मिळाली. त्यात या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पोस्टचा मथितार्थ असा की एखाद्या माणसाने आपल्याला उद्देशून अपशब्द उच्चारले, शिव्या दिल्या तर आपल्याला संताप येतो. म्हणजेच त्या शब्दांमध्ये ताकद आहे. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तयार होते. ह्याउलट कुणी आपले कौतुक केले, प्रेमाने बोलले तर आपल्याला प्रसन्न, आनंदी वाटतं. म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते अगदी ह्याच प्रकारे मंत्रातील शब्दांतदेखील ऊर्जा, सामर्थ्य असते. हे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी, जे वैज्ञानिक होते, संशोधनातून सिद्ध केले आहेत.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड,विश्वविख्यात नेमबाज अंजली भागवत यांच्यासारखे अनेक खेळाडू ज्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात होते ते क्रीडामानसशास्त्रज्ञ व माजी इंटेलिजन्स ऑफिसर भीष्मराज बाम यांनी हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. ते म्हणतात,’ मंत्र म्हणजे काही शब्दांच्या किंवा वाक्यांच्या आधारे प्रगट होणारा एखादा प्रभावी विचार असतो. काही वेळा एखादा शब्द किंवा ओंकारासारखे अक्षर मंत्रजपासाठी वापरले जाते. तर कधी कधी काही ओळींचाही मंत्र असू शकतो. मंत्रजप हा एकाग्रतेसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्या विचारांवर आपला ताबा नसेल तर विचार भरकटतातच. पण त्यासोबत आपलीसुद्धा अत्यंत त्रासदायक अशी फरफट होते. विचारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्र उपयुक्त ! मंत्रातले शब्द ज्या अर्थाने वापरले असतील त्यावर तुमची पक्की श्रद्धा असायला हवी. म्हणून तर मंत्र हा तुमची ज्या गुरुवर श्रद्धा असेल, त्याच्याकडून मिळवायचा असतो. किंवा तो मंत्र तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध झालेला हवा. मग आपोआप तुमची त्याच्यावर श्रद्धा बसते.’

प्रभावी स्वसंवाद ( स्वतःसाठी सूचना)  लिहून काढून त्याचा मंत्रासारखा वापर करण्याबाबतही बाम सरांनी लिहिले आहे. Winning Habits या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा ‘विजयाचे मानसशास्त्र’ या नावाने वंदना अत्रे यांच्या सहाय्याने मराठी अनुवाद केला आहे.

दैनंदिन जीवनात मारुती स्तोत्र, रामरक्षा (किंवा आपले आवडते स्तोत्र / मंत्र) म्हटले की प्रसन्न वाटतं, नकारात्मक विचार पळून जातात हा अनुभव तर सर्वांनीच घेतला असेल. ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’  अशीच रामरक्षेची सुरुवात आहे. बुधकौशिक ऋषींना स्वप्नात रामरक्षा स्फुरली. कुरवपूर (कर्नाटक) येथे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’  या अठरा अक्षरी प्रभावी मंत्राचा साक्षात्कार झाला.

अखंड नामस्मरण, मंत्रजप यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता येत असेल, फायदा होत असेल तर ‘श्रद्धा – अंधश्रद्धा’ चा काथ्याकूट कशाला ? नियमितपणे, श्रद्धेने मंत्र जपावा हे उत्तम.

संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी-नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लिसनर… सुश्री राधा पै ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ लिसनर… सुश्री राधा पै ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

खरे तर त्याच मेन्यू कार्डची त्याला उत्सुकता, प्रतीक्षा असते. दोन्ही कार्डांवर बारकाईने नजर टाकून तो वेटरला ऑर्डर देतो. थोड्या वेळाने तो वेटर खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि सोबत एका सुंदर तरुणीला घेऊन येतो. समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते. ‘हॅव ए गुड टाइम.. एन्जॉय !’ अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो.

 टेबलावर ते दोघेच. अनोळखी. अपरिचित. काही क्षण नि:शब्द जातात. मग दोघेही एकमेकांचा परिचय करून देतात. या जुजबी ओळखीपाळखीनंतर ‘ति’च्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते. दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद हळुवारपणे रंगत जातो. उभयतांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगलेला असतानाच वेटर बिल घेऊन येतो. दोघांचाही हिरमोड होते. ‘पुन्हा भेटू’, म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन तो हॉटेलबाहेर पडतो!

‘लिसनर’ नावाच्या शॉर्टफिल्मचे हे संक्षिप्त कथानक. जगभर ही फिल्म दाखविली गेली आणि तितकीच नावाजलीही गेली. ही शाॅर्टफिल्म बनविण्यामागे संदर्भ होता-अमेरिकेतील वॉल्डेन युनिव्हर्सिटीच्या ‘ॲन्युयल रिविव्ह ऑफ सायकॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख. ‘संवाद हरवलेली कुटुंबं’ हा त्या लेखाचा विषय. अर्थात, तो अमेरिकेतील एकल कुटुंब व्यवस्थेवर आणि त्यातही ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, आयबीएमसारख्या आयटी कंपन्यात काम करणाऱ्या कपल्सवर आधारित. ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं (सोशल मीडिया) जन्माला आली तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती नि:शब्द, निरस आणि एकलकोंडी असतात, हा त्या लेखाचा निष्कर्ष. या ‘लिसनर’ शॉर्टफिल्मची प्रेरणा घेऊन कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत, जिथे तुम्हाला, तुमचं मन मोकळं करता येतं! मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागतात! ते तुमच्यात गुंतत नाहीत; पण तुम्हाला गुंतवून ठेवतात. भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पैसे मोजून तासभर संवाद साधायला ‘गिऱ्हायकं’ येतील की नाही, याबाबत हाॅटेलमालक थोडे साशंक होते. पण त्यांची शंका क्षणभंगुर ठरली. बघता-बघता अशा प्रकारची ‘टॉक-टाइम’ हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली!

संवाद हरवलेली कुटुंबं, ही आता जागतिक समस्या बनली आहे. जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली, राहणीमान उंचावले, पण कामाचा ताण, नोकरीची धास्ती आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे मनस्वास्थ्य हरवून बसलेली माणसं आपल्या घरात आहेत. ही केवळ नोकरदार वर्गाची समस्या नाही.

विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध असे सगळे संवाद हरवून बसलेल्या एक प्रकारच्या मानसिक आजाराचे शिकार आहेत. मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे नुकत्याच झालेल्या जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत या विषयावर अतिशय गांभीर्याने चर्चा झाली. विशेषत: कोरोना महामारीनंतर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमागे संवादाचा अभाव हे कारण असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ हे त्याचे एक प्रमुख लक्षण. प्रत्येकाला काही तरी सांगायचे आहे, पण ऐकणारेच कुणी नाही, अशा एका विलक्षण कोंडीत जग अडकले आहे. हा कोंडमारा जीवघेणा ठरतो आहे. परवा नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी वाचून आई-वडिलांना धक्काच बसला. त्याने लिहिले, ‘मी गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय; पण तुम्ही ऐकूनच घेत नाही. माझ्याच घरात जर कुणी ऐकणारं, समजून घेणारं नसेल तर मी कोणाजवळ मन मोकळं करू?’ या मुलाने लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुराने आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे! अन्यथा, पैसे देऊन संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून देणारी हॉटेल्स आपल्याकडेही येऊ घातली आहेच!

सारांश : बोला, व्यक्त व्हा, संवाद साधा, कुठेतरी मन मोकळे करा. मित्र, मैत्रिणी असो की नातलग

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ आत्मपरीक्षण…  ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

आपल्या जीवनात आपण योग्य मार्गावर असण्यासाठी वेळोवेळी स्वतःचे तटस्थपणे आत्मपरीक्षण करता आले पाहिजे.एकदा एक गोष्ट वाचण्यात आली…..

एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.

तरुण : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?

तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खूश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो.

तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.

महिला :  नको. मी एका महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.

तरुण: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !

महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?

तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!

महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!

तरुण हसत हसत फोन ठेवून निघाला.

दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, “तू प्रयत्न केलास, पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस.”

यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, “मला नोकरी नकोय. नक्की नकोय.”

दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?

तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो. तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही, हे चेक करत होतो.

असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.

सांगण्याचे तात्पर्य म्हणजे अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही नोकर असा की मालक. ते महत्वाचे नाही. तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का, हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो?तर आपण स्वतः !!

जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो.

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 49 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 49 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९०.

यमराज जेव्हा तुमचे दार ठोठवेल तेव्हा

तुम्ही काय द्याल?

मी त्याला रिक्त हस्ते जाऊ देणार नाही.

माझ्या त्या पाहुण्याकडे माझ्या

आयुष्याचा पूर्ण कुंभ ठेवीन.

माझ्या शिशिरातल्या दिवसांची भेट त्याला देईन,

वसंत ऋतूतील मधुर फळे देईन,

माझ्या उद्योगशील दिवसांत गोळा केलेले

धान्याचे कण त्याला अर्पण करेन.

जेव्हा माझ्या जीवनाच्या शेवटच्या दिवशी

यमदूत माझ्या दारावर ठोठावेल.

 

९१.

हे मृत्यो, तू माझ्या जीविताची

अखेरची परिपूर्णता आहेस!

ये, आणि माझ्याशी हितगुज कर!

 

मी तुझ्या वाटेकडे दिवसांमागून दिवस

डोळे लावले आहेत.

जीवनातला आनंद व दु:ख मी तुझ्यास्तव

सोसली आहेत.

 

मी जसा आहे, माझ्याकडे जे आहे,

माझ्या आज्ञा,माझे प्रेम हे सर्व

एकांताच्या गहराईत तुझ्याकडेच वाहात होतं.

तुझा एकच अखेरचा दृष्टीक्षेप पडावा

आणि हे माझं जीवन कायमचं तुझं व्हावं!

 

वरासाठी फुलं ओवून त्यांचा हार सिध्द आहे.

विवाहानंतर वधू आपलं घर सोडेल,

तिच्या परमेश्वराला रात्रीच्या

नीरव शांततेत ती एकटीच भेटेल.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खोट्या गोष्टी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ खोट्या गोष्टी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी

१) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- ती तुझ्याकडेच बघतेय.

२) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा.

३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा.

४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको.

६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं.

७) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट- मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही.

८) मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट- आमची मुलगी खूप शांत स्वभावाची आहे.

९) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट- मी Occasionally ड्रिंक्स घेतो.

१०) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट- माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत.

११) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट- हा रंग तुमच्यावर उठून दिसतो.

१२) “टेबल पार्टनर” ने सांगितलेली खोटी गोष्ट- बिअर म्हणजे दारू नव्हे.

आणि सर्वात कळस म्हणजे

१३) नवर्‍याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट

– तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही.

सर्वच खोटं ..पण खरंय..

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बापाची पुस्तकं… – श्री सौमित्र  ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे  ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ बापाची पुस्तकं… – श्री सौमित्र  ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मी गेल्यावर

तुला वाटेल की आपल्या बाबांनी

वाचलीयेत ही सारी पुस्तकं,

पण नाही

अर्धंही वाचता आलेलं नाहीय,

येणारही नाही हे ठाऊक होतं मला

तरी

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं.

 

माझ्यासाठी माझ्या बापाने

काहीच सोडलं नव्हतं मागे,

ही अक्षर ओळख सोडून फक्त

जिच्या मागे धावत मी

पोहोचलो आहे इथवर….

 

तुला सांगण्या समजावण्यासाठी की

मलाही सोडता येणार नाहीय मागे

काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी….

 

ही काही पुस्तकं  आहेत फक्त!

जी तुला दाखवतील वाट

 

चालवतील तुला, थांबवतील कधी, पळवतील कधी

निस्तब्ध करतील,

बोलतं करतील कधी

टाकतील संभ्रमात

सोडवतील गुंते….

 

वाढवतील पायाखालचा चिखल

कधी बुडवतील ,  तरवतील कधी,

वाहवतील कधी थोपवतील प्रवाह,

अडवतील तुडवतील सडवतील…

बडवतील हरवतील सापडतील…

तुझ्याशी काहीही करतील

ही पुस्तकं…

 

तू समोर आल्यावर नेहमीच कवेत घेऊन मी माझ्यातली धडधड

तुला देण्याचा प्रयत्न करतो

तशीच ही पुस्तकं

उघडतील . मधोमध पसरतील हात.

मिठीत घेतील तुला…

आपोआप होतील हृदयाचे ठोके.

 

यांच्यात रहस्यं आहेत दडलेली

अनेक उत्तरंही असतील

प्रश्नांमधे

कदाचित कुठेच

प्रश्नही नसतील..

 

एक लक्षात ठेव,

आपलं आयुष्यच

पल्प फिक्शन

कधी क्लासिक

सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल

कधी कवतिक,

कधी किचकट

कधी सोपं असतं.

 

लक्षात असू दे या सगळ्यात

वाईट काहीच नसतं.

त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक

त्याच वेळची गरज असतं . समज नसतं….

 

मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील..

जी नेतील तुला जायचं आहे तिथं…

 

फक्त, मी असेन तिथं मात्र…

तुला पोहोचता येणार नाही.

कारण,मी आधीच

होऊन गेलेलो असेन तुझ्यासाठी-

एखादी कथा एखादी कादंबरी….

एखादी कविता एखाद्या पुस्तकातली.

 

माझी आठवण आली की

या प्रचंड ढिगाऱ्यातलं

ते एखादं पु्स्तक शोध

तुझा प्रवास,बघ, कसा

सोपा होऊन जाईल.

लेखक : श्री सौमित्र

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आहारबोली… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आहारबोली… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत . 

हस्ताक्षर,सही,दिसणे, काही लकबी वगैरे.पण कधीकधी असे वाटते की पंगतीत ताट वाढल्यावर जेवताना,जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते, त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.

म्हणजे बघा …..

समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे, तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो.जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात.

तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो.त्यांच्यात patience कमी असतो.

वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच साधी सरळ असतात ,ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.

भजी उचलणारी माणसे भज्यासारखीच कुरकुरीत,नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात.यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.

जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहीभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात.

लोणचे कुठले आहे ? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन असतात.

काही लोक सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात. ते लोक अतिचिकित्सक असतात.

यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.

पहिला जेवणाच्या आधी काही reactions असणारे आणि दुसरा जेवणानंतरची reaction असणारे.

जेवणाच्या आधी ताटे ,भांडी घ्यायला सुरुवात झाली, की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही, हे बघून त्याची चर्चा करणार.

हे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात .

अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून न घेणारी असतात.अशांना मित्रमंडळी कमी किंवा नसतीलच. मित्र असलेच तर तेही याच catagory तील असतात.

पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे,

अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे… माझ्या पानात नाही… आत्ताच हवे म्हणून लोक वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. हे लोक jealous असतात.सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .

गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच,”मी काय म्हणालोे, अहो बासुंदीच आहे ,म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले,”असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात.

जेवणाच्या आधी आणि जेवताना सुद्धा जे लोक

‘बाकी सगळे ठीक होते ,पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते,”असं म्हणत राहतात, ते  अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीचे असतात .

समोर चांगले ताट वाढले आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.

ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी!

या सर्वांपलिकडे एक विशेष catagory आहे .

सगळे जेवण झाल्यावर

“ताक आहे का ?”

म्हणून विचारणार आणि नाही  म्हणल्यावर

” अरेरे! ताक असते ना, तर मजा आली असती “

असा शेरा मारणारे … किरकिरे.  

लेखक – अज्ञात 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ~ मानसिक डाएट ~ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ~ मानसिक डाएट ~ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

ही कन्सेप्ट जरा नवीन आहे,पण ती तुम्ही समजून घ्याल, ही खात्री आहे.

 

“तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो.”  मनाला सुद्धा डाएटिंगची तेवढीच गरज आहे का?बघू या.

मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल..

 

स्वतःचं अवघं आयुष्य बदलून टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते.

मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीच असते.

तर मानसिक डाएट म्हणजे काय करायचं?

तर आपले विचार अधिकाधिक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा.

 

तेलकट-तूपकट म्हणजे फडतूस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही.

 

अति-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसऱ्याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.

 

दररोज एकातरी व्यक्तीला  आपण एक छान स्माईल देऊन खूश करु.

 

दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावून मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकून देऊ.

 

आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ.

 

या अशा मूल्यशिक्षणाबरोबरच महत्त्वाचं आहे, ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक ओळखून स्वत:ला “रीझनेबल” बनवणं,

दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं, दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालू ठेवणं,

मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं,

एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं आणि बरंच काही.

 

या सगळ्यातला समतोल हरवला ना,

की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारच

आणि मग नीट डायग्नोसिसच झालं नाही,

म्हणून मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळू शकते.

 

माणूस आहे,

मनपण थकतं हो कधीकधी,

त्याला इंस्टंट एनर्जी मिळते, ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने.वाह ताज !!!

 

सगळ्यात महत्त्वाचं

की,आपल्या डाएटचे साईड इफेक्ट्स खूप मस्त असतात.

 

लोक प्रेमातपण पडू शकतात तुमच्या.

तुमच्या चेहर्‍यावरचा ताण कमी होतो,

तुम्ही यंग वाटू लागता, टेन्शन्स कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्नइतकं हलकं होतं.

वास्तविक, मन ओके असेल

तरच लाईफ ओके असतं, नाही का?

 

असं ह्या डाएटचं व्रत

हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मध्ये एक संजीवनी देईल हे नक्की.

 

साध्या आणि ताज्या विचारांचं सॅलड आपली नक्की काळजी घेईल.

 

शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.

बदल हा नेहमीच चांगला असतो.

 

असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकत आहे ना ?

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मोफत मिळणारी औषधे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ मोफत मिळणारी औषधे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

 मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का?

व्यायाम हे औषध आहे.

सकाळ/संध्याकाळ चालणे हे औषध आहे.

उपवास हे औषध आहे.

कुटुंबासोबत जेवण हे औषध आहे.

हसणे आणि विनोद हे देखील औषध आहे.

गाढ झोप हे औषध आहे.

सर्वांशी मिळून वागणे हे औषध आहे.

आनंदी राहण्याचा निर्णय हे औषध आहे.

मनातील सकारात्मकता हे औषध आहे.

सर्वांचे भले हे औषध आहे

कधी कधी मौन हे औषध असते.

प्रेम हे औषध आहे.

मन:शांती हे औषध आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत

आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे?

प्रत्येक चांगला मित्र हे एक परिपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.

निरोगी रहा आणि आनंदी रहा

दिवसाचा आनंद घ्या

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

मुलांना जबाबदार  बनवायचं असेल, तर अर्थातच त्यांना काही गोष्टीचं स्वातंत्र्य द्यायला हवं. याचाच अर्थ, त्यांच्याकडं जसं लक्ष द्यायला हवं, तसंच थोडं दुर्लक्षही करायला हवं. रेणू दांडेकर यांनी यासाठी ‘हेल्दी निग्लिजन्स’हा शब्द सुचवला आहे. त्या म्हणतात, ‘आजकाल घरात एकच मूल असतं. फार फार तर दोन.या ‘दोन बाय दोन’च्या रचनेत मुलंच केंद्रस्थानी असतात.लक्ष्य असतात. त्यामुळंच कधी कधी आपलं,नको इतकं लक्ष मुलांकडे असतं.

त्यांनी असं एक उदाहरणही दिलंआहे: माझी एक मैत्रीण मुलांच्या बाबतीत अत्यंत जागृत होती. तिनंच तिच्या मनानं मुलांच्या अभ्यासाच्या वेळा…जेवायच्या वेळा… आहार… कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास ,या सगळ्याचंच वेळापत्रक बनवलं होतं. सतत त्यानुसार ती आपल्या मुलांवर देखरेख ठेवायची.मुलं अगदी जखडून गेली ,कंटाळली, हळूहळू ऐकेनाशी झाली.

आईची प्रतिक्रिया, “मी मुलांचं इतकं करते,तरी मुलं अशी वागतात. यापेक्षा अजून किती लक्ष द्यायचं?”

“तू जरा जास्तच लक्ष देते आहेस,” रेणूताईंनी म्हटलं,”थोडं दुर्लक्ष कर .मुलांना त्यांचं स्वतःचं जगणं आहे.जर त्यांच्या प्रत्येक क्षणावर तू ताबा ठेवलास, तर कसं चालेल?जरा ‘हेल्दी निग्लिजन्स’ करायला शिक.”

मुलांना मोकळेपणा, स्वातंत्र्य दिल्याशिवाय ती जबाबदार कशी होतील? फक्त एवढंच, की ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करत आहेत ना ,हे त्यांच्या नकळत पहायला हवं. लक्ष हवंच,पण न जाचणारं! मूल पोहायला लागलं तरी आईनं त्याच्या पाठीवर डबा बांधला, त्याचा हात धरला तर ते तरंगणार कसं?हात पाय हलवणार कसं? ते आता पोहू शकतंय, यावर विश्वास ठेवायला हवा. आपण, ते बुडेल, ही भीती सोडायला हवी. थोडं काठावर उभं राहता आलं पाहिजे ,थोडं पाण्यातही भिजता आलं पाहिजे. पालक प्रशिक्षणातला हा एक धडा फार महत्त्वाचा आहे. शोभा भागवत म्हणतात, त्याप्रमाणे ,’ ‘मूल मोठं व्हावं, शहाणं व्हावं,’ असं तोंडानी बोलत ,मनात ठेवत, प्रत्यक्षात आपण त्याला ‘लहान’च ठेवत असतो. तोंडी बोलण्यापलीकडं मूल आरपार आपल्याला पहात असतं .आपण ‘मूल’ राहण्यातच पालकांना समाधान आहे, हेही ते जाणतं आणि तसं वागत राहतं.’

ते विश्वासानं शहाणं व्हायला हवं असेल, तर पालकांनी सतत पालक म्हणून वागायचं सोडून द्यायला हवं. पालकपणाचा अधून मधून राजीनामा द्यायला हवा.

लेखक –  श्री शिवराज गोर्ले

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares