मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… पंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथापंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

पंढरीचे वर्णन

भूतलावरील वैकुंठ, पंढरपूर या श्रीक्षेत्राचे वर्णन आणि महात्म्य सांगणाऱ्या गाथेतील अभंगांचे आपले विवेचन चालू आहे. आज आणखी काही अभंग पाहूया.

पंढरपूर कसे आहे, तेथे काय काय चालते याचे वर्णन करणारा हा एक फार सुंदर अभंग पहा.

जववरी नाही देखिली पंढरी/

वर्णीशील थोऱी वैकुंठीची//

मोक्ष सिद्धी तेथे हिंडे दारोदारी/

होऊनी कामारी दीनरूप//

वृंदावन सडे चौक रंगमाळा/

अभिनव सोहळा घरोघरी//

नामघोष कथा पुराण कीर्तनी/

ओवीया कांडणी पांडुरंग//

सर्व सुख असे तेथे सर्वकाळ/

ब्रह्म ते केवळ नांदतसे//

तुका म्हणे जे न साधे सायासे/

प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी//

तुकाराम महाराज भक्ताला सांगतात, ” जोपर्यंत तू पंढरपूर पाहिले नाहीस, तोपर्यंत तू वैकुंठाची थोरवी वर्णन करशील. या पंढरपुरात सिद्धी आणि मोक्ष सांगकामे(कामारी) होऊन दारोदार दीनपणे हिंडत असतात. अर्थात ज्याचे पाय पंढरपुरास लागतात, त्याला मोक्षप्राप्ती नक्की होते. इथे घरोघरी तुळशी वृंदावने आहेत, रस्ते झाडून जागोजागी सडासंमार्जन आणि रांगोळ्या घातलेल्या दिसतात. घरोघरी अभिनव सोहळे चालू आहेत. कथा, पुराणे, कीर्तने, नामघोष होत आहेत. दळण- कांडण करताना स्त्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या गात आहेत. या इथे सर्वकाळ सर्व सुखे असून मूर्तीमंत ब्रह्माचा वास आहे. मोठ्या कष्टाने जे प्राप्त होऊ शकत नाही, ते ब्रह्म या ठिकाणी प्रत्यक्ष विटेवर उभे आहे.

होय होय वारकरी/ पाहे पाहे रे पंढरी//

काय करावी साधने/ फळ अवघेची येणे//

अभिमान नुरे/ कोड अवघेची पुरे//

तुका म्हणे डोळा/ विठोबा बैसला सावळा//

पुढे महाराज भक्तांना सांगतात की, वारकऱ्यांनो पंढरीचे दर्शन घ्या. बाकीच्या साधनांची काही जरुरी नाही. सर्व फळ या पंढरपुरातच मिळते. अभिमान राहत नाही.

(या ठिकाणी अभिमानाचा अर्थ देहाभिमान असा आहे) सर्व मनोकामना पूर्ण होतात. डोळ्यामध्ये सावळ्या विठ्ठलाचे रूप भरून राहते, त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो.

पंढरीसी जाये/ तो विसरे बाप माय//

अवघा होय पांडुरंग/ राहे धरुनिया अंग//

नलगे धन मान/ देह भावे उदासीन//

तुका म्हणे मळ/ नाशी तात्काळ ते स्थळ//

यासाठी वारकऱ्यांनो पंढरपुरी जा, तेथील पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर तुम्ही तुमचे मायबाप विसराल. याचाच अर्थ असा तुम्हाला प्रापंचिक आसक्ती राहणार नाही. तुम्ही स्वतःच पांडुरंग रुपी व्हाल आणि त्याच स्थितीत राहाल. कसलाच अभिमान न राहता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धनद्रव्य, मानसन्मान याची इच्छा तुमच्या ठिकाणी राहणार नाही, कारण देहाविषयी तुम्ही उदास व्हाल. पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरूपी मळाचा विनाश करणारे आहे.

पंढरीचा महिमा कसा अगाध आहे, याचे वर्णन तुकाराम महाराज या खालील अभंगात करतात.

पंढरीस दुःख न मिळे ओखदा/

प्रेम सुख सदा सर्वकाळ//

पंढरपुरात निरंतर पांडुरंगाचे प्रेम सुख असल्यामुळे दुःख औषधालाही (ओखदा) मिळत नाही.

पुंडलिके हाट भरियेली पेठ/

अवघे वैकुंठ आणियेले//

पंढरपुरीची पेठ भक्त पुंडलिकाने वसविली असल्यामुळे त्याने तेथे संपूर्ण वैकुंठ आणले आहे.

उदीमासी तुटी नाही कोणा हाणी/

घेउनिया धणी लाभ घेती//

या ठिकाणी व्यापार-उदीमात खोट कधीच येत नाही. नुकसान जराही नसून फायदाच फायदा आहे.

पुरले देशाशी भरले सिगेसी/

अवघी पंचक्रोशी दुमदुमित//

या पेठेत विठ्ठल हाच माल आहे. देशाला पुरेल एवढा माल शिगोशीग भरला आहे. पंढरीची पंचक्रोशी अशी या मालाने दुमदुमून गेली आहे.

तुका म्हणे संता लागलीसे धणी/

बैसले राहोनी पंढरीस//

सर्व संतांना येथे फार तृप्ती, समाधान लाभले आहे. कारण विठू माऊली त्यांना भेटली आहे, म्हणून ते पंढरीतच वास करून राहिले आहेत.

सुरवर येती तीर्थे नित्य काळ/

पेठ त्या निर्मळ चंद्रभागा//

साक्षभूत नव्हे सांगितली मात/

महिमा अत्यद्भूत वर्णवेना//

पंचक्रोशीमाजि रीघ नाही दोषा/

जळती आपैसा अघोर ते//

निर्विषय नर चतुर्भुज नारी/

अवघा घरोघरी ब्रह्मानंदू//

तुका म्हणे ज्यापे नाही पुण्यलेश/

जारे पंढरीस घेई कोटी//

चंद्रभागारुपी ही पेठ अतिशय शुद्ध आहे म्हणून इथे देवही येतात आणि सारी तीर्थेही येतात. ही गोष्ट नुसती ऐकीव नाही किंवा सांगोवांगी नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेली आहे असे तुकाराम सांगत आहेत. या पेठेचा अद्भुत महिमा वर्णन करण्यास शब्द नाहीत.

या पंचक्रोशी मध्ये कोणत्याही दोषांना प्रवेश नाही. संचितात जे काही मोठे दोष असतील ते येथे आपोआप गळून जातात. या ठिकाणी स्त्रिया- पुरुष चतुर्भुज निर्विषय देवाप्रमाणे विषयहीन आहेत. त्यांच्या काम- वासना जळून गेल्या आहेत. घरोघरी ब्रह्मानंद आहे. ज्यांच्यापाशी पुण्याचा लवलेश नाही, त्यांनी पंढरीस जाऊन लागेल तेवढे पुण्य प्राप्त करून घ्यावे.

या अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

अवघीच तीर्थे घडली एक वेळा/

चंद्रभागा डोळा देखिलिया//

अवघीच पापे गेली दिगंतरी/

वैकुंठ पंढरी देखिलिया//

अवघिया संता एक वेळा भेटी/

पुंडलिक दृष्टी देखिलिया//

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक/

विठ्ठलची एक देखिलिया//

ज्याने चंद्रभागेचे दर्शन घेतले, त्याला सकल तीर्थांचे स्नान घडले. एवढे हे दर्शन पुण्यकारक आहे. भूतलीचे हे वैकुंठ, पंढरपूर पाहिले असता सर्व पातके नाहीशी होतात, दिगंतरात जातात. एका पुंडलिकाचे दर्शन घेतले की सर्व संतांच्या दर्शनाचा लाभ होतो आणि एका विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने आपण जन्माला आल्याचे सार्थक होते.

असा आहे हा पंढरीचा महिमा. चला तर मग पंढरीसी जाऊ /विठू माऊलीला/

डोळा भरू पाहू//

क्रमशः… २८

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ५ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ५ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्लोक ४१ ते ५३

प्रपद्यन्ते लोकाः कति न भवतीमत्रभवती-

मुपाधिस्तत्रायं स्फुरति यदभीष्टं वितरसि ।

शपे तुभ्यं मातर्मम तु पुनरात्मा सुरधुनि

स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान् ॥ ४१॥

*

ललाटे या लोकैरिह खलु सलीलं तिलकिता

तमो हन्तुं धत्ते तरुणतरमार्तण्डतुलनाम् ।

विलुम्पन्ती सद्यो विधिलिखितदुर्वर्णसरणिं

त्वदीया सा मृत्स्ना मम हरतु कृत्स्नामपि शुचम् ॥ ४२॥

*

नरान् मूढांस्तत्तज्जनपदसमासक्तमनसो

हसन्तः सोल्लासं विकचकुसुमव्रातमिषतः ।

पुनानाः सौरभ्यैः सततमलिनो नित्यमलिनान्

सखायो नः सन्तु त्रिदशतटिनीतीरतरवः ॥ ४३॥

*

यजन्त्येके देवान् कठिनतरसेवांस्तदपरे

वितानव्यासक्ता यमनियमरक्ताः कतिपये ।

अहं तु त्वन्नामस्मरणकृतकामस्त्रिपथगे

जगज्जालं जाने जननि तृणजालेन सदृशम् ॥ ४४॥

*

अविश्रान्तं जन्मावधि सुकृतजन्मार्जनकृतां

सतां श्रेयः कर्तुं कति न कृतिनः सन्ति विबुधाः ।

निरस्तालम्बानामकृतसुकृतानां तु भवतीं

विनाऽमुष्मिंल्लोके न परमवलोके हितकरम् ॥ ४५॥

*

पयः पीत्वा मातस्तव सपदि यातः सहचरै-

र्विमूढैः संरन्तुं क्वचिदपि न विश्रान्तिमगमम् ।

इदानीमुत्सङ्गे मृदुपवनसञ्चारशिशिरे

चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम् ॥ ४६॥

*

बधान द्रागेव द्रढिमरमणीयं परिकरं

किरीटे बालेन्दुं नियमय पुनः पन्नगगणैः ।

न कुर्यास्त्वं हेलामितरजनसाधारणतया

जगन्नाथस्यायं सुरधुनि समुद्धारसमयः ॥ ४७॥

*

शरच्चन्द्रश्वेतां शशिशकलश्वेतालमुकुटां

करैः कुम्भाम्भोजे वरभयनिरासौ च दधतीम् ।

सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकर-

स्थितां त्वां ये ध्यायन्त्युदयति न तेषां परिभवः ॥ ४८॥

*

दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतै-

र्भवज्वलनभर्जिताननिशमूर्जयन्ती नरान् ।

चिदेकमयचन्द्रिकाचयचमत्कृतिं तन्वती

तनोतु मम शन्तनोः सपदि शन्तनोरङ्गना ॥ ४९॥

*

मन्त्रैर्मीलितमौषधैर्मुकुलितं त्रस्तं सुराणां गणैः

स्रस्तं सान्द्रसुधारसैर्विदलितं गारुत्मतैर्ग्रावभिः ।

वीचिक्षालितकालियाहितपदे स्वर्लोककल्लोलिनि

त्वं तापं तिरयाधुना मम भवज्वालावलीढात्मनः ॥ ५०॥

*

द्यूते नागेन्द्रकृत्तिप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं

सर्वस्वं हारयित्वा स्वमथ पुरभिदि द्राक् पणीकर्तुकामे ।

साकूतं हैमवत्या मृदुलहसितया वीक्षितायास्तवाम्ब

व्यालोलोल्लासिवल्गल्लहरिनटघटीताण्डवं नः पुनातु ॥ ५१॥

*

विभूषितानङ्गरिपूत्तमाङ्गा सद्यःकृतानेकजनार्तिभङ्गा ।

मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु ॥ ५२॥

*

इमां पीयूषलहरीं जगन्नाथेन निर्मिताम् ।

यः पठेत्तस्य सर्वत्र जायन्ते सुखसम्पदः ॥ ५३॥

मराठी भावानुवाद – –

गङ्गेमाते जन अपरिमित येत तुला शरण

इच्छित फलदायी तू असशी धरिती तव चरण

प्रेम अमित माझे तुजठायी आण घेउनी कथन

तव हृदयी मजला घे माझ्या भक्तीसी जाण॥४१॥

*

मृत्तिका तुझी भाळि लाविता पाप तमाचे हरण

माध्यान्हीच्या सूर्यासम तिज करिता धारण

विधीलिखित दुःखांच्या पंक्ती टाकिते पुसून

मृदा तुझी ही सदैव करुदे माझे शोकहरण ॥४२॥

*

भागिरथीचा वास न तेथे मूढ लोभी वसती

मळकट तरिही पुष्पसाथिने सुगंधीत होती

मळलेल्या त्या सर्व जनांचे सखे म्हणून असावे

पादप तुझिया तटावरिल मम शाश्वत मित्र व्हावे ॥४३॥

*

दुरापास्त अर्चना पूजिती भक्त देवतांचे

काही करिती सदा आचरण यज्ञाचे यागाचे

अन्य कर्मीं आसक्तीपोटी मार्ग यमनियमांचे

कामपूर्ती त्रिपथगे जपतो भासे जाल भवाचे ॥४४॥

*

जन्मापासुन अखंड अविरत पुण्यकर्म करिती

कल्याणास्तव देवता तयांचे समर्थ असती

पुण्य न पदरी निराधार जे जगासिया भार

उद्धरण्याला अशा जिवांना तूच एक आधार ॥४५॥

*

उदक प्राशुनी तुझे मूढ मी गेलो मित्रांसवे

मिळाला न मज काही विसावा शांत कसे व्हावे

मृदु वाऱ्याने शीतल तुझिया जलअंकावर घेई

अखेरची चिरनिद्रा मजसी तव सान्निध्ये देई ॥४६॥

*

बद्धपरीकर होवोनीया होई सिद्ध गङ्गे

किरिट सजवुनी बालचंद्रे होई सज्ज गङ्गे

उपेक्षा नको करू ग माझी सामान्यासम गङ्गे

जगन्नाथाच्या उद्धाराचा समय पातला गङ्गे ॥४७॥

*

शरद्ऋतूतिल शुभ्र पांढरी चंद्राची कोर

धारण करुनी कुम्भ कमळ अन् अभयमुद्रा कर

शुभ्र मकर स्थित अमृतभूषण धवल वसन लेवुन

अजीत शाश्वत असती करता मनोमनी तव ध्यान ॥४८॥

*

स्मितहास्याने वदनावरती सुधाकांति विलसत

भवाग्नीदग्ध जनास पामर करिसी तू शांत

चमत्कारीक चिदानंदरूपी चंद्रकांती

माते शंतनुकांते प्रसन्न होई मजवरती ॥४९॥

*

मंत्रौषधांनी झाकियलेला भवताप व्यस्त

वैनतेय पाषाणे भग्न देवगणांनी त्रस्त

सुधारसाने चरण कालियामर्दक क्षालन

उद्धर मजला आत्मताप मम शाश्वत दूर करून ॥५०॥

*

उमा जिंकली द्यूतामध्ये महादेव सर्वस्व

गण मणि श्रेणी नंदी इंद्र माळ चंद्र गजचर्म

स्मितकटाक्ष तुजवरी उमेचा देह पणे लाविता

पावन करी मज गङ्गे तांडव शिवशंकर नाचता ॥५१॥

*

भूषविते देहास देखण्या रतीकान्त अरीचा

विनाविलंब भंग करते समग्र जनपीडांचा

मनोहारी उत्तुंग चंचल मोहक लहरींनी

निर्मल करी गे देहा माझा माये प्रक्षालुनी ॥५२॥

*

पियूषलहरी पठण करी जो जगन्नाथ निर्मित

सुखसमृद्धी सदासर्वदा तयासि होई प्राप्त ॥५३॥

– क्रमशः भाग पाचवा (समाप्त)

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # २९३ ☆ हर मन माली बनकर जीने लगे… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना हर मन माली बनकर जीने लगे। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख # २९३ ☆

हर मन माली बनकर जीने लगे ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

चाहत मन की ज्योति, बढ़ेगी देखो कैसे।

उम्मीदों से प्रीत,जीतते हरदम जैसे।।

हरियाली की बात, करेगा  जब सब कोई।

सूखे को दें मात, देख धरती खुश होई।।

धरती को हरा-भरा बनाने का स्वप्न केवल वृक्षारोपण अभियानों से पूरा नहीं होगा; उसके लिए आवश्यक है कि प्रत्येक मन माली बनकर जीना सीखे। माली होना केवल पौधों को पानी देना नहीं, बल्कि उनके साथ आत्मीय संबंध स्थापित करना है।

आज घरों में पौधे सजावट का हिस्सा बन गए हैं। वे ड्रॉइंग रूम, बालकनी और उद्यान की शोभा तो बढ़ाते हैं, पर अनेक बार हमारा संबंध उनसे वहीं तक सीमित रह जाता है। हम उन्हें वस्तु की तरह रखते हैं, परिवार के सदस्य की तरह नहीं। परिणामस्वरूप हरियाली का विस्तार नहीं, केवल प्रदर्शन बढ़ता है।

भारतीय संस्कृति ने वृक्षों और पौधों को सदैव जीवन का सहचर माना है। तुलसी, पीपल, वट, नीम और बेल जैसे वृक्ष केवल वनस्पति नहीं रहे, बल्कि श्रद्धा, संरक्षण और सहअस्तित्व के प्रतीक बने। यह परंपरा हमें बताती है कि प्रकृति से जुड़ाव केवल पर्यावरण की रक्षा नहीं करता, बल्कि मनुष्य के भीतर संवेदना, धैर्य और करुणा का भी विकास करता है।

समय आ गया है कि हम पौधों को केवल सजावटी वस्तु नहीं, अपने जीवन का अभिन्न अंग मानें। जब किसी नए पत्ते के निकलने पर हमें उतनी ही प्रसन्नता होगी जितनी किसी अपने की मुस्कान पर होती है, तब हर घर सचमुच एक छोटा-सा उपवन बन जाएगा। यदि प्रत्येक व्यक्ति अपने भीतर के माली को जागृत कर ले, तो हरियाली केवल बगीचों में नहीं, हमारे विचारों और व्यवहार में भी दिखाई देगी। यही हरित चेतना आने वाली पीढ़ियों के लिए सबसे सुंदर विरासत सिद्ध होगी।

**

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # ४२१ ☆ व्यंग्य – भंडारा ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # ४२१ ☆

?  व्यंग्य – भंडारा ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

दीनू दान उड़ा रहा है। चंदू चंदा डकार रहा है। ठेकेदार मुनाफा बटोर रहा है। नेता बजट का श्रेय और बजट का हिस्सा दोनों ले रहा है। अधिकारी कमीशन को प्रशासनिक संस्कार मानकर आत्मसात कर रहा है। जमीन पर कब्जा हो रहा है। जनता मुफ्त प्रसाद की प्रतीक्षा में खड़ी है।

देश में भंडारों की बड़ी परंपरा है। पहले लोग पुण्य कमाने के लिए भंडारे करते थे। अब प्रभाव, प्रभुत्व और प्रायोजन कमाने के लिए करते हैं। पहले कड़ाही में दलिया और खिचड़ी पकती थी, अब कागजों में योजनाएं पकती हैं। पहले पूड़ी सब्जी बंटती थी, अब घोषणाएं, विज्ञापन और सपने बांटे जाते हैं।

भंडारे की शुरुआत हमेशा श्रद्धा से होती है और समापन हिसाब से। श्रद्धालु धन देता है, आयोजक धन्यवाद देता है और बीच का रास्ता धन के चरित्र को बदल देता है। चंदा जब तक दानदाता की जेब में रहता है, धर्म के लिए संकल्प कहलाता है। दान खाते में पहुंचते ही अवसर बन जाता है।

चंदू इसी अवसरवाद का पुरोहित है। वह चंदे को इस कौशल से पचाता है कि आयकर विभाग भी उसके पाचन तंत्र पर शोध करना चाहे। वह पारदर्शिता का इतना बड़ा समर्थक है कि हर सवाल पूछने वाले को आरपार देख लेता है, लेकिन अपने खाते किसी को नहीं दिखाता। उसके अनुसार समाजसेवा में हिसाब मांगना आस्था पर हमला है। वह उदाहरण देता है, प्रतिप्रश्न करता है कि अमुक धर्म या खास ट्रस्ट पर कोई सवाल क्यों नहीं उठा रहे, केवल हमारी आस्था ही क्यों सवाल की परिधि में है।

दीनू सेवा का ब्रांड एंबेसडर है। वह हर फोटो में गरीब के कंधे पर हाथ रखता है और हर सौदे में अपना दूसरा हाथ जेब के भीतर रखता है। उसके चेहरे पर करुणा टपकती है और व्यवहार में गणित। उसे मालूम है कि पांच लाख का दान पचास लाख की प्रतिष्ठा और पांच करोड़ का प्रभाव पैदा कर सकता है। इसलिए वह परोपकार को निवेश की तरह करता है। 

नेता जी मंच पर विराजमान हैं। वे जनता को अपना परिवार बताते हैं। यह वही परिवार है जिससे वे चुनाव के बाद उतनी ही दूरी बना लेते हैं जितनी दूरी सुरक्षा घेरा जनता से बनाए रखता है। वे बताते हैं कि विकास गांव गांव पहुंच चुका है। गांव वाले सहमति में सिर हिलाते हैं क्योंकि विकास उनसे मिलने नहीं आया, लेकिन उसका विज्ञापन रोज उनके मोबाइल पर पहुंच जाता है।

अब विकास का अर्थ भी बदल गया है। सड़क टूट जाए तो मरम्मत का बजट विकास है। मरम्मत टूट जाए तो नया टेंडर विकास है। टेंडर रद्द हो जाए तो पुनः स्वीकृति विकास है। काम हो जाए तो वह चमत्कार की श्रेणी में आता है।

ठेकेदार लोकतंत्र का अनसुना जन कवि है। वह सीमेंट में दर्शन और बजरी में संभावना मिलाकर निर्माण करता है। उसकी बनाई सड़कें बरसात आते ही आत्मनिर्भर होकर मिट्टी में विलीन हो जाती हैं। पुल उद्घाटन के समय मजबूत और जांच के समय भावुक पाए जाते हैं। मगर चिंता की कोई बात नहीं। हर दुर्घटना के बाद संवेदना का नया भंडारा शुरू हो जाता है।

अधिकारी व्यवस्था के योगी हैं। वे फाइलों के पद्मासन पर बैठकर निर्णय की साधना करते हैं। उनकी कलम तब तक मौन व्रत में रहती है जब तक उसे समुचित ऊर्जा प्राप्त न हो जाए। इस ऊर्जा के कई नाम हैं, पर जनता इसे सुविधा शुल्क के नाम से पहचानती है।

भंडारे का एक स्वादिष्ट व्यंजन जमीन भी है। जिस भूमि पर स्कूल बनना था, वहां कॉम्प्लेक्स उग आता है। जहां तालाब था, वहां टावर खड़ा हो जाता है। जहां पार्क प्रस्तावित था, वहां प्लॉट बिक जाते हैं। नक्शे बदलते हैं, सीमाएं बदलती हैं, मालिक बदलते हैं, केवल सरकारी रिकॉर्ड अपनी नींद में खर्राटे भरता रहता है।

इस पूरे आयोजन में जनता की भूमिका सबसे महत्वपूर्ण और सबसे नगण्य है। उसी के नाम पर चंदा आता है, उसी के नाम पर बजट आता है, उसी के नाम पर योजनाएं बनती हैं और उसी के नाम पर भाषण दिए जाते हैं। दरअसल पूरा भंडारा ही जनता के नाम पर आयोजित होता है, जनता का ,  जनता के लिए , जनता के धन से , बस वही जनता भंडारे के स्वादिष्ट भोजन की  लाभार्थियों वाली लाइन में कहीं पीछे छूट जाती है।

भंडारा समाप्त होने पर पत्तलें उठ जाती हैं, बैनर उतर जाते हैं, नारे बदल जाते हैं। लेकिन दीनू बना रहता है, चंदू बना रहता है, ठेकेदार बना रहता है, कमीशन बना रहता है। और बने रहते हैं, नेता जी , जो अवसर के अनुसार नई पार्टी में नजर आ सकते हैं। केवल जनता हर बार नए विश्वास के साथ फिर अगले भंडारे की  पंक्ति में लग जाती है। 

लोकतंत्र की यही सबसे अद्भुत व्यवस्था है। यहां भंडारा जनता के नाम पर होता है, खर्च खजाने से होता है, लाभ प्रभावशालियों को मिलता है और धन्यवाद जनता देती है। फिर अगला भंडारा घोषित होता है। फिर वही श्रद्धा, वही शोर, वही भाषण, वही बजट, वही बंटवारा।

देश का विकास रथ चलता रहता है।

भंडारा भी।

 

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

लंदन प्रवास पर

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री ओमप्रकाश जी का साहित्य # २४९ – लघुकथा – मैं ऐसा नहीं – ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। अनेक पत्र-पत्रिकाओं में रचना सहित 145 बालकहानियाँ 8 भाषाओं में 1160 अंकों में प्रकाशित। प्रकाशित पुस्तकेँ-1- रोचक विज्ञान कथाएँ, 2-संयम की जीत, 3- कुएं को बुखार, 4- कसक, 5- हाइकु संयुक्ता, 6- चाबी वाला भूत, 7- बच्चों! सुनो कहानी, इन्द्रधनुष (बालकहानी माला-7) सहित 4 मराठी पुस्तकें प्रकाशित। मध्यप्रदेश साहित्य अकादमी का श्री हरिकृष्ण देवसरे बाल साहित्य पुरस्कार-2018 51000 सहित अनेक संस्थाओं द्वारा सम्मानित व पुरस्कृत। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत साहित्य आप प्रत्येक गुरुवार को आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारानी लघुकथा मैं ऐसा नहींकी समीक्षा।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # २४९ 

☆ लघुकथा – मैं ऐसा नहीं ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ 

वह फिर गिड़गिड़ाया, “साहब ! मेरी अर्जी मंजूर कर दीजिए. मेरा इकलौता पुत्र मर जाएगा.”

मगर, नरेश बाबु पर कोई असर नहीं हुआ, “साहब नहीं है. कल आना.”

“साहब, कल बहुत देर हो जाएगी. मेरा पुत्र बिना आपरेशन के मर जाएगा.आज ही उस के आपरेशन की फीस भरना है. मदद कर दीजिए साहब. आप का भला होगा,” वह असहाय दृष्टि से नरेश की ओर देख रहा था.

“ कह दिया ना, चले जाइए, यहां से,” नरेश बाबु ने नीची निगाहें किए हुए जोर से चिल्लाते हुए कहा.

तभी उस का दूसरा साथी महेश उसे पकड़ कर एक ओर ले गया.

“क्या बात है नरेश! आज तुम बहुत विचलित दिख रहे हो.” महेश बाबु ने पूछा, “वैसे तो तुम सभी की मदद किया करते हो ? मगर, इस व्यक्ति को देख कर तुम्हें क्या हो गया?” वह नरेश का अजीब व्यवहार समझ नहीं पाया था.

नरेश कुछ नहीं बोला. मगर, जब महेश बाबु ने बहुत कुरैदा तो नरेश बाबु ने कहा, “क्या बताऊ महेश ! यह वही बाबु है, जिस ने मेरी अर्जी रिश्वत  के पैसे नहीं मिलने की वजह से खारिज कर दी थी और मेरे पिता बिना इलाज के मर गए थे.”

“क्या !’’ महेश चौंका.

“हां, ये वहीं व्यक्ति है.”

“तब तू क्या करेगा?” महेश ने धीरे धीरे से कहा, “जैसे को तैसा?”

“नहीं यार, मैं ऐसा नहीं हूं,” नरेश ने कहा, “मैंने इस व्यक्ति की अर्जी कब की मंजूर कर दी है और इलाज का चैक अस्पताल पहुंचा दिया है. यह बात इसे नहीं मालुम है.’’ कहते हुए नरेश खामोश हो गया.

महेश यह सुन कर कभी नरेश को देख रहा था कभी उस व्यक्ति को. जब कि वह व्यक्ति माथे पर हाथ रख कर वहीं ऑफिस में बैठा था. 

© श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

16-07-2024

संपर्क – 14/198, नई आबादी, गार्डन के सामने, सामुदायिक भवन के पीछे, रतनगढ़, जिला- नीमच (मध्य प्रदेश) पिनकोड-458226

ईमेल  – opkshatriya@gmail.com मोबाइल – 9424079675 /8827985775

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # ३०२ ☆ बाल कविता – जीवन है अनमोल… ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक लगभग तेरह दर्जन से अधिक मौलिक पुस्तकें ( बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य ) तथा लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन।लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मानबाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्य कर्मचारी संस्थान  के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंतउत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित बारह दर्जन से अधिक राजकीय प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत। 

आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।

आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य प्रत्येक गुरुवार को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # ३०२ ☆ 

☆ बाल कविता – जीवन है अनमोल ☆ डॉ राकेश ‘चक्र’ 

टमटम में बैठे हम सब ही

चले शहर की ओर

पों – पों – पीं – पीं गाड़ी करतीं

अति का होता शोर।।

भालू जी की बाइक की थी

बहुत तेज रफ्तार

मोबाइल से बात कर रहे

जा टकराए कार

बाइक टूटी गिरे जोर से

      दुखी है पोर- पोर।।

 **

शेर, लोमड़ी गीदड़ उनको

अस्पताल में लाए

हाल अजब अपना था पाया

जब वे होश में आए

नहीं करूँ मनमानी अब मैं

      जीवन है अनमोल।।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

Rakeshchakra00@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग २ – ‘आई’ (मायेची पैठणी) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग २ – ‘आई’ (मायेची पैठणी) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

नात्यांचं महावस्त्र – ‘आई’ (मायेची पैठणी)

​ज्याच्याशिवाय नात्यांचं हे महावस्त्र जन्मालाच येऊ शकत नाही, असा या वस्त्रातील एक अनोखा आणि सर्वात मौल्यवान पदर म्हणजे ‘आई’. नात्यांच्या या वस्त्रातील ती खरी सुवर्णमयी ‘पैठणी’ असते. विधात्याने अत्यंत कुशलतेने आणि निगुतीने घडवलेली! ज्यामुळे आपण या जगात येतो आणि आपल्याला आपली ओळख मिळते असे एक नाते म्हणजे आई. प्रत्यक्ष परमेश्वराने सुद्धा जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतला, तेव्हा त्यालाही आईमुळेच सर्वश्रेष्ठ ओळख मिळाली. राम झाला कौसल्यानंदन, कृष्ण झाला देवकीनंदन. अंजनेय(हनुमंत)आणि राधेय(कर्ण) हे देखील आपल्या आईच्या नावामुळेच ओळखले गेले. ‘ आईची महती ‘ एवढी थोर की जगातल्या अनेक थोर साहित्यिकांनी तिच्यावर भरभरून लिहिले.

​’आई’ हा शब्द जरी उच्चारला, तरी डोळ्यांसमोर प्रेमाची अशी एक मूर्ती उभी राहते जी वैश्विक आहे. माणूस असो वा प्राणी, भारत असो की जगाच्या पाठीवरचा कुठलाही देश; आईचे प्रेम सर्वत्र सारखेच असते. म्हणूनच मी आईला प्रेमाची वैश्विक मूर्ती म्हणतो. इतरांचं प्रेम भलेही ‘माया’ असेल, पण तिचं प्रेम म्हणजे ‘आभाळमाया’! आपल्या मुलांवर असलेली तिच्या प्रेमाची शाल केवळ ऊब देत नाही, तर एक अभेद्य कवच बनून आयुष्यभर त्यांचे रक्षण करते. “घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी… ” तशी आई शरीराने कुठेही असली, तरी तिचे चित्त मात्र सदैव आपल्या लेकरापाशीच असते.

​परमेश्वराने तिला पृथ्वीवर पाठवतानाच तिच्या काळजात ‘अखंड माया’ भरून पाठवली आहे. आई म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप. कोणीतरी खूप छान म्हटलं आहे की, परमेश्वराला सगळीकडे उपस्थित राहणे शक्य नाही म्हणून त्याने आईला पाठवले आहे. ती स्वतः उपाशी राहील, पण लेकराचं पोट भरल्याशिवाय तिचं पोट भरत नाही. तिची स्वतःची झोप होवो न होवो, आपल्या तान्हुल्याची झोप नीट व्हावी म्हणून तिची धडपड असते. “निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टी सारखी धरी” अशी तिची अवस्था असते. जी स्त्री जन्माला येते, अशी प्रत्येक स्त्री ‘बाई’ होते; पण तिचे बाईपण ‘आई’ झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यासाठी तिने मुलाला जन्म दिलाच पाहिजे अशी काही अट नसते, तिला फक्त ‘आई’ होता आलं पाहिजे, मायेचं पांघरूण घालता आलं पाहिजे. किंबहुना, आई होण्यासाठी स्त्री असण्याचीही अट नाही; ज्याच्या हृदयात सगळ्यांबद्दल प्रेम आणि कळवळा काठोकाठ भरला आहे, अशी कोणतीही व्यक्ती आई होऊ शकते.

​पंढरपूरला विटेवर उभा असलेला पांडुरंग सर्व भाविकांचे, वारकऱ्यांचे दैवत. हा सावळा विठ्ठल काही करत नाही, काही बोलत नाही, काही देत नाही आणि घेतही काही नाही. पण तो ‘विठू माउली’ झाला. का बरं? कारण तो सगळ्यांचं दुःख ऐकून घेतो, सगळ्यांना उराशी धरतो. त्याच्याजवळ कोणताच भेदभाव नाही. तो जरी बोलत नसला, तरी सगळ्यांना खात्री असते की “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असा आशीर्वाद प्रत्येकाला तो नक्कीच देतो.

​”ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती. “

जिच्यामुळे हे विश्व निर्माण झाले अशी माता पार्वती जगज्जननी झाली. आमचे संत देखील ‘माउली’ झाले. समाजाने ज्यांचा अपार छळ केला, तरीही ज्यांच्या मुखातून विश्वाच्या कल्याणासाठी ‘पसायदान’ नावाचे अमृत बाहेर पडले, ते संत ज्ञानेश्वर म्हणूनच ‘ज्ञानेश्वर माउली’ झाले. अहिल्याबाई होळकर लोकांसाठी समाजसेवेची अनेक कामे करून ‘लोकमाता’ झाल्या. अनाथ, निराधार मुलांवर मायेचे छत्र धरणाऱ्या सिंधूताई सपकाळ याच व्यापक मातृत्वाचे रूप झाल्या. ज्या आदीवासी, अशिक्षित स्त्रियांनी वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन वृक्षांचे संरक्षण केले, त्या वृक्षमाता झाल्या. अशी मातेची अनेक रूपे.

​आपल्या मुलांवर प्रेम करते ती ‘आई’; सर्वांबद्दल प्रेमभाव जिच्या मनात असतो ती ‘माता’; आणि अखिल विश्वाला कवेत घेणारी अपार माया जिच्या काळजात असते, ती ‘माउली’!

​”न मातु: पर दैवतम” असे आपल्याकडे म्हटले जाते; म्हणजेच आईसारखे दुसरे दैवत नाही. इतर देवतांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते, नवस बोलावे लागतात. पण हे मातृत्व नावाचे दैवत असे आहे की, त्याला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही उपासना करावी लागत नाही. तिच्या पोटी केवळ जन्म घेतला, की ही देवता प्रसन्न होते आणि आयुष्यभर त्या बाळाची काळजी वाहते. प्रसूती वेदना काय असतात, ते फक्त माताच जाणे! पण जेव्हा ते नवजात अपत्य ती पहिल्यांदा आपल्या जवळ घेते, तेव्हा तिच्या त्या प्रसववेदनांचे शीतल चांदणे होऊन तिच्या मुखावर एक अद्भूत हास्य विलसते. तिच्या उरातील माया अमृत होऊन तिच्या स्तनातून बाळासाठी पाझरू लागते. तिच्या कुशीत जेव्हा तिचं बाळ असतं, तेव्हा ती जगातली सर्वात समृद्ध स्त्री असते. आयुष्याच्या विद्यापीठातली ‘आई’ नावाची सर्वोच्च पदवी निसर्गाने तिला बहाल केलेली असते.

​बाळ अजाणतं असतं, असहाय असतं, त्याला काहीच करता येत नाही तेव्हापासून आई त्याला सावरते. जेव्हा त्याच्या चिमुकल्या ओठांतून ‘आई’ हा पहिला शब्द उमटतो, तेव्हा तिच्या काळजाचा झालेला आनंद गगनात मावत नाही. याच एका शब्दासाठी ती नऊ महिने नऊ दिवस आसुसलेली असते. मग ती हळूहळू त्या सानुल्याला बोलायला शिकवते, पाऊल पाऊल टाकत चालायला शिकवते आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे करते. तीच त्याची पहिली शाळा आणि पहिला गुरू असते. या शाळेत कुठलीही फी नसते, उलट काळजी आणि प्रेम मात्र अपार असते.

​बाळ जसजसं मोठं होतं, तसतसं तिचं काळीज आनंदाने फुलत जातं. बाळाच्या पंखात ताकद येते आणि ते स्वतःचे आभाळ शोधायला उडू लागतं. पण कधी कधी, आकाशात उंच भरारी घेणाऱ्या या पाखराचे लक्ष जमिनीवर एकटीच बसलेल्या आपल्या वृद्ध आईकडे जात नाही. अशा वेळी ती केवळ दोन शब्दांच्या प्रेमासाठी आसुसलेली असते. आता तिच्या पंखातले बळ कमी झालेले असते. आता वेळ असते त्या मुलाची—परतफेड करण्याची. खरं तर, आईच्या ऋणातून मुक्त होणे किंवा त्याची परतफेड करणे जन्मांतरातही शक्य नाही, पण कृतज्ञतेने त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्कीच करता येतो.

​आई नावाच्या नात्याचा परिसस्पर्श ज्यांच्या आयुष्याला झाला, त्या आयुष्याचं सोनं झालं! कौसल्येने रामाला घडवलं, यशोदेने कृष्णाला, जिजाऊ मातेने छत्रपती शिवरायांना, भुवनेश्वरी देवींनी स्वामी विवेकानंदांना, आणि ‘श्यामच्या आई’ने साने गुरुजींना घडवले. असा हा मातृमहिमा अपार आहे.

​सखोल आणि योग्य मार्गदर्शन आणि अचूक निर्णयक्षमता यासारख्या गोष्टी म्हणजे आईच्या सल्ल्याचे वैशिष्ट्य! आईनं ज्यांना मार्गदर्शन केलं आणि आईचा सल्ला ज्यांनी शिरोधार्य मानला, त्यांनी जीवनामध्ये फार मोठे कार्य करून दाखवले आणि ते यशस्वी झाले. पांडवांनी आपल्या माता कुंतीचा सल्ला प्रत्येक वेळी शिरोधार्य मानला; त्याच वेळी त्यांचे बंधू असलेल्या कौरवांनी मात्र आपल्या आईचा (गांधारीचा) सल्ला नेहमीच धुडकावून लावला. या दोन्ही गोष्टींचे परिणाम काय झाले, याची साक्ष महाभारतात आपल्याला मिळते. पांडवांना सर्वत्र विजय मिळाला आणि कौरवांचा मात्र पराभव झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील माता जिजाऊंचा सल्ला प्रत्येक प्रसंगी शिरोधार्य मानला, म्हणूनच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले.

​आई या नात्याचे अनेक पदर आहेत. गुरूची पत्नी जेव्हा ‘गुरुमाता’ होते, तेव्हा ती आश्रमातील सर्व बटूंना स्वतःच्या मुलासारखे सांभाळते. वशिष्ठांच्या आश्रमात जेव्हा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा निघताना प्रभू रामचंद्रांनी गुरुमातेचे पाय धरून म्हटले, “तुम्ही आईच्या मायेने आम्हाला सांभाळले, कशाचीच उणीव भासू दिली नाही. आमच्या वागण्यात काही चुकले असेल, तर आईच्या मायेने आम्हाला क्षमा करा. ” खरोखरच धन्य ती गुरुमाता आणि धन्य ते संस्कारी भावंडे! रामायणाने अशी नाती कशी जपावीत याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. रामाला वनवासात पाठवले म्हणून जग कैकयीला दोष देत असताना, राम लक्ष्मणाला समजावतो, “आई कोणीही असो, ती सदैव आदरणीयच असते. मला वनात पाठवण्यामागे तिचा नक्कीच काहीतरी चांगला उद्देश असेल. माझ्या शिक्षणात काही उणीव राहिली असेल, ती पूर्ण करण्यासाठीच ही वनाची योजना असावी. ” ही उदात्तता आजच्या पिढीने शिकायला हवी.

​ज्याच्या डोक्यावर मातृछत्र छाया धरून असतं, त्याच्या भाग्याची थोरवी काय वर्णावी? प्रत्यक्ष परमेश्वराला देखील हे भाग्य लाभत नाही म्हणून तो सुद्धा मानवी अवतार धारण करून पृथ्वीवर येतो. ‘दिवार’ या चित्रपटातील एक संवाद मला आजही आठवतो. त्या चित्रपटात इन्स्पेक्टर असलेला शशी कपूर आणि चोराची भूमिका करणारा अमिताभ यांच्यातील संवाद फार लोकप्रिय झाला होता. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, “मेरे पास गाडी है, बंगला है, नोकर चाकर, पैसा है… तुम्हारे पास क्या है? ” तेव्हा शशी कपूरने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, “मेरे पास माँ है! ” आईची बरोबरी कशानेच होऊ शकणार नाही, कुबेराची संपत्ती देखील तिच्या तुलनेत फिकी आहे.

​पण आज आम्हाला केवळ या महापुरुषांची आणि त्यांच्या मातांची थोरवी सांगून भागणार नाही. असे सुपुत्र आजच्याही काळात घडावेत आणि त्यांना जन्म देणाऱ्या माता धन्य व्हाव्यात, ही भारतभूमी धन्य व्हावी, ही काळाची गरज आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा; जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. ही सुसंस्कारी मूर्ती घडवण्याची पहिली आणि मुख्य जबाबदारी आईची असते. खाण तशी माती असे आपण म्हणतो. आई जर सुसंस्कारित आणि सुशिक्षित असेल तर तिची मुले सुद्धा तशीच होतील. अशा आया घरोघरी असतील तर सुसंस्कारित समाज निर्माण होईल.

​वर्तमानकाळातील मातांपुढे आजच्या युगाने खूप मोठी आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीची आई मुख्यतः ‘गृहिणी’ होती, त्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ असायचा. आजच्या आईला मात्र नोकरी, करिअर आणि घर अशी दोन्ही आघाड्यांवर दुहेरी कसरत करावी लागते. कधी कधी यामुळे तिच्या मनात एक अनामिक ‘अपराधित्व’ (Guilt) डोकावते की, मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही. पण अशाही परिस्थितीत ती आपला पदर खोचून खंबीरपणे उभी आहे. ती केवळ मुलांचे संगोपन करत नाही, तर आपल्या कर्तृत्वाने मुलांसमोर स्वावलंबनाचा एक नवा आदर्श ठेवत आहे.

​तथापि, बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर आजच्या आईला काही जाणीवपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबा, काका-काकू असायचे, मुलांवर सहज संस्कार व्हायचे. आज बहुतेक घरात एकच मूल असते आणि ते एकलकोंडे होते. आजी-आजोबांच्या गोष्टींचे माध्यम आता बऱ्याच घरांतून नाहीसे झाले आहे. मुले पाळणाघर किंवा प्ले-ग्रुपमध्ये वाढतात, पण तिथे आवश्यक कौटुंबिक संस्कार मिळतीलच असे नाही; ही पोकळी आईलाच भरून काढावी लागेल.

​आजची मुले ‘डिजिटल’ युगातली आहेत. ती नुसते सांगून किंवा उपदेश ऐकून शिकत नाहीत; त्यांच्यासमोर स्वतःचा आदर्श ठेवावा लागतो. “सारखा मोबाईल पाहू नकोस, पुस्तक वाच, अभ्यास कर” असे ओरडून मुले ऐकणार नाहीत. आई-बाबांनी कामावरून आल्यावर स्वतः मोबाईल आणि टीव्ही बाजूला ठेवून हातात एखादे चांगले पुस्तक धरले, तर मुलेही त्याचे अनुकरण करतील. आईचा पदर आणि तिची अंगाई यातून जी भावनिक ऊब मुलाला मिळते, ती ‘यूट्यूब’वरील बालगीतांमधून कधीच मिळू शकत नाही, हे आजच्या मातेला समजून घ्यावे लागेल. सुट्टीच्या दिवशी पालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा, घरातील छोटी-मोठी कामे करताना त्यांना सोबत घेतले, तर श्रमाची आणि जबाबदारीची सवय त्यांना आपोआप लागेल.

​नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा मातृत्वाचा पदर जर संस्कारांनी आणि ओलाव्याने संपन्न राहिला, तरच पुढची पिढी निकोप आणि सुदृढ होईल. आई नावाच्या या पैठणीची जरतारी चमक कधीच फिकी पडू न देणे, ही आजच्या प्रत्येक मुला-मुलीची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे.

(पुढील भाग दर रविवारी)

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # १५१ ☆ गीतिका ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण एवं विचारणीय “गीतिका” ।)

✍ जय प्रकाश के नवगीत # १५१ ☆

☆ गीतिका ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

 नदिया सूखी भरी हुई सी

धूप बिचारी मरी हुई सी ।

 *

बरखा बूँद हुई मतवाली

गर्मी अबला डरी हुई सी।

 *

खेत अघाने पानी पीकर

मेंड़ लगे कुछ हरी हुई सी।

 *

छप्पर छानी बतियाते हैं

लगे बदरिया झरी हुई सी।

 *

गंध सुवासित व्यापी तन-मन

हुलस प्रीति मरमरी हुई सी।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ ग़ज़ल # १५८ ☆ ख़्वाहिशें बेहिश हुई है… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “ख़्वाहिशें बेहिश हुई है“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # १५८ ☆

✍ ख़्वाहिशें बेहिश हुई है… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

ख़्वाब की ताबीर मेरे और पूरी आरज़ू

होश ग़ाफ़िल हो गया है जब वो आया रूबरू

 *

उम्र की दहलीज पर जब सांझ की दस्तक हुई

ख़्वाहिशें बेहिश हुई है चैन की है ज़ुस्तज़ू

 *

कब रकम अखबार में कब है मुनादी की गई

प्यार की चर्चा हमारे हो रही है कू-ब-कू

 *

गिर गया किरदार से इंसान कितना देखिए

है हवस यूँ ज़र ज़मीं की बेच देता आबरू

 *

दोस्त है गद्दार की पहचान ये सबसे बड़ी

हो वतन को जब ज़रूरत तब नहीं खौले लहू

 *

अम्न का कैसे मसीहा ज़ह्न नादिर शाह का

हर चमन पे चाहे कब्ज़ा सबका मालिक तू ही तू

 *

शेर सर्कश का किया है समझा जो जंगल का शेर

सिद्ध ईरानी किये है किस तरह है जंग-जू

 *

कामयाबी के नहीं इमकान के आसार है

दोगले के घर करोगे अम्न की गर गुफ़्तगू

 *

अय अरुण ओढ़ी तबस्सुम सच छुपा सकती नहीं

आपकी नाराज़गी आँखें दिखाती सुर्खरू

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ हेमंत साहित्य # ६२ – मकीं तो मुंतज़िर हैं… ☆ श्री हेमंत तारे ☆

श्री हेमंत तारे 

श्री हेमन्त तारे जी भारतीय स्टेट बैंक से वर्ष 2014 में सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृत्ति उपरान्त अपने उर्दू भाषा से प्रेम को जी रहे हैं। विगत 10 वर्षों से उर्दू अदब की ख़िदमत आपका प्रिय शग़ल है। यदा- कदा हिन्दी भाषा की अतुकांत कविता के माध्यम से भी अपनी संवेदनाएँ व्यक्त किया करते हैं। “जो सीखा अब तक,  चंद कविताएं चंद अशआर”  शीर्षक से आपका एक काव्य संग्रह प्रकाशित हो चुका है। आज प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम रचना – मकीं तो मुंतज़िर हैं।)

☆ हेमंत साहित्य # ६२ ☆

✍ मकीं तो मुंतज़िर हैं… ☆ श्री हेमंत तारे  

हमें मालूम ही न था, कि बेज़ार हैं लोग

ग़लत समझे थे हम, कि ग़मगुसार हैं लोग

हमें इल्म ही न था ‘बेगाना-ए-अलम’ रहकर

कि लोमड़ी की ख़ाल में, रंगे सियार हैं लोग

*

मकीं तो मुंतज़िर हैं, कि कोई घर को मेरे आए

सुना है इन दिनों मगर, खुद-हिसार हैं लोग

*

ज़रूरत के वक्त जब, इमदाद न मिल सकी

तब जाना कि दिखावे के लिए दिलदार हैं लोग

*

पैकर की चमक तो, महज़ भुलावा है मेरे यार

अपनों से ही कटकर, बड़े लाचार हैं लोग

*

शिकवों के बोझ तले, दबे रहते हैं इस कदर

कि रिश्तों की हरारत से, बेख़बर हो जाते हैं लोग

*

‘हेमंत’ इस दौर में, कोई अपना नहीं दिखता

अब आसां रहा न कहना, कि वफ़ादार हैं लोग

 

© श्री हेमंत तारे

मो.  8989792935

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares