(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं – भावना के दोहे – सूरज।)
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.“साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता – घर-घर दस्तक देती टोली… । आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # ३०४ ☆
☆ कविता – घर-घर दस्तक देती टोली… ☆ श्री संतोष नेमा ☆
(बड़ोदा से सुश्री मंजिरी “निधि” जी की गद्य एवं छंद विधा में विशेष अभिरुचि है और वे साथ ही एक सफल महिला उद्यमी भी हैं। आज प्रस्तुत है आपकी मंजिरी की कुंडलिया – भोजन ।)
(श्रीमती शशि सुरेश सराफ जी सागर विश्वविद्यालय से हिंदी एवं दर्शन शास्त्र से स्नातक हैं. आपने लायंस क्लब और स्वर्णकार समाज की अध्यक्षा पद का भी निर्वहन किया. आपका “लेबल शशि” नाम से बुटीक है और कई फैशन शोज में पुरस्कार प्राप्त किये हैं. आपका साहित्य और दर्शन से अत्यधिक लगाव है. आप प्रत्येक शुक्रवार श्रीमती शशि सराफ जी की रचनाएँ आत्मसात कर सेंगे. आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता ‘तेरा साथ…‘।)
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस प्रपंचात अडकलेल्या सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी गाथेत भरपूर अभंग लिहिले आहेत. सर्वसामान्य माणसांना ऐहिक जीवनाचा लोभ असतो, त्यातून त्यांना परावृत्त होणे फार अवघड आणि कष्टाचे असते. तुकाराम महाराज या संदर्भात आपल्यासारख्या सामान्यांना अत्यंत कळकळीने त्यांच्या वाणीत जागोजागी सांगत आहेत.
आहे ते सकळ कृष्णासी अर्पण/
* नकळता मन तुझे भावी*//
म्हणवुनी पाठी लागतील भुते/
येती गिवसीत पाच जणे//
ज्याचे त्या वंचले आठव न होता/
दंड न हा निमित्त कारणे//
तुका म्हणे काळे चेपीयला गळा/
मी मी वेळोवेळी करीतसे//
आपण प्रापंचिक लोक हे जाणतच नाही की जी काही कर्मे आहेत, आणि जे जे काही अस्तित्वात आहे ते एका कृष्णाच्या सत्तेने आहे. कर्ता-करविता तोच आहे. आपण अविवेकी, हे जाणत नाही आणि सर्व काही मी केले अशी मनात भावना धरतात. त्यामुळे “येती गिवसित पाच जणे”, म्हणजे आपला पंचमहाभूतांचा हा देह आपल्याला शोधत येतो. याचाच अर्थ आपण जन्म मरणाच्या चक्रातून फिरत राहतो, आपला पुनर्जन्म होतो. सर्व कर्मे हरीचीच असून ती त्याची त्याला अर्पण करण्याची आठवण न ठेवल्यामुळे आपल्याला जगण्याचा आणि मरणाचा दंड मिळतो. हा दंड भोगायचा नसेल त्याने प्रथमतः अहंकाराने मी मी करणे सोडून दिले पाहिजे. ज्यावेळी अशी अवस्था होईल त्याचवेळी लोभ, मोह, सर्व मायापाश यातून माणसाची कायम सुटका होईल.
ते सामान्य संसारी माणसाला सांगतात,
वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जीती/
जाणार त्या निश्चिती देव नाही//
भाडेकरी वाहे पाठीवरी भार/
अंतरीचे सार लाभ नाही//
देवपूजेवरी ठेवूनिया मन/
पाषाणा पाषाण पूजी लोभे//
तुका म्हणे फळ चिंतीती आदर/
लाघव हे चार शिंदळीचे//
फळाची इच्छा मनात ठेवून प्रपंचासाठी अर्थार्जन करणाऱ्या प्रापंचिकांविषयी तुकाराम महाराज वरील अभंगात सांगत आहेत. एखादा चरितार्थाचा व्यवसाय मिळवून जमीन, घर, द्रव्य, राज्य, प्राप्त करून घेणारे जे लोक असतात त्यांनी परमार्थात कितीही धडपड केली, तरी त्यांना परमेश्वर प्राप्ती होणे असंभवनीय आहे. ओझे वाहणारा भारवाहक त्याच्या हमालीचे पैसे घेईल, परंतु त्या ओझ्यातील सारभाग त्याला कसा मिळेल? काही एक प्राप्त करण्याची वासना मनात ठेवून जो देवपूजा करतो तो दगडाची पूजा करणारा दगडच म्हणावा लागेल. अनेक प्रकारचे उद्योग करून त्यापासून फलप्राप्ती इच्छिणारे जे लोक आहेत त्यांची सर्व धडपड म्हणजे तुकाराम महाराजांच्या मते गणिकेच्या शृंगाराप्रमाणे निंद्य आहे.
रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊन तुकारामांची सामान्यांना परिस्थिती पटवून, समजावून देण्याची पद्धत खरोखरच आपल्या मनाचा ताबा घेऊन त्या दृष्टीने आपल्याला विचार करण्यास लावणारी आहे. आता हे दोन अभंग पहा…
(1)
माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक/
आपणा सरिसे लोक नागविले//
विषयी लंपट शिकवी कुविद्या/
मनामागे नांद्या होऊनी फिरे//
करुनी खाता पाक जिरे सुरण राई/
करिता अतित्यायी दुःख पावे//
औषध द्यावया चाळविले बाळ/
दावूनिया या गुळ दृष्टी पुढे//
तरावया आधी शोधा वेदवाणी/
वांझट बोलणी वारा त्याची//
तुका म्हणे जया पिंडाचे पाळण/
न घडे नारायण भेट तया//
(2)
मृगजळ दिसे साचपणा ऐसे/
खोटीयाचे पिसे ऊर फोडी//
जाणूनी का करा आपुलिया घात/
विचारा रे हित लवलाही//
संचित सांगती बोळवण सवे/
आचरण द्यावे फळ लेणे//
तुका म्हणे रोखी स्मशान ते वरी/
संबंध गोवरी आगीसवे//
आपल्या देहाचे पालनपोषण करण्यातच आयुष्य वेचणाऱ्या आणि दुसऱ्यांना उपदेश करून स्वतः पापे करणाऱ्या लोकांविषयी पहिल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की, हे धर्माचे स्तोम माजविणारे लोक माया आणि ब्रह्म एकच आहे असे म्हणतात आणि याच धारणेने स्वैर वागतात व अज्ञान्यांना फसवितात. ( या लोकांना महाराजांनी धर्मठक ही अगदी योग्य संज्ञा दिली आहे.) विषयासक्त मनुष्य दुसऱ्याला कुविद्या शिकवतो आणि स्वतः नंदीबैलाप्रमाणे मन मानेल तिकडे जातो. सुरण आणि मोहरी शिजवून खाल्ली तरच पचन होते, अन्यथा कच्चे खाणाऱ्यांना दुःख भोगावे लागते. आजारी मुलाला कडू औषध देताना त्याची आई त्याला एवढे औषध घेतल्यावर गुळाचा खडा देण्याचे आमिष दाखवते. महाराज सांगतात की, हा भवसागर तरुन जाण्यासाठी त्याचा नीट विचार करून, ज्ञान संपादन करून ( सुरणासारखा शिजवून आणि स्वर्गरूपी गुळाचा खडा महत्त्वाचा न मानता त्याग रुपी औषध घ्यावे) हेच आयुष्याचे सार आहे. माया आणि ब्रह्म एकच आहे असे समजून आणि देहाला सर्वस्व मानून त्याचे चोचले पुरविणाऱ्यांना नारायणाचे दर्शन कधीही होणार नाही.
दुसऱ्याही अभंगात मृगजळापाठी धावणाऱ्या हरिणाचे उदाहरण देऊन तुकाराम महाराज सामान्यांना हीच गोष्ट अधिक पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे मृगजळ हरिणांना खरे वाटते आणि ऊर फुटेपर्यंत मोठ्या आशेने हरणे तेथे धाव घेतात, त्याचप्रमाणे देहादिक प्रपंच खोटा आहे हे जाणूनही स्वतःचा घात करतात. स्वहित कशात आहे याचा विचार करीत नाहीत. जे आपले संचित कर्म आहे ते आपल्या बरोबर या जन्मातून त्या जन्मात येत राहते आणि पूर्वकर्माप्रमाणे ते भोगावे लागते. प्रपंचात्मक माणसाचा देह स्मशानात जातो, तेथे तो अग्नीमध्ये मिसळतो. ( अग्नीशी त्याचे लग्न लागते.) याचाच अर्थ असा की, त्याचा जन्म ईश्वर साधना न करता फुकट जातो.
संसारी लोकांबद्दल महाराज काय म्हणतात ते आपण या अभंगात पाहू.
काय एकाच जाले ते का नाही ठावे/
काय आहे सांगावे का म्हूण//
देखतील डोळा ऐकतील कानी/
बोलिले पुराणी तेही ठावे/
काय हे शरीर साच की जाणार/
सकळ विचार जाणती हा/
का हे कळो नये आपुले आपणा/
बाळत्व तारुण्य वृद्धदशा//
का हे आवडले प्रिया पुत्र धन/
काय काम कोण कोणा आले//
का हे जन्म वाया घातले उत्तम/
काहे राम राम न म्हणती//
काय भूली यांसी पडली जाणता/
देखती मरता आणिकांसी//
काय करीती हे बांधिलिया काळे/
तुका म्हणे बळे वज्रपाशी//
महाराजांना वाटते की, संसाराच्या संगतीने यांची ही काय दुर्दशा, अवस्था झाली आहे. यांना काय काय म्हणून सांगावे? प्रपंच संगतीने जीवाची किती दैना होते हे ते पाहतात, ऐकतात आणि पुराणातही सांगितलेले त्यांना माहित आहे. हे शरीर खरे आहे की नाशीवंत आहे याचे ज्ञान त्यांना आहे. कारण त्यांनी सर्व ऐकले आहे. आपल्या देहाला बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या अवस्था अटळ आहेत हे माहीत असूनही त्यांना कळत कसे नाही? बायको, मुले, पैसा याविषयी इतकी प्रीती का असावी? ही माणसे कधी कुणाच्या उपयोगी पडू शकतात का? हे लोक त्यांना मिळालेला उत्तम नरजन्म वाया घालवीत आहेत. रामनामाचे चिंतन का करीत नाहीत? कित्येक लोक मरतात हे पाहिल्यावर आपल्यालाही मरायचे आहे हे जाणूनही लोकहो तुम्ही या वरपांगी देहाला का भुलता? काळाने त्याच्या बलिष्ठ वज्रपाषाने यांना बांधल्यावर हे काय करतील? गीतेमध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, व दोष यांचे जाणीवपूर्वक दर्शन करणे हे ज्ञानाचे लक्षण सांगितले आहे. संसारातील दुःखांची सतत जाणीव ठेवून हरी भजन करावे हेच महाराज आपल्यासारख्या मायाजालात फसलेल्या सामान्य जनतेला सांगत आहेत.
पुढील भागात याच संबंधी गाथेतील आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस
संसाराची आसक्ती गेल्याशिवाय तुम्ही आम्ही सर्वच माणसे या ऐहिक मोह पाशातून मुक्त होणे कदापि शक्य नाही म्हणून अशा संसारासक्त माणसांना तुकाराम महाराज या अभंगात काय सांगतात ते पाहू.
का रे माझी पोरे म्हणशील ढोरे/
मायबाप खरे काय एक//
का रे गेले म्हणून मी करीसी तळमळ/
मिथ्याची कोल्हाळ गेलियाचा//
का रे माझे माझे म्हणशील गोत/
न सोडविती दूत यमाहाती//
का रे मी बळिया म्हणविसी ऐसा/
सरणापाशी कैसा उचलविसी//
तुका म्हणे न धरी भरवसा काही/
वेगी शरण जाई पांडुरंगा//
महाराज म्हणतात की, बाबारे, तात्काळ तू पांडुरंगाला शरण जा. उगाच कशापाई ही माझी मुलं, ही माझी गुर ढोरं करत बसतोस? माझे आई- बाप, माझं गोत का करतोस? कोणी गेल्यावर विनाकारण का तळमळतोस? यमदुताच्या तावडीतून यांच्यापैकी कोणीही तुला सोडवण्यास येणार नाही हे लक्षात असू दे. स्वतःला मोठा बलाढ्य का समजतोस? जर इतका बलवान आहेस, तर मेल्यानंतर तुला सरणावर दुसऱ्याला का चढवावे लागते? एकच लक्षात ठेव की या विश्वात कायम टिकणारा, चिरंजीव असा कोणताच पदार्थ नाही. म्हणून तू फक्त एका पांडुरंगाला शरण जा. ते एकच शाश्वत सत्य आहे.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे/
उदास विचारे वेच करी//
उत्तमची गती तो एक पावेल/
उत्तम भोगेल जीवखाणी//
पर उपकारी नेणे परनिंदा/
परस्त्रिया सदा बहिणी माय//
भूतदया गाई पशूंचे पाळण/
तान्हेल्या जीवन वनामाजि//
शांतीरुपे नव्हे कोणाचा वाईट/
वाढवी महत्त्व वडिलांचे//
तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ/
परमपद बळ वैराग्याचे//
गृहस्थाश्रमी माणसाचे आचरण कसे असावे हे सांगणारा हा अभंग सर्वश्रुत व परिचित आहे. जन हो, प्रामाणिकपणे व्यवहार करून द्रव्य प्राप्त करावे, परंतु मनात त्याची आसक्ती नको. उदास विचारे, अलिप्त राहून ते द्रव्य खर्च करा. अशा व्यवहाराने तुम्हाला उत्तम गती मिळेल आणि तुम्ही चांगले भोग भोगाल. कुणाला लुबाडून, चोरी करून, डाका घालून सद्गती मिळणे कदापी शक्य नाही. जो परोपकार करतो, निंदा नालस्ती करत नाही, जो परस्त्रीला मातेसमान, भगिनी समान मानतो, जो सर्व भूत मात्रांवर प्रेम करतो, दया, सहानुभूती दाखवतो, त्यांचे पालन- पोषण करतो, यथाशक्ती वैराण मार्गात पाण्यासाठी विहिरी बांधतो, जो आपली वृत्ती शांत ठेवून कोणाशी दुष्ट वागत नाही, वरिष्ठांचा मान ठेवतो, त्याचा गृहस्थाश्रम आदर्श होय. मोक्षप्राप्तीला लागणारे वैराग्य ते हेच होय. केवळ जंगलात जाऊन एकांतवासात राहण्याने मोक्षप्राप्ती असंभव आहे.
महाराज प्रापंचिकाला पुढे सांगतात,
आयुष्य मोजावया बैसला मापारी/
तू का रे वेव्हारी संसाराच्या//
अरे भल्या माणसा, तो काळ तुझ्या आयुष्याचे माप घेत आहे आणि तू इथे संसारात रममाण झाला आहेस?
नेईल ओढोनी ठाऊक नसता/
न राहे दुश्चित्ता हरिविण//
तो काळ तुला कधी ओढून नेईल ते तुला कळणारही नाही, म्हणून आतापासूनच तू हरीचिंतन करत रहा. तुझे चित्त विचलित होऊन देऊ नकोस.
कठीण हे दुःख यम जाचतील/
कोण सोडविल तया ठाई//
तू केलेल्या पापांची यमराज तुला शिक्षा देईल, तेव्हा यातून तुला सोडवायला कोण येईल?
राहतील दूरी सज्जन सोयरी/
आठवी श्रीहरी लवलाही//
त्यावेळी सखे सोयरे, नातलग, मित्र मंडळी सर्वजण तुझ्यापासून दूर राहतील. तेव्हा तू सतत श्रीहरीचे स्मरण करत रहा, त्या एका हरीला शरण जा.
तुका म्हणे किती करसी लंडायी/
होईल भंडाई पुढे थोर//
तुकाराम महाराज म्हणत आहेत, ” अरे, इतका गर्व आणि मस्ती बरी नव्हे, असे केल्याने शेवटी तुझी मोठी दैना होईल.
संसारी माणूस, गृहस्थ सर्वसाधारणपणे कसा असतो त्याचे वर्णन आपल्याला या खालील अभंगात पहावयास मिळते.
जरी आले राज्य मोळविक्या हाती/
तरी तो मागुता वेवसायी//
तृष्णेची मजूरे नेणती विसावा/
वाढे हाव हावा काम कामी//
वैभवाची सुखे नातळता अंगा/
चिंता करी भोगा विघ्न जाळी//
तुका म्हणे वाहे मरणाचे भय/
रक्षण उपाय करूनी असे//
एखाद्या मोळी विक्या माणसाला राज्यकारभार देऊन त्याला सिंहासनावर बसवले, तरी त्याच्या मनात मोळ्या विकण्याची आणि त्याचा धंदा करण्याची इच्छा निर्माण होणारच. संसारी माणसाचे ही तसेच आहे. मनुष्य देहाचा लाभ होऊनही आपल्या तृष्णेचा (लोभाचा) गुलाम होतो. अविश्रांत श्रम करतो आणि हावेने हाव, कामाने काम वाढत जातो. भरपूर वैभव असले तरी त्याला सुख लाभत नाही. कितीही उत्तम भोग अनुकूल असले तरी काही विघ्न तर नाही ना येणार या भीतीने त्याचे आयुष्य जळत राहते. जरी तो आपल्याला मरण नक्की येणार आहे हे जाणत असला तरी, आपला पैसा, सारे वैभव कसे टिकून राहील याचा अहोरात्र विचार करत राहतो.
अशा प्रकारे या मायाजालात अडकलेल्या प्रापंचिकाला त्यातून बाहेर काढण्यासाठी परमार्थाला कसे लागावे ते रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतील काही अभंगातून सुचवितात.
ते म्हणतात,
आवडी येते गुणे/
कळो चिन्हे उमटती//
पोटीचे ओटी उभे राहे/
चित्त साहे मानसी//
डोहोळीयाची भूक गर्भा/
ताटी प्रभा प्रतिबिंबे//
तुका म्हणे मागून घ्यावे/
मना खावे वाटे ते//
दृष्टांत देऊन महाराज जन रीत सांगत आहेत. ते म्हणतात की, एखाद्या ठिकाणी चांगले गुण दिसले म्हणजे त्या माणसावर आपली प्रीती जडते. जी गोष्ट मनात असते तीच ओठा वाटे प्रगट होते, कारण मन चित्ताचे सहाय्य घेत असते. मातेला डोहाळे लागतात, ती सर्व भूक, तहान, आवड गर्भाची असते. त्याचीच भावना आईच्या ठिकाणी अन्नाच्या वासने प्रमाणे प्रतिबिंबित होते. जे भक्षण करताना मनाला आवडते तेच पुन्हा मागून खावेसे वाटते. तुकाराम महाराज आपल्या आवडी परमार्थाकडे कशा लावाव्या ते सुचवतात.
स्वतःबद्दल प्रापंचिकांना ते सांगतात,
” माझ्यावर अशी काही अमंगल वेळ ओढवली की नेमका कथेच्या वेळी मला शीण आला आणि मी दुःखी झालो. माझ्या पापामुळे मला दुष्ट लोकांचे दर्शन झाले. मी आता हे विठोबाच्या कानावर घालतो. जन्माला येऊन संसाराच्या मोहात मी कितीदा माझी फजिती करून घ्यावी? देवा, माझी उघड उघड फजिती जाणून लवकर या आणि मला मदत करा. या संसाराच्या वेढ्यात सापडलो आणि बायका मुलांची सेवा करण्यातच अडकलो. पण भक्तीच्या वाटेने पांडुरंगाची कृपा झाली, आणि त्याची भेट झाली. संसाराचे ओझे डोक्यावर होते, ते सोडविणारा कोण सद्गुरु भेटेल याची मला चिंता लागून राहिली होती. “
स्वतःच्या या अनुभवावरून सांसारिकास महाराज सांगतात,
जा रे तुम्ही पंढरपुरा
तो सोयरा दीनांचा//
गुणदोष नाणी मना/
करी आपणासारिखे//
उभारोनी उभा कर/
भवपार उतराया//
तुका म्हणे तातड मोठी/
जाली भेटी उदंड//
तुम्ही पंढरपूरला जा कारण तो परमेश्वर, पांडुरंग दीनांवर दया करणारा आहे दीनानाथ आहे. जे त्याला शरण जातील त्यांचे गुणदोष न बघता तो त्यांना आपल्या समान करतो. शरणागताना भवसागरातून उद्धारून नेण्याकरता तो आपले हात वर करून उभा आहे. दीन व आर्त लोकांना भेटण्याची त्याला मोठी उत्कंठा आहे. त्याच्या भेटीने आपले फार मोठे हित होते.
इतके अभंग वाचल्यानंतर आपण सारेच या भवसागरातील प्रवासी, सर्वसामान्य प्रापंचिक, परमार्थाच्या वाटेने चाललो तर आपल्यालाही पांडुरंग, माय- माऊली भेटेल आणि कृपा करेल यात शंका नाही.
अर्थ: भक्ती (प्रेमरूप भक्ति) एकच असूनही ती अकरा प्रकारे प्रकट होते. श्रीमहाराज एका ठिकाणी भक्ति बद्दल म्हणतात, “प्रपंचात जशी आसक्ति, तशी भगवंतावर प्रीती, त्या नाव भक्ति. “ प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असल्याने प्रत्येक व्यक्तीची आसक्ति कुठे असेल ते सांगणे कठीण आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याने आपापल्या आसक्तीचा विचार करून, त्या आसक्तीला भगवंताकडे वळविता आले की त्याचे अर्धे काम झाले असे म्हणता येईल. श्रीमहाराज म्हणायचे की भगवंताशी काहीतरी नाते जोडावे. त्याला भाऊ, बहीण, आई, बाबा, पुत्र किंवा अन्य कोणतेही. त्याचा भक्तिमार्गात खूप उपयोग होतो.
आसक्तीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
गुण माहात्म्यासक्ति :
भगवंताचे गुण, महिमा, दया, करुणा, सौंदर्य, सामर्थ्य इ. श्रवण करून, मनन करून त्याच्यावर प्रेम करणे. नारद मुनी आणि महर्षी व्यास यांची भक्ति वरील प्रकारात मोडते.
रूपासक्ति :
भगवंताच्या सुंदर स्वरूपावर प्रेम करणे. त्याच्या मूर्तीचे, दर्शनाचे, सौंदर्याचे चिंतन करणे. गोकुळातील गोपींची भक्ति या प्रकारची आहे असे मानले जाते.
पूजासक्ति :
भगवंताची सेवा, पूजा, आरती, अभिषेक, अलंकार इत्यादींमध्ये प्रेम वाटणे.
स्मरणासक्ति :
सतत भगवंताचे नामस्मरण, गुणस्मरण, लीला चिंतन करणे हेच जीवनाचे ध्येय मानणे.
दास्यासक्ति :
आपण भगवंताचे सेवक आहोत, ही भूमिका घेत त्याची सेवा करणे.
सख्यासक्ति :
भगवंताशी मित्रभाव ठेवून त्याच्याशी मनमोकळा संवाद साधणे.
वात्सल्यासक्ति :
भगवंताच्या लीलांचे बालरूप धरून त्याच्यावर आई-वडिलांसारखे प्रेम करणे.
कान्तासक्ति :
भगवंतावर पतीप्रेमासारखे गाढ, उत्कट, अनन्य प्रेम करणे.
आत्मनिवेदनासक्ति :
स्वतःचे सर्वस्व भगवंताला अर्पण करणे. “तूच सर्वकाही आहेस, मी नाहीच” असे मनोधारणे.
तन्मयतासक्ति :
भगवंतात इतके एकरूप होणे की स्वतःचा विसर पडणे.
परमविरहासक्ति :
भगवंताच्या वियोगाने अतीव तगमग, विरह, वेदना याचा अनुभव घेणे.
समर्थ रामदास भक्तीचे नऊ प्रकार सांगतात.
भक्ती एकच असते ते भगवंतावरचे प्रेम. पण “व्यक्ती तितक्या प्रकृती” या उक्तीप्रमाणे भक्तीचे अनंत प्रकार होऊ शकतात.
“जशी भक्ताची भावना, तशी त्याची भक्तीची अभिव्यक्ती!”
जय जय रघुवीर समर्थ
– – – –
भक्ति सूत्रे ८३ – –
“इत्येवं वदन्ति जनजल्पनिर्भयाः एकमताः कुमार व्यास शुक शाण्डिल्य गर्ग विष्णु कौण्डिण्य शेषोद्धवारुणि बलि हनुमद् विभीषणादयो भक्त्याचार्याः ॥ ८३॥”
अर्थ : सनत्कुमार, वेदव्यास, शुकदेव, शाण्डिल्य, गर्ग, विष्णु, कौण्डिन्य, शेष, उद्धव, अरुणि, बलि, हनुमत्, विभीषण आदि भक्तीचे आचार्य लोकांच्या निंदा स्तुतीची पर्वा न करता (भीती न बाळगता) एकमताने असेच सांगतात की भक्तीच श्रेष्ठ आहे.
विवेचन : भक्तीमार्ग हा एक प्राचीन, समन्वयपूर्ण आणि अनुभवाधारित भगवंत प्राप्तीचा मार्ग आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नारद मुनींनी ही सूत्रे लिहिली आहेत, ती त्यांच्या अनुभूतीची आहेत. भक्तीची रचना त्यांनी केलेली नाही, त्या आधीच्या ऋषि आणि पूर्वसुरींनी भक्तिशास्त्राची रचना केली. आणि ती परंपरेने आपल्यापर्यंत आलेली आहे. हा मागील कालावधी एका अर्थाने अनंत असा आहे. या भक्तिमार्गाचे काही प्रमुख आचार्य आहेत, त्यांची नावे वरती दिलेली आहेत. आपण या सर्वांना भक्तिमार्गाचे प्रमुख “वारकरी” (वाहक, प्रचारक) म्हणू शकतो. भक्तीच्या या पवित्र मार्गावर चालताना लोकांच्या टीकेची भीती न बाळगता भगवंताच्या प्रेमाला प्राधान्य देत निष्ठेने भक्ती करणे हे जीवनाचे सार आहे.
ज्या प्रमुख वारकऱ्यांचा उल्लेख नारद महर्षींनी केला आहे, त्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात आपण समजून घेऊ.
सनत्कुमार:
महाविष्णूंच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टि रचनेचा संकल्प केल्यावर प्रथम सनक, सनंदन, सनातन, सनातकुमार हे चार कुमार प्रकट झाले. हे नारद मुनींचे सद्गुरू. भक्तिशास्त्राच्या आचार्यांचे वर्णन करण्याआधी नारद महाराज आपल्या सद्गुरुंचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करीत आहेत.
व्यास :
महर्षी नारद हे कीर्तन कलेचे उद्गाते आहेत, तसे वेदव्यास हे प्रवचन कलेचे उद्गाते मानले जातात. जिथे कीर्तन केले जाते त्याला नारदाची गादी म्हटले जाते तर जिथे प्रवचन केले जाते त्याला व्यासपीठ असे संबोधले जाते. व्यास हे एक महान ऋषी. त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केलेज संपादन केले. त्यांनी महाभारतादि अनेक ग्रंथ लिहिले. पण इतके सारे लिहून त्यांना समाधान लाभले नाही. मग सद्गुरू नारद मुनींनी महर्षी व्यासांना भगवंताचे गुणवर्णन करणारे भागवत त्यांना लिहायला सांगितले. भागवत लिहिल्यावर त्यांना मनःशांती लाभली असे वर्णन आहे.
शुक :
व्यासांचे पुत्र, ते जन्मतःच वैराग्य संपन्न होते. श्रीमद्भागवताचे ते आद्य वक्ते मानले जातात. त्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितले.
शाण्डिल्य :
शाण्डिल्य ऋषींची भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत. नारद मुनींनी त्यांचा उल्लेख 18व्या सूत्रात केला आहे.
गर्ग :
कृष्णाचे नामकरण करणारे ऋषी. यांनी सुद्धा भक्ति सूत्रे लिहिली होती, पण काळाच्या पोटात ती गडप झाली असे म्हणावे लागते.
विष्णु :
हे एक महान ऋषी होऊन गेले. त्यांची अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.
कौण्डिन्य :
धर्मराजाने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्याचे प्रमुख कौडिन्य ऋषी होते असा उल्लेख आढळतो.
शेष :
क्षीरसागरात महाविष्णू शेषावर शयन करतात. लक्ष्मणाला शेषाचा अवतार मानले जाते.
उद्धव :
यादव कुळातील हा कृष्णाचा परमभक्त. गोपींनी त्याला भक्ति शिकवली.
आरुणि :
छादोंग्य उपनिषदात यांचा उल्लेख आहे.
बलि :
भक्त श्रेष्ठ प्रल्हाद यांचा मुलगा विरोचन यांचा हा मुलगा. हा महान भक्त होता. वामन अवतारात त्याला पाताळाचे राज्य भगवंताने त्याला देऊ केले.
हनुमान :
एका शब्दांत वर्णन करायचे झाल्यास ते असे करता येईल… रामदास (हनुमान).
बिभीषण : रावणाचा भाऊ. महान भक्त. रामभक्तीने चिरंजीव पद प्राप्त केले.
– – या सर्व महान भक्तांच्या चरित्राचे स्मरण करून प्रत्येकाने या पवित्र अशा भक्तिमार्गावर अनुसरण करायचा प्रयत्न करावा.
जय जय रघुवीर समर्थ
– – – – –
भक्ति सूत्रे ८४ – –
“य इदं नारदप्रोक्तं शिवानुशासनं विश्वसिति श्रद्धत्ते स प्रेष्ठं लभते स प्रेष्ठं लभत इति ॥ ८४॥”
अर्थ : जो मनुष्य नारदांनी सांगितलेली ही शिवमय, कल्याणकारक शिकवण (भक्तिमार्ग) श्रद्धेने व विश्वासाने स्वीकारतो, तो सर्वोत्तम असलेल्या भगवंताची प्राप्ती करतो.
विवेचन : भक्ति करणे जरी शास्त्र असले तरी भक्ति करायला सांगणे, सुचवणे हा उपदेश नव्हे.
भक्ति हे गुह्य ज्ञान आहे. ते सुलभ साध्य आहे, पण सहजसाध्य नाही. इथे वाचकांचा घोळ होऊ शकतो. निसर्गात हवा आहे आणि ती सर्वांना सुलभ आणि सहज साध्य आहे. पण भक्तीच्या बाबतीत थोडा वेगळा विषय आहे. भक्ति करण्यासाठी कोणतीही अट नाही, पण ती करावी लागते, त्यासाठी काही अथवा किमान नीतीनियम पाळावे लागतात. तसे हवेच्या बाबतीत म्हणता येत नाही. प्रयत्न केले, सांगितलेले नीती नियम पाळले तर भक्तीची प्राप्ती सुलभतेने होऊ शकेल.
“जितकी भक्ति तितकी प्राप्ति” हे सूत्र आपण पाहिले आहे. नारद महाराज स्वतः ठामपणे सांगतात की, जो भक्तीच्या या मार्गावर श्रद्धा ठेवतो, तो “प्रेष्ठं”( सर्वोत्तम गोष्ट) ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
या जगात आपण नव्हतो, तेव्हा भगवंत होता. आज आपण आहोत, भगवंत आहे. उद्या कदाचित आपण नसू, पण भगवंत नक्कीच असेल. कारण न बदलणारा एकमेव भगवंत आहे. तो आपल्याच नव्हे तर चराचर सृष्टीच्या अंतर्यांमी तो स्थित आहे. त्याला जाणून घेणं हे मनुष्य जन्माचे खरे उद्दिष्ट आहे. आपल्याला नरदेह लाभला आहे तर त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. अन्यथा, आपण जन्ममरणाच्या चक्रात फसलेले आहोत, यातून बाहेर पडण्यासाठी भक्तिमार्गासारखा सुलभ मार्ग नाही.
महर्षी नारद ऋषींनी सामान्य मनुष्याचे दुःख दूर होण्यासाठी, नव्हे तर प्रत्येक मनुष्याला शाश्वत सुखाचा मार्ग मिळावा म्हणून ही परमप्रेमा भक्ति सांगितली आहे.
माझ्या सारख्या अल्पमती मंदबुद्धि असलेल्या मनुष्याने नारद भक्ति सूत्र विवेचनाचे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस केले ते माझ्या सद्गुरूंच्या आधाराने. हे विवेचन करण्यात जी काही त्रुटी राहिली असेल ती माझी आहे आणि जे काही चांगले असेल तो मात्र माझ्या श्रीमहाराजांचा कृपाप्रसाद आहे अशी माझी श्रद्धा आहे. आपण हा कृपा प्रसाद गोड मानून घ्यावा आणि भक्तीमार्ग आचरावा.
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “तपते शहर में ठहरी हुई छाँव: क्यों कुछ रास्ते धूप में भी ठंडे रहते हैं?…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख # २८७ ☆
☆तपते शहर में ठहरी हुई छाँव: क्यों कुछ रास्ते धूप में भी ठंडे रहते हैं? ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆
तपन जब अपने चरम पर होती है, तब मन किसी तर्क से नहीं, केवल अनुभव से चलता है। धूप में दो कदम चलते ही भीतर एक ही पुकार उठती है — “काश कहीं कोई पेड़ मिल जाए… बस एक पल की छाँव मिल जाए।” यह चाह केवल शरीर की थकान नहीं होती, यह आत्मा की प्यास भी होती है।
कभी आपने ध्यान दिया है—कुछ रास्ते ऐसे होते हैं जहाँ पेड़ों की हरियाली सिर पर छतरी-सी तनी रहती है। उन्हीं रास्तों से गुजरते हुए, चाहे आप खुले में हों या गाड़ी के भीतर, गर्मी का तीखापन जैसे कहीं खो जाता है। हवा वही होती है, सूरज वही होता है, पर एहसास बदल जाता है। वहाँ धूप जलाती नहीं, बस छूकर निकल जाती है।
और दूसरी ओर, वे रास्ते जहाँ पेड़ नहीं हैं—जहाँ केवल कंक्रीट है, तपती ज़मीन है, और बिन छाँव का विस्तार है। वहाँ आप गाड़ी के भीतर बैठकर एसी चला लें, फिर भी भीतर कहीं न कहीं गर्मी का एक अदृश्य बोझ बना रहता है। जैसे वातावरण ही तपकर भीतर उतर रहा हो।
यह अंतर केवल तापमान का नहीं, यह प्रकृति के स्पर्श का अंतर है।
पेड़ केवल छाया नहीं देते, वे वातावरण को संतुलित करते हैं। उनकी पत्तियाँ हवा को ठहराती हैं, उसे शीतल बनाती हैं, और उनकी जड़ें धरती में जल को थामे रखती हैं। जहाँ वृक्ष अधिक होते हैं, वहाँ धरती की नमी जीवित रहती है, वहाँ जीवन की साँसें गहरी होती हैं।
हरियाली दरअसल प्रकृति का वह मौन संगीत है, जो बिना शब्दों के हमें सुकून देता है। जब हम पेड़ों के बीच से गुजरते हैं, तो केवल शरीर नहीं, मन भी ठंडा होता है। जैसे कोई अदृश्य हाथ हमारे माथे को सहला रहा हो और कह रहा हो—“ठहरो, सब ठीक है।”
शायद इसी कारण, जब जीवन की भागदौड़ और गर्मी दोनों हमें थका देती हैं, तब हम अनायास ही हरियाली की ओर खिंचते हैं। क्योंकि पेड़ों की छाँव में केवल विश्राम नहीं, एक गहरा अपनापन मिलता है—एक ऐसा अपनापन, जो हमें हमारी जड़ों से जोड़ देता है।
तो इस तपते समय में, जब हर कोई सुकून की तलाश में है, क्यों न हम खुद भी उस सुकून का कारण बनें?
एक पेड़ लगाएँ, एक पौधे को बढ़ने दें, ताकि आने वाले समय में जब कोई राहगीर उस रास्ते से गुजरे, तो उसे भी वही शीतलता मिले, वही राहत मिले—जो हम आज तलाश रहे हैं।
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक विचारणीय कहानी – “एकला चलो रे” ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # ४१३ ☆
कथा कहानी – एकला चलो रे श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆
कहानी
दोपहर की तीखी धूप पुणे के इस औद्योगिक क्षेत्र की कंक्रीट सड़कों पर कोलतार पिघला रही थी। साठ पार कर चुके ब्रजेश चाचा ने अपनी पुरानी साइकिल के पैडल पर थोड़ा और दबाव डाला। कैरियर पर सजे टिफिन और भारी-भरकम थैले हैंडल पर लटके हुए हैं। नीले-सफेद कपड़े के थैले आपस में टकराकर एक परिचित लय पैदा कर रहे थे।
सफेद गांधी टोपी के नीचे से बहते पसीने को उन्होंने अपनी खादी की कमीज की आस्तीन से पोंछा और ठीक बारह बजे साधना जी के घर के सामने साइकिल रोक दी।
साधना जी दरवाजे पर ही डिब्बा हाथ में लिए खड़ी थीं। उन्होंने गरम और ताजे भोजन का स्टील का डिब्बा चाचा के हाथ में थमाते हुए बड़ी आत्मीयता से कहा कि चाचा, बाहर धूप बहुत तेज हो गई है, आप दो मिनट बैठ क्यों नहीं जाते, थोड़ा ठंडा पानी पी लीजिए। इस उम्र में आप इतनी कड़ी मेहनत करते हैं, अब तो बेटे भी कमाने लगे हैं, अब आराम क्यों नहीं करते।
ब्रजेश चाचा ने डिब्बे को सलीके से थैले में रखते हुए मुस्कुराकर जवाब दिया कि बहुरानी, इस धूप से मेरा पुराना नाता है। अगर आज मैं सुस्ताने बैठ गया, तो कारखाने में भूखे पेट मशीन चला रहे उस नौजवान इंजीनियर का भरोसा टूट जाएगा जो घर के स्वाद की आस में बैठा है। आराम तो उस दिन होगा जिस दिन यह सांसें रुकेंगी, जब तक पैरों में दम है, यह चाचा और उसकी सायकिल का चक्का घूमता रहेगा।
साधना जी उनकी इस निष्ठा को देखकर अवाक रह गईं। बरसों पहले जब ब्रजेश चाचा ने मुंबई के डिब्बावालों की कार्यप्रणाली से प्रेरित होकर पुणे के इस नए विकसित होते इंडस्ट्रियल एरिया में अकेले दम पर टिफिन पहुँचाने का फैसला किया था, तब लोगों ने इसे दीवानगी कहा था। कोई संगठन नहीं था, कोई नेटवर्क नहीं था, बस एक साइकिल और एक अटूट संकल्प था।
रवींद्रनाथ टैगोर के एकला चलो रे के मंत्र को उन्होंने अपने जीवन का सत्य बना लिया था।
शहर धीरे-धीरे बदल गया और फैक्ट्रियों के आस-पास चमचमाते रेस्तरां और ऑनलाइन फूड डिलीवरी वाले लड़के मोटरसाइकिल पर दौड़ने लगे। कई लोगों ने चाचा को सलाह दी कि अब इस बुढ़ापे में जान जोखिम में डालने की क्या जरूरत है, तकनीक के इस दौर में अब आपकी इस पुरानी व्यवस्था को कौन पूछेगा। लेकिन चाचा जानते थे कि मशीनी ऐप्स कभी भी उस माँ, पत्नी या गृहणी के हाथ के बने भोजन की ममता और शुद्धता को उस भूखे कर्मचारी तक नहीं पहुँचा सकते, जो उनका डिब्बा खोलते ही अपनी थकान भूल जाता है। यह उनके लिए महज एक रोजगार नहीं, बल्कि एक पवित्र मानवीय सरोकार था जिसे उन्होंने अपने हाथों से बनाया था।
साइकिल का स्टैंड हटाते हुए चाचा ने साधना जी को प्रणाम किया। उन्होंने कहा कि यह डिब्बा सिर्फ पेट नहीं भरता बहुरानी, यह घर को दफ्तर से जोड़ता है, और इस बूढ़े को जिंदा रखता है। इतना कहकर उन्होंने पैडल मारा और देखते ही देखते वह धूप से तपती सड़क पर कारखानों की ओर बढ़ गए। हवा में उनकी सफेद टोपी दूर से ही चमक रही थी, मानो वह थकती और हारती हुई दुनिया को यह संदेश दे रही हो कि जब कोई साथ न दे, तब भी अपने कर्तव्य पथ पर अकेले बढ़ते रहना ही जीवन का असली संगीत है।