मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू नसल्यावर… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तू नसल्यावर… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

तू नसल्यावर काय करू या जगण्याचे मी

करू किती नाटक हे नसुनी असण्याचे मी

उदास हे जग, उदास हे मन, उदास जगणे

तरंग उठवू किती मुखावर हसण्याचे मी

 *

अवतीभवती भास तुझे हे नित्य निरंतर

जाच किती सोसू छळण्याचे.. फसण्याचे मी

 *

स्वप्न दंशते, फूल टोचते, स्मृती दाहते

पार करावे रान कसे हे वणव्याचे मी

 *

अश्रूंचा हा पूर अनावर, ढळे तोल ही

प्रयास निष्फळ करू किती सावरण्याचे मी

 *

तू नसल्यावर दाटुन येते सांज मनावर

दुःख भोगतो ढळण्याचे अन् गळण्याचे मी

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – फुकट काहीही नसते…? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – फुकट काहीही नसते…? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

सेल! सेल! सेल! … एक खरेदी करा दुसरी वस्तू अगदी फ्री! फ्री! अशा पाट्या मान्सून मध्ये सगळी कडे जास्तच झळकतात.. महिला वर्ग तर अशा मान्सून सेल ची अगदी आतुरतेने वाट बघत असतो.. पण खरचं ह्या एक वर एक फ्री ह्या अशा ऑफर फायदेशीर असतात का हो की ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न असतो.. कारण या जगात कोणतीच गोष्ट फुकट मिळत नसते..

“फुकट” हा शब्द ऐकला की प्रत्येकालाच आनंद होतो. पण खरतर या जगात फुकट काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. ती कधी पैशांत मोजली जाते, तर कधी वेळ, कष्ट, त्याग, संयम किंवा जबाबदारी ह्यांच्या रूपात मोजली जाते..

निसर्ग आपल्याला हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि अन्न देतो. पण त्यामागे ही निसर्गाचे संतुलन टिकवण्याची जबाबदारी आपलीच असते. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या धान्यामागे त्याचा घाम, मेहनत असते. त्यामुळे अन्नाचा प्रत्येक घास अमूल्य असतो.. आणि त्या घासाची किंमत जो पर्यंत कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत त्याचे खरे मोल कळत नाही..

एखाद्या परीक्षेत उत्तम यश गुण मिळवण्यासाठी नियमित अभ्यास, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते आणि ह्या किंमतीवरचं यशाची पावती मिळते म्हणजेच यश मिळवण्यासाठी प्रयत्न सातत्य आणि मेहनत ही किंमत मोजावी लागतेचं… एखाद्या खेळाडूसाठी एखादी स्पर्धा त्यातील यश मेडल मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करावी लागते अपार कष्ट घ्यावे लागतात वेळ खर्ची घालावा लागतो तेंव्हा कुठे यशाची पायरी मिळते.. प्रत्येक यशामागे संघर्षाची कहाणी असते. संघर्षाची चिकाटीची किंमत मोजावी लागते..

आजच्या काळात अनेक गोष्टी “फ्री” म्हणून दिल्या जातात. परंतु त्याची किंमत आपण वेळ, छुपे टॅक्सेस किंवा इतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चुकवत असतो. त्यामुळे जे दिसते तेच खरे असते असे नाही. कोणतीच गोष्ट कधीच फुकट मिळत नाही.. त्याची कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंमत मोजावीच लागते..

आई-वडिलांचे प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ यांना पैशांत मोजता येत नाही. पण त्यामागे त्यांचा त्याग, काळजी आणि निस्वार्थ भाव असतात म्हणून अशा नात्यांचे मोल खूप जास्त असते.. अशी नाती अमूल्य असतात आणि ती ज जपणे ही आपली जबाबदारी असते..

जीवनात यश, सन्मान, विश्वास आणि आनंद हे कोणालाही सहज मिळत नाहीत. त्यासाठी प्रामाणिकपणा, परिश्रम, संयम आणि चिकाटी आवश्यक असते. कष्टाशिवाय मिळालेली गोष्ट टिकत नाही, पण कष्टाने मिळवलेले सुख आयुष्यभर अभिमान देऊन जाते.

म्हणूनच “फुकट काहीही नसते” हे जीवनाचे सत्य आहे. प्रत्येक गोष्टीमागे कोणाचा तरी त्याग, कष्ट किंवा किंमत दडलेली असते. म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे मोल ओळखून कृतज्ञ राहता आले पाहिजे, त्या मागे लागलेल्या कष्टांची किंमत ओळखता येण खूप गरजेचं असतं.

“कष्ट हेच खरे भांडवल आणि परिश्रम हेच यशाचे प्रवेशद्वार आहे. ” कष्टाशिवाय फळ नाही, आणि मूल्याशिवाय कोणतीही गोष्ट नाही. ” म्हणून फुकटाच्या मोहात न पडता, प्रामाणिक परिश्रमाने मिळवलेल्या प्रत्येक यशाचा अभिमान आयुष्यभर आनंद देऊन जातो..

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फटफटीचा फंडा – – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

☆ फटफटीचा फंडा – – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

मुंबापुरीतील ही गोष्ट. देवेश आणि त्याची बायको देविका दोन-चार दिवसांसाठी कोकणातून दादरला, त्याच्या चुलतभावाकडे – सुधीरकडे, आले होते. अहमद सेलर चाळीतील त्याच्या घरातच उतरले होते. कामं संपल्यावर एक दोन दिवस राहून जीवाची मुंबई करण्याचा मस्त plan होता.

अडचण होती ती मुंबईच्या भरगच्च भरलेल्या लोकल्सची. ना देवेशचा त्यात पाय टाकायचा धीर होई ना देविकालाही ते जमत होतं. पण सुधीरच्या मोटरसायकलचा आधार होता.

“वापरू का रे तुझी फटफटी? ” देवेश विचारता झाला.

“हो, घेऊन जा ना, आम्हाला आमची लोकलच बरी. फक्त बाईकचं handle lock कधी कधी त्रास देतं हां. ही घे किल्ली. “

“कुठली आहे बाबा गाडी तुझी? “

“बजाज बॉक्सर, सगळे गिअर पुढून खाली. “

“एवढं काही सांगायला नकोय, एवढा काही मी वेंधळा नाहीये. माझ्याकडेही गावाला बजाजच आहे बरं. “

कोकणातल्या या दोघांना समुद्राचं नाविन्य नव्हतं पण गेटवे, ताज आणि हो, म्हातारीचा बुटही डोळे भरून बघून झाला. नेपियन सी रोड, फोर्टच्या त्या उत्तुंग इमारती पहाताना डोळे फिरत होते. संध्याकाळी दादरला चाळीत गाडी लावताना सुधीर म्हणाला तसा handle lock ने त्रास दिलाच, काही केल्या लागेचना. पण ‘राहू दे, कंपाउंडच्या आत आहे ना’ म्हणून देवेशने स्वतःचंच समाधान करून घेतलं. भावाच्याही कानावर घालून ठेवलं की नेहमीच्या जागेवर गाडी लावली नाहीये व handle lock ही लागलेलं नाहीये.

” हां, हां. मी जेवण झाल्यावर पाय मोकळे करायला जाईन तेव्हा बघतो. “

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवेशला शिवाजी पार्कला जायची सुरसुरी आली नी तो एकटाच चक्कर मारायला खाली उतरला. पाहिलं तर गाडी परत जागेवर लावून ठेवलेली, handle lock ही नीट लावलेलं. “जेनु काम तेनू थाय; बीजा करे सो गोता खाय” पुटपुटत देवेशराव फटफटीवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने निघाले.

पार्कातून येऊन आंघोळ पांघोळ आटपून देवेश जरा बसतो की नाही तेवढ्यात बायकोचं फर्मान आलं – अहो जरा एक दूध पिशवी घेऊन या. घरातलं दुध अगदीच संपलंय. स्वारी खाली उतरून दुध केंद्राकडे वळणार तेवढ्यात सुधीरच्या मोटरसायकलचे पुढचे चाक आपल्या मोटरसायकलच्या पुढच्या चाकाला कपडे वाळत घालायच्या नायलॉनच्या दोरीने घट्ट बांधताना एक जण त्याला दिसला.

“हेल्लो, तुम्ही ही गाडी बांधून ठेवताय खरं पण एक अर्ध्या तासात मी ही बाईक परत घेऊन जाणार आहे बरं. “

देवेश एवढं बोलला मात्र बनियन लेंगा घातलेल्या, दाढीचे काळे पांढरे खुंट वाढलेल्या, डोळे खोल गेलेल्या त्या माणसाने देवेशकडे रोखून पाहिलं. त्या बाबाच्या घरचं कोणीतरी नुकतंच वारलं असावं, मुंडण केलेल्या डोक्यावरून ते जाणवत होतं.

” म्हणजे ही बाईक कालही तुम्हीच नेली होतीत? ” तो विचारता झाला.

देवेशला काही कळेना, सुधीरची बाईक नेल्याबद्दलचा जाब हा माणूस आपल्याला का विचारतोय.

“हो. का? “

“अशी कशी नेलीत? “

“सुधीरला सांगून नेली होती. “

“सुधीरचा काय संबंध? “

याच्या घरचं जे कोणी वारलं होतं त्याने याच्या डोक्यावर वगैरे काही परिणाम झालाय का काय अशी शंका देवेशला येऊन गेली.

“अहो मिस्टर, तुम्ही कोण आहात? ही माझी गाडी आहे. ” – टकलू हैवान.

“अहो, ही सुधीरची गाडी आहे. “

” तुमचं काय डोकं फिरलंय का? ही माझी गाडी आहे. सुधीरची बॉक्सर ती तिकडे आहे, त्याच्यावर त्याचं नावही लिहीलंय की. “

आता चक्रावायची पाळी देवेशची होती.

“आणि तुम्ही ही गाडी नेलीच कशी? ” टकलू हैवान थांबायचं नावच घेत नव्हता.

“माझ्याकडे किल्ली आहे. ” दीवारच्या शशी कपूरने ज्या ठामपणे मेरे पास मां है म्हटलं त्या सुरात देवेश.

” सुधीरची किल्ली माझ्या गाडीला कशी लागेल? “

आता मात्र वाद न घालता देवेश पुढे आला, handle lock ला किल्ली लावली, एका झटक्यानिशी कुलूप उघडलं, किक मारताच बाईक start झाली.

“अहो, आई वारली त्याला अजून दहा दिवस नाही झाले. काल सकाळी बाहेर जायला निघालो तर गाडी गायब. घरी सगळ्यांना विचारलं, कोणीच नेली नव्हती आणि कोणालाच माहित नव्हतं, मग शेवटी पोलिस चौकीत complaint करून आलो. “

सकाळी वहिनी दुध आणायला उतरली ती म्हणाली गाडी आहे, म्हणून पाहिलं तर खरंच होती. मग तीच गाडी घेऊन पोलिस स्टेशनला गेलो तक्रार अर्ज मागे घ्यायला. तो हवालदार कायदा शिकवायला लागला – एकदा FIR झाली की ती मागे घेता येत नाही म्हणून. मग शेवटी अर्ज मागे घेण्यासाठी त्याला चहापाणी दिलं, घरी आलो; गाडी जागेवर लावली; handle lock लावलं.

पाच मिनीटाने खाली उतरलो तर परत गाडी गायब. डोकं फुटायची पाळी आली. म्हणून आत्ता गाडी परत दिसल्यावर तिला बांधूनच ठेवत होतो; तर तुम्ही तोंड वर करून सांगताय की मी ही गाडी घेऊन जाणार आहे म्हणून. “

चाळीत दोन बॉक्सर होत्या, आपण सुधीरला गाडी नंबर विचारून घ्यायला होता, त्याची किल्ली याच्या गाडीला लागेल याची कोणाला कल्पना होती? आणि देविकाबरोबर फिरताना जर पोलिसांनी चोरीची गाडी घेऊन फिरतोय म्हणून अटक केली असती तर – देवेशच्या डोक्यात मुंग्या येऊ लागल्या. आणि मुंबई दर्शनाची त्याची हौस पुरती फिटली होती.

दोन फटफट्यांच्या फंड्याने त्याची चांगलीच फसगत झाली होती.

 

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुझ्यासारखा तूच मित्रा.. ” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “तुझ्यासारखा तूच मित्रा.. ”  ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

यावर्षी ३० जुलै आणि २ ऑगस्ट अशा दोन दिवशी “ मैत्रीदिन “ साजरा केला गेला. तसा बरेचदा तो असाच दोन वेळा जगात साजरा केला जातो, आणि याचे कारण असे की ३० जुलै ही तारीख “ UN International Day of Friendship “ म्हणून जागतिक पातळीवर ‘मैत्रीदिन’ म्हणून साजरी केली जाते. तर दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी.. जो यावर्षी २ ऑगस्ट रोजी होता.. भारत, अमेरिका, आणि यू. के. मध्ये ‘ मैत्रीदिन ‘ साजरा केला जातो.

… दरवर्षीप्रमाणे यंदाही, उपलब्ध असलेल्या सर्व सामाजिक माध्यमांवरून या दोन्ही दिवशी शुभेच्छांचा मुसळधार पाऊस पडला आणि मैत्रीला चिंब भिजवून गेला… आनंद आणि समाधान दोन्ही भरभरून देऊन गेला.

… वाचता वाचता सहजच असं लक्षात आलं की अशा बहुतेक सर्व शुभेच्छा “ मैत्री “ चे महत्व, प्रत्येकाच्या आयुष्यात तिची असणारी आवश्यकता, आणि अर्थातच त्यामागची कारणं, ‘मैत्री’ या शब्दाशी मूलतःच जोडल्या गेलेल्या भाव-भावना, आणि त्या भावनांबद्दल व्यक्त करावीशी वाटणारी कृतज्ञता … हेच सगळं ठळकपणे सांगणाऱ्या होत्या.. नेहेमीसारख्याच…आणि यात आक्षेप घेण्यासारखं खरोखरच काहीच नाही.

पण एका सुहृदाने मात्र मला एक हिंदी कविता पाठवली होती जी फक्त मैत्रीबद्दल न बोलता, स्वतःच्या एका जिवलग मित्राला उद्देशून लिहिलेली होती…भावना त्याच पण व्यक्त करण्याची पद्धत वेगळी.. आणि त्यामुळे अर्थातच ती मनाला फार भावली … त्या मित्राच्या आपल्या आयुष्यात असण्याबद्दल.. व्यक्तिशः त्याच्याबद्दल वाटणारा विश्वास आणि त्याच्याबद्दल मनात सतत असणारी कृतज्ञतेची भावना ठळकपणे व्यक्त करणारी ती कविता … आणि म्हणूनच त्या कवितेचे हे वेगळेपण मनाला थेट भिडले.

…. आणि त्या कवितेचा स्वैर भावानुवाद करण्याचा मोह टाळताच आला नाही.

हिंदी कवी श्री. विजय सिंह चौहान यांच्या.. ।। तुमसा कोई नहीं ।।.. या हृद्य कवितेचा हा स्वैर भावानुवाद ……

☆ तुझ्यासारखा तूच मित्रा.. ☆

भेटण्यासाठी कुठलंच कारण नको 

अन गप्पा मारण्यासाठी एखादा विषयही नको 

शब्दांचं अवडंबर नको… बस् फक्त तुझा आपलेपणा पाहिजे 

बाकी काहीच नको रे मित्रा …

 

मन जेव्हा मनाशी जुळतं..

नातं आपसूकच विणलं जातं 

मग कितीही वर्षं का उलटेनात..

मनात उजळणारे स्नेहाचे दिवे विझू शकतच नाहीत रे मित्रा …

 

भेट कितीही दिवसांनी होवो..

डोळ्यात तो पूर्वीचाच विश्वास असतो 

मग काही न बोलताही खूप काही बोललं जातं 

मनातल्या मधुर संवेदना एकमेकांच्या मनाला लगेच जाणवतात मित्रा …

 

कुठलाही स्वार्थ नाही.. कसलीच अपेक्षाही नाही 

फायदा- नुकसान याचा हिशोब तर नाहीच नाही 

तूच तो मित्र जो सदैव सोबत उभा असतोच असतोस 

प्रत्येक सुखाचे वा दु:खाचेही उत्तर तूच देऊ शकतोस मित्रा …

 

अशा तुझ्या सुंदर पवित्र मैत्रभावनेला माझा मनापासून सलाम मित्रा 

माझ्या मनातल्या मनात तुझा सततच सन्मान मित्रा 

हे आपलं मैत्रीचं घट्ट नातं आयुष्यभर असंच दरवळत राहू दे..

माझा-तुझा स्नेह अविनाशी आणि विश्वास असाच अतूट राहू दे मित्रा… 

खरंच.. तुझ्यासारखा फक्त तूच मित्रा…

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “प्रिय जुलै महिना…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “प्रिय जुलै महिना…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रिय जुलै महिना,

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष…?

कालच तू निघून गेलास, पण आजही तुझी आठवण आली म्हणून हा पत्र प्रपंच…? 

महिनाभर राहून गेलास, आपण बोललो – भेटलो तरीही मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्याच राहून गेल्या, त्या सांगण्यासाठी हे आंतरदेशीय पत्र तुला टाकत आहे.

हल्ली पत्राचा जमाना गेला, पण आपल्यापासून सुरुवात करायला काय हरकत आहे…?

… लहानपणी मी खूप पत्र लिहायचो… ते फिकट निळं, आभाळाच्या रंगाचं आंतरदेशीय आणायचं, कुणी येणार नाही अशा ठिकाणी खोलीचा एक कोपरा पकडून बसायचं, संध्याकाळ नंतर नक्षीदार चांदण्याची काळी साडी नेसून रात्र जशी नकळत येते… इतका वेळ कुठ्ठेही दिसत नसलेला चंद्र, रात्रीच्या भाळावर चांदीच्या बंद्या रुपयागत जसा अचानकपणे नकळतच चमचमतो, तसे शब्दही नकळत चमचम करत मनात यायचे रे…? 

… पिकात सोडलेलं पाणी जसं जमिनीत मुरतं, तसे सुचलेले शब्द मनात मुरायचे, खडे मीठ टाकून आंब्याच्या कोयीसकट, माठात घातलेल्या पिवळ्याशार लोणच्यासारखे…? 

… रानात पेरणी करावी आणि एक दिवस अचानक उठून बघावं आणि इतके दिवस काळ्याशार दिसत असलेल्या मातीत अचानक हिरवे कोंबच कोंब दिसू लागावेत… काळी मातीच जणू हिरवी होऊन जावी, तसं ते निळं पत्र माझ्या मनातल्या भावनांनी हिरवं होऊन जायचं…? 

शेवटी पत्राच्या एका कडेला जिभेवरून फिरवून थोडं ओलं केलं किंवा भाताची चार शितं या कडेवरून त्या कडेवर बोटानं लावली की, आधीच लावलेला डिंक मनातल्या मनात हरखून जायचा… भात खाऊन पोट भरल्यागत…?!!

हरखून, विरघळलेला तो डिंक पत्र घट्ट चिटकवायचा आणि नाती सुद्धा…? 

… नाती टिकवायला प्रेमाची चार शितं आणि थोडा मायेचा ओलावा लागतो हेच खरं…? 

पत्र लिहून झालं की, हाफ चड्डी सावरत, गावातल्या गल्लीबोळातनं फिरून, पत्र “पोष्टाच्या लाल पेटीत” टाकायला दुडक्या चालीनं पळत सुटायचो… पोस्टाची ती आsss करून उभी असलेली लाल पेटी, अजूनही मनात घर करून आहे रे… लहानपणी ती आsss करून उभी असलेली लाल पेटी दिसायची…

… आज आsss करून उभी असलेली उघडी नागडी चिल्ली पिल्ली दिसतात… पोटात भुकेचा वणवा पेटलेला… तो ही लालच…? 

.. ये लाल रंग कब मुझे छोडेगा…???

असो, यावेळी तू आणलेला पाऊस आम्हाला खूप आवडला. आम्ही तो पुरवून पुरवून वापरत आहोत.

कुणाला भिजवून गेला, तर कोणाची तहान भागवून गेला…

शेतकऱ्यांची चूल पेटवून गेला…? 

तुला सांगायचं राहिलं,

… आपल्या गावात ज्यांच्याकडे धड कपडे नाहीत किंवा घरं नाहीत, रस्त्यावर राहतात अशा सर्वांना रेनकोट आणि छत्र्या दिल्या आहेत, काळजी नसावी.

… आपल्या घरामागे जी गल्ली आहे ना, तिथल्या एकाने त्याच्या अपंग आईला, घराबाहेर काढले, तिला व्हीलचेअर दिली.

… त्याचं बघून दुसऱ्याने त्याच्या वडिलांना बाहेर काढलं, ते आजारी होते, पायाने अधू होते. त्यांना हाताने चालवायची तीन चाकी सायकल घेऊन दिली आहे. गंमत बघ, पूर्वी बाबा आपल्या लहान मुलांना तीन चाकी सायकल घेऊन द्यायचे, आज बाबांना तीन चाकी सायकल घेऊन देताना मला काय वाटलं असेल, हे शब्दात नाही सांगू शकत जुलै…

– – तर घराबाहेर काढलेल्या या आई-बाबांना भेटायला गेल्यानंतर जाणवले, त्यांच्यासारखे अनेक जण रस्त्यावर राहत होते… नाईलाजाने जगण्यासाठी याचना करत होते.

वेळ – मित्र – नाती यांना किंमतीचं लेबल नसतं पण हरवल्यावर त्यांचं मोल कळतं जुलै…

… ज्या आई-बाबांना, त्यांच्या मुला-मुलींनी घराबाहेर काढलं आहे, त्यांना आईबापाचं मोल कधी कळेल रे…?

.. या सर्वांनाच रस्त्यावरच गोळ्या औषधं दिली आहेत, रक्त लघवी तपासण्या केल्या आहेत, कुणाला कुबडी, कुणाला काठी, तर कुणाला मानेचे – कमरेचे पट्टे गरजेप्रमाणे दिले आहेत. जे मला रस्त्यात करायला जमत नाही अशा सर्वांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे.

तुला “तो” आठवला का…? हां… “तोच तो”…

त्याने आता टगेगिरी, मारामारी या सर्व गोष्टी सोडल्या आहेत. काम करू लागला आहे. परवा त्याच्या लग्नाला जाऊन आलो, तुझी आठवण काढत होता. सासरी जाताना मुलीच्या वडिलांना काय वाटेल, म्हणून स्वतःच रडणारा तो हाच तो, त्याच्या भावनांना सलाम करणारा मीच तो…? 

तुला तर माहीतच आहे, आपल्या गावात जे लोक असे बाहेर राहतात आणि याचना करतात त्यांना गोळा करून आपण त्यांच्याकडून जेवढा जमेल तेवढा गावाचा भाग झाडून पुसून स्वच्छ करत आहोत. या संपूर्ण टीमला आपण “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे.

.. दर आठवड्याला अशी स्वच्छता करून प्रत्येकाला महिनाभर पुरेल इतका किराणा दिला आहे.

.. आई स्वरूप अनेक माऊली होत्या, त्यांना नवीन साड्या दिल्या आहेत.

अरे हो, लहान लहान मुलांनी, जुलै काका कुठे गेला? जुलै काका कुठे गेला? असं म्हणत मला भंडावून सोडलं, मग त्यांची समजूत काढण्यासाठी काकांनी हे लाडू पाठवले आहेत, असं सांगून रस्त्यावरील सर्व चिल्ल्या पिल्लांना लाडू दिले.

आपल्या गावातले जे लोक सध्या कुठे ना कुठे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांना डबा आणून देणारं कुणीही नाही, अशा सर्वांना आपण जेवणाचे डबे पोच केले आहेत, त्याचप्रमाणे आपल्या गावातले जे लोक रस्त्याकडेला पडून आहेत, त्यांनाही जेवण दिले आहे. मागच्या पाच वर्षांपासून आपण रोजच्या रोज हे करत आहोत.

तुला माहित आहे ना जुलै… अनेक पालक घरातल्या लहान मुलांना शाळेत न टाकता, आपल्या मुलांना घेऊन भीक मागायला आपल्या गावातल्या धार्मिक स्थळांच्या बाहेर जमा होतात.

.. अशा अनेक पालकांना भेटून त्यांच्या संमतीने त्यांच्या मुलांना भीक मागणे सोडायला लावून त्यांना शाळा कॉलेजात घातले आहे.

… यावर्षी अशा साठ मुला मुलींना आपण शैक्षणिक मदत केली.

तुला ती चिंगी माहितीय…? तान्ही असल्यापासून तिची आई तिला भीक मागायला घेऊन जायची, यावर्षी आपण तिला नर्सरी मध्ये टाकलं आहे. तो पिंट्या… त्याला टॅलीचे क्लासेस लावले… ती पिंकी आठवते का तुला…? जुलै काका मला गाडीवर चक्कर मार असं म्हणणारी… हां तीच, तीला एमबीएला ऍडमिशन घेऊन दिलं आहे… अजून एकीला आयएएस व्हायचं आहे, हायस कुटं दोस्ता…?

– – सर्वात महत्त्वाची गोष्ट, भीक मागणाऱ्या ज्या लोकांना भीक मागणे सोडायचे आहे अशांसाठी आपण एक रोजगार केंद्र (Employment Centre) सुरू केलं आहे. तिथे आपल्या या लोकांच्या साथीने परफ्युम, कृत्रिम मोती आणि फुलांचे बुके, कापडी पिशव्या आणि लिक्विड वॉश अशा गोष्टी तयार करत आहोत, या सर्व वस्तूंच्या विक्रीतून आलेले पैसे त्यांचा पगार देण्यासाठी वापरत आहोत.

.. सध्या पंधरा ते वीस लोक या प्रकल्पात काम करत आहेत, ते कष्टकरी होऊन गावकरी झाले आहेत, याचा आनंद आहे… आणखीही अनेक लोकांना काम करण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना पगार देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, ही खंत सुद्धा आहे.

.. थोडा वेळ जाऊ दे, होईल सर्व व्यवस्थित, मैं समय हुं… असं तूच म्हणतोस ना जुलै…?

 तुझ्यावर विश्वास आहेच आणि आम्ही प्रयत्न सोडणार नाही, यावर विश्वास ठेव? 

 – – तू म्हणशील हे सर्व करतंय कोण…?

.. तर, मी तुला लिहिलेलं हे माझं पत्र जे आत्ता वाचत आहेत, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…? 

.. ज्यांनी दुसऱ्याच्या “वेदना” समजून घेऊन “वैद्य” होण्याचा प्रयत्न केला, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…?!

.. ज्यांनी स्वतःचे हात मला दान दिले आहेत, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…?!!

– – या सर्वांचे हात घेऊन, मी आणि मनीषा काम करत आहोत, ज्यांच्या समोर आम्ही कायम नतमस्तक होतो, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…

आता हे आंतरदेशीय पत्र पुरे करतो, जिभेनं ओलं करून, भाताची चार शीतं लावून, पत्र टाकायला पुन्हा पोस्टाच्या पेटीकडे पळत जायचं आहे…? 

… जाता जाता एक सांगतो, तू गावातून गेल्यानंतर आज आमच्याकडे ऑगस्ट रहायला आला आहे.

.. तो येताना श्रावण घेऊन आला आहे, अनेक सणवार तो आम्हांला भेट देणार आहे.

मित्रा जुलै, तू सुद्धा वारी आणि आषाढी एकादशी घेऊन आलास. सर्व वातावरण भक्तीमय झालं होतं… अजूनही आहे… कायम राहील…? 

… पण आम्ही काही उपवास केला नाही, कारण आम्ही रोजच पोटभर उपास करतो…

… भंगलेल्या मूर्ती काही दिवसात पुन्हा उठून उभ्या राहून, जेव्हा आशीर्वादाचे दोन शब्द माझ्या झोळीत टाकतात, अभंग मी तिथेच अनुभवतो…

… चंदनाची उटी नाही, माझ्याकडे मलमाची वाटी आहे… जखमांमुळे सडत चाललेले पाय, जेव्हा बरे होऊन चालायला लागतात, त्यांच्या पायाने जणू मीच वारी करतो…

… माझ्या हातातला स्टेथोस्कोप टाळ होतो आणि त्यांच्या हृदयातली धडधड मृदंग… भजन मी इथेच अनुभवतो…

… जीर्ण आणि जराजर्जर झालेल्या वृद्ध शरीरांवर मी भक्ती करतो, मग त्यांच्या कायेमध्येच मला विठ्ठल दर्शन देतो…

– – – म्हणून मग मी नाही गाठला चंद्रभागेचा तीर… ना गाठले पंढरपूर…

कळावे, लोभ असावा.

तुझा मित्र,

अभिजीत 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शिक्षण आणि सक्षमीकरण’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मीनल केळकर☆

मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

‘शिक्षण आणि सक्षमीकरण‘ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

एके दिवशी एका कंपनीत मुलाखतीच्या वेळी अनिल नावाच्या बॉसने सीमाला विचारले, “तुला या नोकरीसाठी किती पगाराची अपेक्षा आहे? “

सीमा बिनधास्त आत्मविश्वासाने म्हणाली, “किमान ९०, ००० रुपये. “

अनिलने तीच्याकडे पाहिलं आणि पुढे विचारलं, “तुला कुठल्या खेळात रस आहे का? “

सीमाने उत्तर दिले, “हो मला बुद्धिबळ खेळायला आवडते. “

अनिल हसत हसत म्हणाला, “बुद्धिबळ हा खूप मनोरंजक खेळ आहे. त्याबद्दल बोलूया. तुम्हाला कोणता बुद्धिबळ पॅटर्न सर्वात जास्त आवडतो? किंवा तुम्ही कोणत्या चालीने सर्वात जास्त प्रभावित आहात? “

सीमा हसत म्हणाली, “वजीर. “

अनिलने उत्सुकतेने विचारले, “का? माझ्या मते घोड्याच्या युक्त्या सर्वात अनोख्या आहेत. “

सीमाने गंभीरपणे उत्तर दिले, “खरं तर घोड्याच्या चाली रंजक असतात, पण बाकीच्या शिक्क्यांमध्ये वेगळेपणाने आढळणारे सगळे गुण मंत्र्याकडे आहेत. ” तो कधी सीलसारखं पाऊल टाकून राजाला वाचवतो, कधी तहानेने चालत आश्चर्यचकित करतो, तर कधी ढाल बनून राजाचे रक्षण करतो. “

तीच्या समजूतदारपणाने प्रभावित होऊन अनिलने विचारले, “खूप मनोरंजक! पण राजाबद्दल तुझे मत काय आहे? “

सीमाने लगेच उत्तर दिले, “सर, बुद्धिबळाच्या खेळात मी राजाला सर्वात कमकुवत मानते. ” तो स्वत:चा बचाव करण्यासाठी फक्त एक पाऊल उचलू शकतो, तर मंत्री त्याला प्रत्येक दिशेने संरक्षण देऊ शकतो. “

सीमाच्या प्रतिसादाने अनिल प्रभावित झाला आणि म्हणाला, “खूपच हुशार! उत्कृष्ट उत्तर. आता मला सांग यापैकी कोणता चेहरा तू स्वत:ला मानतेस? “

सीमाने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, “राजा. “

अनिल थोडं आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “परंतु पंतप्रधानांच्या मदतीची नेहमी वाट पाहणाऱ्या राजाला तुम्ही दुर्बल आणि मर्यादित म्हटले आहे. ” मग तू स्वतःला राजा का मानतेस? “

सीमा हलके हसत म्हणाली, “हो, मी राजा आहे आणि माझा मंत्री माझा नवरा होता. त्याने नेहमी स्वतःपेक्षा माझे रक्षण केले, प्रत्येक अडचणीत मला साथ दिली, पण आता तो या जगात नाही. “

हे ऐकून अनिलला जरा धक्काच बसला आणि त्याने गंभीरपणे विचारले, “मग तुला हे काम का करायचं आहे? ” “

सीमाचा आवाज भरून आला, तिचे डोळे ओले झाले. तीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, “कारण माझे प्रधान आता या जगात नाहीत. आता मला प्रधान होऊन माझ्या मुलांची आणि माझ्या आयुष्याची जबाबदारी घ्यावी लागेल. “

हे ऐकून खोलीत शांतता पसरली. अनिल टाळी वाजवत म्हणाला, “शाब्बास, सीमा. तू एक मजबूत स्त्री आहेस. “

शिक्षण आणि सक्षमीकरणाचे महत्त्व — — —

जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोंड देणाऱ्या सर्व मुलींसाठी ही कथा प्रेरणादायी आहे. मुलींना चांगले शिक्षण देणे आणि त्यांचे संगोपन करणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून त्यांना कधीही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला तर त्या प्रधान बनू शकतील आणि स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक मजबूत ढाल बनू शकतील…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तसंच जाऊ नको..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तसंच जाऊ नको..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

आपले संस्कार, आपली संस्कृती.

घरी आलेल्या कुणालाही ‘तसंच’ पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना ही ‘तसंच’ जायचं नाही हा आमच्या घरचा शिरस्ता!

या ‘तसंच’मध्ये जगभरचा पाहुणचार सामावलेला होता.

माझे कुणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटेवडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर.. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान “सफरचंदाची एक फोड तरी खा” म्हणत ती हातावर दे.

आई-बाबांचे ऑफिसमधले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर.

नातेवाईकांपैकी कुणी येणार असेल तर खास आवडी-निवडी जप हे सारं कसे अध्याहृतच होतं.

हे सगळं करताना आई-आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, कधीही श्रम दिसायचे नाहीत, आणि त्यांचं स्मितहास्य पण लोपायचं नाही… इतकं ते सारं अगदी सहज होतं! सहज होतं म्हणूनही ते सुंदरपण होतं!

पाहुण्यांसाठी असलेल्या ह्या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही ‘तसंच’ निघायचं नाही. घरातल्या सर्व माणसांसाठीही एक उपनियम होताच!

सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी, “‘तशीच’ जाऊ नको ग कॉलेजला! ” असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायचीच.

मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हां मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पांतून आजीला हे कळलं असावं. आणि मग..

“आजी, उशीर होतोय ग.. नकोय मला.. मी जाते तशीच, ” असं म्हणण्याचा अवकाश…

ती त्या मनसुखानीच्या नावाने बोटं मोडायची.

“त्या मनसुखानीला म्हणावं एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला ‘तशीच’ सोडत नसते. बाकी तू तुझं बघ, ” असा तिचा राग उफाळून यायचा पण घरातून निघताना ‘तसंच’ जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा.

आपण कुणाकडे जातानाही ‘तसंच’ जायचं नाही हा या सगळ्याचा व्यत्यास.. तोही तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बाटली भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे.. एक ना दोन! यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्षं घे.. चिकू घे, असलं काही न काही त्या करायच्या.

हे सगळे सोपस्कार आई-आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक! पण मी माझ्या शाळा-कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातेय तरी या ‘तशीच’ जाऊ नको गं, म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे, पण अनेकदा त्या-त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात ‘तशीच’ निघून जायचे. लहान आहे.. मोठी होईल तेव्हा कळेल, असं म्हणून सोडूनही द्यायच्या!

एकदाच आजीने या चिडचिडीवरचा उतारा केला.

मला म्हणाली, “कपभर चहाही न देता कुणाला ‘तसंच’ पाठवशील किंवा रिकाम्या हाताने कोणाकडे जाशील.. तर आपल्या घरातलं काही जाणार नाही.. पण पत मात्र जाईल. ज्याला ऐपत आहे, त्याने आपली पत सांभाळावी. ”

आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून ‘तसंच’ कुणी जात नाही. आणि आपणही ‘तसंच’ कुणाकडे जात नाही.

काय करणार..?

आजीचे नाते सांगणारी मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आपल्या आसपासच वावरत असतात ना.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ फुले बागेतली… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ फुले बागेतली नीलांबरी शिर्के 

फुले बागेतली

रंग गंध ल्याली

पावसात न्हाली

मनसोक्त?!

*

फुले बागेतली

परडीत आली

चरणी बैसली

देवाचिया?!

*

फुले बागेतली

उद्या सुकतील

निर्माल्य होतील

आपोआप?!

*

बागेतल्या फुला

अल्पसे जीवन

तरी दरवळून

जात असे?!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ह व्या स? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ह व्या स? ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

दृश्य विहंगम गाड्यांचे 

काल दिसले मजला 

कंटाळून खड्ड्यांना 

गाड्या गेल्या पोहायला

*

आनंदून काही गाड्यांनी 

लावले स्वतःचे हेडलाईट 

ओळीत पोहून सर्वांनी 

केल पाण्यात ऍक्रोबाईट

*

दिसेल वरचेवर माणसा 

हेच दृश्य भविष्यकाळी

फक्त गाड्यांची जागा 

शहरं घेतील त्या वेळी

*

वेळ अजुनी गेली नाही

कास धर पर्यावरणाची

नाहीतर तुझ्या ऱ्हासास

हीच डोकेदुखी कायमची 

 हीच डोकेदुखी कायमची 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – “खोया हुआ कुछ…” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ लघुकथा – “खोया हुआ कुछ…” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

-सुनो।

-कौन?

-मैं।

-मैं कौन?

– अच्छा। अब मेरी आवाज भी नहीं पहचानते?

– तुम ही तो थे जो काॅलेज तक एक सिक्युरिटी गार्ड की तरह चुपचाप मुझे छोड़ जाते थे। बहाने से मेरे काॅलेज के आसपास मंडराया करते थे। सहेलियां मुझे छेड़ती थीं। मैं कहती कि नहीं जानती।

– मैं? ऐसा करता था?

– और कौन? बहाने से मेरे छोटे भाई से दोस्ती भी गांठ ली थी और घर तक भी पहुंच गये। मेरी एक झलक पाने के लिए बड़ी देर बातचीत करते रहते थे। फिर चाय की चुस्कियों के बीच मेरी हंसी तुम्हारे कानों में गूंजती थी।

– अरे ऐसे?

– हां। बिल्कुल। याद नहीं कुछ तुम्हें?

– फिर तुम्हारे लिए लड़की की तलाश शुरू हुई और तुम गुमसुम रहने लगे पर उससे पहले मेरी ही शादी हो गयी।

-एक कहानी कहीं चुपचाप खो गयी।

– कितने वर्ष बीत गये। कहां से बोल रही हो?

– तुम्हारी आत्मा से। जब जब तुम बहुत उदास और अकेले महसूस करते हो तब तब मैं तुम्हारे पास होती हूं। बाॅय। खुश रहा करो। जो बीत गयी सो गयी।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares